भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ९ शब्दार्थ व टीपा -आधिच्या-पूर्वजन्मीच्या, भ्रतारें-पतीकडून, रातले-रममाण झाले अर्थ -पूर्वजन्मीच्या माझ्या पतीकडून माझी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मी आज या वरवर गैर वाटणाऱ्या आचरणास प्रवृत्त झाले आहे १ तो धोंहोरो मला आता रात्रंदिवस माझ्याजवळ हवा त्याच्याशिवाय मला एक क्षणभरही करमणार नाही २ आता माझ्यादाद्दलची सर्व आशा सोडून द्या, कारण तुकारामबुवा म्हणतात की मी आता अनंताशी रममाण झाले आहे ३ विवरण - वरवर शृंगारात्मक दिसणाऱ्या या अभंगाच्या निमित्ताने तुकाराम महाराजानी आपण आता परमेश्वराशी रममाण झालेलो असल्यामुळे आपली आशा आता लोकांनी सोडून द्यावी असे विनविले आहे ९ हाचि नेम आता न फिरे माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥ १ ॥ घररिघी जाले पट्टराणी बळें । वरिले सावळें परब्रह्म ॥ २ ॥ वळियाचा अगसंग जाला आता । नाही भय चिंता तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -घररिघी-स्वत होऊन घरात शिरणारी, पट्टराणी-मुख्य आवडती राणी, वरिले- स्वीकारिले, वळियाचा-बलवानाचा, समर्थाचा, अगसंग-संबध अर्थ -मी आज श्रीप्रभुशेजारी बसले असल्याने तेथून आता माघारी फिरणार नाही, हाच माझा निश्चय झाला आहे १ मी आता त्या सावळ्या परब्रह्मास वरले असल्यामुळे मी त्याची पट्टराणी झाले आहे मी स्वतः होऊन त्याच्या घरात शिरले आहे २ आता माझा संबंध बलवंताशी झालेला आहे त्यामुळे मला कुठलीच भीती किंवा चिंता उरली नाही ३ १० नाही काम माझें काज तुम्हासवे । होते गुप्त ठावे केले आता ॥ १ ॥ व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सरती लोकांमाजी जाले ॥ २ ॥ न धरावा लोभ काहीं मजविशीं । जाले देवपिशी तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -काज-काय, सरतो-मान्य, देवपिशी-देववेडी अर्थ -भोवतालच्या लोकांना उद्देशून तुकारामबुवा म्हणत आहेत की, माझे आता तुमच्या बरोबर, काही काम उरलेले नाही आजवर माझा गुप्त संबंध ईश्वराशी होता तो आता तुम्हा सर्वांना माहित झाला आहे १ माझे हे निंद्यकर्म तुम्हास ठाऊक झाले आहे त्यामुळे माझे आचरण तुम्हास मान्य नाही २ तरी तुम्हीही आता माझ्या- विषयी कसलाच लोभ धरू नये, मी आता पक्की देववेडी झाले आहे ३ ११ विसरले कुळ आपुला आचार । पती भाये दीर घर सोय ॥ १ ॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातले अनंता चित्त माझें ॥ २ ॥ मज आता कोणी आळवाल क्षणी । तुका म्हणे कानीं बहिरी जाले ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - सांडिला-सोडिला, रातले-रममाण झाले, क्षणी-कवां अर्थ -मी आता आपले कुलशीलही विसरून गेले असून माझे घर, सोयरे, दीर, पती इत्यादींनाही मी विसरले आहे १ मी या जगातील रोजचा सर्व व्यवहार सोडून दिला असून मला आता कसलीच भीती व चिंता उरलेली नाही माझे चित्त आता त्या अनंताशी रमले आहे २ आता मी परत संसारात किंवा लौकिक व्यवहारात गुंतावे म्हणून कुणी मला आळवू नये तुकाराम महाराज म्हणतात, मी आता दोनही कानांनी बहिरीच झाले आहे ३ तु गाथा २

१० सार्थ तुकारामगाथा १२ न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥ १ ॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥ २ ॥ आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : नाइकें-ऐकणार नाही. अर्थ : मी आता दुसरे काहीच पाहणार नाही, बोलणार नाही; आणि ऐकणार नाही; कारण माझ्या चित्तात आता एक श्रीहरी स्थिर झाला आहे. १ सासरी व माहेरी आता मला माझे म्हणून कोणी नाही; श्रीहरीच्या रूपात मी दोन्हीचे एकच स्वरूप मानले आहे. २ मीच भांडखोर म्हणून मजवर आळ आलेला होता; पण आता त्या प्रभूंसच मिळवून मी सर्वांवर मात केली आहे. ३ १३ दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासुनिया ॥ १ ॥ बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिका गोविंदोसी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : दुजा-दुसरा, प्रीतिका-प्रीति करणाऱ्या अर्थ अनंत स्वरूपाच्या असणाऱ्या या हरीवाचून आता दुसरा कोणी बलवान आहे ? १ आणि या बलवंताच्या प्राप्तीमुळे आम्हीही बलवान झालो असून आमची सत्ता आता सर्वांवर राहील. २ तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही मूळचेच अतःकरणाने उदार आहोत; म्हणूनच गोविंदास प्रेम करून आम्ही जवळ करू शकलो. ३ १४ क्षणभरी आम्हीं सोसिलें घाईट । साधिलें अवीट निजसुख ॥ १ ॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : अवीट-वीट किंवा, कंटाळा न येणारे, निजसुख-मोक्षाचे सुख, साडीमांडी-टाळणे, पुन. घेणे, भरोवरी-श्रम, कष्ट अर्थ : लोकांच्या दृष्टीने मी त्याची निंदा क्षणभर सहन केली; पण त्या योगाने ज्याचा कधी कंटाळा येणार नाही असे मोक्षसुख मी मिळविले. १ पूर्वायुष्यात अनेक प्रकारची यातायात केली. अनेक गोष्टी टाळल्या. पुनः घेतल्या. सुखप्राप्तीसाठी अनेक परिश्रम घेतले, पण ते सर्व मला अधिकच दुःखाचे झाले. २ पण आता या अनंत स्वरूपाच्या प्रभूशी लीन झाल्यामुळे, पायांशी राहिल्यामुळे जाणेयेणे अथवा त्यातील कष्टच संपून गेले. ३ १५ आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥ १ ॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥ २ ॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : दुजें-दुसरे, एकविध-एकनिष्ठ, अंगसंग-शरीराची जवळीक, शरीराचा भोग. अर्थः-आता मला कोणी वडील, कोणी धाकटे नाही. मीच मला वडील आहे व धाकटीही आहे. आता माझ्या मागाहून येणारे कोणी नाही ; पुढेही आलेले कोणी नाही. १ आता मला चांगला एकांतही मिळतो, तेव्हा एकनिष्ठ भावनेनेच मी राहतो व तो श्रीहरी माझयारोबर सर्व प्रकारच्या क्रीडा करतो. २ आमच्या दोघां- शिवाय दुसरे तेथे कोणीही नसते ३ १६ सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥ १ ॥ याचसाठीं सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषासीं ॥ २ ॥ तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा ११ शब्दार्थ व टीपा:- जाळ-जाळे, सांडियेले-सोडले, भरतार-पती, परपुरुष-श्रेष्ठ परमेश्वर अर्थ-आता मी सर्व सुखे नेहमीच भोगीन. मी सर्व मायापाश व नात्याची जाळी तोडून टाकली आहेत. १ या प्रभूसाठी मीं माझ्या पतीसही सोडले. मी या श्रेष्ठ परमेश्वराशी रममाण झाले आहे. २ त्यामुळे आता मला पुनः गर्भवासाची यातना राहणार नाही; आता प्रभुप्राप्तीचे औषध असेच केले आहे की जे फळ धरूच देणार नाही. पुन: लौकिकाची आशाच उरणार नाही. ३ १७ एका जिवें आतां जिणें जालें दोन्हीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥ १ ॥ नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥ २ ॥ तुका म्हणे जाले सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेगळीक-वेगळेपणा, भाक-वचन, इच्छा. अर्थ:-आता माझे व श्रीहरीचे अशी दोनही जीविते एकच झाली आहेत. आता वेगळेपणा असा काही उरलाच नाही. १ मी व नारायण यांच्यात आता निराळेपणा नाही. त्याला मी आर्त्त होऊन हाक मारली; तो मला मिळाला, माझी इच्छा त्याने पुरी केली व मला जवळ करून सांभाळले. २ माझ्या थोड्याफार परिश्रमाचे मला हे फळ मिळाले; आता ती दुजेपणाची वेळ संपली. ३ १८ हासों रूसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट तें ॥ १ ॥ सेवासुखें करूं विनोदेवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा:- आवडी-प्रेम, अंतरींची-मनाची. अर्थ : आता आम्ही हसू, एकमेकांवर रुसू व यातून प्रेमाची वाढ करू. मनातील अवीट गोडी चाखून एक- मेकांची सेवा करू. १ काही विनोदवचनांनी संभाषण करू. आता मी व नारायण हे एकच आहोत. २ मी आता या लौकिक जगाविषयी उदासीन झाले आहे. कारण मी हा श्रेष्ठ ईश्वर पती म्हणून केला असून मी त्याला स्वतःच्या आधीन करून ठेवला आहे. ३ १९ मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयांनो ॥ १ ॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥ २ ॥ तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळियासवें आम्ही ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- न साहवे-सहन होत नाही, कूट-निंदा, ओखटें-वाईट, अमंगल, विचरों-हिंडत राहू अर्थ - आपल्या मागे मागे येणाऱ्या सांसारिक व लौकिकावर दृष्टी ठेवणाऱ्या स्त्रियांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणत आहेत; आता तुम्ही कोणी माझ्याबरोबर येऊ नका. बायांनो, तुम्ही सर्वजण सासुरवासिनी आहात. १ तुम्हांला हे लोक निंदात्मक शब्द बोलतील ते सहन होणार नाहीत कारण ते लोक फार वाईट व अमंगल असे बोलतात. २ पण मी मात्र सर्व लौकिकापासून मोकळी व विरक्त झाली असल्यामुळे या गोपाळकृष्णाबरोबर मी वाटेल तशी वागू शकते. ३ २० शिकविले तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥ १ ॥ प्रसंगीं या नाही देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥ २ ॥ तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - नित्य-अक्षय, कायम टिकणारे, अनित्य-क्षर, नाश होणारे अर्थ.-लौकिक संसाराविषयी तुम्ही मला जे शिकविले ते श्रीहरीशी माझा वियोग जोपर्यंत होता तोपर्यंतच मला पटत होते. १ आता या ऐक्याच्या भावनेत देहाची देखील शुद्ध आम्हास नाही; तेथे तुमचे वचन आता कोण

