भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 77, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 77

शब्दार्थ व टीपा - व्याल्याविण-बाळंत झाल्याशिवाय शोभन तातडी-बारशासारखे मंगल कार्य करण्याची घाई, चार-चाळे, देशी-पाहून, कुधाऱ्या-मुद्दाम उसने आणलेल्या, कुष्ठी-कोडाच्या रोगाचा, वाव-विनाकारण अर्थ - एक स्त्री बाळंतीण व्हायच्या आधीच बारसे वगैरे मंगल कार्य करण्याचे चाळे मूर्खाप्रमाणे करू लागली १ दुसऱ्या खऱ्या बाळंतिणीचे विस्तारपूर्वक व्यापार पाहून ही तसे करू लागली तर काय उपयोग ? साखर स्वतः खाऊन जो गोडी अनुभवता येते ती काय दुसऱ्यास सांगता येते ? २ तृप्ततेचे जेवण झाल्यावर जशी ढेकर येते तशी ती उगाच भुकेल्या पोटी बळाने दिलेल्या ढेकराप्रमाणे होणार नाही दोघीत मोठाच फरक दिसणार उलट अशा ढेकरेमुळे चेहरा मात्र कष्टदायक व मलीन दिसणार, किंवा कोडाच्या रोगाचा मनुष्य आपले कोड दिसू नये म्हणून अंग मलीन करून घेतो तसेच होणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, नुसती बडबड करणारे श्रोत्रहो ऐका, तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याखेरीज उगाच बोलू नका ४

१०८ जेणे घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥ १ ॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ २ ॥ प्रल्हादें जनक बिभीषणे बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - अंतराय-अडथळा, वियोग, वर्जावी-मोडावी, येर-मग, लेखा-गणती, हिशेब, दुःखमूळ- दुःख देणारे अर्थ - ईश्वराच्या प्राप्तीस जर अडथळा होत असेल, त्याचा वियोग घडत असेल तर अत्यंत पूज्य असलेल्या आईबापांचाही त्याग करावा १ मग इतर नात्याची माणसे, प्रिय पत्नी, मुले धन यांची काय गणना ? त्याचाही त्याग करावा, कारण हे सर्व आपल्याला दुःख देण्यास पात्र असलेले शत्रूरूप आहेत २ आईबापाचा वा आप्तांचा असा त्याग पूर्वी अनेकांनी केला होता देवासाठी प्रल्हादाने आपल्या पित्याचा बिभीषणाने आपल्या थोरल्या बंधूचा, भरताने आपल्या आईचा व राज्याचाही त्याग केला नव्हता काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात याच्या सेवेतून निर्माण होणारे सर्व धर्म श्रीहरीच्या पायाशी दिसतील इतर सर्व उपाय दुःखाचे मूळ आहे त्यामुळे दुःखच होत राहील हे निश्चित ४ विवरण - ईश्वरप्राप्ती हे सर्वात मोठं ध्येय माणसाने असल्यान या प्राप्तीच्या आड येणारी सर्व बंधने तोडावीत असे वारंवार सांगितले जाते अतिशय पूज्य आईबाप, यांनी आपणास जन्म दिलेला असतो, पण हे जर परमेश्वरप्राप्तीच्या आड आले तर त्याचाही त्याग करावा, मग बंधू, पुत्र पत्नी याचा त्याग करावा यात नवल ते काय ? यांच्या अतिरिक्त मोहामधून ईश्वर दुरावतो म्हणून या नात्याचा त्याग सुचविला आहे गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसांची लक्षण सांगताना 'असक्तिरनभिष्वंग पुत्रदारगृहादिषु-बायकामुलं व घर इत्यादीविषयी लंपट न होणे'-हा एक प्रमुख म्हणून दर्शविला आहे 'दारागृहपुत्रों। नाहीं जया मैत्री । तो जाणपा धात्री । ज्ञानासि गा' असे ज्ञानदेवानी या पुरुषांचे वर्णन केले आहे 'देवाच्या सख्यत्वासाठीं । पाडाव्या जिवलगांसि तुटी । प्राण सर्वस्वही शेवटीं । तोही वेंचवा' असे समर्थ रामदासानी निःप्रहाण सांगितले आहे असा हा आप्तस्वकीयांचा किंवा आईबापांचा त्याग पूर्वी कधी कुणी केला होता काय ? तुकारामबुवांनी काही उदाहरणे आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी दिली आहेत प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा मुलगा पण यास भगवद्भक्तीचे अतिशय वेड म्हणून या बापाने प्रल्हादाचा अतिशय छळ केला प्रल्हादाने विष्णूची व नृसिंहाची प्रार्थना केली शेवटी नृसिंह प्रकट होऊन त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला अशी कथा आहे याप्रमाणे प्रल्हादान आपल्या बापाची पर्वा केली नाही असा भावार्थ बिभीषण हा रावणाचा बंधू मोठा भगवद्भक्त होता रावणान सीतेस चोरून आणले, रामास त्रास देण्यास सुरवात केली, त्याच्याशी युद्ध आरंभिले म्हणून याने रावणास बराच उपदेश केला, पण तो त्यास पटला नाही मग बिभीषण रामास अनुकूल झाला त्याने सर्व माहिती रामास पुरविली युद्धात रामाकडूनच लडन याने दृष्टमाळे, प्रहस्त वगैरंना ठार मारले भरत हा रामाचा बंधू आपली आई कैकयी हिच्या