भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

[Page Header] सार्थ तुकारामगाथा ५४१ [End Page Header]

शब्दार्थ व टीपा - नलगे-लागत नाही, मिरवावे-रक्षणासाठी सांगावे, भारभार-गर्भाचा भार, उमगूनी- समजावून, खापरी-खापरातील लाहीप्रमाणे कष्टी, दुःखी अर्थ - आपल्या मुलाचे रक्षण आईने करावे अशी सूचना बाळानेंच करावी लागत नाही, ती आपल्या स्वभावानेच त्याच्याकडे ओढली जात असते, किंवा त्यास आपल्याकडे ओढीत असते १ या गोष्टीचा मग मीच आता कशास विचार करावा ? ज्याने मला गर्भात धारण केले, तोच आता माझा भार सहन करील हे खरेच २ जे गोड पदार्थ घरात आई तयार करून ठेविते, ते सर्व मुलाने मागावच्या आतच ती त्यासाठी जपून, राखून ठेवीत असते, त्याला सोडून ते पदार्थ खाण्याचे तिला समाधान मुळीच मिळत नाही ३ अशा वेळी जर बालक एखाद्या वेळेस खेळायला गुंतले असेल तर आई त्याचा शोध करते व त्यास घरी आणून बळेच स्तनाशी पिण्यास घेते ४ या बालकाच्याच दुःखाने ती सतत दुःखकष्टी होत असते खापरात तडफडणाऱ्या लाहीप्रमाणे तिचे चित्त तडफडून जाते ५ तुकाराम महाराज म्हणतात, या मुलाच्या मोहात आई आपला देह देखील विसरून जाते मुलाला कोण- त्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ती एकसारखी जपत असते ६ विवरण - तुकारामबुवांनी विठोबा माऊलीला उद्देशून जे वात्सल्याचे फार चांगले व थोर अनुभूतीचे अभंग लिहिले आहेत, त्यात वरील अभंग महत्त्वाचा आहे आईचे नात हे सर्वात जवळचे असते तिच्यापाशी मुलास मोकळेपणाने बोलता येतो, हट्ट करता येतो, प्रसंगी तिच्यावर रागावताही येते व पुत्राचे कितीही अपराध झाले तरी ती त्यास कधी दुखवत नाही, रागावली तरी पुन चटकरन जवळ घेत असे हे आईचे भाबडे हृदय प्रेमाने व मुलाच्या हिताने काठाकाठ भरलेले असते सर्व विश्वाची अनत युगाची ही विठ्ठलमाउली तर किती कनवाळू व हृदयाची कोमल ? तिला मनातील सर्व शकाकुशका सागाव्याव आईच आपल्या मुलास कशी सांभाळते, याचे फार चांगले व रमाळ चित्रण तुकारामबुवानी या अभगात केले आहे आई आपल्या स्वभावधर्मानुसार आपल्या मुलाची काळजी घेत असते त्याला ती गोड पदार्थ मुद्दाम राखून ठेवित तो खेळायला गेला तर ती त्याला शोधून आणते, त्याला दूध पाजत व मग बाळ तृप्त झाल्यावर ती तृप्त होते त्याच्या दुःखाने ती संतावन, सुखाने सुखावते असे हे आईच्या प्रेमाचे निर्व्याज मनोहर रूप तुकारामबुवानी या एका चागल्या अभंगात उभे केले आहे, या विठ्ठल माउलीचे अस वत्सल वर्णन अनेक अभंगातून आलेले आहे ' उत्तम तें बाळासाठीं। राखी ओढो आपुल्या,' ' लेकराचे हित । वाहे माउलीचें चित्त, ' ' व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा,' ' मातेचिया चित्तीं। अवघी वाळयाची व्याप्ति' अशा भाषेत त्यानी मातचा महिमा वर्णन केला आहे ज्याने जन्म दिला, त्यानच आपली काळजी वहावी, असा एक नाटिफ्रमही यथे आहे ' लेकराचा भार मातेचिया शिरीं । निडळ ते दूरी धरीलिया', ' पोटा आले बाळ । त्याचे जाणावे सकळ', ' मायो नेणे परी माय जाणे धर्म । बाळा नेदी श्रम पावो काही ' ' बाळा न मागता भोजन । माता घाली पाचारून, ' ' खेळता विसरे भूकताम घर । धरुनिया धर आणी बाळें,' 'तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूखतान ' अशा बोळीतून त्यानी मातेचा गौरव तर केला आहच, पण देवासी तिचा संबंध जोडून एक अति रमणीय असे नातेही निर्माण करून अधिकच जवळीक त्यांनी साधिली आहे वात्सल्यभक्तीचा सहज सुदर आविष्कार त्याच्या अभंगातून होत असतो

१२३४ ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धि । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥ १ ॥ ज्यासी नायडे हरिनामकतिंन¹ । आणीक नृत्य न वैष्णवाचे ॥ २ ॥ सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे येयें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें फुष्ठ होय ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - श्रुतिमधों-वेदादी शास्त्रात, भानतारिखें-वेगळेच अर्थ - तुम्हाल वेदादी शास्त्रांत चौकशी करू पाहा अशा बुद्धीचा काही ब्राह्मण होऊ शकत नाही १ कसा बुद्धीचा ? तर ज्याला श्रीहरीचे नामसंकीर्तन आवडत नाही, व ज्याला विष्णुभक्तांचे कीर्तननृत्य आवडत नाही.


१ नाम संकीतंग

५४२ सार्थ तुकारामगाथा यांवर ज्याचे प्रेम नाही, असा ब्राह्मण जन्माचा ब्राह्मण असला तरी तो तसा नसतो २ जन्माने ब्राह्मण तो जरी असला तरी त्याच्याविषयी असेच म्हणावे लागेल की, यावेळी त्याच्या आईचा अंत्यजाशीच व्यवहार घडलेला असावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या विचाराखेरीज आणखी कांही वेगळेच कुणी मानेल तर त्याच्या मुखात त्वरित कोडाचा रोग होईल असे निश्चित समजावे ४ १२३५ ब्राह्मण तो याती अंत्यज असता । मानावा सत्यता निश्चयेंशीं ॥ १ ॥ रामकृष्णनामें उच्चारी सरळें । आठवों सावळें रूप मनीं ॥ २ ॥ शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे गेल्या पडऊर्मी अंगे । सांडूनिया मग ब्रह्मचि तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - याती-जात, पडऊर्मी-कामक्रोधादी सहा उर्मी अर्थ - आणि तो जरी जन्माने अंत्यज असला तरी त्यास निश्चयाने व तात्त्विक दृष्टीनेही ब्राह्मण जाती- चेच मानावे १ कुणास ? तर ज्याच्या मुखातून रामकृष्ण या नामाचा सरळ सरळ उच्चार होत आहे, ज्याच्या मनात त्या सावळ्या विठ्ठलाच्याच रूपाचा एकसारखा आठव आहे २ शांती, क्षमा, दया इत्यादी दैवी गुणांचे अलंकार अंगावर शोभत आहेत, व जो कोणत्याही प्रसंगी धैर्यवान आहे, तो ब्राह्मणच समजावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्यातून कामादी सहा उर्मी नष्ट झाल्या आहेत, तो स्वत च ब्रह्म बनला आहे, असे समजावे तोच खरा ब्राह्मण ४ विवरण - या दोन अतिशय महत्त्वाच्या अभंगात एक बंडखोर विचार तुकारामबुवांनी निर्भीडपणे मांडी त्ला आहे त्यांच्या भक्तीमार्गात जातिभेदाची बंधने शिथिल होत असल्याचं आपण पाहिलेच आहे हीनजातीचे, चांडालादी लोक अथवा दुराचारीही भक्तीच्या क्षेत्रात एकदा मनापासून पदार्पण केले व पश्चात्तापाची दृढभावना निर्माण झाली की श्रेष्ठ पदवीस पोचू शकतात या संबंधीचे अनेक दाखले पुराणातूनही आहेत पण वरील दोन अभंगात बुवांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून जन्मजात अशा ब्राह्मणत्वाचा अथवा अंत्यजत्वाचा अधिकार होता, त्यासच धक्का दिलेला आहे ब्राह्मण हा जन्मावरून न ठरता, कर्मावरून गुणावरून त्याच्या आचारावरून समजावा हा नवा विचार रूढ होऊ पाहत होता ज्याला हरिकीर्तनात रुची नाही व जो वैष्णवांच्या संगतीत रमत नाही तो, कसला ब्राह्मण ? उलट एखाद्यास जन्म जरी अंत्यज यातीत आला असेल, पण त्यास श्रीहरीच्या प्रेमाची गोडी असेल रामकृष्णहरि या नामात जर तो तल्लीन होऊन तो जर रमत असेल, तर मग त्यासच ब्राह्मण म्हणावे असे बुवांनी स्पष्टपणे सांगितले आहे ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, हीच व्याख्या त्यांनी ब्राह्मणाची केलेली आहे कारण या श्रीहरीचे वर्म केवळ नामसंकीर्तनातच सापडते अशीही खात्री तुकारामबुवांची होती 'ब्राह्मणा न कळे आपुले तें वर्म । गवसे, परब्रह्म नामें एका' असे त्यांनीच म्हटले आहे ब्राह्मणासंबंधी एवढ कडक लिहिण्याचे कारण असे की सर्व वर्णाचे गुरु म्हणून ब्राह्मणांना मान होता वेदांचे अध्ययन अध्यापन ही त्यांची मुख्य कामगिरी, पण मध्ययुगीन काळानंतर ब्राह्मणधर्माचाही हास होता की काय अशी परिस्थिती निर्माण झाली व आपले उच्च आचारविचार सोडून नुसत्या कर्मकांडात रमू लागले त्यांना धनांचा, सत्तेचा लोभ सुटला त्यांचा आचारधर्म लुप्त झाले यासंबंधी हवी तेवढी वर्णने एकनाथ, तुकाराम रामदास या संताच्या वाङ्मयातून मिळतील केवळ जन्म ब्राह्मण जातीत झाला म्हणून श्रेष्ठता प्राप्त व्हावी अशी समाजाची अवस्था असल्यामुळे तीव्र असंतोष मात्र पसरला निर्बुद्ध व दुराचारी ब्राह्मणास कोण वंदन करणार ? व ईश्वरप्रेमी आणि सदाचारी अंत्यजास का दूर ठेवावे ? असे प्रश्न निर्माण होऊन जो एक नवा विचार रूढ होऊ पाहात होता त्याचे निदर्शन करणारे हे तुकोबांचे अभंग आहेत, ब्राह्मण कुणास म्हणावे ? असाच मूलभूत प्रश्न निर्माण झाला मराठी संतांनी या प्रश्नाची जी उत्तरे दिली आहेत त्याच सार बहिणाबाईने, 'ब्राह्मण तो एक सांगन इत्यथ । जेणें हा वेदार्थ साठविला,' 'ब्रह्मभाव देहीं सदासर्वकाळ । ब्राह्मण केवळ तोचि एक', 'ब्रह्म जाणे तोचि बोलिजे ब्राह्मण इतकेच

