भारतकोश
संग्रह पर लौटें

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

प्रमाणे निजामशाहीही मराठ्यांना लष्करात प्रवेशतर मिळालाच, पण त्याचबरोबर अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या. प्रामुख्याने लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना शाही राजवटीत मर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली. त्यातूनच मराठ्यांचा उदय होऊन काही मातब्बर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला. आदिलशाही मध्ये चंद्रराव मोरे, झुंझारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, सावंत, नाईक-निंबाळकर इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला. निजामशाही मध्ये जाधवराव आणि भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो. अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हे घराणे मूळचे वऱ्हाडातील सिंदखेड या गावचे होते. देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे संबंधीत होते असे म्हटले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते. त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीची पत्नी आणि शिवाजीची आई होय. निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्त्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे. या घराण्याचा संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला. त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असा इतिहासकारांचा तर्क आहे. मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी बाबाजी भोसले (१५४८ ते १५९९) यांच्यापासून सांगता येते. या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इ.स.१४७० च्या एका फर्मानावरून स्पष्ट होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष 'राणा' ऐवजी 'राजा' ही पदवी धारण करू लागले. बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरूळ या गावचे पाटील होते. निजामशाही राजवटीत वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे विशेष महत्त्व वाढले, बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी गाजविली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावची जहागीर बाबाजी भोसले यास मिळाली. पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही व निजामशाही यांचा सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते. ही कुवत बाबाजीजवळ असल्यामुळे निजामशहाने त्याला ही जहागिरी दिली असावी. बाबाजी हा चार-पाच गावाचा मोकदम आणि दोन गावाचा देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती निश्चितच चांगली होती. बाबाजीची दोन मुले-विठोजी आणि मालोजी हे कर्तबगार निघाले. इ.स.१५८८-८९ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी यांनी मोठा पराक्रम गाजविला. बुऱ्हाण निजामशहाने या दोन्हीही भावांना दीड ६ छत्रपती शिवाजी महाराज

दीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली. या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा मालोजी व विठोजी यांचेकडे वहिवाटीस आला. या सुमारास मालोजीचे वय केवळ चौदा-पंधरा वर्षांचे होते. इ.स. १५९१ ते १५९५ या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त संघर्ष चालू होता. या संघर्षात निजामशहाच्या वतीने मालोजीने अनेक लढायांत पराक्रम गाजविला. त्याबद्दल बुऱ्हाण निजामशहाने त्याचा सरंजाम पाच हजारपर्यंत वाढविला. त्यामध्ये सुप्यासारख्या परगणा मालोजीकडे वहिवाटीस आला. बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले. मलिक अंबर आणि मिआन राजू या दोन सरदारांमध्ये सत्तास्पर्धा निर्माण झाल्या. मूर्तजा निजामशहाला मलिकअंबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले. म्हणून त्याने मिआन राजू वर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार दिले. त्यातून मलिक अंबर व राजू यांत अनेक चकमकी होऊ लागल्या. मालोजी भोसले हा मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गढीमध्ये तो वास्तव्य करून होता. मिआन राजूच्या सैन्याने इंदापूरच्या गढीवर हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारला गेला. त्याच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा शहाजी हा केवळ पाच-सहा वर्षांचा होता. मालोजीच्या मागे विठोजीने १६११ पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीकडे आली. मालोजीच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते. तिला शहाजी व शरीफजी अशी दोन मुले होती. त्या मुलांच्या नावासंबंधी बखरीत दिलेल्या कथांना कोणताही आधार नाही. □□□ शिवपूर्वकाल ७

