सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 557, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५११ परंतु नंतर ही उणीव भरून काढण्याचा पहिला प्रयत्न गीतेमध्ये झाला. जातीचा, वर्णाचा, स्त्रीपुरुषादी भेदाचा किंवा इतर कसलाही फरक न करता सद्गती देणारा भगवद्भक्तीचा मार्ग सर्वांना सहज व सुलभ करून दिला तो या गीताप्रणीत भागवतधर्मानेच होय. 'स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्' असा निर्णय भगवद्गीतेने दिलेला आहे. स्त्रिया, वैश्य व शूद्र यांच्याबरोबर अन्त्यजादी पापयोनी याचाही उल्लेख आहे. याप्रमाणे समाजातील सर्व वर्णातील लोकांना मोक्षाचे द्वार खुले झाले होते. तोच नेमका आधार घेऊन भागवतधर्मीय संतांनी हा मार्ग सहज सुलभ करून सोडला. 'ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चांडाळा आहे अधिकार । याळें नारीनर आदि- करोनि वेश्यादि' असा त्याचा खुलासा तुकारामबुवांनी या अभंगात केलेला आहे. हिंदुधर्माप्रमाणे बौद्धधर्मांतही वेश्येसही या मार्गाची प्राप्ती सुगम झालेली दिसते. बुद्धाने आम्रपाली या वेश्येस व अंगुलीमाल नावाच्या चोरासही दीक्षा दिली असल्याची हकीगत सापडते. पिंगलादी वेश्याचा संदर्भ या ठिकाणी ध्यानात राहण्यासारखा आहे. कान्होपात्रा ही तर एका नायकिणीची मुलगी होती. आपल्या दुष्कृत्याबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप व ईश्वरावर संपूर्ण विश्वास, यामुळे मोक्षाची दारे सर्वांनाच या भक्तिमार्गामुळे खुली झाली ११८४ न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥ १ ॥ अविनाश सुख देईल निर्वाणीं । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥ २ ॥ आणिकियां जीवां होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥ ३ ॥ आहिच्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥ ४ ॥ तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- निर्वाणी-अखेरीस, आहिच्य-या लोकात, परत्र-परलोकात. अर्थ :- काही एक तळमळ न करिता तू आपले मन शांत व स्वस्थ करून तू आता स्थिर हो हा माझा स्वामी मोठा कृपाळू आहे. १ हा तुला अखेरीस अविनाशी असे प्रेमामृत देईल व त्यामुळे तुझ्या चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांच्या खेपा चुकतील. २ तुझ्या स्वतःच्या अशा उद्धारामुळे आणखीही पुष्कळ लोकांचा उद्धार होईल व तुझ्या हातून कोट्यवधी उपकार पडतील. ३ या लोकी व परलोकीही तुझी मान्यता वाढेल. यासाठी पण तू मुखाने राम राम असे शब्द म्हणत राहा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू या संसाराचा लोभ मान सोडून दे. तरच तुला परमावधीचा आनंद प्राप्त होईल. ५