१२ सार्थ तुकारामगाथा मानणार ? २ तुकाराम महाराज म्हणत आहेत की माझ्या चित्तात आता अनंतस्वरूपाचा परमेश्वर बसलेला असल्यामुळे मला आता नित्य व अनित्य यांतील भेदही दिसेनासा झाला आहे ३ २१ सांगतो ते तुम्हीं अइकावे कानीं । आमुचे नाचणी नाचू नका ॥ १ ॥ जोवरी या तुम्हा मागिलाची आस । तोवरी उदास होऊ नका ॥ २ ॥ तुका म्हणे काय वायाविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -नाचणी-नादाने, मागिलाची-संसाराची लौकिकाची, आस-इच्छा धिंद-फजिती अर्थ -बायानो, मी सांगते ते तुम्ही आपल्या कानांनी नीट ऐका-माझ्या नादी काही केल्या तुम्ही सांगू नका १ कारण जोपर्यंत तुम्हांला लौकिक संसाराची जबर हाव आहे तोपर्यंत उदास होऊन वैराग्याचा आव आणू नका २ तुकाराम महाराज म्हणतात की अशामुळे काहीच पदरी न पडता तुमची फजिती मात्र होईल इकड़ेही पतीची मर्जी पालवून बसाल व तिकडे परमेश्वरासही मुकाल ३ २२ आजिवरी तुम्हा आम्हा नेणपण । कौतुके खेळणे सग होता ॥ १ ॥ आतां अमावर जाले अगुणाची । करू नये तेचि करों सुखें ॥ २ ॥ तुका म्हणे आता बुडविली दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -नेणपण-अज्ञान, सग-सोबत अगुणाची-निर्गुणाची अर्थ -आजपर्यंत तुम्ही व आम्ही अज्ञानाने लौकिक प्रपंचासच महत्त्व देऊन कौतुकाने खेळ एकमेकांच्या संगतीने खेळलो १ आता मात्र सर्व गुणाचा त्याग करून मी त्या निर्गुण परमेश्वराशी लीन झाले, आणि करू नयेत ते खेळ सुखाने करण्यासाठी तत्पर झाले २ तुकारामबुवा म्हणतात आता मी दोन्ही कुळे सासरची व माहेरची बुडवून एक नारायणास मात्र हृदयात स्थान दिले आहे ३ २३ सासुरिया वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावेचि ॥ १ ॥ साडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगू आता ॥ २ ॥ न व्हावी ते जाली आमुची भडाई । तुका म्हणे काई लाजो आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -साडवर-नवरा टाकलेली स्त्री भडाई-अपकीर्ती अर्थ -माझ्या सासुरवाडीस असे घडले की माझ्या पतीसच माझा वीट आला, आणि माहेरास तर दिलेली मुलगी दुसऱ्याचीच या भावनेने अलिप्तपणा सहजच होता १ आता या नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीस कोण आधार देणार ? जे काय व्हायचे नशिबात असेल ते भोगू आता २ दोन्ही ठिकाणी भांडणे होऊ नयेत, ती माझी झाली खरी, आता त्याबद्दल लाज धरण्यात काय अर्थ आहे ? ३ २४ मरणाही आधीं राहिलो मरोनी । मग केलें मनीं होते तैसे ॥ १ ॥ आता तुम्ही पाहा आमुचे नवल । नका वेचू बोल वायाविण ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसी सग सरी तुम्हा आम्हा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -वायाविण-व्यर्थ अर्थ -मरणाचे दुःख मी याच जन्मी जगू भोगले आहे प्रत्यक्ष देहत्यागापूर्वीच ती अवस्था या देहधारी अवस्थेतही आम्ही भोगत आहोत माझा संपूर्ण पालट झाला आहे, मग जे माझ्या मनात होते ते मी करीत राहिलो. १ आता तुम्हीच आमच्या आयुष्यातील नवल पाहा उगाच व्यर्थ वचन मात्र अर्थशून्य बोलू नका २ तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सर्व बायका भयभीत आहात, तुम्हांला लौकिकाची आशा सुटलेली नाही तेव्हा तुमच्या- आमच्या संगतीची बरोबरी कशी होणार ? होणार नाहीच ३

सार्थ तुकारामगाथा १३ २५ परपुरुषाचे सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावे सीस ॥ १ ॥ संसारा आगी आपुलेनि हाते । लावूनि मागुतें पाहू नये ॥ २ ॥ तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई १ ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - सीस-डोके, मागुतें-मागे अर्थ -त्या श्रेष्ठ पुरुषाच्या, परमेश्वराच्या सहवासाचे सुख भोगावयाचे असेल तर तळहातावर शीर घेऊनच जावे लागते, म्हणजे जिवावर उदार व्हावे लागते १ आपल्या हाताने आपल्या संसाराला आग लावावी लागते, संसारसुखावर पाणी सोडावे लागते, पुन त्याच्याकडे मागे वळूनही पाहू नये २ तुकाराम महाराज म्हणतात की दिव्यावर झेप घेणारा पतंग जसा जिवावर उदार होऊन झडप घालतो त्याप्रमाणे या मार्गातील लोकांनी धीट व्हावयास हवे ३ २६ आइकाल परी ऐसे नव्हे ताई । न सडा या सोई अंतराची ॥ १ ॥ नव्हे आराणूक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविले तें ॥ २ ॥ तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -न सडा-सोडू नका, आराणूक-तृप्ती, संतोप, गोविले-गुंतवून ठेविल अर्थ -बापानो, तुम्ही माझे म्हणणे ऐकाल, पण त्याप्रमाणे वागणे तुमचे किती होईल कुणास माहित ? पण तुम्ही या परमश्रेष्ठ संतांची संगत मात्र सोडू नका १ आणि लक्षात असू द्या की या लौकिक संसारापासून कसलाच संतोप तुमच्या मनास लाभणार नाही, पण आपले आपणच त्या संसारात गुंतून राहिलेले असतो २ तेव्हा मन जरा कठिण करा व ज्याचे मन असे कठिण होईल तेवढयाच माझ्या मार्गाने या ३ २७ आहाच वाहाच आत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हा संशा ॥ १ ॥ भेऊ नये तेथें भेडसावू कोणा । आवरूनि मना बद द्यावा ॥ २ ॥ तुका म्हणे काही अभ्यासावाचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाच-आत वाहाच-बाहेर, गडणी-सावतीण, मैत्रिण, बद-बंदी, वायूचा निरोध करण्याची योगमार्गातील एक प्रक्रिया, अर्थ -आत मनात एक व बाहेर तोंडात एक अशा मैत्रिणी आम्हांस नकोत १ आमच्या मनात कसलेच भय नसते, मग आम्ही तरी इतरांना कसे दाखवू ? तुम्हीही आपले मन आवरून बदिस्त करून ठेवा २ आणि लक्षात असू द्या की कोणत्याही गोष्टीचा चांगला अभ्यास असल्यावाचून काही साध्य होईल असे नसते ३ २८ बहुताच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥ १ ॥ विचार करिता वाया जाय काळ । लटिकॆ ते मूळ फजितीचे ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - लटिकॆ-बाट, घटापटा-व्यथ खटपट घटाबादा म्हणजे आकाश बस कवडे, तर घटाच्या आकारात सामावलेले पट म्हणजे वस्त्र व त्यास ततू याच्या सवधावरून ईश्वर व जगत याच्या सवधाचे वगन करण्याची जी वेदान्ताची परिभाषा ती या पटपटादी खटपटीवरून प्रकट होते अथ -आम्ही काही पुष्कळ लोकाच्या मतांना मानणार नाही, कारण प्रत्येकाची भावना कशी वेगळी असेल याचे काय सागावे ? १ याबद्दल जो जो विचार करावा तो तो वेळ मात्र वाया जातो असे दिसते व ही चर्चाच व्यर्थ असून तोमुळे फजिती मात्र पदरी येते २ तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही वाटल्यास ही घटपटादी खटपट करा खुशाल, पण आमच्या वाटेस मात्र कोणी जाऊ नका ३ १ दीपावरी

१४ सार्थ तुकारामगाथा २९ त्याचे सुख नाहीं आले अनुभवा । कठिण हे जिवा तोचिवरी ॥ १ ॥ मागिलाचे दुःख लागो नेदी अगा । अंतर हे सगा नेदी पुढें ॥ २ ॥ तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - नेदी-देत नाही, सगा-भगतीस, श्रुति-वेद अर्थ - जोपर्यंत त्या परमपुरुषाच्या सहवासाचे सुख अनुभवास आले नाही तोपर्यंतच जिवाला हा मार्ग भारी कठिण वाटतो १ पण एकदा त्याची भेट झाली म्हणजे मग मात्र मागचे दुःख जाणवत नाही, आणि जे संगतीचे सुख मिळेल त्यात अंतरही पडत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात की हा परमपुरुष सर्वांना संपन्न असाच असून त्याचाच महिमा सर्व वेदांनी जाणून गाइला आहे ३ ३० न राहे रसना बोलता आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मने ॥ १ ॥ मानेल त्या तुम्ही अइका स्वभावे । मी तो माझ्या भावे अनुसरले ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्हीं फिरावे बहुतों । माझी तो हे गती जाली आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - रसना-जीभ वाणी आवडी-प्रेमाने अर्थ - बाबांनो, त्या श्रेष्ठ पुरुषाविषयी बोलताना प्रेमामुळे माझ्या वाणीला भान राहात नाही माझ्या मनाने तर त्याच्याच पायावर बुडी दिलेली आहे १ तुमचा जसा स्वभावविशेष असेल त्याप्रमाणे तुम्ही एकावे, मी मात्र माझ्या स्वभावानुसार त्याला अनुसरले आहे २ तुकारामबुवा म्हणतात, बाबांनो तुम्ही आता मागे फिरावे हे बरे माझी तर आता ही अशी गत होऊन गेली आहे ३ ३१ न बोलता तुम्हा कळो न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥ १ ॥ आता तुम्हा पुढे जोडीतसे हात । नका कोणी अत पाहो माझा ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी । करील ते हरी पाहो आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - गुज-गुपित गोष्ट सांडियेली-सोडली अर्थ - बाबांनो, मी ही माझ्या मनातील गुपित गोष्ट जर बोलले नसते तर तो तुम्हास समजली नसती, म्हणून तर लाज सोडून मी ही तुम्हास सांगितली १ पण आता मात्र मी तुमच्यापाशी हात जोडून विनवणी करीत आहे की आता माझा अंत कोणी पाहू नका २ तुकारामबुवा म्हणतात, आम्ही आता त्याच्या शेजारी सुखाने बसलो आहोत, आता तो श्रीहरी जे करील ते आम्ही पाहू ३ विवरण - येथ विराण्यांचे पंचवीस अभंग संपले अत्यंत तीव्र अशा अनुभूतीच्या प्रकटीकरणासाठी तुकाराम महाराजांनी ही अशी शृंगारिक भाषा वापरली असली तरी त्यातील रूपक एकदा ध्यानात आल्यावर मग मथितार्थ सरळपण ध्यानात येण्याजोगा असतो ३२ नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ॥ १ ॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ २ ॥ देवापाशीं मागे आवडीची भक्ति । विश्वासेसीं प्रीति भावबळें ॥ ३ ॥ तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार दिसेदिस ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सुस्वर-गोड आवाज, निर्धार-निश्चय अर्थ - तुकारामबुवा आपल्या मनास उपदेश करीत आहेत की मना, तुला मधुर शब्दांनी परमेश्वराचे स्तवन करता येत नसेल, कारण तसा गोड आवाज तुला मिळाला नसेल १ पण ध्यानात ठेव की ईश्वर काही त्याच्यासाठी भुकेलेला नाही तुला जसे येईल तसे 'रामकृष्ण रामकृष्ण' असे म्हण २ देवापाशी मोठ्या प्रेमाने