२. शहाजीची कामगिरी ज्यावेळी जहागिरीची जबाबदारी आली त्यावेळी शहाजी केवळ १२ वर्षांचा होता. आपल्या कर्तबगारीवर शहाजीने मलिक अंबरचा विश्वास संपादन केला आणि काही वर्षांतच तो मातब्बर सरदार झाला. त्याचे वडील मालोजी व चुलते विठोजी हे दोघेही पराक्रमी होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा मालोजीने जिर्णोध्दार केला तसेच शिखर शिंगणापूर येथे यात्रेकरूंच्या सोईसाठी एक तलाव बांधला. औरंगाबाद मध्ये मालपूरा आणि विठपुरा अशा दोन पेठा आहेत. ही नावे मालोजी विठोजी यांच्यावरून पडली असावीत असे मानले जाते. श्रीगोंद्याच्या शेख महंमद या संतास मालोजीने बारा बिघे बागायती जमीन दान म्हणून दिली होती. श्रीगोंदयास जी पेठ मालोजीने बसविली तिला मकरंदपुरा असे म्हणतात. मालोजीस मकरंद अशी पदवी मिळाली होती हे ऐतिहासिक पुराव्यावरून स्पष्ट होते. शहाजीचा उत्कर्ष विठोजी भोसल्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीवर आली. मालोजीची पंचहजारी शहाजीला मिळाली. लहान वयातही ही जबाबदारी शिरी घेण्याची कुवत शहाजीमध्ये होती. शहाजीची ही कुवत पाहून निजामशाहीतील सप्तहजारी सरदार लखुजी जाधवराव याने आपली कन्या जिजाबाई हिचा विवाह शहाजीबरोबर केला. या संदर्भात बखरीत दिलेली रंगपंचमीच्या सणाची कथा निराधार असून शहाजीच्या विवाहाप्रसंगी मालोजी हयात नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. शहाजीचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. इ.स.१६२० पासून शहाजीच्या कर्तबगारीला बहर आलेला दिसून येतो. मलिक अंबरचे कर्तृत्व बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर ८

पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रम गाजवून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून १९ ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगर जिंकून घेतले. राजधानीचे शहर अहमदनगर हातचे गेल्यानंतरही मलिक अंबरने धीर सोडला नाही. मूर्तजा निजामशहा दुसरा याला मराठवाड्यातील परिंड्याच्या किल्ल्यात सुरक्षित ठेऊन दौलताबादजवळ असलेल्या खडकी या गावी मलिक अंबरने आपली नवी राजधानी उभारली. हे खडकी गाव पुढे औरंगाबाद या नावाने प्रसिद्धीस आले. निजामशाही वाचविण्याचे प्रयत्न चालू असतांना मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी असलेल्या मिआन राजूने मलिक अंबरला सर्वतोपरी सहाय्य केले. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेल्या जहांगीरने निजामशाहीचा उच्छेद करण्यासाठी शहानवाजखान नावाच्या सरदारास दक्षिणेत पाठविले. शहानवाजखानाने रोशन गावला मलिक अंबरचा पराभव करून फेब्रुवारी १६१६ मध्ये खडकी हे गाव लुटले. मलिक अंबरने मुघलाशी तह करून बालाघाटचा प्रदेश जहांगीरला दिला. अशाप्रकारे एक मोठा पराभव मलिक अंबरला पत्करावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीत लखुजी जाधवरावाने निजामशाही सोडली आणि तोही मुघलांना जाऊन मिळाला. अशा या आणीबाणीच्या काळामध्ये मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले. भातवडीची लढाई अकबरानंतर जहागीर मुघल सम्राट झाल्यावर त्याने दक्षिण भारतात राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले. लखुजी जाधवराव मुघलांना मिळाल्यामुळे निजामशाहीची बाजू लंगडी पडली होती. या परिस्थितीची फायदा घेऊन विजापूरच्या आदिलशहाला जहांगीरने निजामाविरुद्ध चिथावले. त्यामुळे मलिकअंबर अडचणीत येईल असा जहांगीरचा कयास होता. परंतु धूर्त मलिक अंबरने गोवळकोंड्याच्या कुतुबशहाबरोबर तह करून आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर थेट बीदरपर्यंत चढाई करून आदिलशाही फौजेचा मोठा पराभव केला. त्यानंतर मलिक अंबरने थेट विजापूरपर्यंत मोहिम काढून आदिलशहाच्या राजधानीलाच वेढा दिला. परंतु मुघलांची मदत मिळाल्यामुळे आदिलशहाने निकराचा लढा दिला. तेव्हा नाईलाज होऊन मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठविला आणि अहमदनगरकडे त्याने प्रयाण केले. या संधीचा फायदा घेऊन आदिलशहा व मुघल यांच्या फौजांनी मलिक अंबरला भातवडीजवळ गाठले. शहाजीची कामगिरी ९

