भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 74, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 74

४८ सार्थ तुकारामगाथा आपल्या हिताचा विचार लौकर करा २ आपले पूर्वसंचित जे कर्म असेल तेच आपल्या बरोबर असून आपली पाठवणी तेच करीत असते. जैसे आपले कर्म तसे आपणास फळ मिळते ३ शेवटी आपला देह जोपर्यंत स्मशा- नातच जाणार आहे तोपर्यंत त्याचा संबंध अग्नीशी व गोवरीशीच यायचा हे नाकारून कसे चालेल ? ४ १०० गौळीयाचीं ताकपिंरें । कोण' पोरें चांगलीं ॥ १ ॥ येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ २ ॥ काय उपास पडिले होते । कण्यामोवते विदुरांच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ताकपिंरे-ताक पिणारी, विदूर-धृतराष्ट्र व पंडू याचा धर्मनिष्ठ भाऊ, कुब्जा-पाठीला वांक असलेली कंसाची एक बुरुप दासी अर्थ:- भक्तीसाठी परमेश्वर किती लालचावलेला असतो हे सांगण्यासाठी तुकारामबुवा सांगतात, गवळ्यांची ताक पिणारी ती पोरे ! काय त्यांच्यात लोभ पडण्यासारखे होते ? १ पण श्रीकृष्णास त्यांचा केवढा मोठा छंद होता ! कारण त्यांची सेवा व त्यांची भक्ती यांची थोरवी फार होती २ विदुराच्या कण्या देवांनी मोठ्या प्रेमाने खाल्या, त्यावेळी काय देवाला उपवास पडले होते ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ती कंसाघरची दासी पाठीला पोंक आल्यामुळे अष्टवक्रा झाली होती, पण अशी विरूप झालेली व हीन कळा असलेली दासी ही ईश्वराला सौंदर्याची राशी वाटली कारण एकच देवाला केवळ भक्ती प्रिय आहे विवरण :- भक्तीचे महिमान सांगणारा एक महत्त्वाचा अभंग आहे हा शुद्ध प्रेमास भुकेलेला ईश्वर आपल्या भक्ताचे रूप, त्याची जात, त्याचे पूर्वकर्म वगैरे काही न पाहता केवळ त्याचे भाव पाहतो हे सांगण्यासाठी वरवर हीन किंवा क्षुल्लक दिसणाऱ्या काही थोर भक्तांचा उल्लेख तुकारामबुवांनी येथे केला आहे लहानपणी गोकुळात असताना गवळ्याची मुले घेऊन श्रीकृष्ण अनेक खेळ खेळले, ती गवळ्याची मुले ! काय त्यांना रूप असणार ? की त्यांना प्रगल्भ बुद्धी असणार ? का ती धनवंत होती ? पण ईश्वरास या गोष्टीची जरूरी नसते त्याला फक्त प्रेम हवे असते ते या बावळ्या पोरांच्यात होते विदुर हा अंबिका नावाच्या दासीपासून झालेला मुलगा शूद्र स्त्रीपासून याची निर्मिती म्हणून याला धृतराष्ट्र व पंडू यांची बंधुत्वाचे नाते असूनही राज्य मिळाले नाही पण हा मोठा धर्मनिष्ठ होता श्रीकृष्णावर याचे फार प्रेम होते याची श्रीकृष्णभक्ती थोर असल्याने याच्या घरच्या कण्याही श्रीकृष्णास गोड लागल्या आणि ती कंसाघरची दासी कुब्जा ? अंग वाकडे झाल्याने कुरूप दिसत असे त्रेता युगातील शूर्पणखेची दासी मधुरा शापाने द्वापरयुगात कंसदासी कुब्जा बनली होती पण तिच्या मनात कृष्णाविषयी अपार प्रेम असल्याने श्रीकृष्णाने तिला जवळ करून सुस्वरूप केले १०१ आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आपुलाचा ॥ १ ॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ २ ॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनिया मन एकविध ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दंडवत-नमस्कार, व्यापार-कामे अर्थ :- माझा सर्व प्राणिमात्रांना आता हाच उपदेश आहे की त्यांनी आपल्या आयुष्याचा नाश करू नये. १ सर्वांच्या पायावर डोके ठेवून मी विनंती करीत आहे की सर्वांनी आपापले चित्त शुद्ध करून विठ्ठलाची भक्ती करावी. २ ईश्वराचे चिंतन सतत करणे हेच हितकारक असल्यामुळे ते मन शुद्ध ठेवून करावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे हिताचे असेल ते लक्षात ठेवून आपली कामे करीत जावीत, आता आणखीन काय सांगावे ? ४ १ काय

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 74, कुल 611 में से · BharatKosha