सार्थ तुकारामगाथा ५४३ बोलून बहिणाबाई थांबत नाही, तर ती स्पष्ट म्हणते, 'बहिणी म्हणे ब्रह्मीं नांदे तो ब्राह्मण । यातीशीं प्रमाण नसे तेथें' साधुसंतांनी हा जो निवाडा केला आहे, त्यास केवळ समकालीन परिस्थिती व ब्राह्मणाची अधोगती एवढीच पार्श्वभूमी नाही. या विचारास एक तात्त्विक बैठक असल्याचे आपण पाहिले आहे. एकाच ब्रह्मतत्त्वापासून जर हे चराचर विश्व व्यक्त झाले असेल, तर हा ब्राह्मण, हा अंत्यज हे ठरले कसे ? या प्रश्नाचे उत्तर वाटते तितके सोपे नाही. चोखोबांनी यार्ची तात्त्विक मीमांसा श्रेष्ठ प्रकारची केलेली आहे. समकालीन ब्राह्मणाची परिस्थिती, नखोन जाणीव व तत्त्वाची बैठक याचा सुंदर मिलाफ ज्यात आहे, असा एक एकनाथाचा अभंग येथे देणे अस्यानी होणार नाही. एका ब्राह्मणाचा व महाराचा एक खटकेबाज संवाद एकनाथांनी देऊन शेवटी निर्णयही दिलेला आहे तो संवाद असा- 'कां रे महारा ! बदमस्ता ?' 'का हो ब्राह्मणबाबा भलतेंच बोलतां !' 'तुझे बापाचे भय काय ?' 'मायबाप तुमचे आमचे एकच हाय !' 'ऐक ऐसे बोलू नको' 'निर्गुणापासून अवघे झालों' 'निर्गुण तुला काय ठावें' 'आत्मरूपीं शोधून पाहावें' 'आत्मस्वरूप आम्हां कळेना' 'नाहीं तरी संतांशीं शरण जाना १२३६ एक करिती गुरु गुरु । भोवता भारु शिष्यांचा ॥ १ ॥ पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ २ ॥ परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- भारु-समुदाय, पुंस-शेपूट, पेंडखान-पेंडीचे खाणे, निर्भर-निःकाळजी. अर्थ :- कित्येक आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय गोळा करून स्वतः गुरु गुरु म्हणवून घेऊन धन्य होतात. १ पण त्यांना मनुष्य म्हणावे काय? ती माणसे असली तरी शेपूट नसलेली अशी चार पायांची कुत्रीच आहेत, असे समजावे. २ परस्त्रीगमन व मद्यपान हेच जनावराचे पेंडीचे खाणे त्यांनी पसंत केलेले असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अधोगतीला जाण्याविषयी यांचे चित्त निष्काळजी असते. ते हटकून अधोगतीला जातातच. ४ १२३७ एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥ १ ॥ पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ २ ॥ कांहीं दुसरा विचार । न लगे करावाचि फार ॥ ३ ॥ असत्य जे वाणी । तेथें पापाचीच खाणी ॥ ४ ॥ सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥ ५ ॥ तुका म्हणे दोन्ही । जवळीच लाभहानी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाभहानी-फायदा व तोटा. अर्थ :- एखाद्या पुरुषास दोन बायका आहेत, असे जर असेल तर, त्याच्या घरात पापाचे स्थान आहे, असे मानावे. १ पापाचा शोध ज्याला घ्यावयाचा असेल, त्यास दुसरीकडे मग जाणे नको. त्याच्याच घरी जावे व पापाचे दर्शन घ्यावे. २ याविषयी दुसरा काही विचारच करण्याची जरूरी नाही. ३ जो नेहमीच खोटे बोलतो, त्याची वाणीही पाप निर्माण करणारी खाणच आहे असे समजावे. ४ जो तोंडाने नेहमी सत्य बोलतो, त्याच्या

ठिकाणी सुख नेहमीच उचंबळून येते ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकाराने पापाजवळ तोटा व पुष्या जवळ, सत्याजवळ फायदा अगदी शेजारी शेजारी अशाच या गोष्टी आहेत ६ १२३८ जळते संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥ १ ॥ माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळा मनीं ध्याय ॥ २ ॥ नेदी कर्म घडो । कोठें आडराणे पडो ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ । राहो नेदी ताप जाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धर्मनीत-धर्माची नीती अर्थ - आपले सर्व संचित कर्म जळून जाते अशी या धर्माची नीती आहे १ यासाठीच माझ्या या विठोबाच्या पायाचे चिंतन सतत करीत असावे २ त्यामुळे तुमच्या हातून कधी पापकर्म घडणार नाही, की आडरानातून सापडण्याचाही प्रसंग येणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हे विठ्ठलाचे नाम व त्याचे चिंतन याच्यामुळे तापाचा जाळ व पापाचा मळ राहूच शकत नाही ४ १२३९ संतापाशीं बहु असावे मर्यादा । फलकटाचा धदा उर फोडी ॥ १ ॥ बासर तो भुके गाढवाचे परी । उडे पाठीवरि दड तेणे ॥ २ ॥ समय नेणे ते येडें चाहाटळ । अवगुणाचा ओगळ मान पावे ॥ ३ ॥ तुका म्हणे काय वाया चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फलकटाचा धदा-हलकटपणाचा उद्योग उरफोडी-घात करील बासर-स्वैर, स्वच्छंदी अर्थ - संताच्याजवळ जाताना नेहमी मर्यादेत वागावे, उगाच हलकटपणाचा उद्योग केला तर, त्यापासून घात होण्याचा संभव फार असतो १ स्वैरपणाने बोलणारे आहेत त्यांचे बोलणे म्हणजे गाढवाच्या ओरडण्याप्रमाणेच आहे याचे फळ म्हणजे शेवटी पाठीवर दंडाचे वळच उठलेले दिसतील २ ज्यास प्रसंग समजत नाही तो चावटच समजला पाहिजे तो येडाच असतो त्यास ओंगळ अशा अवगुणाची पदवी मात्र प्राप्त होते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे त्याचे वागणे उगाच आहे हगवण लागलेल्या पोराची पिटपिटवाणी घाण असते तसेच त्याचे वागणे ओंगळ आहे ४ १२४० घेसी तरी घेई संताची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥ १ ॥ सर्वभावे त्याचे देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ २ ॥ करिशील तो करीं संताचा सांगत । आणीक ते मान नको मना ॥ ३ ॥ बैससी तरी बैस संताचे मधीं । आणीक ते बुद्धि नको मना ॥ ४ ॥ जासी तरि जाई संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथें मना ॥ ५ ॥ तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आणीक-दुसऱ्या सांगत-संगत सोवत धणी-तृप्ती अर्थ - मना, तुला भेटच जर घ्यावयाची असेल तर, तू संताची घ्यावीस याखेरीज दुसऱ्या गोष्टीच तू मनात आणू नकोस १ कारण या संताचे सर्व भांडवल म्हणजे तो एक देव झालेला असतो या देवाशिवाय ते दुसरे बोलणे कधीच बोलत नसतात २ मना तुला संगतच जर करायची असेल तर ती संताचीच कर आणखी याखेरीज दुसरी कोणतीच गोष्ट तुला मग करायला नको ३ तुला जर बसायचेच असेल तर तू संतांच्याच मध्य बैस या खेरीज दुसरी कसलीच बुद्धी तुला नको ४ तुला जर गावालाच जायचे असेल, तर तू संतांच्याच गावाला जा तुझा