१. शिवजन्म, बालपन व रोहिडेश्वर स्वराज्य प्रतिज्ञा

ऑक्टोबर १६२४ मध्ये मोठा रणसंग्राम होऊन मालिकअंबरने आदिलशाही व मुघली फौजांना पराभव केला. या लढाईत मालिकअंबरप्रमाणे शहाजीनेही मोठा पराक्रम गाजविला. शहाजीचा भाऊ शरीफजी यानेही या लढाईत मोठा पराक्रम गाजविला. या लढाईत त्याला वीरमरण आले. भातवडीच्या लढाईत मुघल आणि आदिलशहा या दोघांनाही माघार घ्यावी लागली. भातवडीच्या अपूर्व यशानंतर निजामशाहीला उर्जितावस्था येण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु मलिक अंबर व शहाजी यांच्यामध्ये अचानक बेबनाव निर्माण झाला. परिणामी शहाजीने निजामशाही सोडून आदिलशाहीचा आश्रय घेतला. त्यामुळे मलिक अंबर व शहाजी यांच्यात प्रत्यक्ष संघर्षास सुरुवात झाली. तथापि या संघर्षात मलिकअंबरला यश मिळू शकले नाही. त्यामुळे विजापूरच्या दरबारात शहाजीचे वर्चस्व वाढले. शहाजीमुळे अनेक मातब्बर मराठ्यांना आदिलशाहीच्या दरबारात मानाच्या जागा मिळाल्या. स्वतंत्र वृत्तीचा शहाजी १६२७ मध्ये दक्षिणेतील आणि उत्तरेतील राजकारणात दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. १४ मे १६२७ रोजी मलिक अंबरचा मृत्यू झाला व त्यामुळे निजामशाहीची जबरदस्त हानी झाली. त्याचप्रमाणे २८ ऑक्टोबर १६२७ रोजी मुघल सम्राट जहांगीर मृत्यू पावल्यामुळे दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान विराजमान झाला. या दोन घटनांचा उत्तरेतील व दक्षिणेतील राजकारणावर दूरगामी परिणाम झाला. शहाजी जरी आदिलशाहीमध्ये मानाचे स्थान मिळवून होता, तरीपण अंतर्यामी निजामशाहीची त्याला ओढ होती. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाही पोरकी झालेली पाहून शहाजीचे मन निजामशाहीकडे ओढ घेऊ लागले. अशा परिस्थितीत १२ सप्टेंबर १६२७ रोजी इब्राहिम आदिलशहा मृत्यू पावला. त्याच्या जागी आलेल्या मुहम्मदशहाशी शहाजीचे जमले नाही. त्यामुळे स्वतंत्र वृत्तीच्या शहाजीने १६२८ च्या पावसाळ्यापूर्वी आदिलशाही सोडली आणि निजामशाहीत प्रवेश केला. या सुमारास मुघलांची चाकरी सोडून लखुजी जाधवराव हाही निजामशाहीत दाखल झाला. वास्तविक पहाता लखुजी जाधवराव व शहाजी भोसले हे दोन बलाढ्य सरदार निजामशाहीस मिळाल्यामुळे या राजवटीचा उत्कर्ष होण्याची मोठी संधी प्राप्त झाली होती. परंतु प्रत्यक्ष निजामशाही मध्ये अंतर्गत कटकरी, हेवेदावे इतके वाढले होते की शाही- दरबारात संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्ष निजामशहाला लखुजी १० छत्रपती शिवाजी महाराज

