सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
३०० सार्थ तुकारामगाथा लागल्या आहेत. मांस, मलमूत्र यांचीच सर्वत्र वेष्टण असते. त्यावेळीं मी तुलाच क्षणोक्षणीं स्मरत असतो. ३ माझा मरणकाळ जवळ आला असताना, मला जवळच्या नात्याची माणसे कुणी दिसतच नाहीत. देहपतन म्हणजे माती मातीस जाऊन मिळणे; पूर्वसंचिताप्रमाणे होणे एवढेच माझ्या ध्यानात येते. ४ देवा, आता माझ्यासाठी तू एवढे कर. तुझी काही चरणसेवा मला घडावी. तुकाराम महाराज या केशवास विनवीत आहेत की, या संसाराशी माझा काही विरोध निर्माण होईल असे तू कर. ५ ६१६ अगा ए सावळया सगुणा । गुणनधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥ १ ॥ बहु या उदराचे कष्ट । आम्हांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ २ ॥ जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न फळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥ ३ ॥ येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाही । हित तों कांहीं दिसेचि ना ॥ ४ ॥ जीवित्व वेचिलें वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांही व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥ ५ ॥ माझा मींच जालों शत्रु । केंचा पुत्र दारा केंचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्गुरु तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - गुणनधी-गुणाचा साठा, परिसा-ऐका, विज्ञापना-विनंती, पांगिला-पंगू, दारा-पत्नी. अर्थ :- अरे श्यामसुंदरा, सगुणरूपा विठ्ठला, गुणाचा साठा असलेल्या नारायणा, आमची एक विनंती तू ऐक ना. या आपल्या दीन सेवकाचा सांभाळ तू कर ना. १ मी पोट भरण्यासाठीच फार कष्ट केले. त्यामुळे आम्ही देवा, कर्मभ्रष्ट झालो. तुमच्याकडे येण्याची वाट चुकली त्यामुळे म्हणून तर मी तुमच्या दाराशी कटकट करीत उभा आहे. २ देवा, या भोवतीच्या लोकांसाठी मी पंगू बनून राहिलो आहे. आंदण दिलेल्या दासीप्रमाणे मी या संसारात वागत आहे. देवा, तू मला या दृढ अशा बंधनातून कधी सोडवशील ? मी फार बांधलो गेलो आहे रे. ३ या संसारात मला तुझी आठवण काहीच येत नाही. येथे क्षणभर देखील विसावा मिळत नाही. मी आणखी काही वासनांच्या प्रवाही पडलो तर मग मला माझ्या हिताचे काहीच दिसत नाही. ४ माझे आयुष्य तुझ्या वियोगातच खर्च झाले ना ? अनेक जन्मांचा वृथा प्रवास करावा लागला. काही व्याधी जडल्या. रोग निर्माण झाले त्यामुळे देहाची काही तोडमोडही झाली. ५ अशा प्रकारे मीच माझा प्रभू बनलो. अशा वेळी मुलगा, पत्नी, मित्र यांचा कसलाही उपयोग होत नाही. कशासाठी मग हा एवढा पसारा मी मांडला ? तुकाराम महाराज म्हणतात, अहो, जगद्गुरू, तुम्ही याचा विचार करा एकदा. ६ ६१७ आतां मज धरवावी शुद्धि । येवुनी परतवावी बुद्धि । घ्यावें सोडवूनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रों ॥ १ ॥ करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले कहणेची खाई । करीं वो आई मजवरी ॥ २ ॥ मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणें आयुष्य 'जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥ ३ ॥ १ होतें.
सार्थ तुकारामगाथा ३०१ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथे म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥ ४॥ करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासुनिया ॥ ५ ॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- संघीं-संकटात, साई-छाया, पेणें-मुक्काम, धणी-तृप्ती. अर्थ :- देवा, आता माझ्या विचारांनी काही शुद्धी धारण करावी व माझ्या बुद्धीने प्रपंचापासून परतावे, सोडवून घ्यावे, असे कृपेच्या सागरा, काही तरी करा. या काळचक्राच्या संकटात सापडून मी त्रासलो आहे. १ तू मनात आणलेस तर काय करणार नाहीस ? राईचा डोंगर करशील, डोंगराची राई करुन दाखविशील. देवा, तुमच्या कृपेची छाया मजवर करा ना. हे आई, एवडी कृपा तू करावीस. २ या पूर्वीचा काळ अज्ञानपणात निघून गेला. माझ्या स्वभावातील गुणामुळे तो व्यर्थ झाला. यामुळे आयुष्य कमी होत राहिले, हेही ध्यानात आले नाही व पुढला शाश्वत सुखाचा मुक्काम दुरावला हेही समजले नाही. ३ आता मात्र माझ्या मनात भय निर्माण झाले असून दिवस एकामागून एक असे निघून जात आहेत. मी या जन्मास येऊन काय केले ? तुझ्या पायाचे स्मरण काही मनोभावे मी कधी केले नाही. ४ परंतु पुरुषोत्तमा, माझे पूर्वीचे अपराध क्षमा करावेत. तुमच्या नामाविषयी मला प्रेम द्यावे आणि या संसारभ्रमापासून मुक्त करावे. ५ तुमच्या गुणकीर्तनात माझे हृदय स्थिर व्हावे. तुमच्या पायांच्या ठिकाणीच मला स्थान मिळावे. तुमच्या नामसंकीर्तनाची गोडी वाणीने सेवन करु. तुकाराम महाराज म्हणतात, तृप्ती होईपर्यंत यात मी आता रंगून जाईन. ६ ६१८ जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥ १ ॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाऊलें समचि साजिरीं । अंतरीं धरोनि राहिन ॥ २ ॥ जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळें हीं लाघव सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥ ३ ॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥ ४ ॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥ ५ ॥ जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । तो हा तेजःपुंज रासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- साजिरीं-शोभिवंत, भाळ-मस्तक, कपाळ. अर्थ :- ज्या ईश्वराने मला हा शुद्ध व सात्विक असा जीव दान दिला आहे, त्याचेच चिंतन मी रोज करीत राहीन. या जगताचे जीवनच असणारा जो नारायण त्याचेच गुण मी गात राहीन. १ तोच देव या भिवरा नदीच्या काठावर कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याची एकसारखी पावले अतिशय शोभिवंत अशी असून तोच मी माझ्या चित्तात धारण केली आहेत. २ हा विठ्ठल असुराचा, दुष्ट लोकांचा काळ असून आपल्या भक्तांचा सांभाळ मोठ्या