सार्थ तुकारामगाथा ५४५ तेथेच खरी विश्रांती लाभेल. ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे संत म्हणजे सर्वसुखाचे सागर असून त्यांच्यामुळे मनाची निरंतर तृप्ती होते. ६ १२४१ संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥ १ ॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥ २ ॥ संतांचिये गांवीं यरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥ ३ ॥ संतांचें भोजन अमृताचें पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥ ४ ॥ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटों घेती देती ॥ ५ ॥ तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- यरो-पुष्कळ, उदीम-व्यापार, परी-प्रकार. अर्थ :- या संतांच्या गावी प्रेमाचा मोठा सुकाळ असतो. त्या ठिकाणी कसली तळमळ असत नाही, की दुःखाचा लेशही उरलेला नसतो. १ त्याच ठिकाणी मी याचक होऊन राहीन तेथे ते मला प्रेमाची भीक घालतील २ संतांच्या गावी श्रीविठ्ठलाचे प्रेम हेच खरे भांडवल आहे. हीच सर्व संपत्ती आहे. ३ संतांच्या घरचे हरिकीर्तनाचे भोजन म्हणजे केवळ अमृताचे पानच होय. कारण ते नेहमीच कथाकीर्तनात दंग झालेले असतात. ४ संतांचा नेहमी व्यापार म्हणजे उपदेशाचाच असतो. ते प्रेमसुखाचीच देवघेव नेहमी करीत असतात. ५ तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या ठिकाणी इतर दुसरे कसलेही प्रकार नसतात. म्हणूनच भिकारी होऊन मी त्यांचा दास झालो आहे. ६ १२४२ संतांचें सुख जालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥ १ ॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ २ ॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥ ३ ॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥ ४ ॥ अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वार्गो नेदी आड कोणी तया ॥ ५ ॥ तुका म्हणे ते बळिया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-संपूर्ण, पाड-किंमत. अर्थ :- या संतांच्या संगतीचे सुख देवासही फार मोठे झाले. म्हणून तोच या संतांची सेवा करण्यास उत्सुक असतो. १ अशा या देवाचा संपूर्ण महिमा मी कसा वर्णन करू शकणार ? माझा अधिकार तो किती. २ या भक्तांच्या साठी निर्गुणनिराकार असणारा देव सगुण व साकार झाला. तोच या संतांना दंडवत घालून त्यांची पूजा करीत असतो. ३ सर्व तीर्थे याच संताच्या सहवासाची इच्छा करितात व स्वतःच निर्मल होऊन जातात अनेकांची पापे दूर करण्यात आलेले मलीनत्व तीर्थे या संतांच्या संगतीने धुऊन काढतात. ४ अशा या संतांच्या सामर्थ्यापुढे अष्ट सिध्दींची काय किंमत आहे ? त्यांना कुणी समोर राहू देत नाहीत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व बलवंतांमध्ये संत हे बलवान होऊन राहिले आहेत, मी त्यांच्याच चरणापाशी निकटचा गृहून राहिलो आहे. ६ विवरण :- वरील चार अभंगात तुकाराम महाराजांनी संताचा महिमा पुन एकदा मुक्तकंठाने गाइला आहे. संतांचे चरित्र, संतांचा सहवास, संतांचे बोल, संताचा उपदेश, संतांची सेवा, संतांची ईश्वराविषयीची जवळीक व स्वतः ईश्वरासही वाटणारे संताविषयी प्रेम याचा विशेष लोभ सर्वच सज्जनांना वाटत असल्यास नवल नाही. ईश्वराएवढेच महत्त्व भागवत संप्रदायात संतांना दिलेले आहे. इतकेच नव्हे तर तुकारामबुवांनी 'देव सारावे परते । संत पूजावे आरतें' असे म्हटले आहे. कारण 'देव ते संत देव ते संत' असाच त्यांचा निर्णय आहे. या साधुसंताचा व संतसंगतीचा महिमा सर्वच संतानी एकमुखाने वर्णन केलेला आहे. 'संतांचा महिमा कोण जाणे सीमा । सांगता हा तु. गाथा....६९

५४६ सार्थ तुकारामगाथा ब्रह्मा बोलवेना', 'संतचरणरज उधळले । तेणें सर्वांग डवरले,' 'संतसंगतीचे काय सांगू सुख ? । आपण पारिखे नाहीं तेथें', 'सुख सांगावे संतापुढें । जेणे सुख अधिक वाढे' अशा भाषेत नामदेवानी संताचे महत्त्व स्पष्ट केले आहे श्रीएकनाथ महाराजांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून संताचे उपकार त्याच्या माहात्म्यासहित सविस्तर वर्णन केले आहेत 'संताचे चरणतीर्थ घेता अनुदिनीं । पातकांची धुणी सहज होय', 'संतचरणींचा महिमा । फावौं न कळे आगमानिगमा । ब्रह्मा घाली लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥ शिव प्यालो पायवणी । धन्य धन्य संत जनीं', 'देवाचे ते आप्त जाणावे जे संत । त्याचे चरणीं रत व्हावे सर्वदा', असे संतमाहात्म्य कथन करुन त्यांनीही 'संत आधी देव मग । हाचि उद्गम आणा मना', 'संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे' असाच निष्कर्ष काढलेला आहे या संताच्या नादाने देव लोभावला जातो तो त्या सुखामुळे या संताची सेवा करुन त्यांचे परोपरीने रक्षण करीत असतो हा भावही मराठी संतानी वारंवार प्रगट केला आहे ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ साडुनी संतसदनीं राहीला । धन्य धन्य संताचे सदन । जेथें लक्ष्मो सहित शोभे नारायण', 'संतचरणींचे रज कण । तेणें तिन्ही देव पावन' अशा शब्दात या संताचा वेध देवालाच किती जमतो, याचे वर्णन एकनाथानी केलेले आहे ज्ञाने- श्वरानी तर हा देव चार हातानी संताना मिठी मारण्यास कसा उत्सुक असतो याचे मोठे हृद्य चित्र ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात रसाळपणे वर्णन केले आहे या भक्ताच केवढे कौतुक देवास असते ? ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, 'आम्ही तयाचे करु ध्यान । ते आमुचे देवतार्चन । ते वाचूनि आन । गोमटे नाहीं ॥ तयाचे आम्हा व्यसन । ते आमुचे निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती तें ॥ तो पाहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षूसो मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पूजूं तयांतें ॥ दोंवरी दोनी । भुजा आलो घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचे आंग ।' आपल्या भक्ताविषयी व संताविषयी देवाला हे येवढ प्रेम वाटते ! ज्ञानेश्वरीमधील हाच भाव ज्ञानेश्वरानी एका अभंगात अतिशय बहारदारपणे व्यक्त केलेला आहे 'संत भेटतों आजी मज । तेणें मी झालो चतुर्भुज । दोन्ही भुजा स्थूळीं सहज । दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥ आलिंगनीं सुख वाटे । प्रेम चिदानंदीं गोठें । हर्षे ब्रह्मांड उतरे । समूळ उठे मी पण' अशा या संताचे उपकार या जगातील सब लोकावर किती मोठे झाले आहेत याचे वर्णनही सपूर्ण असे करता येणे कठीण आहे १२४३ जो मानी तो देईल काई । न मनी तो नेईल काई ॥ १ ॥ आम्हा विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ २ ॥ आधीन ते जना काई । जल्पे वायाविण ठायी ॥ ३ ॥ वदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पाडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भलतैसा-कसा तरी, कोणत्याही रूपात, जल्पे-बडबडतात अर्थ - जो आम्हास मान देईल, तो आम्हास अधिक काय देणार आहे ? व जो मान देणार नाही, तो आम्हास देणार नाही असे काय आहे ? १ कसेही असले तरी हा श्रीविठ्ठलच सर्वभूतमात्रामध्ये बसलेला आम्हास आमच्या चित्तात दिसावा २ लोकाच्या स्वाधीन तसे काहीच नसताना लोक असे व्यर्थ का बडबडतात ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे तुला कुणी वंदिले अथवा निंदिले तरी त्याचे महत्त्व तुला सारखेच आहे ४ १२४४ भावबळें कैसा जालासी लहान । मागें संतीं ध्यान वर्णिगेले ॥ १ ॥ तें मज उचित करुनिया देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ २ ॥ पाहो निया डोळा बोलेन मी गोष्टी । आलिंगूनि मिठी देइन पायीं ॥ ३ ॥ चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडो निया कर पुढें दोन्ही ॥ ४ ॥ तुका म्हणे उत्कंठित वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥ ५ ॥

