भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 575, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 575

सार्थ तुकारामगाथा ५२९ गोळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती । तयासी दिले तें कवणासी नाहीं । अवघा अंतर्बाह्यीं तोचि' जाला ॥ ५ ॥ देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें धर्म नाचरावें । तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिले ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - मनावे-मानूं नये, म्हुन-म्हणून, पृथक-वेगळे, थेराकार-वंग, कंचाट-क्रोध, नाचरावें- आचरू नये अर्थ :- जर गुरूच्या वचनानी ईश्वराचे अंतर पडत असेल तर मग ते गुरूचे वचनही मान्य करू नये त्रिपाद भूमीचे दान देताना झारीच्या पाण्यात शुक्र आड आल्यावर बळी राजाने त्याचा डोळा दर्भाच्या काडीने फोडला शुक्राला आंधळेच करून टाकले १ देवाने जर मनात आणले तर मग तो काय करणार नाही ? तुम्ही उगाच वेगळे असे परिश्रम व्यर्थ का करिता ? २ आपल्या पतीची आज्ञा मोडून ऋषिपत्नी भगवंताकडे अन्न घेऊन गेल्या होत्याच ना ? त्यावेळी देयाने त्याचे सर्व काम करून त्याची लाज व त्याचा धर्म याचे रक्षण केले ३ प्रल्हाद जेव्हा श्रीहरीची भक्ती करू लागला, तेव्हा त्याच्या पित्याने, हिरण्यकशिपुने त्याला केवढा विरोध केला, पण देवाच्या प्राप्तीसाठी प्रल्हादाने आपल्या दैत्य पित्यास भारविले त्याने प्रल्हादावर परोपरीची संकटे निर्माण केली; पण ईश्वरविषयचीचा लोभ प्रल्हादाने सोडला नाही ४ गोकुळच्या गोळणी जरी देवाकडे व्यभिचाराच्या भावाने गेल्या तरी व त्या लौकिक आचारापासून भ्रष्ट झाल्या, तरी देवाने इतर कुणाला जे दिले नाही ते त्याने गोळणींना दिले कारण त्यांचा अंतर्बाह्य विषयच श्रीहरी बनून गेला होता. ५ यासाठी जरी वरवर अधर्म होत असला, पण त्यामुळे जर देव मिळत असेल तर तोही करावा परंतु देवाशी जेणेकरून अंतर पडेल, असे कुठलेही कार्य करू नये तुकाराम महाराज म्हणतात, देवास हा कळवळा हृदयामधील असतोच, म्हणून तर त्याने अजामेळासारख्या पातक्यांचाही उद्धार केला ६ विवरण :- भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गात आईबाप, बंधू, पती, पत्नी किंवा गुरू कुणीही आले तरी त्याचा त्याग करावा, व देवाशी सख्यत्व जोडावे, असा विचार अनेक ठिकाणी संतानी सांगितलेला आहे वरवर अधर्माचे वाटणारे कृत्यही करावे, पण श्रीहरीची प्राप्ती होत असेल तर ती सोडू नये या विचाराच्या पुष्टीसाठी तुकाराम बुवांनी दिलेली काही उदाहरणे आपणास माहित आहेत ऋषिपत्नीची कथा भागवतादी ग्रंथात विस्ताराने आलेली आहे एकदा श्रीकृष्ण व त्याचे मित्र रानात हिंडता हिंडता खूप दूर आले चालण्याचे परिश्रम फार झाल्यामुळे त्यांना फार भूक लागली व त्यांनी श्रीकृष्णाजवळ खायला मागितले तेव्हा बलराम व श्रीकृष्ण यांनी गोपाळांना सांगितले, 'येथून जवळच ब्राह्मणांनी आंगिरस नावाचा यज्ञ सुरु केलेला आहे त्यांच्यापाशी जाऊन अन्न घेऊन या' त्याप्रमाणे गोपाळ ऋषींच्या जवळ गेले त्यांनी श्रीकृष्ण व बलराम यांचा निरोप त्यांना सांगितला परंतु ऋषींनी व ब्राह्मणांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही श्रीकृष्णास विसरून ते स्वर्गाची इच्छा मनात धरून यज्ञायागादी कर्म करण्यात गुंतले होते मग ते गोपाळ त्या ऋषींच्या पत्नींकडे गेले श्रीकृष्णाचा निरोप ऐकून ऋषिपत्नींना अतिशय हर्ष झाला त्यांचे चित्त भगवंताकडेच एकदम वेधून राहिले नाना प्रकारची अन्ने व गोडपदार्थांची ताटे घेऊन त्या श्रीकृष्णाकडे धावल्या भगवंताच्या ओढीपुढे त्यांनी कुणाचीही, आपल्या पतींचीही आज्ञा मान्य केली नाही त्यांच्या प्रीतीमुळे श्रीकृष्णासही आनंद झाला व श्रीकृष्णदर्शनामुळे ऋषिपत्नीहा सुखावल्या पुढे ब्राह्मणांनाही आपल्या कर्माचा पश्चात्ताप झाला गोकुळच्या गोळणी ईश्वराकडे कोणत्या भावनेने गेल्या? याविषयी भरपूर चर्चा आजवर झालेली आहे 'गोळणी करिती देवाशीं व्यभिचार' अशा भाषेत तुकोबांनी त्यांच्या वृत्तीने वर्णन केले असले तरी, त्या वर्णनाची वरवरची भाषाही महत्त्वाची नाही, हे ध्यानात घ्यावयास हवे व्यभिचाराच्या भावनेत जो तीव्रता व जी समर्पणाची १ हरी तु गाथा ६७