१. मंगलाचरण व विठ्ठल स्तुति अभंग

सार्थ तुकारामगाथा १५ तू भक्तीच माग आणि मोठ्या विश्वासाने व भावनेने त्याच्याशी प्रीती जडीव ३ मना, हा हाच एक निर्धार तू दिवसेंदिवस पक्का करावांस हा एक विचार तुला सांगतो ४ ३३ सावध जालों सावध जालों । हरिच्या आलो जागरणा ॥ १ ॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ २ ॥ पळोनिया गेली झोप । होते पाप आड तें ॥ ३ ॥ तुका म्हणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागरणा-देवासाठी केलेले जागरण, भजन, कीर्तन, भार-समुदाय, ओल-दाट अर्थ - परमेश्वराच्या कृपेने मी सावध झालो व हरीच्या भजनकीर्तनात मग्न झालो १ त्या ठिकाणी विष्णूभक्तांचे समुदाय मोठमोठ्याने हरिनामाची गर्जना करीत होते २ ते पाहून माझी झोप पळून गेली व जे काही थोडे पाप होते तेही संपले ३ तुकाराम महाराज म्हणतात त्याच ठिकाणी दाट कृपेची छायाही निर्माण झालेली असते ४ ३४ आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥ १ ॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ २ ॥ गीता भागवत करितो श्रवण । १आणीक चिंतन विठोबाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या देवा पार नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागता-सावध, हरिख-हर्ष, आनंद, पार-अंत, शेवट, तुलना अर्थ - आपले श्रेष्ठ हित कशात आहे हे जो जाणून आहे, म्हणजे ईश्वराच्या मोठेपणाची जाणीव ज्यास आहे त्याचे आईबाप त्याला प्रसवून धन्य झाले आहेत १ ज्याच्या कुळात सात्त्विक विचाराचे कन्यापुत्र निर्माण होतात त्याबद्दल प्रत्यक्ष ईश्वरासही हर्ष होतो २ जेथे अखंडपणे भगवद्गीता व भागवत याचे वाचन व श्रवण चालत असते आणि जेथे सतत चिंतन विठ्ठलाचे असते, ३ तेथील लोकांची सेवा मला घडली तर मग माझ्या देवास कसली तुलनाच राहणार नाही, एवढे दैव मोठे माझे होईल ४ ३५ अंतरोंची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥ १ ॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ २ ॥ आपुल्या वैभवे । शृंगारावे निर्मळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जेवी सवे । प्रेम द्यावे प्रीतीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंतरोंची-मनातील, गोडी-किंमत, सोयरा-नातेवाईक, शृंगारावे-सुशोभित करावे अर्थ - ईश्वर आपल्या भक्ताच्या अंतःकरणातील गोडी चाखीत असतो, त्याच्या हृदयात भावना कोणती असते हे तो पाहतो १ खरोखरच देव हा एकच खरा आपला आप्त आहे दीन दुबळ्याचा तोच नातेवाईक नव्हे काय ? २ तो आपल्या सामर्थ्याने आपल्या भक्तास निर्मळपणे सुशोभित करतो ३ इतकेच नव्हे तर तुकाराम महाराज म्हणतात की तो सोयरा ईश्वर आपल्या भक्ताबरोबरच जेवण करतो, व आपले स्वतःचे प्रेमही त्याला देतो ४ ३६ सुखे वोळव दावी गोहा । माझें दुख नेणा याहा ॥ १ ॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय फंसा म्हणे भेडा ॥ २ ॥ निपट मज न चले अन्न । पायली गहू साजा तीन ॥ ३ ॥ गेले वारीं तुम्हीं आणिली साखर । सातदीं² गेली साडेदहा शेर ॥ ४ ॥ १ अखंड २ सात दिवसा दाहा शेर

१६ सार्थ तुकारामगाथा अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर १ तूप पथ्या ॥ ५ ॥ दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पडे सुपती ॥ ६ ॥ नीज नये घाली फुलें । जवळी न साहती मुलें ॥ ७ ॥ अंगी चंदन लाविते भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥ ८ ॥ हाड गळोनि आले मांस । माझें दुःख तुम्हां नेणवें कैसें ॥ ९ ॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥ १० ॥

शब्दार्थ व टीपा :- चोळंब - ढोंग, कौतुक, रागाव, गोहा - नवऱ्याला, मारिला - नादावलेला, भिडा - भिडेने, निपट - अगदी, न चले - पचत नाही, जात नाही, साजा - वेळेस, गेलेवारी - मागल्या वारी, बाजाराच्या दिवशी, सातदी - सात दिवसात, व्यथा - दुख, लहरी - चक्कर, भोवड, घेरी, सुपती - झोपी जाते, जिता - जिवंतपणीच

अर्थ - एक सुखात वाढलेली स्त्री आपल्या पतीला आपल्या नाजूक प्रकृतीचे ढोंग किंवा कौतुक वर्णन करून सांगत आहे आणि म्हणते, 'अहो, माझे दुःख कुणीच कसे जाणीत नाही?' १ आणि बायकोच्या प्रेमाने नादावलेला वेडा नवरा भिडेखातर 'होय य हो खरेंच' असे म्हणत राहतो २ त्याची बायको त्याला म्हणत असते, 'मला अन्न मुळीच जात नाही, पचत नाही. दिवसास तीन वेळास कसे तरी पायलीभर गहू पुरतात मला ३ गेल्या बाजाराच्या दिवशीच तुम्ही साखर आणलीत, पण ती साडेदहा शेर साखर मला कशी तरी सात दिवस पुरली ४ मला एकसारखे पोटाचे दुखणे आहे, म्हणून दूधभात व तूपसाखर याच्या पथ्यावर मला राहावे लागते ५ दोन प्रहरी मला चक्कर येत असल्यामुळे मी अंथरुणावर पडून झोपी जाते, कधी बेशुद्धही होते. ६ मला कधी धड झोपही येत नाही, मग मी माझ्या अंथरुणावर फुलांचा थर घालते जवळ सारखी किरकिर करणारी मुले मला सहन होत नाहीत. ७ माझे कपाळ नेहमीच दुखत असल्यामुळे मी कपाळावर, अंगावर चंदनाची उटी लावते ८ माझी सारी हाडे गळून गेली असून नुसते मांस उरले आहे, हे माझे दुःख तुम्हास कसे समजत नाही ? ९ तुकाराम महाराज म्हणतात, या असल्या ढोंगी बायकोच्या नादाने नवरा जिवंत असतानाच शुद्ध गाढव बनला व मेल्यावर नरकात गेला त्याला नीट प्रपंचही समजला नाहीं; परमार्थही साधला नाही १०

निरूपण :- तुकारामबुवांच्या अभंगातून भव्य असे तत्त्वनिरूपण वा कथाप्रसंगाचे, वृत्तान्ताचे कथन नसले तरी त्यांच्या अभंगांचे स्थूल मानाने दोन वर्ग करता येतात पहिल्या वर्गात त्यांची स्वतःची मनःस्थिती त्यांनी सविस्तर वर्णन केली आहे आपला उद्योगधंदा, आपला संसार, आपले वैराग्य, आपली साधना, आपणास झालेली गुरुप्राप्ती, आपली कवित्वशक्ती, परमेश्वरभेटीची तीव्र लालसा, तळमळ, उत्कंठा, ईश्वराचे रूपचितन, त्याच्या भेटीचा परमानंद, पुनः विरह, पुनः तगमग, पुनः दर्शनाचे सुख, मीलनाचा आनंद हा सर्व विलास पहिल्या प्रकारच्या अभंगातून बुवानी सविस्तर वर्णन केलेला आहे दुसऱ्या प्रकारच्या अभंगातून बुवा समकालीन लोकांना प्रपंच व परमार्थ याच्यासंबंधी उपदेश करीत आहेत ढोंगी, स्वार्थी गुरूंच्या मागे लागून लोक कसे फसत आहेत व त्यांचे ना धड परमार्थ ना धड प्रपंच, अशा अवस्थेत दिवस कसे वाया जात आहेत याचे चित्रण त्यांनी अनेक अभंगातून केले आहे लोकांचे वैयक्तिक प्रपंच कसे चुकीच्या मार्गाने होत आहेत याचीही चित्रे त्यांनी रेखाटली आहेत लोकही ढोंगी आहेत केवळ पैसा, केवळ स्त्री, केवळ मानसन्मान, केवळ स्वार्थ याच्याच नादी लागून परमार्थविचार अगदीच सोडून देत आहेत असे बुवाना दिसले ईश्वराचे नावही न घेता लोक निव्वळ प्रपंच प्रपंच, पैसा पैसा करीत आयुष्य कंठतात अशा भेसूर प्रपंचाची बुवानी फार मार्मिक व बोलकी शब्दचित्रे काढलेली आहेत प्रत्यक्ष उपदेशापेक्षाही असल्या उपरोधिक टीकेमुळे लोकांना जास्त समजते असा अनुभव सर्वत्र आहे

या अभंगात अशाच एका अर्थकामाधिष्ठित जोडप्याचे प्रपंचिक चित्र बुवानी उपरोधाने रंगविले आहे या अभंगातील बाई सुखाला, विलासाला चटावलेली आहे साऱ्यांनी, विशेषतः आपल्या नवऱ्याने सदैव आपलेच

