भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 507, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 507

सार्थ तुकारामगाथा ४६५ विवरण — या व या वरील दोन तीन अभंगातील तुकारामबुवांच्या मनाची वर्तता सहज ध्यानात येण्या- सारखी आहे वात्सल्य व सख्य या दोन भावानी महाराजांचे चित्त द्रवून गेलेले असल्यामुळे या अभंगातून उच्च भूमिकेवरचे भाव सोप्या सोप्या शब्दात सहज रीतीने व्यक्त झाले आहेत ईश्वराशी किती लडिवाळ असावे, त्याच्याशी किती जवळीक साधावी, किती कौतुकाने त्याच्याशी लगट करावी, किती प्रेमाने त्याच्याशी नाते जडवावे, यासवंधीची उत्तम साक्ष या अभंगात आहे. आपला शीण कुणी तरी जाणावा, कुणी तरी आपल्या तहानभूकेची चौकशी करावी, कुणीतरी कौतुकाने आपली समजूत काढावी, अशी जी आपली इच्छा असते, ती पुरविणारा हा एक समर्थ श्रीविठ्ठलच असल्यावर मग त्या सुखाचे वर्णन अवीट व्हावे यात नवल ते काय ? १०३४ तेव्हां धाले पोट बैसलों पंगती । आता आम्हा मुक्तिपांग काई ॥ १ ॥ धांवा केला आता येई वो' धांवोन । येथें काई करणे न लगे संदेह ॥ २ ॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ । आनंदें सकळ भरी आले ॥ ३ ॥ देवाच्या सख्यत्वे विषमासी ठाव । मध्यें कोठें घाव राहो सके ॥ ४ ॥ तेव्हां जाली अवघी बाधा वातावरत । प्रेम हृदयांत प्रवेशले ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हीं जितिले भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- धाले-सतुष्ट झालो, मुक्तिपाग-मुक्तीची इच्छा, विषमासी-सकटास, ठाव-जागा अर्थ - जेव्हा मी देवाबरोबर त्याच्या पंगतीसच बसलो, तेव्हा माझे पोट भरून आल्यामुळे मी सतुष्ट झालो आता आम्हास मुक्तीची इच्छा कुठून असणार २ १ आता त्याचा धावा करताच तो धावून येईल; या विषयी मनात संशयच नको. २ आता त्याचे गायन करून गुणवर्णन करण्याचीही वेळ राहिलेली नाही, सर्वच त्याच्या प्रेमानंदाने भरून गेले आहे ३ देवाच्या मैत्रीमध्ये विषम भावनेस किंवा सकटाना स्थान कुठून असणार ? कारण मध्ये कुठे रिकामी जागा असतच नाही ४ या श्रीहरीचे प्रेम जेव्हा माझ्या हृदयात प्रवेश करू लागले, तेव्हा सर्व कामादिक शत्रूची वाताहत झाली दुर्वसिनाचा घात झाला ५ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देवास खात्रीने जिंकले आहे, असा विश्वास मला आहे. कारण आपल्या दासास देव कधी सोडून देईल की काय ? ६ १०३५ तरि का पवाडे गर्जती पुराणे । असता नारायण शक्तिहीन ॥ १ ॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरा वाणीत ना ॥ २ ॥ तरिच म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखी गुण ॥ ३ ॥ चांगलेपण हें निरुपमता' अंगी । बाणले श्रीरंगीं म्हणऊनि ॥ ४ ॥ तरिच हा थोर सागितले करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे तरि करितो याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - निरुपमता - उपमा नसलेला, हेवा-हाव, कुडें-वाईट अर्थ - जर खरोखरच हा नारायण दुर्वल असता, तर त्याची एवढी कीर्ती पुराणांनी गर्जून का सांगितली असती ? १ याची कीर्ती असल्याखेरीज का नामाच्या महात्म्याचा डांगोरा सर्वत्र पिटून राहिला आहे ? याशिवाय मानाने व कीर्तीने एकमेकाची स्तुती केलीच असती २ देवा, तुम्ही या जीवास जर सुखी केलेत, तरच तो चिरजीव आहे असे म्हणता येईल ३ या श्रीहरीच्या अग्री चागूलपणा हा इतका आहे की, त्यास उपमा नाही या श्रीरगाच्या अंगी हा चागूलपणा पूर्णपणे बाणलेला आहे ४ या श्रीहरीपाशी कसलाच अभिमान नसल्यामुळेच तो थोर असल्याचे सागितले जाते ५ तुकाराम महाराज म्हणतात, या देवापाशी कधी कुणाची वाईट हाव नसते म्हणूनच सर्व लोक त्याची सेवा करतात ६ १ होईल धावणे । तया काई करणे लागे संदेह, २ निरुपायत तु गाया ५९