३०२ सार्थ तुकारामगाथा प्रेमाने करीत असतो मोठ्या कौतुकाने हा नाना प्रकारचे खेळ करीत असतो याच्या पायावर माझे मस्तक नम्र झाले आहे ३ हा या गोपाळांच्या समुदायात खेळ खेळण्यात रंगून गेला आहे यानेच बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठविले व तो त्याचे दार रक्षण करीत राहिला ४ हा श्रीहरी लावण्याचा पुतळा असून याच्या अंगी सर्व प्रकारच्या कला आहेत. याच्या गळ्यात वैजयंती माळ शोभून दिसत आहे या माझ्या स्वामिस अनेकवार नमस्कार असोत ५ याच्या नामाच्या उच्चाराने पाप नष्ट होते प्रत्यक्ष लक्ष्मीच याची दासी असते हा तेजाची प्रत्यक्ष रासच जणू असून तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याला सर्व भावाने शरण आलो आहे ६ ६१९ काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसे तुम्ही सांगा सतजन । करा समाधान चित्त माझें ॥ १ ॥ काय हे खंडईल कर्म । पाझपतील धर्माधर्म । कासयाने ते कळे वर्म । म्हणउनी भ्रम वाटतसे ॥ २ ॥ काय हो स्थिर राहेल बुद्धी । काहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाईल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥ ३ ॥ काय ऐसे पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कुरवाळील जगजेठी । दाटइन कंठी सद्गदित ॥ ४ ॥ काय हे' निवतील डोळे । सुख ते देखोनी सोहळे । संचित फंसे ते न फळे । होतील डोहळे वासनेसी ॥ ५ ॥ ऐसी चिंता करी सदा सर्वकाळ । रात्रिदिवस हेचि तळमळ । तुका म्हणे नाही आपुले बळ । जेणे फळ पावे निश्चयेंसी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - खंडईल-नष्ट होईल, पाझपतील-कमी होतील अर्थ - संत लोकहो, सांगा ना, माझा उद्धार खरेच होईल ना ? तो नारायण माझ्यावर कृपा करील ना ? माझ्या चित्ताचे समाधान करा ना एकदा तुम्ही १ माझे प्रारब्धकर्म नष्ट होईल ना ? माझे धर्माधर्म कमी होतील ना ? काय केले म्हणजे मला या नारायणाचे रहस्य समजेल ? या चिंतेन माझ्या मनास भारी भ्रम होतात हो २ माझी बुद्धी या ईश्वराशी स्थिर राहील ना ? मध्येच काही एखादे संकट तर नाही ना येणार ? मनात ज्याची इच्छा धरून मी आहे ती सफल होईल ना ? गोड शेवट झालेला मला दिसेल ना ? ३ ज्याच्या योगाने माझी मिठी देवाच्या पायांशी पडेल असे पुण्य कधी तरी माझ्याजवळ साठून राहील काय ? तो जगजेठी मला हळुवारपणे प्रेमाने कुरवाळील ना ? माझा कंठ त्याच्या विषयीच्या प्रेमाने कधी भरून येईल ? ४ त्याच्या भेटीच्या सोहळ्याचे सुख पाहून माझे डोळे कधी बरे निवतील ? काय संचित आहे ते नीट कळत नाही पण अशा प्रकारच्या इच्छेचे डोहाळे मला लागले आहेत हे खरे ५ अशी चिंता मी सदा सर्वकाळ करीत आहे रात्रंदिवस माझे चित्त तळमळत असून तुकाराम महाराज म्हणतात, अशा तळमळीतून मला निश्चयाने फळ मिळेल असे बळ केवळ माझ्याच अंगी आहे असे नाही ६ ६२० तूचि अनाथाचा दाता । दुख मोह नासावया चिंता । शरण आलो तुज आता । तारीं कृपावंता मायबापा ॥ १ ॥ सतसंगति देहें चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हाच भाव माझिया जीया । पुरवीं देवा मनोरथ ॥ २ ॥ १ ते
मज भाव प्रेम देईं कीर्तीं । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्ना सोडवूनि हार्तीं । विनंती माझी परिसावी हे ॥ ३ ॥ आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धन । साकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविण मायबापा ॥ ४ ॥ जोडोमिया कर पायीं ठेवों माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवी व्यथा¹ मायबापा ॥ ५ ॥
शब्दार्थ य टीपा :- परिसावी-ऐकावी, साकडें-मकट
अर्थ - देवा, तूच आमच्यासारख्या अनाथाचा नाथ आहेस आमचे दुःख, मोह, आमची चिंता, याचा नाश तूच करतोस म्हणून देवा, तुला मी शरण आलो आहे. तेव्हा मायबापा, कृपावंत होऊन मला तार; माझे रक्षण कर. १ संताची संगती व तुझ्या चरणाची सेवा एवढ्याच गोष्टी दे तू. जेणेकरून तुझा विसर होणार नाही, हाच भाव माझ्या अंत:करणात दृढ व्हावा माझे एवढे मनोरथ देवा, तू पुरवावेस २ मला तुझ्याविषयी भावभक्ती वाटावी, प्रेम वाटावे, तुझे नाम व तुझी कीर्ती वर्णन करून तुझी स्तुती करण्याची हौस मला आहे तेव्हा तू ती पुरवावीस व माझी सर्व संकटे दूर करून ही विनंती तू ऐक ३ याशिवाय देवा, आणखी दुसरे मागणे काही नाही सुख, संपत्ती, राज्य, धन इत्यादींची काहीही किंमत मला नाही. हे मला देण्याविषयी तुला कधीच सकट पडणार नाही मायबापा, एक भक्ती मात्र तू द्यावीस ४ मी हात जोडून तुझ्या पायावर मस्तक ठेवीत आहे. तुकाराम तुला पंढरीनाथा, विनवीत आहे की, माझ्या अंतःकरणाच्या भावभक्तीच्या रंगावर तुझ्या प्रीतीचा रंग चढावा. एवढीच देवा, माझी तीव्र इच्छा आहे ५
६२१ सेदरीं² हैं देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥ १ ॥ आपुले इच्छे आणिकां पीडो । काय तें देईल वराडी । कळी ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धि अधरा³ ॥ २ ॥ दासीचा ⁴पाहुनेरउखितें । धणी देईल आपुल्या हातें । करुणाभापणउचितें । हें तो रितें सतत शक्तिहीन ॥ ३ ॥ काय तें थिल्लरीचे पाणी । ओठ न भिजे न फिटे धणी । सीण तरों आदी आयसानीं । क्षोभे पुरश्चरणीं विले फळ ॥ ४ ॥ विलेपनें युजविती तोड । मार लोल⁵ वाहातो उदंड । करविती आपणादा दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥ ५ ॥ तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचें करा चिंतन । यदूं चरण येती सकळें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - सेदरीं-शेंदूर फासून केलेली, हेंदरी-आवळ, घाणेरडी, अवदान-बळी, वराडी-वाऱ्याचे- भूत, जोडो-प्राप्ती, अधरा-धैर्य नसलेली, पाहुनेर-पाहुणचार, उखीतें-दासीचे वेतन, थिल्लरीचे-डबक्यातील, धणी-तृप्ती, भांड-भाडखोर
अर्थ :- दगदादिकांना भाव न धरिता शेंदूर फासून येडीवाकडी व घाणेरडी देवदैवते व भूतेखेते यांची पूजा कशासाठी करावी ? आपल्या पोटासाठी एखाद्याच्या शिंताची भिक्षा मागणारी, बळी मागणारी ही दैवते
१ देवा मनोरथा, २ संदरी हेंदरी, दैवत ३ अधीरा, ४ पाहुणेर उषीत, ५ ळोळ
३०४ सार्थ तुकारामगाथा दुसऱ्याला काय देणार ? १ आपल्या इच्छेसाठी, तृप्तीसाठी दुसऱ्यांना छळतात त्या आशाळभूत दैवतापासून आपणास काय मिळणार आहे ? त्याच्या प्राप्तीचा उपयोग तरी काय ? त्याची बुद्धी थोडी असून त्याच्या अंगी धैर्य तर थोडेच असते २ दासीच्या पासूनच जर पाहुणचाराची इच्छा केली, तर स्वतःस वेतन देणाऱ्या आपल्या धन्यास तिला प्रथम विनंती करावी लागते मग ती उचित अशा करून भावनांनी काही स्वागत करील अशा प्रकारची ही रिकामी दैवते दाक्षिण्यहीन अशी असतात ३ एखाद्या डबक्यातील पाण्याचा काय उपयोग ? त्या पाण्यात ओठही भिजत नाही, तहान भागल्याची तृप्ती कधी होत नाही जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व त्रास मात्र सदोदित होतो एखाद्या पुरश्चरणात काही कमी पडल्यास जसा क्षोभ होतो व फळ नष्ट होते, तसे या क्षुद्र दैवताचे आहे ४ या दगडी दैवताचे तोंड शेंदराने झाकून टाकलेले असल्याने त्या भाराची लोळ ती नेहमी वागवीत असतात कधी हिंसाचाराने आपली आपणासच दंड अथवा शासन करून घेतात अशांना देव ढुंगी म्हणेल तर तो मनुष्य भांडखोर व खलबडघा म्हणावा लागेल ५ अशा प्रकारचा हा माझा नारायण नाही हा सर्व जगाला व्यापून राहणारा जनार्दन आहे तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे चिंतन मनापासून करा, म्हणजे ही क्षुद्र दैवते तुमच्या पायाशी नम्र होतील ६ विवरण - तुकारामबुवा सगुण मूर्तीचे उपासक असले तरी, भावभक्तीशिवाय जर कोणी दगडास शेंदूर फासून देवदेवतांचा पसारा मांडू लागला तर मात्र त्यांना खपत नसे एका विठ्ठलावाचून दुसरी दैवतं नमावीत अस त्यांच्या मनास वाटते दुसरी क्षुद्र देवदैवते व्यर्थ कष्ट देणारी, फसविणारी एकसारखी कशाची तरी मागणी करणारी असतात त्यांच्यात आपण समजतो तेवढेही सामर्थ्य नसते आसुरी वृत्तीनी ती नेहमी भारावलेली असून भक्तांना त्रास देणारी व पुन पुन नव्या देणगीची इच्छा करणारी असतात यांच्या नादी कशास लागावे ? सर्व देव सारखेच, सर्व वस्तूत एक