सार्थ तुकारामगाथा ५४७ शब्दार्थ व टीपा - भावबळें-भक्तीच्या प्रभावाने, आर्त-इच्छा अर्थ :- देवा, तू भक्ताच्या वळामुळे कसा लहान, सगुण व सुंदर झाला आहेस. याच ध्यानाचे वर्णन यापूर्वी तुझ्या सतमंडळींनी केले आहे. १ देवा, ते ध्यान उचित आहे, असे मला करून दाखवा ना. केशवा, मायवापा, अशी प्रचीती द्या ना तुम्ही २ मग मी डोळे भरून तुम्हास पाहीन व सुखाच्या दोन गोष्टी बोलून संतुष्ट होईन. तुझ्या पायावर आलिंगन देऊन तुला मी मिठीच मारीन मग. ३ मी माझी दृष्टी तुझ्या चरणावर लावून मी नीट न हालता समोर पाहीन, मी तुझ्यापुढे हात जोडून उभा राहीन. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ही वासना माझी अतिशय उत्कंठित झालेली आहे, म्हणून नारायण, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी ५ १२४५ कृपाळु म्हणोनि बोलती पुराणे । निर्धार वचनें यांचीं मज ॥ १ ॥ आणीक उपाय नेणेचि मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसेँ ॥ २ ॥ नये घड कांहीं बोलतां वचन । रिघालो शरण सर्वभावे ॥ ३ ॥ कृपा करिसी तरि थोडे तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज दाखवी श्रीमुख । हरेल या भूक डोळियाची ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - निर्धार-विश्वास, हरे-दूर होणार आहेत अर्थ - देवा, तू मोठा कृपाळू आहेस, असे सर्व पुराणे गर्जून सांगतात व माझाही त्याच्या वचनावर विश्वास आहे. १ मी तुझ्या चिंतनाखेरीज दुसरा कुठलाच विचार मनात आणीत नाही तुझे रहस्य जेणेकरून ध्यानात राहील असेच मी पाहतो २ मला तर एक शब्दही नीट घडपणे बोलता येत नाही पण सर्व भावाने मी तुलाच देवा, शरण आलो आहे. ३ देवा, तू जर माझ्यावर कृपा करशील, तर ते फार थोडे काम तुला आहे पण त्यामुळे माझे श्रम मान मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत ४ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, मला तुमचे श्रीमुख एकदा दाखवा ना. माझ्या डोळ्याची मग तहानभूक हरून जाईल ५ १२४६ सर्वभावे आलों तुजचि शरण । कायावाचामनेंसहित देवा ॥ १ ॥ आणीक दुसरे नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ २ ॥ माझिये वारचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण एक ॥ ३ ॥ तुझे आम्ही दास आमुचा तूं ऋणी । चालत दूरूनी आले¹ मागें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां घेतले धरणे । हिशोबाकारणे भेटी देई ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- जडभारी-मोठे सकट वारी-निवारण करील. अर्थ :- देवा, मी तुला आता कायावाचामनेकरून शरण आलेलो आहे. १ देवा, आता तुझ्याशिवाय दुसरे काहीही मनात येत नाही. माझी सर्व वासना तुझ्याच पायाशी दृष्टी देऊन राहिलेली आहे २ माझ्यावर जर एखादे मोठे संकट आले तर देवा, ते तुझ्याशिवाय दुसरे कोण पूर्ण करणार ? ३ देवा, आम्ही तुझेच दास आहोत, तू आमचा ऋणी आहेस असा हा तुझा व आमचा संबंध पूर्वीपासूनच चालत आलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मी तुझ्या दाराशी धरणेच घेऊन बसलो आहे, मागील सर्व ऋणाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आता तू मला भेट द्यावीस ५ १२४७ कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥ १ ॥ केला पाडूरंगें तुझा² अंगीकार । मग होइल धीर माझ्या जीया ॥ २ ॥ म्हणऊनि मुख अवलोकितो पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥ ३ ॥ १ आलो, २ माझा

सार्थ तुकारामगाथा ५४९ झालेले दिसतात. देव चांगला क्षीरसागरात सुखासनावर होता, परंतु पृथ्वीवर पातकांची दाटी झाली, दैत्य फार मत्त झाले, म्हणून या भगवंतास गोकुळात गवळ्यांच्या घरी अवतार घ्यावा लागला. आणि देवास त्या पुंडलीक महामुनींने गुंतवून ठेविले, पंढरपूर येथे बांधून ठेवले, इत्यादी भावतुषार सगुण प्रीतीच्या पोटी बुवानी येथे व्यक्त केले आहेत. ईश्वर आपल्या भक्तासाठी श्रमी होतो, हीही भक्तीच्याच अनेक छटांपैकी एक नाजुकसा आविष्कार आहे कारण हा भक्तीच्या भीतीनेच साकार सगुण झालेला असतो 'तुका म्हणे भावें । भेणे देणें आकाराचे' असे त्यांनीच दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे. १२४९ गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें ॥ म्हणतां पाप गेले । विठ्ठलसें वाचेसी ॥ १ ॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाठीं आपुलिया ॥ २ ॥ चित्त पावले आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥ ३ ॥ हें जाणती अनुभवी । जया चाड तो खोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरुपा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धालें-संतुष्ट झालो, चाड-आवड, खोजवी-शोध घेतील अर्थ :- अवचितपणे या विठ्ठलाचे नाम माझ्या वाणीतून निघाले, म्हणून सर्वत्र गोड होऊन गेले. मनातील सर्व पापच नाहीसे झाले. पोट तृप्तीने भरून गेले. १ लोकहो, तुम्ही हे सर्व खरे मानावे. कारण अजामेळासारख्या पाप्याचाही या भगवंताच्या नामामुळे उद्धार झालेला आहे. तो कितीही पातकी व चांडाळ असला तरी त्याने भगवंताचे नाम घेतल्यामुळेच त्याचा उद्धार परमेश्वराने केला. २ श्रीहरीचे नाव वाणीतून निघाल्यामुळे माझे चित्त अतिशय आनंदित झाले आहे या गोविंदारूपा नावाने सदा सर्व काळ समाधी सुखाचाच आनंद प्राप्त झाला आहे. ३ जे कुणी अनुभवी आहेत, त्यांनाच या सुखाची किंमत समजून येईल. ज्यांना याची आवड आहे ते याचा शोध घेतील. तुकाराम महाराज म्हणतात, त्यालाच हा देव आपले अरूप असले तरी सगुण स्वरूप दाखवील. ४ १२५० आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥ १ ॥ हरिने कामा घातला चिरा । वित्तयरा मुकविलें ॥ २ ॥ हरिनें जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोवताला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामा-वासनेस, घातला चिरा-दगड घालून बंदी केले, वित्तयरा-धनसंपत्ती. अर्थ :- आता हा श्रीहरी सर्वत्र आतून व बाहेरून भरून राहिलेला आहे घरोदारी याच हरीच्या रूपाने आकार धारण केला आहे. १ या श्रीहरीने माझ्या सर्व वासनावरच दगड घालून त्यांना बंदी केली आहे वासना त्याने नष्ट केल्या आहेत. याच्यामुळे माझी धनसंपत्तीवरीलही वासना संपलेली आहे. २ या हरीने माझ्या जीवा- घरचाही लोभ घालून सर्व व्यावहारिक प्रपंचाशी वृत्तींचा भंग केला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या श्रीहरीशिवाय वेगळा नाहीच. हाच श्रीहरी माझ्या भोवती सर्वत्र भरून राहिलेला आहे. ४ १२५१ हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरले ॥ १ ॥ आतां कैसो जाऊं घरा । नव्हें बरा लौकिक ॥ २ ॥

