भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 519, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 519

केल्यामुळे आता माझा भार हलका झाला आहे २ मी पूर्वीपासून तुमची कितीतरी काकुळतीने विनवणी करीत आलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आज मात्र तुम्ही मला पदरी घेतल्यामुळे माझी सेवा सफळ झाली असे मला वाटते ४ पाईक-अभंग ११. १०६२ पाईकपणें१ जोतिला सिद्धांत । शूर धरी मात वचन चित्तीं ॥ १ ॥ पाइकावाचून नव्हे कधीं सुख । प्रजामध्यें दुःख न सरे पीडा ॥ २ ॥ तरि व्हावें पाईक जिवाचे उदार । सकळ त्याचा भार स्वामी वाहे ॥ ३ ॥ पाइकीचे सुख जया नाही ठावे । धिग त्यांनीं ज्यावे वायाविण ॥ ४ ॥ तुका म्हणे एका क्षणाचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा -पाईकपणें-सेवकपणा, जोतिला-जोडिला, सांगितला, ज्याचें-जयाचे अर्थ -मी सेवकपणाचा जो विचार सांगितला आहे, तो जो शूर पुरुष असेल तोच चित्तात धरून नीट समजावून घेईल १ सेवक झाल्यावाचून सुख कधीच लाभणार नाही त्याशिवाय प्रजेमधील दुःख, पीडा दूर होणारच नाही २ तरी जीवावर उदार होऊन तुम्ही सेवक व्हावे. तुमचा सर्व भार तो देव स्वतः वाहील ३ सेवकाच्या सुखाची ज्याला कल्पना नाही, त्याचे जन्माला येऊन जगणे व्यर्थच आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, एक क्षणभर जरी सेवकपणा अंगी बाणला तर अपार असे सुख त्यास भोगायला मिळेल ५ विवरण - या पुढचे दहा अभंग पाईक-अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत पाईक म्हणजे शूर शिपाई, सेवक, वीर पुरुष जीवनाच्या विविध क्षेत्रात पाईकपणाने वागणे किती महत्त्वाचे आहे, याचा स्पष्ट बोध या अभंगातून तुकाराम बुवांनी केलेला आहे राजकारण असो, देशरक्षण असो, विद्यासंपादन असो की परमेश्वरप्राप्तीची साधना असो, त्यात पाईकाचे, सेवकाचे गुण हवेतच या सेवकाच्या वृत्तीशिवाय कोणतही अवघड काम होणे शक्य नाही तुकाराम- बुवाच्या या अभंगातून निव्वळ परमार्थाचा बोध किती, व त्यातील राजकारणाचा अर्थ किती, याबद्दल शाहिंच्या मनात संशय येण्यासारखा आहे शिवरायांचे कार्य नजरेसमोर ठेवून तुकोबांनी पाईकाना, स्वराज्याच्या शिपायाना उद्देशून या अभंगातून उपदेश केलेला आहे, असेही मानिले जान या अभंगाच्या निर्मितीचाही प्रसंग सांगितला जातो, तो असा की, एकदा शिवबा व त्याचे महवारी शूर वीर पुरुष असे सर्वजण तुकाराममहाराजाचे कीर्तन ऐकत बसले होत 'थोर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळा पाया पढे' या अभंगाचे स्मरण होऊन वारकरी विठ्ठलभक्ताना व स्वराज्यसाधकाना एकदमच बोध व्हावा, असे तुकोबाच्या मनात आले व त्या प्रसंगी त्यांनी हे 'पाईक अभग ११' म्हटले धीरत्व, पुढारी- पणाची वृत्ती, धीटपणा, जीवावर उदार होऊन कुठेही धैर्याने उडी घेण्याची हिंमत या सर्व गोष्टीची जशी जरूरी स्वराज्यसाधनेस आहे, तशीच ती जीवनाच्या इतरही क्षेत्रात विविध ठिकाणी आहे, असे स्पष्ट दिसत परमार्थाच्या क्षेत्रातही या गुणाना किती महत्त्व आहे, ते या अभंगावरून समजण्यासारखे आहे १०६३ पाइकीचें सुख पाइकासी ठावे । म्हणोनिया जीवे केली साटीं ॥ १ ॥ येता गोळ्या बाण साहिले खडमार । वर्षाता अपार वृष्टि वरी ॥ २ ॥ स्वामीपुढें व्हावे पडता भांडण । मग त्या मडन शोभा दावी ॥ ३ ॥ पाइकांनीं सुख भोगिले अपार । शुद्ध आणि धीर अतर्याहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे या सिद्धाताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - मडन-भूषण, अलकार १ पाईक म्हणे