जाधवारांविषयी संशय व तिरस्कार वाटू लागला. त्यातूनच २५ जुलै १६२९ रोजी लखुजी जाधवराव, त्याची २ मुले अचलोजी व रघोजी आणि नातू बसवंत यांच्यावर निजामशहाने मारेकरी घातले आणि भर दरबारात हत्याकांड घडून आले. हा भीषण प्रकार पाहिल्यानंतर शहाजीला निजामशाहीचा वीट आला आणि त्याने निजामशाही सोडून मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शहाजीचा मनोदय ओळखून बादशहा शहाजहानने शहाजीस पंचहजारी देऊ केली. त्याचा मुलगा संभाजी यालाही दोन हजारी व चुलतभाऊ मालोजी याला दोन हजारी असा सरंजाम देण्याचे मान्य केले अशाप्रकारे शहाजी फिरून मुघलांकडे आला. मुघलांकडे आल्यावर बंडखोर पठाण सरदार दर्याखान याचे पारिपत्य करण्याची जबाबदारी शहाजीवर शहाजहानने सोपविली. या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई प्रसूत होऊन शिवाजीचा जन्म झाला. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत शहाजीला शिवनेरीवर जाण्याची सवड मिळाली नाही. पावसाळा सुरू झाल्यावर शहाजी शिवनेरीला गेला आणि पुत्रमुख त्याने पाहिले. इ. स. १६३० मध्ये महाराष्ट्रात विशेषतः बालाघाट प्रदेशात भीषण स्वरूपाचा दुष्काळ पडला. समकालीन साहित्यामधून या भीषण दुष्काळाची वर्णन आढळतात. 'बादशहानामा' या ग्रंथात या भीषण दुष्काळाचे तपशीलाने वर्णन आलेले आहे. शहाजी मुघलांकडे गेल्यानंतर निजामशाही जवळजवळ मोडकळीस आली. मलिक अंबरचा मुलगा फतेखान याने निजामशाही सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. उलट कटकारस्थानांना कंटाळून ऑक्टोबर १६३१ मध्ये फतेखानाने निजामशहाला ठार मारले. त्यामुळे निजामशाहीची अवस्था मोठी दयनीय झाली. आता निजामशाही मुघलांच्या आहारी जाणार हे शहाजीच्या लक्षात आले आणि म्हणून कोकणात असलेला निजामशहाचा एक वारस शोधून काढून शहाजीने त्याची प्रतिष्ठापना जुन्नर येथे केली. निजामशाही वाचविण्याचे त्याने प्रयत्न सुरू केले. शहाजीच्या या हालचाली मुघलांना धोकादायक वाटल्या. तरीपण आपण मुघलांशी एकनिष्ठ आहोत असे शहाजी वरकरणी भासवत होता. शहाजीचा स्वतंत्र लढा मुघलांकडे असतांना शहाजीने नाशिक, त्र्यंबक, संगमनेर व जुन्नर हे परगणे आपल्या वर्चस्वाखाली आणून कोकण पर्यंतचा प्रदेश हुकमतीखाली आणला. त्यानंतर शहाजीने स्वातंत्र्य पुकारले. बादशहानाम्यामध्ये असा उल्लेख आहे शहाजीची कामगिरी ११