५४८ सार्थ तुकारामगाथा माझिया मनाचा हाचि विश्वास । न करीं सायास साधनाचे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलो मी ऐसा साच भाव ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कई-केव्हा, मात-गोष्ट, अग्रीकार-स्वीकार, सायास-परिश्रम, साच-खरोखर. अर्थ - सत्मुखातून असे बोलणे माझे कान कधी बरे ऐकतील ? कसे बोलणे ? तर या पांडुरंगाने माझा स्वीकार मोठ्या प्रेमाने केला असून तो मला भेटला आहे. असे ऐकल्यानंतर माझ्या जीवास मोठाच धीर येणार आहे २ म्हणून तर देवा, मी तुमच्या मुखाकडे व चरणांकडे पाहात आहे याच स्थानाची मला फार मोठी आशा लागून राहिलेली आहे ३ माझ्या मनात हेच एक स्थान विश्वासाचे असल्यामुळे मी इतर कोणत्याही साधनाचे परिश्रम करणार नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, मला असे सताच्या मुखातून ऐकल्यावर विश्वास वाटेल व मी हा संसारसागर तरून गेलो आहे, असा भाव मला पटेल ५ १२४८ दोन्ही हात ठेवुनि कटी । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साटीं । भक्तिकाजें¹ विठ्ठला ॥ १ ॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आम्हालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ २ ॥ होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गोळियाचे² अवतार ॥ ३ ॥ केला पुंडलिके गोवा । तुज पंढरीसि देवा । : तुका म्हणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साटीं-साठी, भक्तिकाजें-भक्ताच्या भक्तीसाठी, मही-पृथ्वी, गोवा-गुंतवणूक अर्थ - देवा, आपल्या भक्ताचे काम करता करता तू फार थकलास व म्हणून या भिवरा नदीच्या काठावर कमरेवर हात ठेवून विश्रांती घेत तू उभा राहिलास १ मायबापा, देवा, तू आमच्यासाठी फार कष्ट घेतलेत रे. आमच्यासाठी, नाना अवतारासाठी फार तुला खेपा घालाव्या लागल्या तू आम्हा भक्तांना अतिशय सोपा आहेस पण दुष्ट दैत्यांना मात्र काळासारखा, कृतान्तासारखा तू भयानक आहेस २ तू सुखाने आपल्या क्षीरसागरात निवास करून होतास. त्याचवेळी या पृथ्वीवर असुरांची फार दाटी झाली व त्यांनी फार त्रास सज्जनांना दिला. म्हणून देवा, तुम्हाला गवळघराच्या घरी अवतार धारण करावा लागला ३ देवा, या पुंडलिकाने तुला गुंतवून ठेवून तुला या पंढरपुरात स्थिर केले तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू त्याच्या भावामुळेच आमच्या हातीं सापडला आहेस ४ विवरण - वरील पाच अभंगात तुकाराम महाराजांनी सगुण ईश्वराचे मोठे लोभस व हळुवार असे वर्णन केले आहे आपल्या भक्तासाठी हा विठ्ठल मुळचा निर्गुण निराकार असला तरी कसा लहान व सगुण होतो, याचे थोडक्यात वर्णन या अभंगातून आहे अशा या लहान व सावयव ईश्वरास नीट डोळे भरून पाहता येते त्याच्याशी नीट गोष्टी बोलता येतात 'आलिंगूनि मिठी देईन पायीं' अशी भाषा याच सगुण रूपासाठी बोलता येते प्रेमसुखाची सर्वोच्च प्रचीती याच सगुण, सुंदर रूपामुळे फार भक्तांना प्राप्त होत असते त्याच्या चरणाशी उभे राहावे, डोळे भरून त्याचे रूप मनात साठवावे व 'हरेल या भूक डोळियाची' म्हणून तृप्त व्हावे, यातच या सगुणाची सार्थकता आहे क्रमांक १२४७ च्या अभंगात तर या सगुणाच्या लोभाची ओढ भक्तास कशी असते, याचे मोठे सुंदर व भावपूर्ण आढळन पांडुरंगाने आपला स्वीकार कव्हा ही गोष्ट संत आपणास केव्हा ऐकवितात, याविषयी तुकोबांचे चित्त कासावीस झालेले आहे या एका अभंगात भक्तावर कृपा करुन थकलेल्या भागलेल्या देवाचा कळवळा तुकाराम महाराजांना आलेला दिसतो 'भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा' म्हणून तुकारामबुवा दृष्टी १ तू जगजेठी भक्तिकाजा, २ म्हणोनिया हरी । गोळियाघरी अवतार ॥

सार्थ तुकारामगाथा ५४९ झालेले दिसतात. देव चांगला क्षीरसागरात सुखासनावर होता, परंतु पृथ्वीवर पातकांची दाटी झाली, दैत्य फार मत्त झाले, म्हणून या भगवंतास गोकुळात गवळ्याच्या घरी अवतार घ्यावा लागला. आणि देवास त्या पुंडलीक महामुनीने गुंतवून ठेविले, पंढरपूर येथे बांधून ठेवले, इत्यादी भावतुषार सगुण प्रीतीच्या पोटीं तुकांनी येथे व्यक्त केले आहेत. ईश्वर आपल्या भक्तासाठी ऋणी होतो, हीही भक्तीच्याच अनेक छटांपैकी एक नाजूकसा आविष्कार आहे कारण हा भक्तीच्या भीतीनेच साकार सगुण झालेला असतो 'तुका म्हणे माये । घेणें देणें आकारायें' असे त्यांनीच दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे १२४९ गोड जाले पोट धालें । अवचित वाचे आले । म्हणतां पाप गेले । विठ्ठलसें वाचेसी ॥ १ ॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाठीं आपुलिया ॥ २ ॥ चित्त पावलें आनंद । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥ ३ ॥ हे जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरूपा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धालें-संतुष्ट झालो, चाड-आवड, चोजवी-शोध घेतील अर्थ :- अवचितपणे या विठ्ठलाचे नाम माझ्या वाणीतून निघाले, म्हणून सर्वत्र गोड होऊन गेले. मनातील सर्व पापच नाहीसे झाले. पोट तृप्तीने भरून गेले. १ लोकहो, तुम्ही हे सर्व खरे मानावे. कारण अजामेळासारख्या पाप्याचाही या भगवंताच्या नामामुळे उद्धार झालेला आहे. तो कितीही पातकी व चांडाळ असला तरी त्याने भगवंताचे नाम घेतल्यामुळेच त्याचा उद्धार परमेश्वराने केला २ श्रीहरीचे नाव वाणीतून निघाल्यामुळे माझे चित्त अतिशय आनंदित झाले आहे या गोविंदाच्या नावाने सदा सर्व काळ समाधी सुखाचाच आनंद प्राप्त झाला आहे. ३ जे कुणी अनुभवी आहेत, त्यांनाच या सुखाची किंमत समजून येईल. ज्यांना याची आवड आहे ते याचा शोध घेतील. तुकाराम महाराज म्हणतात, त्यालाच हा देव आपले अरूप असले तरी सगुण स्वरूप दाखवील. ४ १२५० आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥ १ ॥ हरिने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविले ॥ २ ॥ हरिनें जीवे केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोयताला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामा-वासनेस, घातला चिरा-दगड घालून बंदी केले, वित्तवरा-धनसंपत्ती. अर्थ :- आता हा श्रीहरी सर्वत्र आतून व बाहेरून भरून राहिलेला आहे घरोदारी याच हरीच्या रूपाने आकार धारण केला आहे. १ या श्रीहरीने माझ्या सर्व वासनावरच दगड घालून त्यांना बंदी केली आहे. वासना त्याने नष्ट केल्या आहेत. याच्यामुळे माझी धनसंपत्तीवरीलही वासना संपलेली आहे. २ या हरीने माझ्या जीवा- वरचाही लोभ घालवून सर्व व्यावहारिक प्रपंचाची वृत्तींचा भंग केला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या श्रीहरीशिवाय वेगळा नाहीच. हाच श्रीहरी माझ्या भोवती सर्वत्र भरून राहिलेला आहे. ४ १२५१ हरिने माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥ १ ॥ आतां कैंसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ २ ॥

पारखियासी सांगता गोष्टी । घरची कुटी खातील ॥ ३ ॥ तुका म्हणे निवांत राहो । पाहिले पाहीं धणीवरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भार-ओझे, वित्त-संपत्ती, कुटी-निंदा अर्थ :- या श्रीहरीने माझे चित्त हरून टाकले आहे संपत्तीचे ओझे याने विसरायला लावले आहे १ आता मी घरी तरी कसा जाऊ ? आता हा बाह्य लौकिक काही मला बरा वाटत नाही २ जे कुणी पारख करणारे असतील, त्यांना ही माझी अवस्था समजेल, पण घरचे लोक माझी निंदाच करतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आता याच अनुभवात स्वस्थ होऊन राहतो जे मी पाहिले आहे तेच तृप्ती होईपर्यंत पाहात बसतो ४ विवरण - वरील दोन अभंगातून तुकाराम महाराजांनी परमेश्वराची अनुभूती कशी आली व तिकडे तिकडे श्रीहरीच सामावून राहिल्याची प्रचीती कशी आली याचे मोठे रेखीव असे वर्णन आहे जिकडे तिकडे श्रीहरीचीच रूप त्यांना दिसू लागली मागचे सर्व संशय फिरले तळमळ दूर झाली, व 'हरि भोवे भोवताला' अशी जाणीव तीव्रपणे प्रकटली तुकाराम महाराजांना अशा प्रकारे श्रीहरीच्या दर्शनाने जे सुखसमाधान वाटत असे, त्याचे रेखीव व मर्म- ग्राही वर्णन त्यांनी शब्दांकित केलेले आहे 'भाग्य फळलें झाली भेटी । नेघें तुटी पाबरी । दैन्य गेले हरली चिंता । सदैव आता पावरी' अशा प्रकारचा अनुभव त्यांनी आणखी एका अभंगात वर्णन केलेला आहे पुष्कळ दिवस वाट पाहिल्यानंतर परमानंदाचा दिवस कसा उगवतो, याचे मोठे सुंदर वर्णन तुकोबानी 'बहुता दिवसाची आजी झाली भेटी । झाली होती तुटी काळगणी' या ओळीने सुरु होणाऱ्या अभंगात केलेले आहे या श्रीहरीचे रूप प्राप्त झाल्या- वर, त्याची भेट झाल्यावर मग जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते 'धवळले जगदाकार । आधार तो निरसला ।' असा सर्वत्र प्रकाशाचाच पसारा दिसतो जिकडे तिकडे त्या श्रीहरीच्याच खुणा मग दिसू लागतात 'धावे मागे मागें । जाय तिकडे चालत लागे ॥ तुका म्हणे मेले । माझें सर्वस्व विठ्ठले' अशी त्याची जवळीक त्यांना वाटत असे 'जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनिया' अशी त्याची नित्य रमणीय सोबत मग उत्साहवर्धक वाटते सर्वत्र त्याच एका रूपाने विश्व भरून गेल्याचा अनुभव येतो 'ब्रह्मरसे गेले भरूनिया अंग' अशी थोर प्रचीती मग येत