परमेश्वर तत्त्व भरून राहिल आहे हे खरे पण हे कुणासाठी ? जो मनात एकनिष्ठ भाव धरून भक्ती करावयास उत्सुक आहे त्यासाठी मनात भावभक्ती नसताना उगाच आपले लौकिक सुखासाठी रोज नवीन दैवते निर्माण करून त्यांच्या वेड्यावाकड्या व तामसी भावना पुऱ्या करणाऱ्यांना तुकोबानी या अभंगात चांगलाच धडा दिलेला आहे दगडास शेंदूर फासून रोज नवे देव निर्माण करून गरीब बायाबापड्यांना फसविण्याचाही धंदा तुकाराम- बुवांच्या वेळेस जोरात चालू असावा भक्तवत्सल अंतःपारा पंढरीनाथ सोडून या क्षुद्र व अघोरी देवदेवतांची उपासना करणाऱ्याचा निषेध सर्वच साधुसंतांनी केलेला आहे ज्ञानेश्वरांनी तर ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायात माणसाच्या अज्ञानाचे वर्णन करताना, त्याच्या या रोज नवा देव शोधण्याच्या वृत्तीचा निषेधच केला आहे केवळ लौकिक सुखासाठी देव आठविणे व मनकामना पूर्ण न झाल्यास त्याच देवास नाव ठेवून दुसरा शोधणे ही काय खरी भक्ती म्हणायची ? अशी भक्ती करणारी माणसे कशी असतात ? ज्ञानेश्वरांनी तीव्र शब्दात सांगितले आहे- 'नातरी कांताच्या मानसीं । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसीं । जावया लागीं ।।' नवऱ्याच्या अंतःकरणात शिरण्याचा प्रयत्न करणारी, पण मनातून दुसऱ्याच प्रियकराचे ध्यान करणाऱ्या जारिणीप्रमाणे या माणसाचे असे वर्तन असते एका दैवताने समाधान झाले नाही, मग दुसरे शोधायचे व पहिल्यांस नांवे ठेवायची- 'कुचवट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलीची परवडी । वरी तया ' अशी त्याची स्थिती असते या नव्यानाव्या देवाच्या शोधात असणाऱ्या माणसांस कधी समाधानच होत नाही तो सारखा भटकत असता बाजारबसवीप्रमाणे त्याचे भ्रमण चालू असते 'ऐसा अखंड भ्रमण करी । उषा नोहे क्षणभरी । अवघे न गावद्वारीं । आहेव जैसो ' असे म्हणून ज्ञानदेवानी या दैवतांचा व त्यांना भजणाऱ्यांचा निषेधच केलेला आहे तुकारामबुवांच्या वेळी तर या क्षुद्र व हिंसाचारी देवांचा सुळसुळाट झाला होता नवे नवे धर्मपंथ, शेंदराचे दैव, रक्ताचा, मांसाचा नैवेद्य, अघोरी उपाय याच्यासारख्या हीन मागणीला या दैवताचा बुवानी धिक्कार केलेला दिसून येता 'नव्हे जाणाई जोखाई मायराणी मेसावाई । बळिया माझा पंढरिराव जो या देवांचाही देव' असा स्पष्ट खुलासा बुवानी आणखी एका अभंगात (अ २३८४) करून 'वेताळें कंताळें । अळो त्याचे तोंड काळें' म्हणून आपल्या नेहमीच्या शब्दांत त्यांनी थेटपणे निषेध केला आहे
सार्थ तुकारामगाथा ३०५ ६२२ विषयओढीं भुलले जीव । आता याची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥ १ ॥ कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागले शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ २ ॥ बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवे जालिय तुटी । भोगिले मागें पुढें ही फोटी । होईल भेटी जन्मासी ॥ ३ ॥ जतिली १ घाणा बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारबळे २ भूकतान ॥ ४ ॥ एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥ ५ ॥ तुका म्हणे न वेचता मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेचिता फुकाचेचि बोल । केवढें खोल अभागिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - नुपजे निर्माण होत नाही, सळे-बलाने, आर-टोचणी, आरबळे-दुःखाने आरडतील अर्थ - या जीवनाविषयीच्या वृथा लोभाने हे जीव कसे भुलून गेले आहेत पाहा आता याची कोण कीव करणार ? कारण याच्या मनात नारायणबद्दल भक्तिभाव कधीच निर्माण होत नाही चांगला नरदेह मिळालेला असतो त्याचा काय उपयोग ? १ काळाच्या मुखात सापडलो असताना या संसारात कसले सुख आहे ? या शरीरास आयुष्याचे माप लागले आहे ते बळाने एकदा कधी तरी पूर्ण भरेल व मग यमदूत येतील २ बळाने ओढायला लागतील व पुढल्या जन्माचीही अशीच अवस्था होऊन जाईल ३ एखाद्या डोळे बांधून घाण्यास जुंपलेल्या बैलाप्रमाणे याची अवस्था होईल त्याला मागेपुढे आरेची टोचणी एकसारखी असते त्यामुळे तो दुःखातच नेहमी राहतो किती भ्रमण केले, हेही त्याला समजत नाही त्याच्या प्रमाणेच ही माणसे दुःखाने एकसारखी ओरडत असतात तहानेने व भुकेने व्याकुळलेली असतात ४ आपल्या प्रारब्धामुळेच, क्रियमाण व संचित्तामुळेच, हा असा त्रास आपणास होत असतो तर मग हा देह अनित्य मानून नित्य नामस्मरण त्या एका परमेश्वराचे हे लोक का करीत नाहीत ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, द्रव्य खर्च न होता या विठ्ठलाचे रूप हृदयात साठविता येत असूनही त्या विठ्ठलाचे चिंतन याना रिती दुर्लभ झाले आहे पाहा ना फुकटचे विठ्ठलाचे नामही या अभाग्याना दुर्लभ किती झाले आहे पाहा ६ ६२३ आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमारग हळूचि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । का रे अघोरा दचकसी ना ॥ १ ॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढिता कुडी प्राणा । ओढाळ सापडे जं धाम्या । चोर यातना धरिजेता ॥ २ ॥ नाहीं दिलें पावेल कैसा । चालता पथ तेणें वळसा । नसेल ठाउके ऐकतो जैसा । नेती बद जैसा धरोनिया ॥ ३ ॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करिता कांहीं । ओढिती काटवणा सोईं । अग्निस्तंभीं याही कवटाळविती ॥ ४ ॥ देऊनि अगें कापती । तप्ते नदीमाजी चालविती । लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥ ५ ॥ १ जुतिले, २ आरबळ तु गाथा ३९
३०६ सार्थ तुकारामगाथा तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळोनि कंसा सोवळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥ ६ ॥ म्हणउनी करा कांही सायास । व्हायेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका म्हणे ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- कुंभयातना-नरकाचे दुःख, कुडी-शरीर, वळसा-संकट, बंद-चोर, पिंड-शरीर, सायास-उपाय, प्रयत्न अर्थ - या संसारास तुम्ही लागलेले आहात, तर एक उपाय करा ना. आपल्या मुक्तीचा मार्ग हळूच साधा. नाहीतर पुढे यमाच्या दंडाची शिक्षा फार भयानक असते. दुराचारी माणसा, हे सर्व ऐकून असा दचकतोस का ? १ शरीरातून प्राण बाहेर नेताना या यमास काही सुद्धा दया येणार नाही. ओढाळ जनावरास धान्य खाताना बरे वाटते; पण पाठीवर दणका बसताच त्याची काय अवस्था होते ? चोरास पकडल्यावर मग त्याची काय गती होते ? २ त्याचप्रमाणे तुमचीही अवस्था होईल काही दान दिल्याशिवाय हे स्थान मिळेल कसे ? या संसार पथा- वरील संकट जर माहीत नसेल मी सांगतो ते नीट ऐका. एखाद्या चोरास धरून नेतात तसे यमदूत तुम्हांस धरून नेतील. ३ पायात काही न घालता एक क्षणभरही तुम्हास चालवत नसे. त्याना मग हे यमदूत कांटेरी वाटेने फरफटत ओढीत घेऊन जातील. लोखंडाच्या खांबास तापवून, लाल करून, त्यास तुम्हाला भेटवतील. ४ ज्याकडे नुसते पाहिले तरी अंगास कापरे सुटते, अशा बेफाम नदीतून तुम्हांस चालवतील. जिचा काहीच ठाव लागला नाही तिच्यात तुम्हांला ते बुडवतील व वर काठीने मारतील हे यमदूत. ५ एखाद्या वेळेस अन्नपाणी न मिळाले तर तुमचा जीव कासावीस होतो, पण हे यमदूत तुम्हास कित्येक दिवस उपाशी ठेवतील. शरीराचे पोषण करून तो कसा सुस्व- रूप ठेविला होता तुम्ही; पण हे यमदूत त्यास तापलेल्या अग्नीच्या ज्वालात लोळवतील. ६ म्हणून लोकहो, काही तरी उपाय करा. या संसाराविषयी उदास व्हा. तुकाराम महाराज म्हणतात, मुख्य म्हणजे या देवाच्या नामाचा घोष करा. या भक्तिरसाचे सेवन करा. ७ ६२४ न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा । तुज मी नाहीं घालीत गोवा । बीड केशवा कासयाची ॥ १ ॥ उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥ २ ॥ दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशक्ति टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥ ३ ॥ म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेगास आपुलिया ॥ ४ ॥ तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजे येथूनि वचन । हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाही म्हण तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोवा-भीड, नकट, वास-वाट. अर्थ :- देवा, तू माझ्याशी का बोलत नाहीस, हे मला आता समजले आहे. तुझे नाव पतितपावन, जगन्नाथ असे असून तू मला पावन करीत नाहीस याची लाज तुझ्या मनात असल्याने तू गप्प राहिला आहेस आणि मीही काही तुला संकटात टाकीत नाही. कशाचीही भीड घालीत नाही. १ तुझ्या मनावर याचा भार असेल तो उतरवून
५. उपदेश व पाखण्ड खण्डन अभंग
टाक. माझ्याशी एक दोन शब्दांनी बोल ना. माझा स्वीकार तुजकडून होत नाही, असे दिसताच मी त्याचाही विचार करीन. २ कोणी याचक यजमानाजवळ काही मागावयास गेला तर यजमानाने दान देऊन त्याचा मान राखला पाहिजे व याचकानेही जे मिळेल ते घेतले पाहिजे. दोघांनीही एकमेकांचा मान राखला पाहिजे. अशी ही धर्मनीती आहे. जर दान मिळाले नाही तर दोघांनाही दोष प्राप्त होतो. ३ म्हणून तर देवा, मी तुझी इच्छा करून आहे. तुझ्या वचनाची वाट पाहात आहे. मोठ्या सायासाने मी तुझ्याबद्दल धीर धरून उभा आहे. वाट पाहण्याच्या नेमास मी काही कधी चुकणार नाही. ४ तुझे वचन घेतल्याशिवाय मी येथून हलणारच नाही. हाच माझा खराखुरा नेम आहे असे तू जाण. ५ ६२५ आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण निघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥ १ ॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझें लाधले पाय । आतां मज न विसंबे माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥ २ ॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहेरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥ ३ ॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारसृष्टी । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥ ४ ॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सायासीं-खटपटीत, लाधतो-मिळतात. अर्थ :- देवा, आता मी इतर कुठल्या साधनमार्गांच्या खटपटीत पडणार नाही संसारदुःखांच्या पाशातही अडकणार नाही. मी आता संतांना शरण जाऊन तुझ्या पायाशी स्थान मिळवीन. ते त्यांना मागेन. १ माझे काय संचित कर्म होते, हे काही कळत नाही. कोणत्या पुण्याईने तुझे पाय लाभतील ? आई, आता तू मला विसरू नकोस ग. मी तुला अतिशय शोकाकुल होऊन विनवीत आहे. २ या संसारात मला फारच त्रास झाला. मोहमाया यांच्या ज्वालानी व विषारी गंधाने माझी फार विटंबना केली. सत्त्व, रज, तम या गुणाच्या तीव्र लहरी मनात निर्माण होऊन मी दुःखाने फारच गांजून गेलो आहे देवा. ३ आणखी मी माझे किती दुःख सांगावे तुला? या संसारदुःखांची मर्मकहाणी ऐकताना पाषाणसुद्धा दुभंगतील. माझ्या तर चित्तात भयाने कांपरेच भरलेले आहे ४ आता हे दुःख मला मुळीच सहन होत नाही. या संसाराची दुर्गंधी आता मला व्यथित करीत आहे. या दुखभाराने मी चांगला जाणता असून वेडाच बनून गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला पाव व माझे रक्षण कर. ५ ६२६ आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळों अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥ १ ॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहींच नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक ऊणें रंकाहूनी ॥ २ ॥ मन स्थिर नाहीं माझिये हातीं । इंद्रियें धावतां नावरती । सकळ पुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळों नाहीं ॥ ३ ॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥ ४ ॥
३०८ सार्थ तुकारामगाथा राहिलो धरुनि विश्वास । आधार नेटों तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - रंक-गरीब, उपाव-उपाय, ठाव-आश्रय, नेटों-नेटाने, दृढ अर्थ - देवा, आता तुला जे कळेल ते, जे बरे दिसेल ते तू कर तारणार असशील तर तार, मारणार असशील तर मारतो जवळ घर पाहिजे असल्यास, अथवा दूरही कर मला या संसारात घाल अथवा घालू नकोस १ मी नेणतेपणाने तुला शरण आलो आहे मला भाव व भक्ती यांन्यातकी काहीच समजत नाही मी सर्व ज्ञानाच्या बाबतीत मद बुद्धीचा असून मी गरिवाहून गरीब आहे २ माझे मन माझ्या हातात स्थिर नाही माझी इंद्रिये बाह्य विषयाकडे धावतात, कितीही त्याना आवरले तरी ती आवरली जात नाहीत माझी सर्व युक्ती संपून गेली आहे शाततेची व निवृत्तीची वृत्ती माझेजवळ उरलेली नाही ३ देवा, मी माझ्या मनातील हा सर्व भाव तुला सागितला आहे तुझ्या पायावर मी हा जीव ठेविला आहे असे समज आता तुला जो पडेल तो उपाय तू कर तूच माझे सर्व आश्रयस्थान आहेस ४ मी तुझाच विश्वास धरून राहिलो आहे मोठ्या दृढ वृत्तीने मी तुझीच कास धरून उभा आहे, आधार घेतला आहे तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आता आणखी काही प्रयत्न करण्याचे जाणीत नाही तुला काय योग्य वाटेल ते तू माझे करावेस ५ ६२७ देवा तू कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिद्धि साधनांसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥ १ ॥ शरणागता वज्रपंजर । अभयदानी तू उदार । सकळा देवा तू अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ २ ॥ भागली स्तुति करिता फार । तेथें मी काय तें गद्धार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊ आता ॥ ३ ॥ नेणें भाव परि म्हणवों तुझा । नेणें भक्ति परि करितो पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धावणें ॥ ४ ॥ तुझिया बळें पंढरीनाथा । जालो निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथा । न भीं सर्वथा तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कृपाकरणासिंधु-कृपेचा, करुणेचा सागर, वज्रपंजर-वज्राचा पिंजरा, अगोचर- इंद्रियाना न समजणारा, गद्धार-मूर्ख, निर्भर-भाररहित अर्थ - देवा, तू कृपेचा, करुणेचा सागरच आहेस तूच आमचा मायबाप झाला आहेस आमचा बंधूही तूच आहेस आमच्या जीवनाची सिद्धी व साधनाचा सिंधू तूच एक आहेस हा संसारपाश तू तोडून टाक माझा १ शरणागताना अभय देण्यासाठी तू म्हणजे वद्याचा एक पिंजराच आहेस तू उदार असून अभय देणारा आहेस सर्व देवांना तू न समजून येणारा आहेस तू विकाररहित व अविनाशी आहेस २ सर्व देव तुझी स्तुती करता करता थकून गेले तेथ मी मूर्ख किती टिकणार ? पण मला तुझ्या स्वरूपाचा विचार समजावून घ्यायचा आहे तू आता मला अंतर देऊ नकोस ३ तुझ्याविषयी मनात भाव नसला तरी मी तुझा दास म्हणवितो, तुझी भक्ती कशी करावी हे मी जाणीत नसलो तरी हे देवा मी तुझीच पूजा करतो तेव्हा केशवा, तुझ्या पतितपावन नामासाठी तरी तुला माझ्या रक्षणासाठी धावून यावे लागेल ४ पंढरीनाथा, तुझ्या बळामुळे मी भाररहित झालो असून माझ्या मनातील सर्व दु खे संपली आहेत मी आता माझा सर्व भार तुझ्याच माथ्यावर ठेविला आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी आता कुणालाही व्यर्थ भिणार नाही ५
