भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 592, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 592

५४६ सार्थ तुकारामगाथा ब्रह्मा बोलवेना', 'संतचरणरज उधळले । तेणें सर्वांग डवरले,' 'संतसंगतीचे काय सांगू सुख ? । आपण पारिखे नाहीं तेथें', 'सुख सांगावे संतापुढें । जेणे सुख अधिक वाढे' अशा भाषेत नामदेवानी संताचे महत्त्व स्पष्ट केले आहे श्रीएकनाथ महाराजांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून संताचे उपकार त्याच्या माहात्म्यासहित सविस्तर वर्णन केले आहेत 'संताचे चरणतीर्थ घेता अनुदिनीं । पातकांची धुणी सहज होय', 'संतचरणींचा महिमा । फावौं न कळे आगमानिगमा । ब्रह्मा घाली लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥ शिव प्यालो पायवणी । धन्य धन्य संत जनीं', 'देवाचे ते आप्त जाणावे जे संत । त्याचे चरणीं रत व्हावे सर्वदा', असे संतमाहात्म्य कथन करुन त्यांनीही 'संत आधी देव मग । हाचि उद्गम आणा मना', 'संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे' असाच निष्कर्ष काढलेला आहे या संताच्या नादाने देव लोभावला जातो तो त्या सुखामुळे या संताची सेवा करुन त्यांचे परोपरीने रक्षण करीत असतो हा भावही मराठी संतानी वारंवार प्रगट केला आहे ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ साडुनी संतसदनीं राहीला । धन्य धन्य संताचे सदन । जेथें लक्ष्मो सहित शोभे नारायण', 'संतचरणींचे रज कण । तेणें तिन्ही देव पावन' अशा शब्दात या संताचा वेध देवालाच किती जमतो, याचे वर्णन एकनाथानी केलेले आहे ज्ञाने- श्वरानी तर हा देव चार हातानी संताना मिठी मारण्यास कसा उत्सुक असतो याचे मोठे हृद्य चित्र ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात रसाळपणे वर्णन केले आहे या भक्ताच केवढे कौतुक देवास असते ? ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, 'आम्ही तयाचे करु ध्यान । ते आमुचे देवतार्चन । ते वाचूनि आन । गोमटे नाहीं ॥ तयाचे आम्हा व्यसन । ते आमुचे निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती तें ॥ तो पाहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षूसो मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पूजूं तयांतें ॥ दोंवरी दोनी । भुजा आलो घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचे आंग ।' आपल्या भक्ताविषयी व संताविषयी देवाला हे येवढ प्रेम वाटते ! ज्ञानेश्वरीमधील हाच भाव ज्ञानेश्वरानी एका अभंगात अतिशय बहारदारपणे व्यक्त केलेला आहे 'संत भेटतों आजी मज । तेणें मी झालो चतुर्भुज । दोन्ही भुजा स्थूळीं सहज । दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥ आलिंगनीं सुख वाटे । प्रेम चिदानंदीं गोठें । हर्षे ब्रह्मांड उतरे । समूळ उठे मी पण' अशा या संताचे उपकार या जगातील सब लोकावर किती मोठे झाले आहेत याचे वर्णनही सपूर्ण असे करता येणे कठीण आहे १२४३ जो मानी तो देईल काई । न मनी तो नेईल काई ॥ १ ॥ आम्हा विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ २ ॥ आधीन ते जना काई । जल्पे वायाविण ठायी ॥ ३ ॥ वदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पाडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भलतैसा-कसा तरी, कोणत्याही रूपात, जल्पे-बडबडतात अर्थ - जो आम्हास मान देईल, तो आम्हास अधिक काय देणार आहे ? व जो मान देणार नाही, तो आम्हास देणार नाही असे काय आहे ? १ कसेही असले तरी हा श्रीविठ्ठलच सर्वभूतमात्रामध्ये बसलेला आम्हास आमच्या चित्तात दिसावा २ लोकाच्या स्वाधीन तसे काहीच नसताना लोक असे व्यर्थ का बडबडतात ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे तुला कुणी वंदिले अथवा निंदिले तरी त्याचे महत्त्व तुला सारखेच आहे ४ १२४४ भावबळें कैसा जालासी लहान । मागें संतीं ध्यान वर्णिगेले ॥ १ ॥ तें मज उचित करुनिया देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ २ ॥ पाहो निया डोळा बोलेन मी गोष्टी । आलिंगूनि मिठी देइन पायीं ॥ ३ ॥ चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडो निया कर पुढें दोन्ही ॥ ४ ॥ तुका म्हणे उत्कंठित वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥ ५ ॥