१ साकर पथ्या

सार्थ तुकारामगाथा १७ कौतुक करावे असे तिला वाटते ही सुखासीन स्त्री सदोदित आपल्या पतीच्या मागे भुणभुण लावीत असते मला भूक लागत नाही, अन्न पचत नाही, पोट दुखते, कपाळ दुखते, दोन प्रहरी जीव घाबरा होतो, झोप येत नाही, हाडे गळून गेली आहेत या तक्रारी ही लाडावलेली स्त्री नेहमी करीत असते, आणि तिच्या सौंदर्याने मोहित झालेला नवरा 'हो हो खरेच आहे' अशी कबुली देत असतो असल्या ढोंगी व मतलबी बायकोच्या नादाने बिघडलेला नवरा हा या जन्मी गाढवाच्या बरोबरीचाच असतो व पुढल्या जन्मी नरकात जातो कारण लाडावलेल्या बायकोस सुधारण्याचे काम खरे म्हणजे पतीचे पण हा तर तिच्याच तंत्राने वागतो तिथे हे सर्व दोष आहे कारण पायलीभर गहू तिला रोज लागतात, साडेदहा शेर साखर तिला एका आठवड्याची लागते दूधभात व तूपसाखर तिला पथ्यासाठी लागतात हे पदार्थ तुकारामबुवांचे हे बोलणे उपरोधाचे असले तरी प्रापंचिकांना त्यांच्या स्थितीचे नीट वर्णन करून सांगणारे आहे समाजस्थितीचे किंवा समकालीन लोकांच्या प्रवृत्ताचे उपरोधिक वर्णन विनोदी भाषेत बुवा नेहमीच करतात नुसत्या उपदेशापेक्षा उपरोधिक टीकेने अधिक चांगले कार्य होते हे त्यांनाही माहित होते असे दिसते प्रपंचातील अनेक विषयावर भारुडात्मक रचना संतांनी जी विपुल प्रमाणात केलेली आहे तीत हा उपरोध प्रकर्षाने पाहावयास मिळतो मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे दोष घालवून त्याला सन्मार्गास प्रवृत्त करण्याचे कार्य संतांना साधावयाचे होते एकनाथांनी या प्रकारच्या सांसारिक चित्राची अनेक शब्दचित्रे काढली आहेत 'बाई मी भोळी ग बाई मी भोळी । आठा दिसा खाते पुरणाची पोळी' या ओळीने सुरुवात असणारे एकनाथांचे एक चांगले भारुड- गीत प्रसिद्ध आहे अशा प्रकारे संसारात स्त्री व पुरुष याचे लक्ष केवळ अर्थकामावर कसे असते व त्यामुळे संसार कसा बिघडून जातो याची तुकारामबुवांची अभंगात्मक चित्रे विचारप्रवृत्त करणारी आहेत पुढे 'भ्रतारेंसी भार्या बोले गुजगोष्टी', 'कामाचा अंकित कांतलें प्रपंचित' यासारख्या अभंगातून हे प्रपंचदर्शन आपणास होणार आहेच तुकाराम- बुवांची प्रपंचविषयक मते यासारख्या अभंगावरून अजमावताना फार सावध असावयास हवे स्त्रीजातीसबंधी तुकारामबुवांचीही दृष्टी अनुदारपणाची होती असा आक्षेप वारंवार येतो, पण तो खरा नाही केवळ प्रपंच, केवळ धनलोभ, केवळ स्त्री व मुले यांच्याच नादात असणाऱ्याचा गौरव कोण करणार? प्रपंचाचे वा स्त्रीपुरुषाच्या प्रेमाचे रहस्य बुवांना समजत नव्हते असे नाही, परंतु त्यातील ढोंग, त्यातील लोभी वृत्ती, त्यातील ईश्वरविन्मुखता बुवांना दूर करावयाची होती ३७ पावले पावले तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥ १ ॥ जेथें तेथें देखों तुझींच पावले । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ २ ॥ भेदाभेदमते भ्रमाचे सवाद । आम्हा नको वाद त्याशीं देऊं ॥ ३ ॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥ शब्दार्थ व टीपा - पावले - मिळाले, दुजा - दुसरा, याहून वेगळा, सचले - माठून राहिले, भेदाभेदमते - नाना मताचे प्रतिपादन, भेद-अभेद, द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण असे वाद, भ्रमाचे - भ्रममूलक, सवाद - भाषण, वाद - भांडण, कलह, अणु - अगदी लहान कण, नभाहूनि - आकाशापेक्षा, वाढ - मोठा अर्थ - परमेश्वरा, तुमच्यापासून जे काही मला मिळायचे होते ते सर्व मिळाले आहे आता देवा, मागणे एवढेच की मनातील हा भाव बदलू देऊ नका १ विठ्ठला, जेथे मी पाहतो तिथे तुझीच पावले मला दिसतात या त्रिभुवनात तूच भरून राहिलेला आहेस २ भेद, अभेद, द्वैत, अद्वैत हे सर्व भाषण भ्रमातून निर्माण झाले असल्याने त्याच्याशी वाद घालण्याचा किंवा भांडण करण्याचा प्रसंग मजवर आणू नकोस ३ देवा, एखादा अणूही असा नाही की ज्यात तू नाहीस तू अणूपेक्षाही लहान व आकाशापेक्षाही मोठा आहेस ४

१८ 'सार्थ तुकारामगाथा' त्याप्रमाणे अथवा ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे त्याप्रमाणे 'सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाच्या सुतीं ओविले' त्यानुसार परमेश्वरी सूत्रात हे जग ओवले गेले आहे सर्वत्र वासुदेवतत्त्व भरून राहिले हा एक भागवत धर्माचा प्रमुख सिद्धान्त आहे महाभारताच्या शांतिपर्वात 'सर्वभूताधिवासश्च वासुदेवस्ततो ह्यहम्' सर्व भूताच्या ठिकाणी मी वास करतो म्हणून मी वासुदेव ' असे स्पष्ट केले आहे गीतेतही 'वासुदेव सर्वमिति' असे वर्णन करून अगदी लहान अणूपासून अमर्याद आकाशापर्यंत परमेश्वर भरून राहिला असल्याचे वर्णन 'अणोरणीयान्महतो महीयान् 'सारख्या सूत्रात स्पष्ट केले आहे इतरत्रही तुकारामबुवानी 'अणुरेणुया थोडका । तुका आकाशाएवढा' अशा शब्दात स्वानुभव मागितला आहे 'सर्वं विष्णुमयं जगत्' म्हणजे सर्व जग विष्णुमय होऊन गेले असा भावार्थं 'जिये दृष्टी जाई तिथे भगवंताची पावलेच दिसावीत ही निष्ठा आहे 'ज्या ज्या स्थळीं हें मन जाय माझें । त्या त्या स्थळीं हें निज रूप तूझें' अशी जाणीव सर्वत्र आहे 'हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरनाचा घ्रोतला भावो' असा स्वानुभव असून 'जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत' ह भक्तियोगातील सूत्र येथे स्पष्ट झाले आहे ३८ वंदूं चरणरज सेवू उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडू ॥ १ ॥ अमुप हे गांठीं बांधू भाडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ॥ २ ॥ अवघे होती लाभ एका या चिंतने । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥ ३ ॥ जन्ममरणाच्या खुटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥ ४ ॥ गेले पुढें त्याचा शोधीत मारग । चला जाऊ माग घेत आम्ही ॥ ५ ॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊ त्या माहेरा निजाचिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका - चरणरज- चरणावरील धूलिकण, सेवू-सेवन करू, स्वीकारू, उष्टावळी-उष्ट्या पत्रा- वळी, अमुप-पुष्कळ, खुटतील-संपतील, चिरा घालणे-जन्ममरणाच्या फेऱ्या बंद करणे, एखाद्या गुहेच्या तोंडावर चिरा देऊन दारे बंद करतात त्याप्रमाणे माहेरा-जेथून आपण जन्मास आलो तेथे जाऊन मिळण्याची धडपड प्रत्ये- कास असते म्हणून या मूळस्थानास 'माहेर' असे संबोधण्याची प्रथा आहे पूर्वी लग्न रोवर झाल्यानंतर लहानपणी माहेरची ओढ जशी असते जशी ओड प्रत्येकास परमेश्वरास भेटण्याची असत असा भावार्थ अर्थ - त्या विठ्ठलाच्या पायावरील धुळीस वंदन करू त्याच्या उष्ट्या पत्रावळीही सेवन करून पूर्वकर्मांची होळी करून टाकू १ आमच्यासारख्या अनाथाना विठ्ठल हेच एक दैवत योग्य असल्याने हे न सरणारे भरपूर असे भाडवल आम्ही पदरात साठवून ठेवू २ या गोविंदाच्या चिंतनाने, त्याच्या नामसंकीर्तनाने सर्व लाभ आम्हास होतात ३ याच्या नामाने जन्ममरणाच्या खेपा संपतील व याच्या प्राप्तीचा हा एक सोपा मार्ग हस्तगत होईल ४ या मार्गावरून जे आमच्या अगोदरच पुढे गेले त्याचा मार्ग शोधीत शोधीत आम्ही त्याच्या मार्गावरच राहू ५ आम्ही आमच्या जीवपणावर चिरा (दगड) घालून, म्हणजे जीवपणाचा भाव संपवून निजात्मरूपाच्या माहेराला

