भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 501, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 501

सार्थ तुकारामगाथा ४५९ गजेंद्रपशु नाडियें¹ जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥ ४ ॥ प्रल्हाद अग्नीत राखिला जळात² । विषाचे अमृत तुझ्या नामें ॥ ५ ॥ पाडवा सकट पडता जडभारी । त्याचा तूं कैवारी नारायणा ॥ ६ ॥ तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनिया मात शरण आलो ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - दीनानाथ-गरिबाचा नाथ, अजामेळ-कान्यकुब्ज देशातील दुराचारी ब्राह्मण, गणिका- वेश्या, पिंगला, भिल्ली-शबरी, धुरु-ध्रुव, उपमन्यू-व्याघ्रपादाचा मुलगा, गजेंद्रपशु-गजेन्द्र हत्ती, नाडियें-दस्त केले, जळचरें-मगरीने, जडभारी-मोठे संकट, मात-कीर्ती अर्थ - देवा, यापूर्वी तुम्ही पुष्कळ पातकी लोकांचा उद्धार केलेला आहे म्हणूनच तू दीनाचा, गरिबाचा नाथ आहेस ना ? १ त्यावेळी तुम्ही कुणाचाही अपराध पाहिले नाहीत, की कुणाची जात कोणती आहे ? कूळ कोणते आहे ? हेही पाहिले नाही अजामेळ, गणिका, भिल्लीण यासारखे हीन व पातकीही तू तारलेस २ त्या ध्रुव बालकास तू ध्रुवस्थानाच्या अढळ पदावर बसविलेस त्या उपमन्यू बालकास दुधाचा समुद्र मिळवून दिलास. ३ गजेन्द्र नावाच्या हत्तीस पाण्यातील एका मकराने पकडले तेव्हा, त्याला या संकटातून तूच ना राखलेस ? त्याचे तूच ना रक्षण केलेस ? ४ प्रल्हादासारख्या विष्णुभक्तास त्याच्या पित्याने अग्निकुंडात टाकले, तेव्हा त्याचे रक्षण तूच देवा केलेस त्याचे पाण्यापासूनही रक्षण केलेस त्याच्या मुखात जाणाऱ्या विषाचे अमृत देवा, केवळ तुझ्याच नामामुळे झाले, हे खरे ना ? ५ त्या पांडवाना त्याच्या आयुष्यात मोठमोठी संकटे थोडी का आली ? पण नारायणा, त्याचा कैवार घेऊन तूच त्यांना वाचवीत होतास तूच त्याचे अनेक प्रसंगी रक्षण केलेस ६ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू अशा प्रकारे अनाथाचा नाथ आहेस अशी ही तुझी कीर्ती ऐकून मी तुला शरण आलो आहे ७ विवरण -आपणास ईश्वराने तारावे, आपणावर कृपा करावी, म्हणून थोर भक्त मागचे दाखले देत असतात याही अभंगात तुकोबांनी अजामेळ, गणिका, ध्रुव, उपमन्यू गजेन्द्र प्रल्हाद, पांडव इत्यादीची उदाहरणे नेहमीप्रमाणे दिलेली आहेत मागे अभंग क्र २५७, ३७२, ४२७ इत्यादीमधून वरील अभंगातील काही कथांचे संदर्भ आलेले असल्यामुळे त्या त्या ठिकाणचे अर्थ व विवरण पाहावे येथे फक्त ध्रुवाची कथा व गजेन्द्रमोक्षाची कथा याचा संदर्भ थोडक्यात पाहू ध्रुव हा उत्तानपाद राजाचा सुनीती नावाच्या पत्नीपासून झालेला मुलगा, हा मोठा भगवद्भक्त होऊन गेला एकदा याच्या सावत्र आईने, सुरुचीने, सवतीमत्सराने ध्रुवास उत्तानपादाच्या मांडीवरून खाली ओढले, कठोर शब्दांचे भाषणही तिने केले विषण्ण ध्रुव रडत रडत आपल्या आईजवळ गेला आपल्यावर ईश्वराची कृपा नाही म्हणूनच आपणास हे दुःख भोगावे लागले, असे त्यास आईने सांगितल्यावर ध्रुव ईश्वरप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी रानावनात निघून गेला तेथे नारदानी त्याला 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र दिला या मंत्राच्या शास्त्राने बालध्रुवाने तपश्चर्या केल्यावर ईश्वर प्रसन्न झाले व त्यांनी त्याची भक्ती पाहून त्याला अढळपद दिले, अशी पुराणातून कथा आहे तुकाराम महाराजांनी मोठ्या कौशल्याने 'अढळपदीं बाळ बैसविला धुरु' असा सार्थ उल्लेख केला आहे भगवंताने गजेंद्राचे रक्षण कसे केले, याविषयीही कथा पुराणातून सापडते अगस्त्य मुनीच्या शापाने इंद्रद्युम्न नावाचा एक राजा हत्तीच्या जन्मास जाऊन त्रिकूट गिरीवर निवास करीत होता तहानेने व्याकूळ झालेला असताना एकदा हा सरोवरात पाणी पिण्यासाठी व जलक्रीडेसाठी गेला असताना, त्याचा पाय पाण्यातील एका मगरीने धरला हा मगर अथवा नक्र हा पूर्वजन्मीचा गंधर्व असून देवलमुनीच्या शापाने या नक्राच्या जन्मास आला होता गजेन्द्र संकटात सापडताच त्याचे आप्तस्वकीय सर्व त्यास सोडून गेले मकराची मिठी तीव्र होत होती अशा संकटप्रसंगी गजेंद्राने भगवंताची स्तुती केली व त्यानंतर श्रीहरीने येऊन स्वतःच्या सुदर्शन चक्राने नक्रास मारून गजेन्द्राचे रक्षण केले ईश्वराच्या कृपेने पुढे गजेन्द्र व नक्र असे दोघेही वैकुंठाला गेले असल्याची कथा आहे तुकाराम महाराजांनीसुद्धा या गजेन्द्रकथेचे अनेक उल्लेख आपल्या अभंगातून केलेले आहेत 'गजेन्द्र तो हस्ती सहस्रन वरुपें । पल्लवामाजि नक्रें १ नाडिला, २ जळात