सार्थ तुकारामगाथा ३०९ ६२८ कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज वा हरी ॥ अवघ्या नाशवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥ १ ॥ प्रथम केला गर्भी वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिले नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥ २ ॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणीं प्रवर्त्तली चिंता । खरें मागुता जन्म धरूं ॥ ३ ॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौऱ्यांशी घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥ ४ ॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मो दीन कामारी । तुका म्हणे करीं कृपा आतां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- थिता-जवळ स्थिर असलेला, भरोवरी-धम अर्थ :- श्रीहरी, या संसारामध्ये मी कोणते सुख मानून राहू रे ? तू साग एकदा ना. येथील सर्व सुखें नाशवंत आहेत. तू एक जवळ स्थिरपणे उभा होतास तोही दूर होतोस अंतरतोस. १ प्रथम मी आईच्या गर्भात निवास केला. तेथील कष्ट काय सांगावेत ? नऊ महिने परिपूर्ण असे मी दुख भोगले आणि मग कसा तरी या जन्मास आलो. २ सर्व बालपण काही न कळताच गेले. तरुणपणी विषयचिंतनाचा आयुष्य गेले. म्हातारपणी आता कसे होणार या चिंतेने मी ग्रासून गेलो. बरे मरून मोकळे व्हावे तर पुनः जन्म आहेच. ३ या संसारात एका क्षणा- चाही विसावा नाही. चौऱ्यांशी लक्ष जन्माच्या खेपा केल्या तरी, जी हाव पाठीशी लागली आहे ती काही केल्या संपत नाही. माझ्या या देहपणाच्या जाणिवेस आग लागो व ती नष्ट होवो. ४ पण देवा, आता हे थम पुरेत. दरिद्री होऊन मी तुझ्या दारात उभा राहीन. वाटेल ती कामे करणारा मी तुझा दास होईन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मजवर कृपा करा ना एकदा. ५ ६२९ सुख या संतसमागमें । नित्य दुणावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥ १ ॥ म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूंचि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥ २ ॥ ऐसा हा कळला निर्धार । माझा तुज न पडे विसर । अससी देउनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळ ॥ ३ ॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्षितमुवित जात्या कामारी दासी । त्याचें वर्म तूं आम्हापाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥ ४ ॥ जेथें तझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हां आनंदास । सेवून ब्रह्मरस तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- संतसमागमें-संताच्या सहवासाने, दहन-नष्ट, कामारी-काम करणान्या. अर्थ :- देवा, या संतांच्या सहवासात काय सुख आहे म्हणून सांगू ? तुझ्या नामाने तर ते नित्य दुपटीने वाढत राहते. सर्व कर्मे त्यामुळे नष्ट होऊन जातात. जळून जातात. त्यामुळे मी मोठ्या प्रेमात व तुझ्या नाम- स्मरणात डुलत असतो. १ म्हणून देवा, आता मला कसलीही चिंता उरलेली नाही तूच आता आमची माता, आमचा पिता, बंधू, चुलता, आमची बहीण सर्व काही तूच आहेस देवा. सर्व नातेवाईकही तूच आहेस. २ आता
३१० सार्थ तुकारामगाथा हा विचार निर्धाराने मला समजला आहे. देवा, तुला माझा विसर कधीच पडणार नाही, हेही मला पक्के माहीत आहे. तू मला धीर देऊन सदैव जवळच असतोस. अंतर्बाह्य स्वरूपात तूच माझ्याजवळ असतोस. ३ दुःख कसे असते ते स्वप्नातही मला दिसत नाही. मुक्ती व भोगवृत्ती या काम करणाऱ्या दासी होऊन राहिल्या आहेत. त्या सर्वांचे रहस्य तुझ्यात असून तू तर प्रेमाच्या सुखासाठी आम्हाजवळ राहिला आहेस. ४ ज्या ठिकाणी तुझ्या कीर्तनाचा नित्य घोष असतो, तेथे सर्व पापे जळून नष्ट होतात. मग आमच्या आनंदास कमतरता कसली ? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मोठ्या प्रीतीने या ब्रह्मरसाचे, ईश्वराच्या ऐक्याचे सेवन करू. ५ ६३० देवा तूं आमचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥ १ ॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुढती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥ २ ॥ आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळिकवैकुंठ ॥ ३ ॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू कीतीं तया सुखा ॥ ४ ॥ तुझियां नामाचीं भूषणें । तों ये मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- कृपाळ-कृपाळू, प्रतिपाळ-सांभाळ. अर्थ :- देवा, तू आमच्याविषयी फार कृपाळू आहेस रे भक्तांचा सांभाळ करणारा तू दीनवत्सल आहेस तू मोठी स्नेहाळ अशी माउली आहेस. आमचा सर्व भार तू घेतला आहेस १ आमची सर्व चिंता देवा, तुलाच लागली आहे. आमचे पाऊल वाकडे पडले तर तूच आमचे त्यावेळी रक्षण करितोस. मग पुढे तू आम्हास संतांच्या स्वाधीन करतोस आम्हाला दूर लोटण्यास तुला धीर कसा होणार ? २ त्यामुळे आता आम्हाला भय नाही की कसली चिंता नाही कसलाही धाक नाही जन्ममरणाविषयी काळजी नाही इहलोक व परलोकही आम्हास एकसारखाच झाला. सर्व ठिकाणे आम्हास वैकुंठाप्रमाणेच झाली. ३ दिवस आहे की रात्र आहे, हेही आम्हास समजेनासे झाले आहे. तुझ्या नामस्वरूपाची अखंड ज्योत अंतःकरणात लागली आहे या आनंदलहरींचे वर्णन देवा, मी करू तरी किती? या सुखाचे वर्णन किती करावे ? ४ देवा, तुझ्या नामाच्या भूषणाचे अलंकार तू मला घातले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्यामुळे आम्हास काहीही कमी पडणारे नाही. ५ ६३१ न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलो ॥ १ ॥ बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघडचा नागविलो चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ २ ॥ तुज मागणें इतुले आतां । मज या निरवावें संतां । जाला घंटस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥ ३ ॥ अति हा निकट समय । मग म्यां करावे तें काय । दिवस गेलिया ठाकील छाय । उरेल हाय रातिकाळीं ॥ ४ ॥
होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां । बहुत चिंता प्रवर्तली ॥ ५ ॥ ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टोपा :- पवे-पावत नाही, ठाकील-येईल, छाव-अंधार, संधी-काळी.