की, “शहाजीने निजामशहाचा एक नातलग हाती धरून त्याला निजामशाहीतील एका बळकट गडावर नेऊन ठेवले आणि स्वातंत्र्य पुकारले.” यावरून असे स्पष्ट दिसते की नाममात्र बादशहा गादीवर बसवून शहाजीला स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा असावी. स्वतंत्र झाल्यावर आणि आपली बाजू बळकट झाल्यावर महत्त्वाकांक्षी शहाजीची नजर दौलताबाद किल्ल्याकडे वळली. कारण हा किल्ला ताब्यात आला तर शहाजीचा मोठा फायदा होणार होता. आपल्या पूर्वजांचे मूळ गाव असलेले वेरूळ आणि मराठवाड्याचा बराचसा प्रदेश शहाजीच्या वर्चस्वाखाली येणे शक्य होते. यावेळी दौलताबादचा किल्ला फतेखानाच्या ताब्यात होता. आदिलशाहाच्या मदतीने दौलताबादचा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू केला. शहाजीच्या हालचाली पाहून फतेखानाने मुघल सरदार महाबतखान यास दौलताबादचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी बोलाविले. महाबतखानाने जून १६३३ मध्ये दौलताबादचा किल्ला जिंकला. फतेखानाने शरणागती पत्करली. निजामशाहीचा नामधारी वारस मुघलांच्या ताब्यात आला. शहाजहानने या नामधारी वारसाची हुसेनशहाची रवानगी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरील तुरुंगात केली. अशाप्रकारे निजामशाही पूर्णपणे संकटात आली. तरीपण हताश न होता निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू ठेवला. शहाजीची ही झुंज जवळजवळ ३ वर्षे चालू होती. शेवटी प्रत्यक्ष शहाजहान बादशहाला शहाजीचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेत यावे लागले. शेवटचा लढा दौलताबाद मुघलांच्या ताब्यात गेल्यावर जुन्नरच्या गडावर बंदोबस्तात ठेवलेल्या निजामशाहीच्या वारसास शहाजीने नगर जिल्ह्यातील पेमगड या ठिकाणी ठेवले. आदिलशाहाकडून मुरारपंत आणि मातब्बर सरदार रणदुल्लाखान शहाजीच्या मदतीसाठी आले. आदिलशाहा व शहाजी एकत्र आलेले पाहून शहाजहानला चिंता वाटू लागली. या सुमारास आदिलशाहीच्या दरबारातच सुंदोपसुंदी सुरू झाली. खवासखान आणि मुस्तफाखान या दोन सरदारांमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यात खवासखानने आपल्या रक्षणासाठी उत्तरेतून शहाजहान बादशहाला बोलविले. जानेवारी १६३६ मध्ये शहाजहान नर्मदा ओलांडून दक्षिणेमध्ये आला. निजामशाही नष्ट करण्याचा त्याचा अंतस्थ हेतू होता. दक्षिणेत येताच त्याने कुतूबशहास सामोपचाराने आपल्याकडे वळविले. आदिलशाहाच्या १२ छत्रपती शिवाजी महाराज

वतीने रणदुल्लाखानाने मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पराभव झाला. अशाप्रकारे कुतूबशहा व आदिलशहा यांना नामोहरम करून शहाजहानने आपला मोहरा शहाजीकडे वळविला. ६ मे १६३६ रोजी शहाजहान व आदिलशहा यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण तह झाला. हा तह दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. या तहातील २ कलमे महत्त्वाची असून एका कलमाप्रमाणे आदिलशहा हा शहाजहानचा मांडलीक झाला. दुसऱ्या कलमाप्रमाणे निजामशाही खालसा करून ते राज्य मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घ्यावे असे ठरले. या तहामुळे शहाजीला आदिलशहाचा असलेला आधार तुटला. निजामशाही वाचविण्यासाठी आता दोन बलाढ्य शत्रूशी आपल्याला सामना द्यावा लागेल याची शहाजीला जाणीव झाली. ज्या रणदुल्लाखानाने शहाजीला मदत केली त्यालाच आदिलशहाने शहाजीविरुद्ध पाठविले. शहाजहानने खान झमान यास शहाजीविरुद्ध चालून जाण्यास सांगितले. अशा बिकट परिस्थितीतही निकराची झुंज देण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू केला. गनिमीकाव्याने लढण्यासाठी त्याने डोंगराळ प्रदेशाची निवड केली. प्रथम त्याने सिंहगड व राजगड या किल्ल्यांचा आश्रय घेतला. रणदुल्लाखान आणि खान झमान पाठलागावर होतेच. तेव्हा शहाजीने कोकणात उतरून माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. मुघलांनी माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिला. शहाजीने शर्थीची झुंज सुरू केली. परंतु निजामशाहीच्या वारसाच्या-मूर्तजाच्या-आईने शहाजहानशी तहाची बोलणी लावल्यामुळे अखेर शहाजीला शरण जाणे भाग पडले. ऑक्टोबर १६३६ मध्ये शहाजहानने माहुलीचा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला आणि आदिलशहाची चाकरी पत्करून तो कर्नाटकाकडे निघून गेला. या घटनेबरोबर निजामशाहीचाही अंत झाला. शहाजीचे कार्य कर्नाटकाकडे जाण्यापूर्वी शहाजीने आपल्या पुणे जहागिरीची व्यवस्था लावली. दादाजी कोंडदेव यास कारभारी नेमले. जिजाबाई व बालशिवाजी यांना पुणे जहागिरीतच ठेवले. आदिलशहाने कर्नाटकातील छोट्या मोठ्या हिंदू राजवटींवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची कामगिरी शहाजीवर सोपविली होती. शहाजीने या लहान मोठ्या राजवटींवर आपले वर्चस्व निर्माण केले, त्यांच्याकडून खंडण्या वसुल केल्या. परंतु एकही राज्य खालसा केले नाही त्यामुळे महंमद आदिलशहास शहाजीचा वारंवार संशय येत होता. शिवभारतकाराने असे म्हटले शहाजीची कामगिरी १३

