भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 500, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 500

४५८ सार्थ तुकारामगाथा इच्छेचे रहस्य समजावून घेण्यासारखे आहे ईश्वराचे हे मानवी रूपच सौम्य व तृप्ती देणारे असते त्याच रूपाच्या सहवासात भक्ताचे मन विसावते

या अभंगात ईश्वराचे निर्गुणनिराकार रूपाचे ज्ञान नको, आत्मस्थितीभाव नको, ब्रह्मज्ञान नको, असे म्हटले आहे याचा अर्थच असा की, त्या परमेश्वरास आपल्या सर्व इंद्रियांनी भोगता यावे, अशी इच्छा भक्ताची असते चरणावर डोके ठेवण्यापासून एकान्तात हितगुज करण्यापर्यंतच्या विविध बाबतीत भक्तांना मोठे सुख वाटते सर्व काही एकच आहे, हे ज्ञानाने समजते बुद्धीस त्याचे आकलन होते, पण प्रेमाशिवाय त्यात मग उणीव निर्माण होते म्हणून भक्त सगुण प्रेमावर येऊन ज्ञानाचाच भाग मागतात परमेश्वराचे विश्वरूप पाहून अर्जुन त्यास म्हणाला, 'ते हें विश्वरूप आपुले । तुम्हां मज डोळां दाविले । तरि माझं मन झाले । तृप्त देवा' अवाढव्य असे हे डोळ्यात न मावणारे रूप जरी अर्जुनास आनंद देणारे होते, तरी त्यात एक प्रकारची भीती होती या हजार बाहूच्या रूपास दोन हातांनी कवळावे कसे ? हाही प्रश्न त्याच्या समोर होता त्याच्याशी प्रेमातल्या गोष्टी कशा बोलाव्यात ? म्हणूनच त्याने जी विनंती ईश्वरास केली, तिचा आविष्कार ज्ञानेश्वरांच्या शब्दात सहजसुंदर अशा स्वरूपात असा आहे 'परि आता ऐसी चाड जीवीं । जे तुजसी गोडी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगूनि तूतें' पण हे सर्व या विश्वरूपाशी कसे घडणे शक्य आहे ? 'ते येचि स्वरूपीं करू म्हणिजें । तरि कोणे एके मुखेंसीं चावळिजे । आणि कवण्हा खेंव देइजे । तुझ लेक नाहीं ।' अशी अवस्था असल्याने त्या सगुण रूपाशिवाय भक्तांस कधीच समाधान होत नाही अर्जुनाला कसे रूप हवे होते ? ज्ञानेश्वरांनी आपल्या सुकुमार शब्दात वर्णन केले आहे 'मस्तकीं मुगुटांतें ठंचिले । कीं मुकुटा मुकुट मस्तक झाले । शृंगारा लेणें लाधले । अंगाचेनि जया ॥ इंद्रधनुष्याचिये आडणी । मानो मेघ गगनधरणीं । तैसे आथरिले शारंगपाणी । वैजयंतिया ।' अशा या सुंदर सगुणरूपाची आवड भक्तांच्या मनात नेहमीच असते अर्जुनाने अगदी बाळुबोलीस येऊन व भगवंतास विनंती केली आहे की, 'हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आता होतात आधले । कृष्णमूर्तीलागी ॥ ते साकार कृष्णरूपडे । वाचूनि पाहो नावडे । तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवाचूनि मान नाहीं । म्हणोनि तैसाचि साकारू होई । हे सावरो आता ।'

याही ठिकाणी ज्ञानेश्वरांनी या सगुण व साकार मूर्तीपुढे आम्हास मोक्षाचीही काही किंमत नाही, असे सांगितले आहे सगुणभक्तीपुढे, ईश्वरस्मरणापुढे, भजनापुढे, संतसंगतीपुढे संतांना मोक्ष तुच्छ वाटतो ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या थोर संतांनी मुक्तीची अथवा मोक्षाची कधीही चिंता केलेली नाही उलट भक्ति- सुखावाचून मोक्ष असला तर तो कटाक्षाने दूर सारला आहे 'सांडुनि पंढरीची वारी । मोक्ष मागती ते भिकारी ।' 'मुक्ति मुक्ति मागो तुज । तरी मज हासती पूर्वज ।', 'मुक्तिपद मी या अभिलाषीन चित्तीं । क्षणी अंतरेतो बाप तुम्हे ', 'कर जोडूनि दोन्ही मोक्ष पाहे वाट । म्हणे होईन दास हरिदासाचा ।' यासारख्या नामदेवांच्या वचनातून मुक्तीऐवजी थोर भक्त भक्तीतच कसा सुखावलेला असतो, हे ध्यानात येईल सर्व संतांची साक्ष याच पद्धतीची आहे 'सांडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ती मागसी अधमा ।', 'न मांगो मुक्ति आणि 'मुक्ति । ती फजीती कोण सोसी' 'मुक्तिपद देता न घे फुकासाठीं । तैं हिंडे पाळुवटीं दोन रूप' 'मोक्ष मुक्तिंतें देवा । नव्हे गोड तया ठावा' यासारख्या वचनामधून एकनाथांनी मुक्तीपेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केलेले आहे तुकारामबुवांनी तर मोक्षाच्या तुच्छतेचा आपल्या अभंगातून वर्षावच केला आहे 'मोक्षपदें तुच्छ केलीं या कारणे । आम्हा जन्म घेणें युगायुगीं ।', 'देवा ऐक हे विनंति । मज नको रे हे मुक्ती', 'मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ।', 'नलगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेता जन्म ऐसे ', 'नाहीं चाड मोक्षपदीं, भजनौ आवडीं ।' यासारख्या अनेक चरणातून मोक्षसुखाऐवजी सगुण रूपाच्या भक्तीचे व संतसंगाचे महिमान तुकोबांनी वर्णन केले आहे

१०२३ मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥ १ ॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ २ ॥ अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागर उपमन्या ॥ ३ ॥