सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 573, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५२७
१२०५ नाहीं सतपण मिळतें१ हें हाटों । हिंडता कपाटीं रानीं वनीं ॥ १ ॥ नये मोल देता धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥ २ ॥ तुका म्हणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - हाटों- बाजारात, कपाटीं- गुहात. अर्थ :- सतत्वाची प्राप्ती कुठे बाजारात विकत मिळत नाही किंवा रानावनात कुठे, डोंगरातील गुहांतही ते कधी प्राप्त होत नाही १ वाटेल तेवढे मोल धनाची रास ओतून जरी दिले, तरी काही त्याची प्राप्ती होणार नाही. ते आकाशात किंवा पाताळात धुंडूनही मिळणार नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, ते फक्त आपला जीव परमेश्वरास अर्पण करण्याची तयारी आपली असेल तरच, ते आपणांस मिळेल. अशी तयारी नसेल तर सत्त्वाची गोष्ट कुणीही कधी बोलू नये ३ विवरण - वरील दोन अभंगात तुकाराम बुवांनी सतांचे व सतत्वाचे महत्त्व स्पष्ट केले आहे सताचे महत्त्व शाब्दिक पंडिताना कधीच समजणार नाही, आपण स्वतःच जेव्हा सत्त्व अंगी बाणवून घेऊ, तेव्हाच त्याची प्रचीती आपणास येईल सत्तत्वही बाह्य देखाव्याची खूण नसून ती एक अंतरंगाची अनुभूती आहे हे सतपण वाटेल एवढी धनसंपत्ती जरी खर्च केली तरी बाजारात, गिरिकुव्हरात, आकाशात, पाताळात, किंवा इतरत्र कुठेही मिळणार नाही केवळ श्रीहरीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची ज्याची इच्छा आहे, त्यालाच या सत्त्वाचा अनुभव घेता येईल, असा निर्णय बुवांनी येथे दिलेला आहे तुकोबांच्या वेळी घरोघरी बवी व संत निर्माण झाल्यामुळे खरा संत कोण, खरे सतत्व कोणते, यासंबंधी एकसारखी जागृती त्यांना करावी लागली आहे संतदर्शनाची व संतसगतीची गोडी ज्ञानेश्वरानामदेवापासून तुकाराम बुवांपर्यंत सर्वच संतानी वर्णन केलेली असली तरी, खऱ्या संतत्वाचा निवाडाही प्रत्येक संतास इतर लोकांसाठी करावा लागला आहे लोकांना फसविणारे, खोट्या परमार्थाची खात वाट दाखविणारे, लुबाडणारे, भोंदू साधुसत वित्तीयरी असतात त्यांच्यापासून लोकांनी सावध असावे म्हणून जाग्रूपनेने थोर संतानी संतत्वाच्या खुणा पुन पुन वर्णन करून सांगितल्या आहेत 'ब्रह्ममूर्ती सत जगीं अवतरले । उद्धरात्रया आले दोन जना', 'सर्वाभूतीं पाहे एक वासुदेव । पुसोनिया ठाव अहंताचा । तोचि सतसाधू ओळखावा निका', असे संताचे वर्णन नामदेवानी केलेले आहे जो लौकिकाविषयी उदासीन आहे, ज्याच्या अंतरंगात प्रेमाचा जिव्हाळा आहे, ज्याच्या वाणीत नेहमी राम कृष्ण असा जप आहे, तेच खरे संत, असे त्याचे सांगणे आहे निळोबारायानी संताच्या लक्षणाविषयी व त्याच्या महत्त्वा- विषयी फार उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले आहे 'तेचि संत तेचि संत । ज्याचा हेत विठ्ठलीं' हे संत कसे असतात ? तर निळोबानी सागितले आहे, 'नेणती ते आपपर । विश्वीं झाले विश्वंभर', 'हरीच्या नामामृतें धाले । गिळूनी यहाळा राहिले' अशा भाषेत त्यानी संतांचा महिमा वर्णन केलेला आहे १२०६ नामाची आवडी तोचि जाणा देव ॥ न धरौं२ संदेह कांही मनीं ॥ १ ॥ ऐसे मी हें नाहीं बोलत नेणता । आणोनि संमता संतांचिया ॥ २ ॥ नाम म्हणे तया आणीक३ साधन । ऐसे हें वचन बोलों नये ॥ ३ ॥ तुका म्हणे सुत पाये या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संदेह-संशय, समता-संमती अर्थ:- श्रीहरीच्या नामाची प्रीती ज्याला आहे, तो प्रत्यक्ष देवच समजावा याविषयी मनामध्ये कसलाही सशय धारण करू नये १ मी अजाणपणे असे काही तरी बोलत आहे, असे तुम्ही कुणी समजू नका या माझ्या बोलण्यास सर्व संताची समती आहे. जो श्रीहरीचे नाम घेत आहे, त्याने आणखी काही साधने भगवंताच्या १ मिळत, २ घरा, ३ उरले