भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 508, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 508

१०३६ अविट हे क्षीर हरिकथा माउली । सेविली' सेविली वैष्णवजनीं ॥ १ ॥ अमृत राहिलें लाजोनि माघारे । येणे रसे थोरें ब्रह्मानंदें ॥ २ ॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवांऐसें ॥ ३ ॥ सर्व सुखें तया मोहरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥ ४ ॥ निर्गुण² हे सोंग धरिलें गुणवंत । धरूनिया प्रीत गाये नाचे ॥ ५ ॥ तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होउनि ठेला ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अविट-कंटाळा न येणारे, क्षीर-दूध गाळणी-वगळून, अर्थ - या हरिकथामाउलीचे दूध अतिशय अविट आहे त्याचा कधीही कंटाळा येत नाही याचे सेवन आजपर्यंत अनेक वैष्णवांनी केलेले आहे १ या हरिकथेपुढे प्रत्यक्ष अमृतही लाजून माघारे फिरते या हरिकथेच्या रसाने फार थोर प्रकारचा ब्रह्मानंद झालेला असतो २ जे कोणी पतित, पातकी आहेत, ते संतांच्या पवित्र पंगतीत या हरिकथेच्या प्रसंगी बसून पावन होतात या कथामृतान तेही देवाप्रमाणेच चतुर्भुज होऊन जातात ३ ज्या ठिकाणी या कथेच्या निमित्ताने वैष्णवांची गर्दी होते तेथे सर्व प्रकारची सुखे मोहरली जातात, अंकुरतात ४ या निर्गुण श्रीहरीने या कथारसाच्या वेळेस गुणवान असे रूप धारण केले असून तो मोठ्या प्रीतीने स्वतःच नृत्य करू लागतो, गाऊ लागतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनांना वगळून, चाळणी करून, निवडून मी हे हरिकथेचे साधन अतिशय सुलभ असे निश्चित केले आहे याच सुखात मी तृप्त झालो आहे ६ विवरण -हरिकथा किंवा कीर्तनभक्ती हे एक सर्वोत्तम साधन ईश्वरप्राप्तीचे म्हणून साधुसंतांनी मानले आहे या हरिकथामाउलीची थोरवी तुकोबांनी या अभंगात गाइली आहे तिच्यापुढे अमृत लाजून दूर सरते, पतित लोक पावन होऊन जातात, निर्गुण असणारा भगवंत तिच्याच नादात सगुणसुंदर होऊन या कीर्तनाच्या जागी येऊन उभा असतो, वगैरे वर्णन मागील संतपरंपरेस धरूनच आहे हरिकथा या कीर्तन हे सर्वांना आवडणारे व सुलभ असे साधन आहे गायन, नृत्य, वाद्य यांच्या आविष्कारास यात भरपूर वाव असल्यामुळे बहुजनांसही याची प्रीती विशेष असते शिवाय कथात्मक निरूपणामुळे मनोरंजनाबरोबर परमेश्वराचे गुणगान केल्याचाही श्रेय हाती येते नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार मानले जातात मुभाचा वरगोठा व रकंटयाची लंगोटी लावून ते वाळवंटात पंढरपुरात कीर्तन करीत असत सगुण प्रीतीचा व कीर्तनभक्तीचा एक थोर आदर्श म्हणजे नामदेवराय होत ' नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं' अशीच त्यांची प्रतिज्ञा होती, या कीर्तनात प्रत्यक्ष देव सगुणसुंदर रूपात हजर असतो अशी श्रद्धा तर सर्वच संतांनी व्यक्त केली आहे ' कीर्तनाचे सुखें सुखी होतो देव' या नामदेवाच्या वचनात स्वतः भगवंतास कीर्तनाची आवड किती आहे हे स्पष्ट केले आहे ' कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा । नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसे', 'देवांसी तो मुख्य कीर्तनाची गोडी । म्हणोनिया उडी घाली स्वयें', 'कीर्तने तोष्ये अधोक्षज । राखी लाज भक्तांची', 'कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी' इत्यादी शेकडो वचनांतून एकनाथांनी कीर्तनाचा व देवाच्या आवडीचा संबंध स्पष्ट केलेला आहे ज्ञानेश्वर नामदेवापासून तुकाराम-रामदासांपर्यंत सर्वच श्रेष्ठ साधुसंत हे स्वतः थोर दर्जाचे कीर्तनकारही होते त्यामुळे कीर्तनाचे सुख त्यांना स्वानुभवाने पटलेले होते कीर्तनसुखाची चटक त्या प्रभूलाही कशी असते, याचे वर्णन तुकोबांनीही पुनः पुनः केले आहे ' कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव सगी आहे', 'न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटीं । जय तेथें दाटो । वैष्णवांची धावोनि', 'हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासाची' इत्यादी वचनांतून प्रत्यक्ष ईश्वरासही या कीर्तनाने किती सुख होते, याचे वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे या कीर्तनाचा आणखी एक लाभ असा की, या साधनाने देवास व भक्तास जसे सुख होते, तसाच फायदा पातकी लोकांनाही होतो नारदापासून या कीर्तनाचा महिमा सर्वांनी गाइला आहे यज्ञयाग, जपतप, व्रतेवैकल्ये १ सेविता सेविली, २ निगुण आकार झाला गुणवंत