अर्थ :- देवा, तुझी जयलोक प्राप्त होत नाही म्हणून मला फारच चिंता वाटत आहे रे. या माझ्या देहावर व प्रपंचाच्या वृत्तींवर पुष्कळांची सत्ता आहे. या बंधनांतून सुटका करवून घेण्याचा मी फार प्रयत्न करतो, पण मी त्यांत जास्त जास्तच गुंतत जातो. बलाढ्य अशा कर्मसत्तेच्या तावडीत मी सापडतो. १ माझ्या मस्तकावर पुष्कळच ओझे आहे. मी हा, हा देह माझा या भावनेमुळे या चोरामुळे मी नागवून उघडा झालो आहे. घरच्या घरीच असूनही माझी अशी अवस्था झाली आहे. २ देवा, तुला मागणे फक्त आता इतकेच आहे. मला तू या संतांच्या स्वाधीन करावेस. तुला विनविता विनविता माझा घसा फुटण्याची वेळ आली. मला आता निराश करु नकोस. ३ आता ही वेळही फार बिकट व कठिण आहे. यावेळी मी आता काय बरे करावे ? आयुष्याचे दिवस संपतील व संध्याकाळचा अंधार दाटून येईल आणि मग भयाण अंधाराचेच राज्य सुरु होईल. ४ मग संचित कर्माचीच सत्ता सुरू होईल. मग मी पराधीन होऊन बसेन. कुठे लपून बसावे तरी मला जागा सापडणार नाही. फारच चिंता त्यावेळी निर्माण होईल. ५ अशा या संकटाच्या वेळी हे कृपेच्या सागरा, तू धावून ये. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सर्व बळ, सर्व बुद्धी, सर्व सिद्धी यांना मी तुझ्याच पायांवर समर्पित केले आहे. ६
६३२ आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥ १ ॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ २ ॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगें वाणिजेते ॥ ३ ॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली धार । अविनाश पर पद ऐसें ॥ ४ ॥ येयें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥ ५ ॥ केली आराणूक सकळां हातीं । धरावें धरिलें तें चित्तीं । तुका म्हणे सांगितलें संतीं । देईं अंतीं ठाव मज देवा ॥ ६ ॥
३१२ सार्थ तुकारामगाथा राहिलो आहे. सर्व लौकिक व्यवहारही सोडून दिला आहे. आपल्या अविनाशी स्वरूपाचा विचार आधी करूनच मी तुमचा आश्रय घेतला आहे. ४ या ठिकाणी धैर्य हे एकच धर्म जाणावयास हवे. या धैर्याच्या बळावर मी हा माझा देह नाशवंत व न टिकणारा आहे असाच मानला. तुझे नाम हेच एक जीविताचे सार मी मानले. ५ सर्व लौकिक वृत्तींच्याकडून सुटका करून घेऊन मी विश्रांतीस पावलो आहे. चित्तात जे धरावयास हवे ते धरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे संतांनी सांगितले तेच मी केले. आता मला जपवेस देवा, तू आश्रय द्यावास. ६ ६३३ बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होईजे ॥ १ ॥ दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ २ ॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥ ३ ॥ ऐसिये पावलिलों ठायीं । आतां मी काई हों उतराई । येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझें आई पांडुरंगे ॥ ४ ॥ फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजबिलों बाळ निजस्थानीं ॥ ५ ॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- आतुडे-प्राप्त होते, येते, कवळ-दोष, चाडा-लोभासाठी अर्थ :- बरे झाले; मी या नरजन्मास आलो. हा एक फार मोठा लाभच मला झालेला आहे. यायोगे ईश्वरसान्निध्याच्या सर्व सुखांचा लाभ मला घेता येईल. १ ईश्वराने मला हात, पाय, कान, डोळे, मुख इत्यादी इंद्रिये दिली आहेत यांच्या उपयोगाने नारायणा, मला तुझी प्राप्ती होईल व मला जीवपणाचा व भवरोगाचा जो रोग लागला आहे तो नाहीसा होईल. २ यामुळे तिळतिळ असा पुण्याचा साठा हातून होईल व बहुत जन्मांच्या संचिताने तुझ्या नामाची जोड माझ्या वाचेस प्राप्त होईल. ३ अशा या महत्त्वाच्या ठिकाणी देवा, तुम्ही मला आणले आहे. आता याचा उतराई मी होऊ तरी कसा ? पण पांडुरंगा, तू माझी माउली असल्याने मी माझा एवढा जीव जरी तुझ्या पायी अर्पण केला तरी तो थोडाच होईल. ४ देवा, तू माझ्या डोळ्यांचा दोष नाहीसा केलास, अंतःकरणा- तील गुण-दोषांचा मळ तू धुऊन काढलास आणि तू प्रेमाने मला स्तनपान देऊन तृप्त केलेस, व या बालकाला आपल्या हृदयाशी झोपविलेस. ५ या अलौकिक आनंदास दुसरी जोडच नाही. याची नुसती हकीकत सांगताना सुद्धा गोड लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आमच्या लोभासाठी व आमच्या भक्तीच्या कौतुकासाठी तू या सगुण आकारास आला आहेस. ६ ६३४ अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोथिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥ १ ॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषे मळिलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाही ॥ २ ॥ विविध कर्म चौऱ्यांशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांठवण ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा ३१३ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । ये भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥ ४ ॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळों दूर होती खळाळों ॥ ५ ॥ म्हणोनि १नासावें अज्ञान । इReport/इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वोळिलों-बनलो, अंतर-अंत करण, लाहातें-संबध, पसर-पसारा, खळाळों-लाटा अर्थ :- अहो वेदमूर्ती देवा, माझी बुद्धी फार अल्प असून तुमच्या विषयी भावही थोडा आहे माझे आयुष्य थोडे असून जे आहे तेही माझ्या स्वाधीन नाही. मी तर अनंत अपराधाची मूर्तीच बनलो आहे. तरी माझी एक विनंती तुम्ही ऐका ना. १ माझ्या दोषांचा परिहार किती करू ? किती दोष घालवायचे म्हटले तरी ते जात नाहीत, इतके माझे अंत करण दोषांनी मलीन झाले आहे. प्रारंभीचे, वर्तमानकाळचे, पुढील काळचे कर्म किती आहे याचा नीट सुगावा काही लागत नाही. २ हे कर्म विविध प्रकारचे असून त्याच्यामुळे चौऱ्याशी लक्ष योनींच्या फेऱ्यात सापडावे लागते. या शरीरालाही आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक अशा स्वरूपाचे तीन मोगही वारंवार भोगावे लागतात. हे शरीर म्हणजे नानाविध कर्माचे भांडारच आहे असे वाटते थ त्यातच जन्म, म्हातारपण व मरण यांची साठवण आहे. ३ तसे पाहिले तर जीव व शरीर यांचा काही संबंध नाही. भिन्न भिन्न पंचमहाभूतांचा हा देह बनलेला आहे. तो कर्माप्रमाणे, संचिताप्रमाणे कधी रचला जातो, कधी खचला जातो. याप्रमाणे हा देह असार असून फोलकटाप्रमाणे व्यर्थ आहे. ४ पुत्र, पत्नी, बंधू, मायबाप, इतर नातेवाईक याच्या नात्याचा पसारा कसा आहे ? तर एखाद्या मोठ्या नदीत महापूर यावा, त्यात काही लाकडे योगायोगाने जवळ यावीत व मग लाटाची खळबळ झाली की ती दूर वाहून जावीत, तसा हा नात्यातील माणसाचा परस्परांशी क्षणिक संबंध आहे. ५ म्हणून मासांठी अज्ञान नाहीसे करावे. इतकी तरी देवा, तू माझ्यावर कृपा करावीस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपाळू आहेस ना ? जनार्दना, मी तुझे चरण धरून तुला अशी विनंती करीत आहे. ६ ६३५ ऐसी हे गर्जूं चेलरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥ १ ॥ जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ २ ॥ चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥ ३ ॥ मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्यकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥ ४ ॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा । करोनि अकर्ता आपणा । भेदो अभिमाना आतळों ॥ ५ ॥ कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाप जीयावेगळें न करी तुका ॥ ६ ॥ १ नसावे. तु. गा...४०
३१४ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा :- वैखरी-वाणी, महदादि-महत् तत्त्वाचा आरंभ ज्याच्यापासून आहे असा, जगदानिया- सर्व जगाला दान देणारा, आतळों-स्पर्श होणे. अर्थ :- देवा, केशव, मुकुंद, मुरारी, राम, कृष्ण या चांगल्या नावांनी सर्व दोषांचे हरण होत असल्याने माझ्या वाणीने नेहमी त्याचाच उच्चार करावा. १ जनार्दना, सर्व जगाचे जीवन असणाऱ्या, तू विराट स्वरूपाचा असून वटू वामन मूर्तीचाही तू होतोस. मधुसूदना, महदादो तत्त्व तुझ्यापासूनच निर्माण होते तू माझी सर्व भवबंधने सोडून टाक. २ हे चक्रपाणी, गदाधरा, असुरांचा नाश करणाऱ्या देवा, शूरामधील शूर देवा, तू अतिशय शौर्यवान आहेस. सर्व जगास दान देणारा तू दाता आहेस ३ देवा, तुझी मूर्ती मदनासारखी सुंदर आहे. सर्व गोपाळ व गोपिका यांचे मन हरण करणारा तू आहेस नटनाट्यात व नृत्यात तू कान्हा कुशल आहेस तू सर्वगुणसंपन्न असा आहेस. ४ तू जसा गुणवंत आहेस तसा निर्गुणही आहेस. जसा सर्व काही पाहणारा आहेस, तसेच सर्व जाणणाराही तूच आहेस सर्व काही करुन तू अकर्ता असतोस तू कुणाला अभिमानाचा स्पर्श करू देत नाहीस. ५ या देवाची सेवा मला कोणत्या प्रकाराने घडणार आहे ? या देवाला मी समर्पण तरी काय करू ? हा देव भक्तिभावावाचून मात्र वश होणारा नाही. या देवाच्या पायांमधून हा तुकाराम आपला जीव काही वेगळा करणार नाही. ६
