भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 427, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 427

सार्थ तुकारामगाथा ३८९ शब्दार्थ व टीपा :- पार पायीं-पैलतीरावर पोचवितो. अर्थ :- आपल्या मुलाचे वर्म नेमके कोणते आहे, हे त्याची आई बरोबर ओळखत असते. त्याचे जे सुख किंवा दुख असेल ते तिला सर्व माहीत असते. १ एखाद्या आंधळ्यास जो आधार देतो त्यालाच पुढल्या पाऊलवाटेचा वा संकटांचा विचार करावा लागतो. २ शरण आलेल्यास ज्याने अभय देऊन पाठीशी घातले आहे, तोच त्याच्या रक्षणाविषयी जाणतेपणाने जाणीत असतो. ३ पाण्यात बुडणाऱ्यास काढण्यासाठी ज्याने कास घातली आहे, त्याला त्याचे काही वाटत नाही. फारसे प्रयत्नही करावे लागत नाहीत. हा पोहणारा मनुष्य ह्या बुडणाऱ्या इसमास सहजा- सहजी पैलतीरावर नेऊन पोचवितो. ४ तुकाराम महाराज म्हणतात, एकदा आपला हा जीव विठ्ठलाच्या हातांत दिल्यावर त्याचे कार्य तो रक्षणाचे करणारच. ५ ८२० नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥ १ ॥ खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघेंच जाये एका घांसें ॥ २ ॥ जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें न मना¹ विषाद । निंबेविण व्याध तुटों नये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मासो-माशी, जोडी-प्राप्ती, व्याध-रोग, न मना-मानू नका. अर्थ - विधिनिषेधांच्या कचाट्यात तुमचे मन गुंतवू नका केवळ पांडुरंगाचे स्मरण सतत करा, म्हणजे झाले १ खाऊन झालेल्या अन्नाच्या शेवटच्या घासाच्या वेळी त्यात माशी पडली होती असे बोलू नये. केवळ एका घासासाठी मग सर्वच कल्पनेने ओकावे लागते. २ कोणत्याही चांगल्या गोष्टीची प्राप्ती सहजासहजी होईल एखाद्या वेळेस; पण त्याचे रक्षण मात्र नीट काळजीपूर्वक करावे लागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या या बोलण्याचा राग मानू नका तुम्ही कोणी. कडू लिंबाच्या रसातून औषध घेतल्यावाचून शरीरात मुरलेला रोग दूर होणार तरी कसा ? ४ ८२१ नको होऊं देऊं भावों अभावना । याचि नांवें जाणा बहु दोष ॥ १ ॥ मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाळ्या उसर लाभ नाड ॥ २ ॥ उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरू तैसा फळे त्यासी ॥ ३ ॥ तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जिव्हाळ्या-सुपीक जमीन, उसर-नापीक जमीन, न -तोटा. अर्थ :- देवा, माझ्या मनात तुमच्याविषयी जो भक्तिभावना आहे, तीत अभावना म्हणजे विपरीत भावना निर्माण करू नका. कारण यामुळे फार मोठा दोष निर्माण होईल १ जर पुष्कळ पाऊस पडला तर सुपीक जमिनीचा फायदा होईल व नापीक जमिनीचा तोटाच होईल. २ कल्पतरुच्या छायेखाली बसून चांगली कल्पना केल्यास चांगले फळ मिळेल. वाईट कल्पना केली तर वाईट फळ मिळेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आपले आयुष्य फार थोडे असल्यामुळे जेणेकरून हित होईल, असे तुम्ही नेहमी पाहात जा. ४ ८२२ त्याग तंव मज न यजतां केला । कांहींच विठ्ठला मनांतूनि ॥ १ ॥ भागलिया आला उपग सहज । न धरितां फाज जालें मनीं ॥ २ ॥ देह जड जालें ऋणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥ ३ ॥ तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न यजता-ध्यानात न येताच. १ माना.