– खंड पहिला समाप्त –

प्रथम खंडातील अभंगसूची

अभंग | अभंग क्रमांक | अभंग | अभंग क्रमांक | | अवघे अवघीवटें | ... २२४ | | अवघे गोपाळ म्हणती या रे | ... १४४ अहवाल परी ऐस नव्हे बाई | २६ | अवघेचि गोड जाल | ... २३१ अव्दकर्मा बमप्रकाशवा | . ६७४ | अवध देव साध | ५७९ अखंड तुझी जया प्रीती | १०७६ | अवघे ब्रह्मारूप रित्ता नाही ठाव | ३०८ अखंडक्षोरामधी मरित आले | ६७२ | अवघ्या जेव्दादवी गोण | ४१८ अगा ए सावळया भगुणा | ६१६ | अवघ्या दशा येण साधती | ६४५ अगा ये वैकुंठनायका | ६६५ | अवघ्या पाप घडला एक | ७९४ अग्री ज्वर तथा नावडे साकर | .. ३०५ | अवीट हे क्षीर हरिकथा माउली | १०३६ अग्री दत्री खळे | ४२२ | अशोकाच्या वनी सीता शोक करी | . ३३९ अगोचरी वासिलो आज्ञेविण | ४९२ | असं नादतु हा हरी सर्वजीवी | १११३ अन तापलिया पायाचि होमे | १२१० | असो आता ऐसा धंदा | ८०१ अनुनि या थोर पोरा न म्हणसी | १४० | असो आतां किती | ७७१ असुरणीया बाभडा | ... १९३ | असो मनहीन क्रिया | ४८२ अंतरली कुटी मटी | २१९ | अहल्या जेणे तारिली रामें | ११०७ अंतरीचा भाव जाणोनिया गूज | .. ११३१ | अक्षईं तें जाले | ७३९ अंतरीची घेतो गोडी | ३५ | अक्षराचा श्रम केला | ९०५ अतिवाद लायी | ५५२ | | अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा | ११८ | | अधमाची वारी | ... २७६ | | अधिवाचा मज वाटाळा | २१४ | आचरणा ठाव | ३५१ अधिकार तैसा दावियेले मागं | ५३८ | आजि वास अमरावती | २१० अनंत जुगाचा देव्हारा | ४६६ | आजि का यो तू दिससी दुश्चिती | ३७८ अनंत ब्रह्मांडें उदरी | १७२ | आजि दिवस जाला | ४६७ अनायाची गुन्हा दवा | ८७७ | आजि नवल मी आले येणे राणे | ३८० अनुतापें दोष | . ७३० | आजीवरी तुम्हा आम्हा नेगपण | २२ अन्नाच्या परिमळ जरि जाय भूक | ... ३४२ | आठव दव ता वरावा उपाय | ९४९ अभय उत्तर सती केले दान | ... ४८१ | आडवले दवदार | . ५१५ अभयाचे स्थळ | . ९६४ | आणिषा उपदेश नेण नाचो | ४५६ अमगळ वाणी | .. ३४९ | आणिवाची स्तुति आम्हा ब्रह्महत्या | २७७ अर गिळिले हो संसार | . १२०९ | आणिवाच्या कापितों माना | २५६ अरे हें देह व्यर्थ जावे | . ३०७ | आणिवाच्या पात ज्याची | .. २८० अल्प भाव अल्प मती | . ६३४ | आणिज बाप मोडी | .. ४१० अल्प माझे मतों | ८०६ | आणिक वाही या उत्तराचे काज | ... ९१५ अल्ला कर सो होय बाबा | ४४३ | आणिक वाळें न चले उपाय | . ५४२ अल्ला देव अल्ला दिलाये | ४४४ | आणिक दुसर मज नाही आता | ... ७०२ अवगुण त्या पाणी नाही | ८३२ | आत हरि बाहर हरि | ... १३५० अवगुणाच हानी | ४१ | आता असो मना लक्षवराची कथा | ... ८१७ अवघा वेसला इंद्रियाचे ओढी | . ८३७ | आता आम्हा हरि काम न दिनभाव | ... १०४९ अवधिचा दिला गोर | . २२६ | आता उपडी डांटे | ... १११ अवधी मिळोनि पाल्हाळ केला | . २३७ | आता ऐसे कर | ... १६७

. अभंगसूची सार्थ तुकारामगाथा ५५३ अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक उ एका पुरुषा दोघी नारी १२३७ उटोनि हे मन राहात निश्चळ ९६७ एवा वीना केला त्रास ७६७ उंच निच कैसी पाईकाची ओळी १०६९ एके घाईं खेळता न पडसी डाई १९० उचित जाणावे मुख्य धर्म आधी ९०६ एवढा प्रभु भाव तेणें संपुष्टी राहावे ९४० उचित तें काय जाणावे दुर्बळे ५३० उचित न वळे इंद्रियांचे ओढी ८९३ ऐ उजळले भाग्य आता ८४९ उजळावया आलों वाटा ३१८ ऐक पांडुरंगा एक मात ६५६ उठा जागेती उजगरा ५०२ ऐक बाई तुज वो काही सागत ४४९ उठा सज्जजन उठिल नारायण ४१४ ऐकत महिमा आवडीची २९६ उठोनिया तुका गेला निजस्थळा ५०५ ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा ११४२ उतरला पार ७६३ ऐसे वचन वचळापती ४८३ उदंड शाह्मण होत तर्कवंत ८७५ ऐसा कर घर झाडे राष ११५९ उदार कृपाळ अनाथांचा नाथ ११३२ ऐसा माझा काग आहे भीडभार १०१४ उद्धाराचा संदेह नाही ८७० ऐसा हा लौकिक कदा राखवेना २५९ उपकारासाठी बोला हे उपाय ९४८ ऐसी हे गजबू वैखरी ६३५ उपजोनिया पुढती येऊ १६१ ऐस ऐमियान भेटती ते साधु ३४५ उपदेश तो भलत्या हाती २४४ ऐस कलियुगाच्या मुळ ७९१ उपाधीच्या नावे घेतला सितोडा ८० ऐस पुढती मिळता जाता ९१३ उभा देखिला भीमातीरी ६६६ उभा भीवरच्या तिरी राहिलाहे १११० ओ उभारिला हात ४७७ ओनाम्पाच्या काळ ७४३ ओवाळू आरती पढरीराया ५०७

५५२ सार्थ तुकारामगाथा अभंगसूची ────────────────────────────────────────────────────────────────── अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक आता वांही मोस न करी • ९३८ आले हो संसारा तुम्ही एक करा • ६२३ आता गाऊ तुज ओबिया • ८६१ आवल नाम आल्ला बडा लेत ४४० आता तरी पुढें हाचि उपदेश • १०१ आशावद्ध जन ६१ आता तुज वळेल ते करी • ६२६ आशाबद्ध वक्ता धात्र घातल्याच्या ६७९ आता धर्माधर्मों वाही उचित ६३२ आशीर्वाद तया जाती ४७९ आता न ये मागे ... ४०६ आश्चर्य त एक जाल ९६१ आता पावेल सफळ सुखे ६९४ आसुरी स्वभाव निर्दय अंतर ३३७ आता पुढें धरी ७४४ आहा आहा र भाई ४५१ आता पोरा काय झाली ५६९ आहावटा त्याचे करिती पितर ७१ आता मज धरयासी बुद्धि ... ६१७ आह्मांच वाहाच आत वरी दोन्ही २७ आता माझा नेणो परतो भाव ... ६४१ आहा रे भाई । गंगा म्हणू जळ ४५४ आता माझा सर्वभावे हा निर्धार ११३५ आहा र भाई । तयावरी ४५३ आता मी देवा पांघरा वाई १०८८ आहा रे भाई । नमो उदासीन ४५२ आता मी न पडें सायासी .. ६२५ आहा र भाई । प्रथम नमु ४५० आता येणे वळें पडरीनाथा ... ६४७ आहे तरि गत्ता ९८५ आता येणेंविण नाही आम्हा ५३६ आहे त सगळे कृष्णाचि अपण ५४ आता हचि जेऊ हचि जेऊ ... २३० आम्हा आपुले नावडे संचित ८५० आदि मध्य अत दाखविला दीपे ८२९ आम्हा आम्ही आता वडील घाकुटी १५ आधळयापागळयाचा एव ४२७ आम्हा घरी एक गाय दुभता हे १५६ आंधळयासि जन अवघेचि आंधळे ३०२ आम्हा निकट वास १४६ आधार तो व्हावा ९८२ आम्हासाठी अवतार • ५७६ आधारावाचुनी ... ८७६ आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत .. ८३४ आधील्या भ्रतारे काम नव्हे पुरा ८ आम्ही उतराई १११९ आधीच आटसी ७८६ आम्ही गाव तुम्ही वोणी काही १००८ आनदल लोक नरनारी परिवार ११०५ आम्ही गावळी रानटें २२५