६३६ होतों तें चित्तीत मानसीं । नवस फळले नवसी । जोडिले नारायणा ऐसी । अवित ज्यासी नाश नाहीं ॥ १ ॥ धरिले जीवी न सोडों पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ २ ॥ मज तों पडियेली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृष्टि उघडली बरे जालें ॥ ३ ॥ आता हा सिद्धि पावो भाव । मध्यें चांचल्यं न व्हाया जीव । ऐसी तुम्हां भाकीतसे कीव । कृपाळुवा जगदानिया ॥ ४ ॥ कळों येते आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधी । केवढें आघात ते मधी । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥ ५ ॥ कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥ ६ ॥
सार्थ तुकारामगाथा २१५ भावाने अलंकृत केली, कीर्तनाच्या प्रसंगी मला चांगली प्रीती जवून दिली. त्या संताच्या चरणावर हा तुकाराम लोटांगण घेत आहे. ६ ६३७ तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा । भवताराका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥ १ ॥ काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं१ नेणें । परि चिंतने काळ सारों ॥ २ ॥ न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वांयां जाय ऐसे । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसे धरोनियां ॥ ३ ॥ तुज समर्पिली काया । जीवे भावें पंढरीराया । सांभाळीं समविषम डाया । करों छाया कृपेची ॥ ४ ॥ चतुर तरीं चतुरां राव । जागता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव । आल्प भाव परि माझा । ५ ॥ होतें तें माझें भांडवल । पायापें निवेदिले बोल । आदरा ऐसे पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-अंत, विज्ञापना-विनंती, डाया-प्रसग, आल्प-वांकडे, वेडेवाकडे, साच-खरे, फोल-खोटे अर्थ - नारायणा, तुमच्या गुणाना अत नाही माझी बुद्धी अतिशय अल्प असल्यामुळे मी त्याने वर्णनही करू शकत नाही तुम्ही ससारसागर तारून नेणारे असून सुजाण आहात. तुमच्या पायाशी माझी एक विनति आहे. १ देवा, तुमच्या भक्तीची लक्षणे माझ्यासारख्या दीनाने काय जाणावीत ? मला खरे म्हणजे माझे तोंडसुद्धा धुता येत नाही, इतका मी अज्ञानी आहे पण देवा, तुमच्या चिंतनात कसा तरी वेळ काढीत आहे. २ देवा, जे परिश्रम वाया जातील व जे व्यर्थ होईल असे दुसरे कसलेही वेड मला लावू नका मला नीट हाताशी घरा व आपल्या कृपेच्या प्रकाशात मला चालवा ३ पढरीराया, मी ही माझी काया तुलाच जीवेभावे समर्पण केली आहे जे काही चागले वाईट प्रसग येतील त्यातून देवा, तू माझा साभाळ कर. तुमच्या कृपेच्या छायेत मला पूर्ण विश्राती मिळावी ४ देवा, तू इतका चतुर आहेस की सर्व चतुराचा राजा तू आणि ज्ञानो तर इतका आहेस की सर्व ज्ञानी जीवाचा जीवच तू आहेस कुठलो म्हणून तुझ्यात कमतरता नाही पण देवा, माझा हा वेडावाकडा भाव तू पाहा. ५ देवा, माझ्याजवळ भक्तिभावाचे जे काही भाडवल होते, ते सर्व मी आपल्या पायाशी अर्पण केले आहे सर्व हकीगत आपल्या चरणाशी निवेदन केली आहे माझा जो जसा आदर असेल तसे मोल मला मिळेल तुकाराम महाराज म्हणतात, यातील खरे खोटे तू जाणशीलच ६ ६३८ का हो माझा मानियेला भार । ऐसा दिसतसे फार । अनंत पावलिलों उद्धार । नव्हेचि थार मज शेवटीं ॥ १ ॥ पाप बळिवंत गाढें । तुज ही राहो सकते पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें२ देखियेले ॥ २ ॥ काय मानिती संतजन । तुमचे हीनत्ववचन । कीं वृध्द जाला नारायण । न चले पण आधील तो ॥ ३ ॥ १ धुऊ, २ कंवडें
२१६ सार्थ तुकारामगाथा आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥ ४ ॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होई प्रगट ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- भार-ओझें, धार-आश्रय. अर्थ :- देवा, तुम्ही माझे फार मोठे ओझे मानले असे मला फार दिसते. पण तुम्ही आजपर्यंत अनेक लोकांचा उद्धार केलात. असे असूनही मला तुमच्यापाशीं कांही आश्रय मिळणार नाही हे कसे ? १ माझे पापच एवढे बलवान दिसते की, ते तुझ्यासारख्यापुढेही टिकू शकते ! तुझ्यासमोरही माझ्या मागील जन्मांची कर्मकटकट शिल्लक राहिली, असे मोठे नवलच मी आज पाहिले ! २ देवा, हा नारायण आता वृद्ध झाला असून पूर्वीचे त्याचे सामर्थ्य काही आता उरलेले दिसत नाही, असे तुमच्या कमीपणाचे वर्णन मी केले तर ते संत लोकांना कधी मान्य होईल काय ? ३ देवा, आता असे चोरटेपणाचे वर्तन करून मला दूर करू नकोस. स्वतःच्याच घरी असा पडदा धारण करणे काय बरोबर आहे काय ? आतापर्यंत तुम्ही मला दूर धरलेत ते धरले. ४ अनंता, आता मला विनाकारण नका फसवू. जाणूनबुजून तू नेणता का होतोस ? तुकाराम महाराज म्हणतात, माझे रक्षण करण्याची सत्ता काय तुझ्यावळ नाही? देवा, तू आता माझ्यासाठी प्रगट हो ना. ५ ६३९ मज ते हांसतील संत । जाँहीं देखिलेतो मूर्तिमंत । म्हणोनि उद्वेगलें चित्त । आहाच भक्त ऐसा दिसें ॥ १ ॥ ध्यानीं म्या वर्णविति कैंसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आते लागलोंसें ॥ २ ॥ कासया पाडिला जो धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । आम्हां लेकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसऱ्याचा ॥ ३ ॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव समचि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥ ४ ॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेसि नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥ ५ ॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां भ्रमलो ते वाट । तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- आहाच-उगाच, धडा-रीत, कारणा-उपयोगी अर्थ - देवा, ज्या साधुसंतानी तुला मूर्तिमंत असे पाहिले आहे ते मला हसतील, या विचाराने माझे चित्त उद्विग्न होऊन गेले आहे. मी भक्त उगाच आहे की काय असे मला वाटते. १ तुझ्या ध्यानाचे वर्णन तरी कसे करावे ? माझ्याच्या कित्येक संतानी तुझी स्तुती केलेली आहेच. देवा, या विचारातून माझा आता जीव निघतच नाही. या एकाच आशेत मी गुंतलो आहे. २ अशी ही वेडीवाकडी रीत महाराज, कशासाठी निर्माण केली आहे ? आम्हा मुलांना त्याचा त्रास होतो ना यासाठी का एकामागून दुसरे दुज असे तू निर्माण केले आहेस ? ३ सांगा देवा, हा अन्याय तरी कुणाचा आहे ? मी तुमचे पाय धरून विचारतो आहे. कारण तू सर्वांची सारखीच आई आहेस; तर सांग, माझा तरी काय अन्याय आहे ? ४ नारायणा, जर माझ्या या देहाचा काही उपयोग नव्हता, तर मला तुम्ही निर्माण तरी का केलेत ? का प्रसवलात मला ? माझ्या प्रश्नास आता नीट उत्तर द्या तुम्ही. माझ्यासारेख्या अज्ञानी
सार्थ तुकारामगाथा ३१७ मुलाची नीट समजूत काढा. ५ देवा, अशा प्रकारचा बोभाटा पुष्कळ दिवस करून मी तुमची वाट पाहून थकून थकून गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ताट वाढून ठेवलेले असावे व त्याचा वीट आलेला असावा, तसा माझा कंटाळा स्वामी करतात की काय ? ६ ६४० बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हां समर्पण ॥ १ ॥ दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ २ ॥ बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं झाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥ ३ ॥ तुम्हांसि पाथविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥ ४ ॥ रवीच्या नांवें निशीचा नाश । उदय होतांचि प्रकाश । आतां कैंचा आम्हां दोष । तूं जगदीश कैवारी ॥ ५ ॥ आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि १ नारायण । आलों शरण तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- भूस-फोलकटाप्रमाणे व्यर्थ, थडी-पैल तीरास, भातें - कौतुकाचे भांडवल, साऊ, निशीच्या-रात्रीच्या अर्थ.- देवा, आजपर्यंत मी मृत्यूच्या दाढेत सापडून नाश पावलो नाही हे बरेच झाले. येथपर्यंत वाचून राहिलो हे ठीक झाले. आता माझे उरलेले सर्व आयुष्य देवा, मी तुम्हास समर्पण करीत आहे. १ आजपर्यंत या काळानेच संधी दिली म्हणूनच माझा नाश झाला नाही. काही कार्य करणे उरले आहे म्हणूनच हे आयुष्य उरले आहे. मागचे आयुष्य फोलकटाप्रमाणे व्यर्थ गेले ते जाऊ द्या २ एकदा पैल तीरावर पोचल्यावर मग नदीत बुडलो हे सर्व खोटेच ठरते. किंवा स्वप्नात वाटेल तेवढी ओढाओढी झाली तरी जागृत अवस्था आल्यानंतर मग ते सर्व खोटेच ठरते. तसाच खरा आनंद मला शेवटी तुमच्या भेटीचा गोड घास मिळणार आहे यातच वाटतो. ३ मी तुम्हास प्रेमाने हाक मारली त्यामुळेच देवा, माझी भीती नाहीशी झाली आहे. शरण आलेल्यांचे रक्षण करावे हे जे तुम्ही कौतुकाने करून शरणागतास प्रेमाचा साऊ देता तोच मोठा आहे. ४ सूर्य उगवल्याबरोबर रात्रीचा जसा नाश होतो, प्रकाशाचा उदय होतो, त्याप्रमाणे तू जगाचा स्वामी आमचा कैवारी असताना आम्हांस दोष कसा लागणार ? ५ आता माझ्या अंगी असणारा देहसुखाचा, दंभाचा, मानाचा अभिमान जळून जावो. मी आता त्याच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू जगाचा स्वामी आहेस, नारायणा, मी तुला शरण आलो आहे. ६ ६४१ आतां माझा नेणो परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सफळां लाभांचा हा ठाव । ऐसा भाव जाला चित्ताठायीं ॥ १ ॥ भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचाची ॥ २ ॥ आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥ ३ ॥ १ जगदीश.