सार्थ तुकारामगाथा १९ ३९ जेविले ते सत मार्गे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥ १ ॥ सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा । पासोनि सकळा अवघ्या दुरीं ॥ २ ॥ परे परतें मज न लगे सांगावे । हे तो देवे बरें शिकविले ॥ ३ ॥ दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥ ४ ॥ येणें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥ ५ ॥ लाचावला तुका भारितसे झड । पुरविले कोड नारायणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - झाडा-हिशेब, परे परते-परावाणीच्या पलीकडे, आतळत-स्पर्श करीत संकेत-खूण, पड-झाड, कोड-कौतुक इच्छा अर्थ - पूर्वी जे संत जेवले, त्यांच्या उष्ट्या पत्रावळी सर्व गोळा करून मी उच्छिष्टाची इच्छा करीत आहे. १ तुमच्या सर्व सोवळ्या ओवळ्यापासून मी निराळा आहे २ परावाणीच्या पलीकडे जे तत्त्व आहे त्यासंबंधी आता मला कुणी काही सांगू नये, मला हे देवाने चांगले शिकविले आहे ३ एका ईश्वराशिवाय आम्ही दुसऱ्या कोणासही स्पर्श करणार नाही, याच प्रकारची खूण मनाशी बांधून मी आता स्वस्थ उभा आहे ४ येणे कुणी काही कसलीही शंका धरू नये मला आता ईश्वरप्राप्तीच्या भोजनाचीच आवड आहे ५ मी याच गोष्टीसाठी हपापलेला असून तो- वरच मी अधाशासारखा तुटून पडत आहे आणि नारायणाने माझी ही इच्छा पूर्ण केली आहे ६ ४० देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥ १ ॥ ब्रह्मादिकासि हे दुर्लभ उच्छिष्ट । नका मानू वीट ब्रह्मरसी ॥ २ ॥ अवघिया पुरतें वोसडले पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥ ३ ॥ इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥ ४ ॥ सरे येथें ऐसे नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळों घ्यावे ऐसे ॥ ५ ॥ तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हातें । कामारोसांगातें निरुपम ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अवघिया-सर्वांना वोसडले-भरून चाल पाक-स्वयंपाक कामारी-मदत करणारा कामगार सांगाते-बरोबर निरुपम-उपमा नसलेला अर्थ - जे कोणी या मार्गास येण्यासाठी अधिकारी असाल त्यांनी देवाचा प्रसाद म्हणूनच भजन करावे १ कारण हे उष्टे अन्न ब्रह्मादिकांनासुद्धा दुर्लभ आहे, म्हणून या ब्रह्मरसाचा वीट तुम्ही मानू नका २ सर्वांना पुरेल एवढे भरून हे पात्र तयार आहे, आणि याचे सेवन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे ३ आणि ज्याची इच्छा करावी ते देणारा समर्थ येथे प्रसन्न झाला आहे, तो सर्वांची इच्छा पूर्ण करणारा आहे ४ या रसाचे सेवन कोणी कितीही केले तरी तो कधी संपणारा नाही व पुन पुन तो घ्यावा, त्याचा घास घ्यावा असे वाटत राहते ५ तुकाराम- महाराज म्हणतात हा ब्रह्मरसाचा स्वयंपाक स्वतः लक्ष्मीने केला आहे, आणि तिला मदत करणारा प्रत्यक्ष निरुपम असा परमेश्वर आहे ६ ४१ अवगुणाचे हातीं । आहे अवघी फजीती ॥ १ ॥ नाहीं पात्रासवे चाड । प्रमाण तें फिके गोड ॥ २ ॥ विष तांब्या वाटी । भरली लावू नये होंटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग याव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अवगुण-दुर्गुण पात्र-भांडे याव-फुकट व्यर्थ

२० सार्थ तुकारामगाथा अर्थ:-दुर्गुणांचा काहीच उपयोग नाही. त्यांच्यायोगे नेहमीच फजिती होत असते १ भांडे कसले आहे, चांगले की वाईट यावर काही नसून आतील पदार्थाच्या गुणावगुणांवर सर्व आहे. २ तांब्याच्या पवित्र वाटीमधील विष ते विषच, परिणामो घातकारकच होणार; ती भरलेली वाटी ओठाना लावता कामा नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात मूळचा भाव जो असेल तोच खरा; धरले सोंग व्यर्थ आहे. ४ ४२ हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥ १ ॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाठीं ॥ २ ॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलीती अंतीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागरण - भजनकीर्तन वगैरेसाठी केलेले जागरण, तुटी-नुकसान, वेचे-खर्च होत आहे, गुंती-मोह, माया, मोकलीती-सोडून देतात, अंतीं-शेवटी, अर्थ - मना, हरीच्या कथाकीर्तनाला का जात नाहीस ? १ केवळ प्रपंचाचा विचार करून तुझे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई तू करणार तरी कुठे ? आयुष्य हरिविना फुकट चालले ना ? २ ज्या मुलांबाळांचा व आप्तांचा तुला मोह पडत आहे ते तर अंतकाळी तुला सोडून जातील. ३ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरप्राप्तीचाच जो चांगला लाभ आहे त्याचाच तू विचार कर. ४ ४३ धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥ १ ॥ मज सोडवीं दातारा । कर्मापासुनि दुस्तरा ॥ २ ॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥ ३ ॥ जिवोंच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुस्तर-तरून जाण्यास कठिण अर्थ - ईश्वरा, तू तर प्रत्यक्ष धर्माचीच मूर्ती आहेस आणि पापपुण्यही तुझ्याच हाती आहे. १ म्हणून हे दातारा, या कठिण अशा पापपुण्यात्मक कर्मापासून मला मुक्त कर. २ देवा, तू जर माझा स्वीकार केलास तर तुला काय माझा भार होणार आहे ? ३ सर्व जीवांचे जीवन असणाऱ्या देवा नारायणा, तुला माझे ओझे काय आहे ? ४ ४४ ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणें । बळिये आम्ही भले शरणागत ॥ १ ॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाऋणी ॥ २ ॥ कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुपावें ॥ ३ ॥ बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥ ४ ॥ हरि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥ ५ ॥ तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा -ब्रह्मादिक-ब्रह्मलोक वगैरे, बळिये-बलवान, पद्मनाभ-श्रीविष्णू, सेवाऋणी-सेवेने ऋणी. कामधेनु-इच्छिलेली वस्तू देणारी दैवी गाय, त्रिपुटो-ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान किंवा ध्येय, ध्याता, ध्यान, अशा तिघांचा समुदाय, लाटे-भरपूर मोठे अर्थ - ज्याच्या लाभापुढे ब्रह्मादिकांचेही लाभ ठेंगणे आहेत अशा ईश्वराच्या संगतीचा लाभ आम्ही मिळविला आहे; त्यामुळे मी शरणागत मोठा बलवान बनलो आहे. १ मी वासनेचा त्याग करून देवाच्या भजनाची जोड मिळविली आहे आणि त्यायोगे पद्मनाभ श्रीविष्णूलाच ऋणी करून ठेविले आहे. २ ईश्वराची ही भक्ती म्हणजे कामधेनूप्रमाणे असून तिच्या दुधाला अंत नसतो. जशी ज्याला इच्छा होईल तसा त्याच्यावर वर्षाव होत राहील. ३

सार्थ तुकारामगाथा २१ बसल्या ठिकाणीच तिच्या दुधाला भरते येते व त्याच्या प्राशनाने एवढी लय साधते की ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होते ध्येय, ध्याता, ध्यान यातील भेद मावळतो ३ काय जाणावयाचे आहे ते, जाणणारा व त्याची झालेली जाणीव अशा वेगळया अवस्थाच शिल्लक राहात नाहीत ४ या जगात आम्हासारख्या विष्णुदासांना हरिनाम हाच एक विसावा आहे. नारायणाने विसावा आमच्याच देहांत घेतलेला आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात की ईश्वरप्राप्तीच्या या भोजनाचा लाभ फार मोठाच आहे येथे कुणीही उपाशी राहू म्हटले तरी राहू शकत नाही ६ ४५ दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणाबाहेरी । नलगे ठाव धुंडावा ॥ १ ॥ इतुले जाणावया जाणा । कोठे तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । १जाणतेचि साधावे ॥ २ ॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसे भासतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जागा । नको २धासपू घाउगा ॥ आहेसि तू आंगा । अगों डोळे उघडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुजें-द्वैत, जीवशिव, आत्मापरमात्मा ही भिन्न असल्याची जाणीव खंडे-सडल्यावर सपल्यावर, पारधी-शिकारी, धासपू-चाचपू, घाउगा-व्यर्थ अर्थ - एक द्वैत संपले की जे उरते ते सर्व परमेश्वराचेच रूप आहे मग त्याला शोधण्यासाठी आपल्या- बाहेर कुठे जावे लागत नाही १ पण हे ज्ञान होण्यासाठी मनाने मनाकडेच अंतर्मुख व्हावयास हवे, कारण पारध्यासच पारध्याच्या खुणा माहित असतात २ आधी देह हासुद्धा खरा नाही, मग त्यापासून निर्माण झालेला पसारा खरा कसा असणार ? शेतातले बुजगावणे हे जसे चोरास रक्षण करणारेच वाटते त्याप्रमाणे देह आपणास खरा वाटतो ३ म्हणून तुकाराम महाराज जागे करीत आहेत की, उगाच इकडे तिकडे ध्येयं चाचपू नका, देहातच तुम्ही ईश्वरस्वरूप आहात, हे देहातीलच ज्ञानदृष्टीने तुमच्या ध्यानात येईल ४ विवरण - संताच्या अभंगात द्वैताद्वैताचा उल्लेख नेहमी येतो मग द्वैती की अद्वैती ? याचे उत्तर संत तत्त्व ज्ञानाच्या वा बोधाच्या दृष्टीने अद्वैतीच त्यांची अनुभूती अद्वैताची दुजेपणा किंवा द्वैत संपल्यावर जे स्वरूप उरत तोच एक परमेश्वर हा या अभंगाचा मुख्य गाभा आहे दुजेपणा संपावा, भेद सर्व नाहीसा व्हावा, जीव वेगळा, ईश्वर वेगळा अशी भावना उरू नये यासाठी तर आग्रह आहे 'भेद तुटलीयावरि। आम्ही तुमचीच हो हरी' अशी जाणीव सर्वत्र आहे 'कासयाने पूजा करू केशीराजा' नावाच्या सर्वोत्तम अभंगात या अद्वैतानुभूतीचे फार चांगल वर्णन आलेले आहे नाव निरनिराळी म्हणून काय मूळ रूपही वेगवेगळे असावे ? जलप्रवाह निराळा, तरंग निराळा, सुवर्ण निराळे, अलंकार वेगळे किंवा तुकोबाच्या भाषेत बोलायचे म्हणजे 'खडा साळी साखर । झाला नामाचाची फेर ' नामाची भिन्नता, परंतु स्वरूपाच्या दृष्टीने एकताच की 'तुज मज नाहीं भेद' अशीच अनुभूती सर्वत्र आहे मग द्वैत आले कोठून ? 'अद्वैतीं तो नाहीं माझें समाधान ' असही तुकारामबुवा का म्हणतात ? याचे उत्तर अस की बोधाला, प्रचीतीला, तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर अद्वैतच; पण या अद्वैताची अनुभूती येणार ती द्वैताच्या साह्याने भोगायला द्वैत, अनुभूतीत अद्वैत दिसायला दोन पण असायला एक अशी वस्तुस्थिती आहे डोळे दोन पण दृष्टी एक ओठ दोन पण गोष्टी एकरूपाच्या एक वीजच वृक्षाच्या रूपाने आले सुवर्णच नाना अलंकाराच्या रूपानी व्यक्त झाले, अनेक लहरीच समुद्रावर उमटल्या, पण या सर्वात अनुभूती एका अव्यक्ताचीच आहे घरात सूर्य अस्तित्व दिसतो वाळात अग्नी वेगळा दिसतो पण सूर्याची व अग्नीची व्यापकता सर्वत्र जगत उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा हीच अनुभूती उदक व तरंग या द्वैतापासून यावयाची तत्त्वर बीजा पोटीं । वीज तश्यवरा शेवटी, 'असे हे द्वैताद्वैत चक्र आहे 'तुझी माझी एक ज्योती' हे अनुभवाचे सार आहे अध्ययनाला सुद्धा व्यक्त होण्याचा अद्वैताला द्वैतावर येण्याचा ध्यास असतो कारण त्याशिवाय सुख नाही त्या मूलस्थानाचा एकट्यास करमनास होणे म्हणून तो बहुविध आवा- रानी नटतो, व्यक्त होतो एका बीजाचा नाश झाल्यासारखा वाटून तरी अनेक टपोऱ्या दाण्याचे कणीस दिसते या अनेक दाण्यातही एक बीजच विविधनान नटलेल असत १ जाणे तणेंचि साधाव्या २ चाचपू