अभंगसूची सार्थ तुकारामगाथा ५५३ अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक उ एका पुरुषा दोघी नारी १२३७ उगेचि हे मन राहात निश्चळ ९६७ एका बीजा केला नाश ७६७ उच निच कैसी पाईवाजी ओळी १०६९ एके घाईं खेळता न पडसी डाई १९० उचित जाणावे मुख्य धर्म आधी ९०६ एवढा प्रभु भावे तणे सपुष्टी राहावे ९४० उचित त काय जाणावे दुबळें ५२० उचित न कळे इंद्रियाचे जोडी ८१३ ऐ उजळलें भाग्य आतां ८४९ ऐक पांडरंगा एक मात ६५६ उजळावया आलों वाटा ३१८ ऐक बाईं तुज मी काही सागते ४४९ उठा भागलेती उजगण ५०२ ऐका महिमा आवडीची २९६ उठा सकळजन उठिले नारायण ४१४ ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या सुखा ११४२ उठानिया तुका गेला निजस्थळा ५०५ ऐक वचन कमळापती ४८३ उतरला पार ७६३ ऐसा कर घर आवे राम ११५९ उदंड माहाणे होत तकवत ८७५ ऐसा माझा कोण आहे भीडभार १०९४ उदार कृपाळ अनाथाचा नाथ ११३२ ऐसा हा लौकिक कदा राखवेना २५९ उद्धाराचा संदेह नाहीं ८७० ऐसी हे गजबू वैखरी ६३५ उपकारासाठीं बोला ह उपाय ९४८ ऐस ऐनिमान भेटती ते साधु ३४५ उपजोमिया पुढती येऊ १६१ ऐसे कलियुगाच्या मुळे ७९३ उपदेश तो भल्याचा हानी २४४ ऐस पुढती मिळता आता ९१३ उपाधीच्या नावे घेतला मिटोडा ८० उभा देखिला भीमातीरी ६६६ ओ उभा भीवरेच्या तिरी राहिलाहे १११० ओनाम्याच्या काळ ७४३ उभारिला हात ४७७ ओवाळू आरती पढरीरापा ५०७ ऊ

५५४ सार्थ तुकारामगाथा अभंगसूची अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक करिसी ते देवा करी माझें सुखें ... ५५० काय दरा करील वन ... ७०९ करी ऐसे जागे ... १०४३ काय दिनकरा . १०४ करी सध्या स्नान .. ७८० काय देह घाल करवती कर्मरी ... ८५८ करुनि आरती ... ५०८ काय नव्हे करिता तुज ... ७४५ करुनि उचित प्रेम . ४८७ काय नव्हे केले ... ७७२ करुनी आद्रत सरदभामा मंदिरी रे . ४०१ काय नाही लदत साडे ... ९०० करुनी विनवणी पायीं ठेवी माथा . ४९५ काय नेणों होता दावेदार मेला ... ५६७ करोत तपादि साधने ... ३६७ काय मी उद्धार पावेन ... ६१९ कलियुगीं मार्ग सागितले सती . ११२९ काय म्या मानावे हरिकथेचे फळ ... ५५८ कलियुगी कवित्व करिती पाषाड ... ८०४ काय या सताचे मानू उपकार ... १७८ कल्पतरु रुपा नव्हती बाभुळा १९० काय विरक्ती कळे आम्हा ... ८७१ कबळाविया सुखें .. १८० काय सागो तुझ्या चरणाच्या सुखा ... ५३४ कहे तुका जग भुला रे ११८४ कापावाचामन ठेविलें गाहाण ... १०१२ कहे तुका भला भया १२०१ का रे गमाविल्या गाई . १७७ कहे तुका मै सवदा बेधू ... ११८४ का रे दास होसी संसाराचा खर . ११४४ कळल हे खूण .. ८९६ का रे माझा तुज न ये कळकळा ... ५४३ कळस वाहियेला शिरी : ५१३ कार्तिकीचा सोहळा ... ३३१ कळीं येते तरि का नव्हे ... १००४ काल्याचिये आसे ... २०८ काकुलती येतो हरी .. २३५ कास घालोनी वळकट ... ५१९ काखे कडासन आड पडें .. २५० काहीच मी नव्हे कोपीये गावीचा ... ५५६ काद्यासाठी जालें ज्ञान ... ७९८ काही नित्यनेमाविण ... १२२ कामडीने केला मन्हाटा भ्रतार ... ८७ काहे भुला धनसपत्ती घोर ... ११६६ कान्हो एकली रे एकली रे . ४०४ काहे रोये अगले मरना ... ११६७ कान्होबा आता तुम्ही आम्हींच गडे . १८१ का हो एथें काळ आला आम्हा ... ८५७ कान्होवा तू आलगट ... १९७ का होती का होती ... ३५८ काफर सोही आपण वुझे . ११८६ का हो देवा काही न बोलाचि गोष्टी ... ५२९ काम क्रोध माझे जीताती शरीरी . १०५९ का हो माझा नानियेला भार ... ६३८ काम घातला बादोडी .. २८५ काळ सारावा चिंतने ... ९८६ काम सारुनि सकळ ... १४७ काळिया नाघूनी आला वरी ... २३९ कामातुर चढी साडी .. ८४० काळे खादला हा अवघा आकार ... ५४१

अभंगसूची सार्थ तुकारामगाथा ५५५ अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक केला अग्रीथोर पंढरीच्या देवे ४९१ गरुडाचे सारिखे कासे पीतांबर ६ केला मातीचा पशुपति . २६२ गर्भचि धारण ३५२ केला रावणाचा वध ... ११०३ गहू एवजाती . ३२५ केली खटपट गाऊ नाचो नेणता . ५१२ गल्लिन जाली कावा . ४७३ केली सीताशुद्धी . २८४ गाई गोपाळ यमुनेचे तटी ३९६ केले पाप जेणें दिले अनुमोदन .. ११२० गाईन ते लीळा चरित्र पवाडे ४१२ कैवल्याच्या तुम्हा घरी .. ९२९ गाऊ वाजूं टाळी रंगी नाचों उदास ४८८ कैसा सिदळीचा ३५० गाढवाचे अगी चंदनाची उटी १०५६ कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज .. ७०५ गाढवाचे घोडे ७७७ कोठे देवा आले अगा थोरपण .. १००० गाढवाचे ताने ९८८ कोठें मी तुझा धरू गेले संग . ३९७ गातो भाव नाही अगी ५९८ कोडे रे कोडे ऐका हे कोडे .. १४१ गातो वासुदेव मी एकर ४३० कोण आम्हा पुसे सिणले भागले १०३३ गायनाचे रंगी ६९३ कोण घरा येत आमुच्या काशाला . ५७२ गावे म्हणउनि गीत ८९५ कोण जाणे कोणा घडे उपासना . ५६१ गेली वीरसरी ९५ कोणते कारण राहिले यामुळें .. ६८६ गेले टळले पाहार तीन . ४०१ कोण त्याचा पार पावला धुंडिता .. ६९७ गोड झाले पोट घालें १२४९ कोण पर्वकाळ पहासिल तीय ... ५२८ गोड लागे परी सागताचि न ये ३९८ कोण सागायाम . ६९५ गोडीपणे जैगा गूळ ... ५८१ कोण सुख धरोनि संसारी . ६२८ गोगी आली घरा . ५६८ कोणाच्या आधारे करू मी विचार . ९२३ गोपाळ म्हणती कान्होबा या रे . २०९ भोणी एकी भुलली नारी .. ४०० गोरस घेउनी सात निघाल्या गौळणी . ३८९ कोणे तुझा साग नेला अगीकार २९७ गौरव गौरवापुरते ... ५८६ क्या कछु नही घूझत लोका ... ११५६ गौळणी आल्या वाज ... ४०८ क्या गाऊ कोई सुननवाला . ११५१ गौळणी बाधिती धारणासि गळा .. २२१ क्या मेरे राम क्यन सूझ सारा . ११६८ गोळियाची ताकपिरे ... १०० क्याला नज आयो बारितेसी घरा . ४०५ क्रियामतिहीन . ७६४