३१८ सार्थ तुकारामगाथा वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥ ४ ॥ करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जोवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥ ५ ॥ बहु मतापासूने निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळां लेइलों तें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाव-निश्चय, वास-वाट, सोस-हौस. अर्थ :- देवा, तुझ्या पायांशीं येऊन मी विसावलो आहे. आतां काही माझा भक्तिभाव तुझ्यापासून दूर होऊं नये. तुझ्या प्राप्तीमुळे मला सर्व लाभाचा लाभ मिळाला, असाच निश्चय माझ्या मनाशीं झालेला आहे. १ तुझ्या- वरचा विश्वास हेच माझे आता मुख्य भांडवल असून मी तुझ्या निश्चयाने सेवक झालो आहे. मी मागच्या प्रपंचाची मग वाटच पाहणें सोडून दिले आहे मला सर्व हौस आता यापुढे तुमच्या सेवेचीच आहे. २ देवा, माझ्या मनात जे आहे, ते सर्व मी तुमच्यापुढे सांगितले आहे. मी माझा सर्व गर्व सोडून दिला आहे. वाईट काळ, चांगला काळ हे सर्वच आम्हांस आता पर्वकाळाप्रमाणे वाटत आहेत. हा मोठा विश्वास देवा, तुमच्या कृपेने मला प्राप्त झाला आहे. ३ आता माझ्या या सर्व व्यवहारांतही या ईश्वराशिवाय दुसरे काही मी जाणीतच नाही म्हणूनच माझ्या मनात पूर्ण समाधान असून लाभहानीविषयी मुळीच विचार येत नाही. ४ असा मी संसार करूनही त्यामधून वेगळा आहे. सर्व बाह्य पसारा मी माझ्या अंगापासून दूरच ठेविला आहे तुझ्याविषयी प्रेम हेच जीवनात खरे सुख प्राप्त झाले. यामुळे नामरूप बीजाचा आश्रय मिळून इतर आघात होते ते संपले, दूर झाले ५ मी अनेक मतांपासून निराळाच राहिलो. सोंवळा होऊनच मी आहे तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या रूपाचे जे ध्यान माझ्या हृदयात वसले आहे, तेच मी माझ्या डोळ्यांनी पाहात आहे. ६ ६४२ तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीराय ॥ १ ॥ भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धिसिद्धि वोळगती द्वारों । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥ २ ॥ जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता चमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥ ३ ॥ सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पक्षिश्वपदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥ ४ ॥ मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहन गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तिभाजा लवलाहीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कामारी-दासी, वोळगती-प्राप्त होतात, घरटी करी-रक्षणासाठी फिरत असते, वाम भागीं-डाव्या अंगास, भीमकी-रुक्मिणी, भंगी-नाहीसा होतो, लवलाहीं-लगबगीने अर्थ :- गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालून हा जगजेठी पांडुरंग आपल्या दृष्टीने पुंडलिकाकडे पाहून भीमा नदीच्या तीरावर विटेवर उभा राहिला आहे. १ अष्टमहासिद्धी व रिद्धी व नाना भोग आणि चारो मुक्ती या याच्याच दासी असून सुदर्शन चक्र जगाच्या रक्षणासाठी फिरत असते याच्या भीतीने यम देखील दूर पळून जातो. २ सर्व विश्वाची माता असणारी याच्या डाव्या अंगात अर्धांगी म्हणून ही रुक्मिणी शोभत आहे. मेघामध्ये जशी चमक- णारी वीज शोभावो तशी ही वाटते. तिच्या दर्शनानेच महापातकांचे दोष नष्ट होतात. ३ हा माझा विठ्ठल सुखाचा
सार्थ तुकारामगाथा ३१९ सागर व परमानंदाचे प्रत्यक्ष रूपच आहे. गोपी, गोपाळ, गाई यांना याचाच एक नाद असून पशू आणि पक्षी यांनाही याचा छंद नेहमी असतो. हाही यांच्याच छंदाने पावा वाजवीत असतो. ४ याने मुकुट सुशोभित असून हा चतुर्भुज आहे. हा भक्तांचे मन हरण करणारा असून याच्या ध्वजावर गरुडाचे स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा स्वामी लगबगीने भक्तांच्या कामासाठी धावत येत असतो. ५ ६४३ हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणायें । करितों जीवें निबलोण ॥ १ ॥ बैसतां संतांचे पंगती १ । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणीच नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ २ ॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठों रुचि ठेऊनि गोड । देखत नाड फळतसे ॥ ३ ॥ मरती मेलों नेणों किती । तोचि लाभ तयाचे संगतीं । म्हणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥ ४ ॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥ ५ ॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्टचि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- कोड-हौस, नाड-फजिती. अर्थ :- देवा, मला आता हाताशी धरले आहे ते सोडू नये. मी तुम्हांस जीवेभावे शरण आलेलो आहे. मला तुम्ही आपला आहे असे म्हणावे. मी माझे जीव तुमच्यावरून ओवाळून टाकीन. १ हे कमळापती, मला या संतांच्या पंगतीस बसल्यावर समजून आले की, माझे हे सर्व आप्त लोक मला कधीही उपयोगी पडणारे नाहीत. ते आपले नव्हेतच. हाच माझ्या मनात निश्चयाचा दृढ भाव झाला. २ ही सर्व नातेवाईक माणसे तुझ्या भजनाच्या आड येतात. देवा, मला प्रपंचाची हौस वाटावी असे करतात, प्रपंचादी मुखासारख्या कमी प्रतीच्या गोष्टीत त्यांना रुची वाटते. पण त्याची पुढे होणारी फजिती मला समजते. ३ ह्यातील कित्येकजण मरून गेले. मलाही त्यांच्या संगतीत एवढा एकच लाभ झाला असता; म्हणून तर देवा, मी फार काकुळतीस येऊन विनवणी करीत आहे की, माझे चित्त त्यांच्यात जडू नये, एवढा धीर मला तुम्ही द्यावा. ४ मग माझी निंदा हे माझे आप्त लोक सुखाने करू द्या ना. मी त्यांच्याशी भाषणही करणार नाही. देवा, तूच आदिपिता आहेस माझा. नारायणा, मी तुमचे पाय काही मग सोडणार नाही. ५ मी आपले हित आपणच साधून घेणार आहे. पूर्वसंचिताप्रमाणेच मी हे करीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी जर हे न करीन तर मी नष्टच होईन, पतितच राहीन. मग सारे संतजन मला हसतील ना. ६ ६४४ वरयें जालें लागलों कारणों । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥ १ ॥ न वेंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संतांची अंदणी दासी । केला याविशीं निर्धार ॥ २ ॥ जीवनों राखिला जिव्हाळा । जालों मी मजसीं निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥ ३ ॥ १ संगती.