भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 104, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 104

७६ सार्थ तुकारामगाथा हा रानभर पळायला लावतो त्याच्या पाठीमागे धूम ठोकून जो पळेल तोच खरा शहाणा श्रीहरी माय आम्हा सर्वांचे घास एकटीच खाते या सर्व सुखांना आपण मुकलो म्हणून इंद्रादी देव हायहाय करू लागले ५ सर्व गोपाळ मग काल्याच्या घासांचाच खेळ खेळू लागले घासाने एकमेकाना मारायला लागले कुणी कुणाच्या तोंडावर, दुसऱ्यावर मारू लागले श्रीहरीला हा मार सहन होईना, तेव्हा आता पुरे असे तो म्हणू लागला मी आता फार दमलो आता आपण नियमास धरून आपले खेळ खेळू या श्रीकृष्णाच्या या सांगण्याचा सर्वांनी आदर केला ६ मग सर्व गोपाळांनी मोठ्या आनंदाने फेर धरले व मध्यभागी श्रीहरीला बसविले नंतर प्रत्येकेजण फेर धरत राहिले. काही जणांनी शिंगे, पावे वाजविण्यास सुरुवात केली या सोबत्यात काही गोपाळ वाकडे होते, काही बोबडे होते काही खोटे, लुळेही होते परंतु हे सर्व फार भाविक असल्यामुळे श्रीकृष्णाला फार प्रिय होते ७ त्याची भावपूर्ण तोंडे पाहून श्रीकृष्ण त्यांचे कौतुक करू लागला हे सर्व सुख पाहून श्रीकृष्ण खळखळून हसू लागला एकमेकांचे उष्टे खाण्यासही कुणास वीट वाटेनासा झाला काही थोडे संकोच धरणारे होते, पण त्यांनाही श्रीहरीने आपल्या संगतीने धीट बनविले ८ ज्यांची अजून भूक गेली नाही त्यांची मुखे उघडवून तो हरी सर्वांना सुख सारख्या प्रमाणात देतो मग सर्वजण म्हणत राहिले की, श्रीकृष्णा, तू फार चांगला, फार चांगला आहेस रे, तुझी संगत फार चांगली, आता तू जरी आम्हास फसविलेस तरी आम्ही दुसऱ्या कुणाही बरोबर जाणार नाही ९ श्रीहरी व गोपाळ यांचा हा आनंदप्रसंग पाहून गाई चारा खाण्याचा विसरून गेल्या पक्षी व वनातील इतर पशू यांचेही चारा खाणे बंद झाले यमुनेचे पाणी स्थिर झाले, त्याचा प्रवाहच जणू श्रीकृष्णस्मरणात थांबला हे सर्व प्रकार देवांनी पाहिले व त्याच्या तोंडात पाणी सुटले, व ते म्हणू लागले की यमुनेच्या तीरावरस्ते हे गोपाळ किती धन्य आहेत, आमचा जन्म मात्र फुकट धिक्कार असो त्याला १० मग ते स्वर्गातील देव म्हणू लागले, काय करावे, कसे करावे ? काल्याचा भाग भक्षण करण्यासाठी आपण यमुनेच्या पाण्यातील मासे व्हावे असे त्यांना वाटले या संकल्पास अनुसरून सर्व देव मत्स्यरूपांनी यमुनेच्या तीरावर आले सर्व किनारा भरून गेला तेव्हा हे खटपाळ गोपाळ अधिकच प्रमाणात आपले ओठ मटामटा वाजवून त्यांना हिणवू लागले ११ मोठ्या आनंदाने गोपाळांसह श्रीकृष्ण खेळ खेळू लागले आणि त्यांनी कुणीही आपले हात यमुनेत धुवू नका (कारण या मत्स्यांना काल्याचा शेष उगाच मिळेल) असे सांगितले त्यावर हा कृष्ण बरोबर आमच्या मनातले ओळखतो असे गोपाळ म्हणू लागले श्रीकृष्णाच्या हातच्या काल्याचा भाग जे आपल्या थोरवीमुळे लाजणारे आहेत त्यांना कसा मिळणार ? १२ आजचा दिवस व काळ किती धन्यतेचा आहे, कारण आज श्रीकृष्ण परमात्मा आम्हास भेटला देवा, तुझ्या हातामधून आज आम्हात काल्याचा प्रसाद मिळाला म्हणून आम्ही आज संतुष्ट झालो एकमेकाच्या संगतीत हे गोपाळ सोंगडी फार सुखावले नाना प्रकारांनी यानी इही पोटभर संतुष्ट होऊन खाल्ले असल्याने ते तृप्त झाले १३ देवा, तुझी ही चांगली संगत आम्हास नेहमी असावी अशाच प्रकारे नित्य जीवांना आनंद देऊन आम्हांस चालवावे त्यावर तो वनमाळी सर्व गोपाळांना म्हणाला, चला रे आपापल्या काठ्या, कावळ्या घ्या आपण सर्वजण खळीमेळीने गाई चारायला निघू या आता १४ तुकाराम महाराज म्हणतात, आज मोठा ब्रह्मानंद झाला त्याचे वर्णनही करता येणार नाही आज या श्रीकृष्णाने सर्व गाईंना व गोपाळांना आपल्यासारखच करून टाकले १५ आज केवढा आनंद झाला आहे प्रत्यक्ष परब्रह्मदच आपल्याबरोबर आज उभा आहे १६ १४९ या हो या चला जाऊ सकळा । पाहो हा सोहळा आजि वृदावनींचा ॥ १ ॥ वाहिला गोपाळें वेणुनाद पडे कानी । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ २ ॥ उरले ते सांडा काम नका करू गोवी । हेचि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥ ३ ॥ निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता । बोलती ते आता घरचीं सोसूं वाईट ॥ ४ ॥ कृष्णभेटीआड कांहीं १नावडे आणीक । लाज तरी लोक मन जाले उदास ॥ ५ ॥ एकाएकीं चालियेल्या सादावीत सवे । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥ ६ ॥ १ न साहे

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 104, कुल 611 में से · BharatKosha