२२ सार्थ तुकारामगाथा ४६ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥ १ ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ २ ॥ कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पाये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भेदाभेदभ्रम-हे माझे, हे दुसऱ्याचे, हा पापी, हा पुण्यवान, हा लहान, हा मोठा अशा जाणिवेचा भ्रम, वर्म-खूण. अर्थ :- सर्व जगच विष्णुमय आहे, म्हणजे एकच तत्त्व सर्वत्र भरून राहिले आहे असे मानणे हा वैष्णवांचा धर्मच आहे. यात भेद मानणे, निराळेपणा कोणत्याही कारणाने कल्पिणे हे वाईट आहे. १ तुम्ही खरे भगवंताचे उपासक असाल तर जे कराल ते सत्याचे स्वरूप जाणून हिताचे असेल तेच करा. २ कुणाही जीवाचा मत्सर करु नका, कारण सर्वत्र एकच परमेश्वरतत्त्व भरून राहिले आहे, व त्या सर्वेश्वर पूजनाचे तत्त्व ध्यानात असू द्या. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व अवयव एकाच देहाचे आहेत. जर एका अवयवास सुखाची किंवा दुःखाची अनुभूती आल्यास ती त्या जीवात सारखीच जाणवते. ४ विवरण :- वारकरी संप्रदायात या अभंगास फार महत्त्व आहे याचे कारण असे की दोन महत्त्वाचे विचार या अभंगात थोडक्या शब्दांत सांगितले आहेत सर्व जगतात एकच परमेश्वर भरून राहिला आहे असे समजून सर्व- श्वराची पूजा करण्याचीच वृत्ती आपली असावी असा एकत्वाचा बोध फार परिणामकारक रीतीने वर्णन केला आहे. या बोधाचा व्यावहारिक उपयोग म्हणजे सर्वत्र परमेश्वराचाच अंश व्यक्त झालेला असल्यामुळे हा लहान, हा मोठा हा उच्च, हा नीच, हा चांगला, हा वाईट, हा पुण्यवान, हा पापी असे भेद उरू नयेत एकट्याचाच हा सर्व विस्तार असल्यामुळे समानबधत्त्वाची जाणीव असणे जगण्याचे आहे, हा यातून निघालेला दुसरा विचार. मग कुणाचाही मत्सर करू नये हे ओघानेच आले. हेवा दावा, मत्सर आपण ज्याचा करणार तोच ईश्वरी अशाचा व्यक्त झालेला आकार असेल तर ? असा प्रश्न सर्वांच्याच मनासमोर उभा राहिला तर पुजळसे हेवेदावे मिटतील कटुता कमी होईल. भागवत धर्माने या समत्वाच्या दृष्टीने फार मोठी कामगिरी सामाजिक क्षेत्रातही केली आहे भेददृष्टीने पाहणे संतानी अमंगल मानले आहे ४७ आम्ही तरी आस । जालों टाकोनि उदास ॥ १ ॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ २ ॥ भलते ठायीं पडों । देह तुरंगी हा चढो ॥ ३ ॥ तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसों जैसों ॥ ४ ॥ गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥ ५ ॥ तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आस-इच्छा, आशा, तुरंगी-घोड्यावर मानामान-मान किंवा अपमान, खंती-काळजी अर्थ :- देहबुद्धीची आशा सोडून आता आम्ही उदास झालो आहोत. १ आता परमेश्वरा, मरणाचे भय कुणास आहे ? २ आता देह कुठे पडून जावो अथवा घोड्यावर चढो, आम्हांस त्याचे काय ? ३ यामुळे होणारे सुखदुःखादी विकार तुमचे तुम्हापाशीच राहोत, आमचा त्यांच्याशी संबंध नाही; आम्ही आहो तसेच राहू. ४ मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांचा नाश करून आम्ही आता त्यांच्या पलीकडे गेलो आहोत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता यासंबंधीची मनांत बिलकुल चिंता उरलेली नाही. ६ ४८ निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥ १ ॥ मज हेंही नाहीं तेंही नाहीं । वेगळा वोहों पासुनी ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा २३ देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥ ३ ॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुम्हाचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देहभोग-देहास होणारे सुखदुःखादी विकार अर्थ :- आमची कोणी निंदा करोत अथवा कोणी स्तुती करोत, कोणी मार देवोत अथवा कोणी पूजा करोत, १ मला पहिल्याचे दुःख नाही दुसऱ्याचे सुख नाही. मी सुखदुःखान्याहोपेक्षा निरच्छाच आहे. २ देहभोगानुसार जे जे बरेवाईट प्रसंग येतील ते सर्व सारख्याच दृष्टीने मी भोगीन. त्याचे समत्वाने स्वागतच करीन ३ कारण ही सर्वच सुखदुःखे माझी स्वतःची नसून जनार्दन स्वरूपाच्या नारायणास ती मी अर्पण केली आहेत, मी तसा अलिप्तच राहिलो आहे. ४ विवरण - वरील दोन्ही अभंगात भक्ताच्या उदासीन वृत्तीचे रहस्य फार समर्पक रीतीने वर्णन केले आहे. त्याने आपले सर्व भाव व सर्व क्रिया सर्वज्ञ परमेश्वरास अर्पण केले असल्याने तो त्यात गुंतून राहात नाही, त्या मानअपमान, सुखदुःख याच्या पलिकडे असतो स्तुतिनिंदा त्याला सारखीच असते भगवद्गीतेच्या बाराव्या अध्या- यात 'यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी' (जो कशाचाही आनंद मानीत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही व इच्छाही करीत नाही, समचि शुभाशुभ फलही ज्याच्या मनात नसते) अशा भक्ताचा गौरव केला आहे त्याची वागणूक 'तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी' (निंदास्तुती समान मानणारी) असते सर्व साधुसंतांनी हाच बोध आपल्या आचरणातून व्यक्त केला आहे 'निंदा स्तुति कोणी करो दया माया । न धरीं चाड या सुखदुःखा' असे तुकारामबुवांनीही म्हटले आहे ४९ जन विजन जालें आम्हा । विठ्ठलनामा प्रमाणे ॥ १ ॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ २ ॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥ ३ ॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- विजन-एकान्ताची जागा, पट्टण-शहर, सरता झाला-सारखा झाला, विठ्ठल् रूपाने भरून राहिला अर्थ :- एका विठ्ठलनामामुळे आम्हास जनसमुदायात राहून विजनवासाची, एकान्ताची गोडी मिळाली १ जिकडे आम्ही पाहू तिकडे मायबाप विठ्ठलरखुमाईचीच रूपे आम्हास दिसतात २ वन असो अथवा नगर असो विठ्ठलवासामुळे सर्व ठिकाणे आम्हास सारखीच झाली ३ या अद्वितीय अशा समभावाच्या आनंदात आम्हाला सुख- दुःखाची आठवणही होत नाही; तुकाराम महाराज त्याच कौतुकाने नाचत आहेत. ४ विवरण-या अभंगात परमेश्वरी कृपेने भाग्यवान झालेल्या भक्ताची अवस्था समत्वाची कशी होते याचे उत्कृष्ट चित्रण आले आहे सर्वत्र विठ्ठलभावच प्रतीतीस आल्यामुळे सुखदुःख, स्तुति-निंदा याची भावना नष्ट झाली जनात आहोत की विजनात आहोत हेही आमच्या ध्यानात येत नाही असे बुवा सांगत आहेत या ठिकाणी 'जन विजन जाले आम्हा' या शब्दातील रहस्य समजावून घ्यावयास हवे जनसमुदाय व वननिवास ही स्थिती आम्हास समान वाटते म्हणजे वनातील एकान्त गर्दीप्रमाणे वाटतो, असे नसून शहरातील जनसमुदायातही एकान्ताचा अनुभव येण्याइतपत आमची विठ्ठलाशी तद्रूपता झाली आहे असा भावार्थ या विजनवासाचे, एकान्ताचे, वननिवासाचे महत्त्व साधकाच्या आयुष्यात फार मोठे आहे 'अरतिर्जनसंसदि' सर्वसामान्य जनांच्या समूहाची आवड नसणे हे एक आत्मज्ञानी माणसाचे लक्षण गीतेत सांगितले आहे हा आत्मज्ञानी 'विविक्त सेवी' म्हणजे विशिष्ट अशा एका- न्ताच्या स्थळी राहाणारा असतो 'एकान्तेवीण प्राणियांतें बुद्धि कैंची ?' म्हणून समर्थांनीही विचारले आहे यासाठी तुकारामबुवांनी गावातील गजबजाट सोडून भंडाऱ्याच्या डोंगरावरील वृक्षवल्लीच्या व वनचरांच्या सोबत्यात मन रमविले हा एकान्ताचा निवास बुवांच्या मनास फार रुचला येथे आपल्याच मनाशी आपणच संवाद

