भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 586, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 586

५४० सार्थ तुकारामगाथा आपल्या नेहमीच्या व्यापारी भाषेत तक्रार केली आहे देवाने आपली ही वचने निकराची आहेत, मल्लगीची नाहीत असेच मानावे, म्हणूनही त्यांनी त्यास सूचना दिलेली आहे आपला संताप झाला आहे असे त्या एका अभंगात म्हणत आहेत अर्थात हे सर्व भांडण प्रेमाच्या पोटीच असते कधी आपण देवास फारच दुरुत्तरे केली, असे वाटून तुकोबांना पश्चात्तापाचीही भावना निर्माण होत मग ते म्हणतात, 'नये ऐसे बोलो कठिण उत्तरें । सलगी लेकरूं केलों पुढें' आपला हाही अपराध देवाने क्षमा करावा, अशीही प्रार्थना ते करितात मग तुकोबा भांडतात तरी का ? ईश्वरास एवढ्या कठोरतेने का बोलतात ? देवाची अशी फजीती करायला का प्रवृत्त होतात ? या प्रश्नाचे उत्तर असे की, ज्याच्यावर आपला फार मोठा विश्वास त्याच्यावर रागावण्यात रुसण्यात गोडी असते 'प्रीतीवीण रुसो नये' असे समर्थ रामदासानी म्हटल आहे याच प्रीतीच्या अतिरेकामुळे तुकारामासारखे भक्त कधी कधी देवावर रागावतात, त्याच्यावर रुसतात, कडक शब्दांनी भांडण मांडतात पण या सर्व कठिण शब्दांच्या मागे देवाविषयी अगाध प्रेम असत नाहीतर मग या संतानी कुणावर रागावावे ? कुणावर रुसावे ? कुणावर सत्ता करावी ? 'कवणाशीं भांडो कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण' या देवाशिवाय आपला राग तरी कोण सहन करणार आहे ? आपण कळ- वळवळाने व पाटतिडकीने का बोलतो, यासंबंधी तुकोबानी एका अभंगात म्हटले आहे, 'तुका म्हणें एके गांवचीं वसती । म्हणऊनि छती वाटे देवा' देव व आपण एकाच गावचे असून एवढा भेद व्हावा याचेच नवल तुकोबांना वाटते

१२३२ बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठविता चित्तीं काय नव्हे ॥ १ ॥ आणिका उपाया कोण वाटी मन । सुखाचे निधान पाडुरंग ॥ २ ॥ गीत गावों नाचो छंदें वावो टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥ ३ ॥ अनंत ब्रह्मांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावे उभा ॥ ४ ॥ लटिका हा केला सवसारसिंधु । मोक्ष खरा बघू नाहीं पुढें ॥ ५ ॥ तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलो निश्चिंत¹ त्याच्या बळें ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - जनिता-जन्म देणारा, निधान-साठा, रोमावळी-केसांची रांग अर्थ - बुद्धीला जन्म देणारा खरे म्हणजे लक्ष्मीपती श्रीविष्णूच आहे त्याचा आठव एकदा झाल्यावर मग काय साध्य होणार नाही ? १ सर्व सुखाचा ठेवा असा हा पांडुरंग जो आहे, त्यास सोडून आणखी दुसऱ्या दैवताकडे आपले मन कोण धाडून देणार ? २ वैष्णवाच्या मेळाव्यात मोठ्या आनंदाने गाऊ नाचू व सुरात टाळघा वाजवू ३ ज्याच्या एका केसावर अनंत ब्रह्मांडें आहेत, अशा या श्रीहरीस आम्ही आमच्या भोळ्या भावाने विटेवर उभे केले आहे ४ आम्ही आता याच्या कृपेने संसारसागर खोटाच ठरविला असून बद्धता व मोक्ष याही अवस्था आम्ही मानणार नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या नामाने अंकित झालो आहोत, त्याच्याच बळावर आम्ही निश्चित होऊन राहिलो आहोत ६

१२३३ न लगे मायेसी बाळें निरदावे । आपुल्या स्वभावे ओढे त्यासी ॥ १ ॥ मज का लागला करणे विचार । ज्याचा जार भार त्याचे माथी ॥ २ ॥ गोड धड त्यासी ठेवी न मागता । समाधान खाता नेदी मना ॥ ३ ॥ खेळता गुंतले उमगूनी आणी । बैसोनिया स्तनी लावी बळें ॥ ४ ॥ त्याच्या दुखेंपणे आपण खापरीं । लाही तळीं वरी होय जैसे ॥ ५ ॥ तुका म्हणें देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागो नेदी ॥ ६ ॥

१ निश्चित