५५६ सार्थ तुकारामगाथा अभंगसूची अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक चंदनाच्या वासे धरितील नाक १२० जरी मी नव्हतों पतित .. ७५८ चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी . २११ जबरी नाही देखिली पंढरी ८१२ चला वळू गाई । बैसो १९९ जब हे सकळ सिद्ध आहे .. ६५५ चवदा भुवनें जयाचिये पोटी ... २६१ जबळी मूळपाशी ८४५ चहू आश्रमाचे धर्म ७३१ जळते सबित ... १२३८ चांगला तरी पूर्णकाम .. ६५८ जळो प्रेमा तंसा रंग .. ९९१ चांगलें नाम गोमटें रूप ६५७ जळो माझी ऐसी बुद्धी ... ९९७ चाल केलासी मोकळा . १३४ जाणाव ते काय नेणावे ते काय १०२१ चाल माझ्या राघो ४६४ जाने भक्तीचा जिव्हाळा ७३६ चालादा पथ तो पाविजे त्या ठाया ८९९ जातीचा पाईक ओळखे पाइका .. १०७२ चिंतन अचित राहिलो निश्चळ .. ९५४ जातो न येति या वाटा .. ८९७ चित्त मिळे तो सब मिळे .. १११५ जातो वाराणसी .. ५१८ चित्तसूचित जब मिळे ... १११४ जाली झडपणी खडतर देवता ४२१ चिंतित्तै ते मनिचे जाणे . ८६९ जाली तडातोडी .. ९८१ चित्त ग्वाही तेथे लोकांचे काई ... ९५१ जाली पार्कसिद्धि वाट पाहे .. ४९३ चित्त समाधाने . ६३ जाले रामराज्य काय उणें आम्हासी . ११०६ चित्ती धरीन मी पाऊले सुकुमार ... १०२९ जालो आता एके ठायी ... २१५ चित्ती नाही ते जबळी असोनि काय ... १३६ जाला तुम्ही माझें जाणते मीपण १२१८ चुघळीचा करी चुघळीशी संग .. २४६ जीव खादला दैवते ... १०४६ चुराचुराकर माउन खाया ११५४ जीव जायबरी गाडी करी माता ... ९७५ चोर टेकाने निघाले चोरी ... १०५४ जीवन हे सुभृत नर जाले पावन ... ९०० चोरटे मुने मारिलें ताळे ... १०५० जीवनावांचूनि तळमळी मासा ... १०३१ चोरे चोरांचे दराया उपदेत ... १२० जीवाशिवाच्या मांडूनि हाला १३१ चौध भरियेला आसनी पाचारिली ... ४१३ जीवीचा जिव्हाळा १०४७ जीवींचे जाणावे या नावे बावडी . ८३९ छ जीवेसाठी यत्नभाव ४७८ छळी विष्णुदासा कोगी .. ३०३ जे मा रजले गाजलें ... ३४७ छोडे धन मंदिर वन बसाया ... ११५२ जे जे काही करितो देवा . ६९८ जे जे जेथे पावे ... ७२१ ज जेणें घडे नारायणी नतराय . १०८ जेणे मूह्स्तवी .. २७५ जग चले उस घाट कोन जाय ... ११६२ जेणें हा जीव दिला दान ... ६१८ जग जोगी जग जोगी ... ४३६ जेथे जाये तेथे कपाळ सरिसे ९३७ जडलो अगाअगी .. ९७१ जेथे वैष्णवाचा बास ... ८७२ जतन करीन जीवे . ९३९ जेविता ही धरी . १०५ जन देव तरी पायाचि पडावे १०७८ जेबिल्ले ते सब मार्गे उपटावळी ... ३९ जननी हे जाणे बाळकांचे वर्म ८१९ जेबी नवज्वरे तापलें शरीर ... ८१६ जन मानवले वरी बाह्यात्कारी १०५८ जैसासाठी तैसे व्हावे ... ९५९ जन विजन झालें आम्हा . ४९ जो भक्ताचा विसाया . १०७५ जनी जनार्दन ऐकतो हे मात .. ११३६ जो मानी तो देईल वाई ... १२४३ जन्मा आलिया गेलिया परी ... ४६५ ज्याची खरी सेवा ... ५९५ जप करिता राग ... ५५५ जया दोषा परिहार ... ३३२ झ जया नाही नेम अशादशोब्रत ... ५९ झाड कल्पतरु ... ५९१ जरो माझी शोषी कापितील मान ... ५४९ झेला रे झेल खरचेवर झेला ... १३९

अभंगसूची सार्थ तुकारामगाथा ५५७ अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक तुका रामसु चित्त वाघ राहू .. १११३ टवकारूनि दृष्टी लावुनिया रंग .. ७९० तुका संगत तिन्हंसे कहिये ... १११६ टांक रुका चाल राहे का गे वेली .. ४५७ तुका सुरा नहि सयदन रे .. ११८६ टाळ दिंडी हाती .. १०४४ तुका सुरा बहुत कहारे . ११८४ टिळा टोपी माळा देवाचे गव्हाळें ... ७८८ तुज ऐसा कोण उदाराची रासी .. ९२१ तुजच पासाव जालोसो निर्माण ९५६ तुज मागणें ते देवा . ७६१ ठकिलें बाळा मारिली दडी ... १०८० तुजबरी ज्याचे मन ६८९ ठायीची ओळखी .. ३२३ तुज वर्णों ऐसा तुज विण नाही .. ७०० तुज वाचुनी मागणें वाय कोणा .. ११०५ तुजविण मज कोण वो सोयरे .. ५२६ डाई घालुनिया पोरे ... २२९ तुजविण वाणी आणिकाची थोरी . ५६५ डोई वाडवूनि केश ... ७७६ तुजशी सबंधचि खोटा . १२२५ तुजसवें येतों हरी .. २३२ तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ . १०२० ढेंकरे जेवण दिसे साचे .. ७० तुझा शरणागत जन्मोजन्मींचा . ७६० तुझा शरणागत जालो मी अंकित . १०२४ तझिया पार नाही गणा ६३७

५५८ सार्थ तुकारामगाथा अभंग अभंग क्रमांक अभंग त्याग तव मज न वजता केला ८२२ देव माझा जरी त्याचे मुख नाही आलें अनुभवा २९ देव होईजेत दयेचे संगती त्यानी घणीवरी सग केला हरीसवे २०६ देव होसी तरी आणिकात र्वां त्रैलोक्य पाळिता उबगला नाही ५०२ देवा ऐसा शिष्य देई देवाचे म्हणोनि देवी अनादर थ देवाच्या प्रसादें करा रे भोजन देवाच्या सवंगें विश्वचि सोयर थोडें आहे थोडें आहे ११० देवा तू आमचा कृपाळ थोडें परी निर ५७८ देवा तूं कृपाकरुणासिंधु देवा मी चांडाळ चांडाळ द देवासी अवतार भक्तासी संसार देवी देव जाग भोग सरला दंभें कीर्ति पोट भरे मानी जन ८५९ देथे जीव घाला दया तिचे नाव भूतांचे पाळण २६४ देश येण नव्हे माझा दर्पणासी नखटें लाजे ८३५ देहबुद्धि वसे लोभ जया चित्ती दर्शनाची आस ८५५ देहभाव आम्ही राहिलो ठेवूनि दाता नारायणा ३२१ देह हा सादर पाहावा निश्चित दानें काप हात ८४ दोन्ही टिपरी एकचि नाद दास जाला हरिदासाचा ११२२ दोन्ही हात ठेवुनि कटी दासा पाठ दोरे राम ११५८ दोष पळती कीर्तन दास्य करी दासाचे ६५२ द्या जी आम्हा काही सागा जी दिनरजनी हाचि धंदा ८८२ द्याल माळ जरी पडेन मी पाया दिवटचा वातें लावुनि झाणे २६९ द्रव्य असता धर्म न करी दीनानाथा तुझी ब्रिंदें चराचर ५४४ द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ दीप घेऊनिया धुंडिती अंधार ५६३ द्रव्याचिये माग बळिवाळाचा दीप न दळे अंधारा ८८० द्वारकेच येण आठ याचि ठाया दुःख वाटे ऐसी ऐका नये गोष्टी ८१३ दुःखाचे डोंगर लागती सोसावे ९११ ध दुजा ऐसा कोण बळी आहे आता १३ दुजे रूडे तरी ४५ धणी न पुरे गुण गाता दुध दही ताक पशूचे पाळण ११४० धना गुंतले चित्त माझें मुरारी दुर्जनांची मधी विठोठेचिया परी ११७ धनी ज्या पाइवा मानितो आपण दुर्जनांसि करी साहे ६६ धन्य आजि दिन दुबळ हे अवध जन ५८९ धन्य काळ संत भेटी दळू ते उपमा ८५४ धन्य त गोधन बांवळी वाटिका देखत जालो भुटा कोरा ११६९ धन्य ते संसारी देखत होता आधी मार्ग पुढें ४२५ धन्य त्या गोळणी इंद्राच्या पूजनी देखिलासि माझी खाता २३२ धन्य दह गाव पुण्य भूमि ठाव देखीचा दिमाख शिकोनिया दावी ९०१ धय भांवगीळ देखोनि पुराणिवागची दाढी ११६ धरिला पाल्य न सोडी माझा येथे दखोनिया तुझ्या रूपाचा आकार ५३५ धर्म रक्षावया साठी देखोनि हरखली बळ ७७ धर्माची तू मूर्ति दती घेती परज गली १२९ धाई अंतरंच्या सुखें दव आड जाला ३५४ धाकुटघाच मुखी घास घाली माता देव घ्या कोणी देव घ्या मोजी १००९ घाले मग पोट