२४ सार्थ तुकारामगाथा करू शकतो ' सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाहीं बहुमता ' असा स्पष्ट निर्वाळा बुवानी दिलेला आहे एकान्तात आपल्या मनासच साक्षी ठेवून वागता येते सर्वसामान्य लोकांचे बहुमत उपयोगी नसते या आत्मज्ञानी भक्ताच्या निवासाचे व एकान्तप्रियतेचे वर्णन ज्ञानेश्वरांनी फार बहारीने केले आहे ' आणि तीर्थे धौतें तटें । तपोवनें चोखटें । आवडती कपाटें । बसवू जया ॥ शैलकक्षांचीं कुहरें । जलाशय परिसरें । अधिष्ठी जो आदरें नगरा नये । बहु एकान्तावरी प्रीति । जया जनपदाची खती । जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो " साधुसंत वा आत्मज्ञानी याप्रमाणे एकांतवासात प्रभूशी समरस झाले असले तरी ते सुख इतरेजना देप्यासाठी ते लोकाच्यातही मिसळत असतात हेही येथे ध्यानात घ्यावयास हवे ' आपण जेवुनी जेववी लोका । सतपंण करी तुका ' म्हणून बुवानी आपल्या कार्याचे मर्म मागितल आहे लोकाच्या उद्धारासाठी जेव्हा सत पुरुष समुदायात येतात तेव्हाही त्याच एकान्ताचे ममत्व कायम असत ५० हिरा ठेविता ऐरणीं । वाचे मारिता जो घणीं ॥ १ ॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ २ ॥ मोहरा होय तोचि अगिं । सूत न जळे ज्याचे सगिं ॥ ३ ॥ तुका म्हणे तोचि सत । सोसी जगाचे आघात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - करणी-कृत्रिम मणी काच इ० मोहरा-ज्याच्या संगतीत आगीतही सूत जळत नाही अस रत्न अर्थ - जो हिरा एरणीवर हातोडयाचे आघात सहन करूनही फुटत नाही तोच खरा १ त्यालाच खरे मोल असते कृत्रिम काचेसारखा असेल तर त्याचा लागलीच चुराच होतो २ ज्याच्या संगतीत अग्नीच्या मुखातही सूत जळत नाही तोच खरा मोहरा मणी म्हणायचा ३ जो जगाचे आघात सहन करील तोच खरा सत म्हणावा असे तुकाराम महाराज म्हणतात ४ विवरण -सताच्या चरित्राच व वर्तणुकीचे महत्त्व समकालीन लोकांना बहुधा वेळीच उमगत नसत संत फटकळपणे समाजाच्या, व्यक्तीच्या गैरवर्तनावर बोट ठेवून कधी कटु शब्दात कधी मृदु शब्दात जाणीव देत असतात सर्व काळास उपयुक्त होईल असा त्याचा उपदेश असतो स्वतः अतिशय निर्लोभी मानापमानाच्या पलीकड गेलेले असे त असतात याच्या या वृत्तीमुळे ढोंगी स्वार्थी, लोभी माणसांची अडचण होते मग ते संताचा द्वेष करायला प्रवृत्त होतात ज्ञानेश्वर एकनाथ, तुकाराम इत्यादी सत्पुरुषांचा झालेला छळ प्रसिद्ध आहच स्वतः संताना याचं काही नसत लाव रागावले तरी सुत पुरुष शांत असतात ' विश्व रागें झालिया वन्ही । संते सुखें व्हावे पाणी ' अशी त्याची शिकवण असते जगाचे आघात संतांना सहन करावे लागतात ५१ आलिंगने घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥ १ ॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ २ ॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । त्याची केली पाये सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सायुज्यता-मुक्तीचा एक प्रकार सीमा-अखर पायापें-पायाशी अर्थ - संताच्या आलिंगनाने सायुज्यतेची मुक्ती मिळते १ संतांचा महिमा हा असा आहे त्याविषयी बोलणेही अपुरे पडते सायुज्यता मिळाल्यानंतर दुसरे काय साध्ययचे २ सर्व तीर्थे व सर्व पर्वकाळ संताच्या पद्याशीच असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, संताची सेवा केली की तो देवास पोचते ४ विवरण -या अभंगात संत महिमा वर्णन केला आहे संताच्या सहवासात सर्व तीर्थे सब पुण्ये प्राप्त होतात अशी ग्वाही सबच संतानी दिलेली आहे या सताच्या पायी नामदेव-तुकारामानी आपला जीव काढून ठेविला होता ' संतमहंत माझी पूजा । आन भाव नाहीं दुजा । अशी निष्ठा स्वतः तुकोबाची होती संताच्या पादुका सायावर

सार्थ तुकारामगाथा २५ घेऊन मी आनंदाने नाचेन असे त्यांनी एका अभंगात म्हटले आहे संताच्या आलिंगनाने सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त होते असे म्हटले आहे स्वतः संतांना कसल्याही मुक्तीची जरूरी नसते त्यांना केवळ ईश्वरसान्निध्य व भजन याचीच गोडी असते पण सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने मुक्तीचे किंवा मोक्षाचे ध्येय सांगितले आहे आपल्या परंपरेत मुक्ती चार प्रकारच्या सांगितल्या आहेत सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या चार मुक्ती होत भागवतात सार्टि ही पाचवी मुक्ती सांगितली आहेत ५२ माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥ १ ॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें बसविलें अंग ॥ २ ॥ टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥ ३ ॥ याये कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उगाणा-गणना, हिशेब, कामावरी-कामादिक वृत्तींवर अर्थ - देहाविषयी मी, माझा देह असा जो भाव होता तो सर्व संपला, त्याचा हिशेब नीटपणे झाला १ आता सर्व भोग व सर्व त्याग तो पांडुरंगच बनलेला आहे, कारण माझ्या सर्वांगात त्याचीच वस्ती आहे तोच प्रेरक आहे २ थोडाफार घात अथवा फायदा करण्याचे कारण जी देहबुद्धी होती तीच संपवून टाकली आहे ३ आता कामादिक वृत्तींवर यावे अशी अवस्थाच उरलेली नाही आता पुढल्या इच्छा मी कराव्यात असे राहिलेच नाही सर्व काही प्रभूच बनून राहिला आहे ४ ५३ सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥ १ ॥ मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें ॥ तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणे दर्शने ॥ २ ॥ मन शुद्ध तया काय करितो माळा । मदित सकळां भूषणांसी ॥ हरीच्या गुणे गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥ ३ ॥ तन मन धन दिले पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥ तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णू त्याची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चिंतामणी-चिंतलेले देणारा रत्न, स्फटिक-कान्तियुक्त पारदर्शक दगडाची एक जात, आगळा-श्रेष्ठ, थोर अर्थ - ज्याची समूळ देहबुद्धी गेलेली आहे अहंकार गळाला आहे, सर्व आशा संपली आहे त्याचे सर्व शरीरच मनात असेल ते देणाऱ्या रत्नाप्रमाणे आहे ज्याच्या मनात निंदा, हिंसा, कपटबुद्धी उरलेली नाही तो स्वच्छ कान्ती देणाऱ्या स्फटिकाप्रमाणेच आहे १ सर्व मोक्षाचे तीर्थ जे काशी तिथे आता जायला नको, कारण याच संत- पुरुषापाशी सर्व लोक आता येतात सर्व तीर्थांचा तीर्थ तोच स्वतः बनलेला असतो त्याच्या दर्शनानेच मोक्ष मिळतो २ मग या सत्पुरुषाच्या गळ्यात माळ असो नसो, ज्याचे मन शुद्ध असते त्यास माळेसारख्या बाह्य उपचाराची काय आवश्यकता आहे ? इतर भूषणांनी अथवा अलंकारांनी भूषित होण्याची जरूरी तरी काय आहे ? ते परमेश्वराच्या गुणाचे संकीर्तन नेहमीच करीत असतात, त्यामुळे त्याचे चित्त सदोदित आनंदाने भरून राहिलेले असते ३ या श्रेष्ठ पुरुषाने आपले तन मन धन हे सर्वस्व परमेश्वरास अर्पण केलेले असते, त्याला स्वतःला कुठलीही आशा उरलेली नसते तुकाराम महाराज म्हणतात असा सत्पुरुष परिसाहूनही श्रेष्ठ आहे त्याची महती मी काय वर्णन करू ? ४ ५४ आहे तें सकळ कृष्णासि अर्पण । न कळता मन दुजें भावी ॥ १ ॥ म्हणउनी पाठी लागतील भूतें । येतों गवसीत पाचजणे ॥ २ ॥ तु गा ४

२६ सार्थ तुकारामगाथा ज्याचें त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥ ३ ॥ तुका म्हणे काळें चेपियेला गळा । मी मी वेळोवेळां करीतसे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- भावी-भावना धरते, मानते, भूतें-पंचेंद्रिये व पंचविषय, वचलें-विस्मरण झाले. अर्थ :- जे आहे ते सर्व श्रीकृष्णाला अर्पण करावे, कृष्णाच्याच सत्तेने व प्रेरणेने सर्व क्रिया होतात असे मानावे. हे ज्याना कळत नाही ते मात्र अज्ञानामुळे सर्व कर्मे मीच केली अशी विपरीत भावना मनात धरतात. १ त्यामुळेच त्याच्यामागे पचेंद्रिये व पचविषय याची भुते लागतात. यात ते गुरफटून राहतात. २ आपल्याकडून होणारे सर्व कर्मे त्या परमेश्वराकडूनच होतात व ही त्यालाच अर्पण करायची असतात, याची आठवण न राहिल्यामुळे फसगत होते व विविध विषयाच्या तावडीत सापडण्यास अवसर मिळतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचा म्हणजे देहबुद्धी धारण करून पचविषयात रममाण होणाऱ्या माणसाचा गळा काळ एकसारखा चेपीत असतो, तरी हा मी मी, माझे माझे असेच अज्ञानाने म्हणत असतो ४ ५५ महारासि सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥ तपा प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ २ ॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥ २ ॥ ज्याचा सग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- कोपे-रागावतो, नातळे-जवळ करु नये अर्थ - या अभगाचे अर्थ दोन प्रकारानी लाविता येतात. एक आध्यात्मिक अर्थ, दुसरा लौकिक. पहिला अर्थ असा - क्रोध हा महार मानला आहे. याला म्हणजे क्रोधरुप महाराला जो शिवतो तो ब्राह्मण नव्हे. ब्राह्मणास राग आला तर तो महार या पदवीस जातो. १ या क्रोधयुक्त ब्राह्मणाने देहान्त प्रायश्चित्त जरी घेतले तरी तो शुद्ध होणार नाही. २ या क्रोधरूपी चाडाळास कधीही जवळ करु नये, कारण त्याच्या अंतरगात विटाळ असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा सग ज्याच्या मनात तशी जात त्याची होते क्रोधरूप महारास त्याने मनात स्थान दिल्यास तोही महारच होईल ४ दुसरा लौकिक अर्थ असा की, महारास शिवल्यावर जो ब्राह्मण संतापतो तो खरा ब्राह्मणच नव्हे. १ अशा संतापी ब्राह्मणास, दुसऱ्यास अस्पृश्य मानणाऱ्या ब्राह्मणास देहत्यागाचे प्रायश्चित्तही कमीच होईल. २ हा मनुष्य चांडाळास जवळ करीत नाही, कारण त्याच्या अंतरंगातच विटाळ असतो, म्हणून त्यास तो चांडाळ वाटतो. ३ हा महार, हा चांडाळ असाच ध्यास एकसारखा त्याच्या चित्तात असल्यामुळे तो त्याच जातीचा होतो. जसे चिंतन तसे त्याला फळ मिळते ४ विवरण :- तुकोरामबुवाच्या वेळेच्या आधीपासून हिंदू धर्मात कर्मकाडाचे, बाह्य उपचाराचे माहात्म्य फार माजले होते पण एक जात उच्च, एक नीच असा फरक सताच्या दृष्टीत नसल्याचे दिसून येते जातिबाह्य, हीन जातीचा, अस्पृश्य, चाडाळ, पापकर्मी यांच्या उद्धाराची मोय भागवतधर्मीय संतानी केली. 'म्हणोनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्यजही व्हावें । परि वैष्ह्णवांचे नांवें । पशूचेही लाभो' अशी ग्वाही ज्ञानदेवानी दिली दगडाप्रमाणे पाप- योनीतील मूर्ख असले तरी एकदा त्याची दृष्टी भगवंताकडे लागली की मग काही उणीव पडू नये 'जाति कुळवर्ण। हे आघवेचि गा अकारण' अशी घोषणा करून ज्ञानेश्वरानीच या क्रातिकार्यास सुरुवात केली जन्मजात जातिभेद परमेश्वराच्या दरबारात नाहीचा अशी नवी विचारसरणी रूढ झाली 'जाति व्यर्थित पडें विपुले' असा निर्णय ज्ञानेश्वरानी दिला आहे भगवद्गीतेने दिलेल्या सवलतीवर भाष्य करिताना ज्ञानेश्वरानी म्हटले आहे 'यापरी पापयोनिही अर्जुना । का वैश्य शूद्र अगंना । मातें भजता सदना माझिया येती' निदान भक्तीच्या प्रातातील जातिभेद कमी होत राहून मानवाळी प्रत्येक जमातीत एक एक गत्पुरुष निर्माण झाला. महार जातीत चोखामेळा निर्माण होऊन या नवविचारांना एक प्रकारचा विजयच झाला बोन्धा, कर्ममेळा इत्यादी अस्पृश्य सताच्या अभंगातील

सार्थ तुकारामगाथा २७ सामाजिक दृष्टणे या संदर्भात पाहण्यासारखे आहे चोखोबांचे विटाळाचे अभंग तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत त्यांच्या मते सोवळेओवळे ज्याच्यात्याच्या पाहण्यावर आहे प्रत्यक्ष विठ्ठल पाहिला तर ? तो 'सोवळ्याच्या ठायीं सोंवळा आहे । ओवळ्याचे ठायीं ओवळा का न राहे ? चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा' म्हणून चोखोबानी निर्णय दिला आहे समत्वाची हीच विचारसरणी नंतर सर्वच संतानी पुढे नेली कबीरासारख्या फटकळ वाणीच्या संताने एकदम विचारले, एक बह्मसे विश्व रच्यौ है, को बाह्मम को शूद्रा ?' एकाच ब्रह्मापासून जर सर्व जीवांची उत्पत्ती असेल तर हा पवित्र, हा अपवित्र हा भेद कसा आला ? एकदा हरीचे त्वरित झाल्यावर मग त जातीचे कुणीही असले तरी 'जाती कुळ नाहीं तयास प्रमाण' अस तुकोबानी एके ठिकाणी सांगितले आहे अशा हीन जातीयाची एक नामावलीच तुकारामबुवानी 'पवित्र तें कुळ पावन तो देश' या अभंगात दिली आह 'उत्तम कुळीं जन्म, क्रिया अमंगळ' असेल तर 'जातीचा ब्राह्मण न करितां सध्या- स्नान । तो एक नावाचा ब्राह्मण, होय हीनाहूनी हीन' म्हणून तुकोबानी आपले जातिभेदावरील विचार स्पष्ट केले आहेत हाच विचार पुढे मराठीतील इतर साधुसंताच्या उपदेशातही येत राहिला एकनाथाय्या चरित्रातील अनेक कथावरून हा जातिविषयक विचार अध्यात्माच्या, भक्तीच्या क्षेत्रातून सामाजिक व्यवहारातही उतरू पाहात होता असे दिसून येईल ५६ तेलणीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥ १ ॥ आपुलें हित आपण पाही । संकोच तो न घरीं कांही ॥ २ ॥ नावडे¹ लोका टाकिला गोहो । बोडिले डोके सांडिला मोहो ३ ॥ शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनीं घर भरिले मागें ॥ ४ ॥ पिसारानें² माजिले घर । नागविले ते नेणे फार ॥ ५ ॥ तुका म्हणे वाच्या रागें । फेडीले सावले देखिले जगें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - भिडा-भिडेने, नावडे-आवडत नाही गोहो-नवरा, बोडिले-हजामत करून घेतली वाच्या रागें-उवांच्या रागाने सावले-लुगडे अर्थ-आपले हित कशात आहे हे न पाहता उगाच संकोच करून वागणाऱ्या माणसाची फजिती कशी होते हे सांगताना तुकारामबुवा म्हणत आहेत, कोणी एक मूर्ख मनुष्य काही कारणाने तेलिणीवर रुसला आता तिच्याकडे तेल कसे मागावे ? या संकोचाने तो भाकरी कोरडीच खात राहिला १ आपले हित पाहून संकोच न धरता त्याने वागायला हवे नाही तर त्याची फजितीच होणार २ लोकांना आवडत नाही म्हणून कोणा एका येडपट स्त्रीने आपल्या पतीचाच त्याग केला व मोह सोडून स्वतःचे डोके बोडून घेतले यात तिचेच नुकसान झाले ३ दुसऱ्या एका मूर्ख स्त्रीने शेजारच्या स्त्रीशी भांडण झाले म्हणून आपले घर उघडे टाकून घराबाहेर प्रयाण केले व तिच्यानंतर कुत्र्यांनी तिचे घर भरून गेले, ४ घरात पिसवा फार झाल्या म्हणून एका शहाण्या माणसाने घरच पेटवून दिले त्यामुळे त्याचेच फार नुकसान झाले ५ एका गलिच्छ स्त्रीच्या लुगड्यात फार उवा झाल्या म्हणून तिने अंगावरचे लुगडेच फेडून टाकले तुकाराम महाराज म्हणतात यात तिचेच मोठे नुकसान झाले तिचे नग्नत्व लोकांना दिसले ना ! अनित्येनी लोक अशा प्रकारे स्वतःचे हित कशात आहे हे न पाहता मूर्खपणाने वागतात ६ ५७ मज दास करी त्याचा । संतदासाच्या दासाचा ॥ १ ॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ २ ॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥ ४ ॥ १ नाविले २ पिसागेने

२८ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - कल्पवरी-युगाच्या अखेरपर्यंत, नीचवृत्तिकाम-हलक्या वृत्तीमधील कोणतेही काम, वेचाये-खर्च व्हावेत अर्थ-साधुसंगतीचे माहात्म्य गाताना तुकारामबुवा म्हणत आहेत, संताचे जे दास आहेत त्याच्या दासाचा दास मला परमेश्वरा, केलेस तरी चालेल १ असे झाले तर मग अनेक युगापर्यंत मला गर्भवास घडून जन्मावर जन्म लाभले तरी चालतील २ तुझे नाव माझ्या मुखात असले म्हणजे वाटेल तसली हलकी कामेही मी आनंदाने करीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरा, तुझ्या सेवेतच माझे सर्व संकल्प याप्रमाणे खर्च व्हावेत ४ ५८ सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥ १ ॥ त्याचे दर्शन न व्हावे । शव असता तो जिवे ॥ २ ॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥ ३ ॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शव-प्रेत, कुशब्द्-वाईट शब्द, पर-परतत्त्व अर्थ - ज्याचे चित्त नेहमीच वृथा तळमळ करीत असते, हळहळत असते, १ त्याचे दर्शन सुद्धा मला होऊ नये कारण तो जिवंत असला तरी प्रेताप्रमाणेच असतो २ वाईट शिवराळ शब्दाच्या घाणीने त्याची वाणी अमंगल बनलेली असते ३ परतत्त्वाविषयी, ईश्वराविषयी त्याला एक शब्दही माहित नसतो परोपकारही तो जाणीत नाही ४ ५९ जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत शव लोकीं ॥ १ ॥ त्याचे१ वय नित्य काळ लेखीताहे । रागें दांत खाय करकरा ॥ २ ॥ जयाचिये द्वारी तुळसीवृंदावन । नाही ते स्मशान गृह जाणा ॥ ३ ॥ जये कुळी नाही एक ही वैष्णव । त्याचा वुडे भवनदीतापा ॥ ४ ॥ विठोबाचे नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष ते कुड रजकाचे२ ॥ ५ ॥ तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया३ ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - काळ-यम वैष्णव-विष्णुभक्त, भवनदीतापा-संसाररूपी नदीमधील नाव, रजकाचे- परिटाचे, चर्मकाचे-चांभाराचे, काष्ठ-लाकूड अर्थ - ज्याच्या घरी एकादशीचे व्रत नाही त्याचा देह सजीव असला तरी समाजात त्याची एखाद्या प्रेताइतकीच किंमत समजावी १ त्याचे जाणारे दिवस प्रत्यक्ष यम रागाने दात करकरा खाऊन मोजीत बसला आहे २ ज्याच्या घराच्या दारात तुळसीवृंदावन नाही त्या घरात घर न म्हणता स्मशानच समजावे ३ ज्याच्या कुळात एकही विष्णुभक्त झाला नाही त्याची संसारसागर तरून जाण्याची नाव बुडाली आहे असेच समजावे ४ जो मनुष्य तोंडाने विठ्ठलाचे नाव उच्चारीत नाही त्याचे तोंड म्हणजे चामडे बुडवायचे चांभाराचे कुंडच होय ५ तुकाराम महाराज म्हणतात जो कीर्तनाला जात नाही त्याचे हातपाय म्हणजे निर्जीव लाकडेच म्हणावीत ६ विवरण -वारकरी संप्रदायातील पंथीयांना काही आचारधर्म साधुसंतानी बसवून दिले आहेत त्याचे उपास्य दैवत श्रीविठ्ठल असावे त्याने एकादशी व्रत करावे, त्याच्या दारात तुळसीवृंदावन असावे, त्याने विठ्ठलाचे नामस्मरण करावे, त्याने कीर्तनास जावे असा काही साधनमार्ग आखून दिलेला आहे हा न पाळणारा मनुष्य कसा वाया जातो याचे वर्णन या अभंगात आहे वारकरी संप्रदायात एकादशी या महाव्रताचे महत्त्व विशेष सांगितले आहे या दिवशी उपवास करून हरिसस्मरणात सर्व वेळ घालविणे हा मुख्य हेतू असतो उपवास हे परमेश्वरप्राप्तीचे एक साधन म्हणून उपनिषदातून वर्णन आहे 'तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिषन्ति यज्ञेन दानेन तपसानाशकेन' म्हणजे वेदाभ्यास, यज्ञ, दान, तप व अनाशक म्हणजे अन्नपाण्यावाचून राहणे हे पाच परमेश्वरप्राप्तीचे माग आहेत अन्नपाणी वर्ज्य करून भगवंताजवळ एकचित्ताने राहणे हे उपवासाचे रहस्य आहे भागवतात एकादशीच १ त्याचे दिवस २ चर्मकाचे ३ हरीच्या जो