आहे की, 'कर्नाटकातील हे छोटे मोठे राजे माझ्या ऐवजी शहाजीलाच मोठे मानतात अशी खंत आदिलशहाला वाटत होती.' शिवाजीने स्वराज्य कार्य सुरू केल्यावर त्याला प्रतिबंध करण्यासाठी आदिलशहाने जुलै १६४८ मध्ये शहाजीला कैद केले. शिवाजीकडून सिंहगडचा किल्ला परत मिळाल्यावर शहाजीची सुटका करण्यात आली. यावेळी त्याने आपल्याबरोबर असलेल्या कान्होजी जेधे या देशमुखास शिवाजीच्या सहकार्यासाठी जावे असे सांगितले. सुटका झाल्यानंतर शहाजी पुन्हा कर्नाटकात येऊन आदिलशहाच्या वतीने कारभार पाहू लागला. जरी आदिलशहाला शहाजीचा वारंवार संशय येत असला तरी तो शहाजीला वचकून होता. शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराचे प्रयत्न चालू असतांना शहाजीची त्याला आतून मदत होत होती का? असा एक प्रश्न इतिहासात निर्माण होतो. जरी शिवाजीला प्रत्यक्ष मदत शहाजीने केल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नसला तरी शिवाजीच्या कार्यात त्याने कधीही अडथळे आणले नाहीत ही गोष्ट लक्षणीय मानली पाहिजे. इ. स. १६६१ मध्ये दक्षिणेतील हिंदू नायकांना एकत्रित करून उठाव करण्याचा प्रयत्न शहाजीने केला असावा हे डच कागदपत्रांवरून सिद्ध होते. या कटाच्या संशयावरून आदिलशहाने शहाजीस पुन्हा कैद केले होते. पण जुलै १६६३ मध्ये त्याची परत सुटका केली. त्यानंतर केवळ ५-६ महिन्यातच कर्नाटकातील होद्देगिरी याठिकाणी शिकारीला जात असतांना घोड्यावरून पडून २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीच्या मृत्यू झाला. शहाजीच्या कार्याचे मूल्यमापन अनेक इतिहासकारांनी केले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी तर स्वराज्य स्थापनेची मूळ कल्पना व योजना शहाजीचीच होती असा निष्कर्ष काढला. बहुतेक इतिहासकार शहाजीचे कार्य शिवाजीला पुरक ठरले असा निष्कर्ष काढतात. राजवाडे म्हणतात, "शिवाजीचा पूर्वावतार जो शहाजी त्याच्या कर्तबगारीवर शहाजीचा पश्चादवतार जो शिवाजी त्याने आपल्या कर्तबगारीची इमारत उठविली.” (राधा माधव विलास चंपू, पृष्ठ ३६.) शहाजीच्या चरित्राचे साक्षेपी अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शहाजी हा स्वतंत्र बाण्याचा आणि स्वाभिमानी वृत्तीचा पुरुष होता. इतिहासाचार्य राजवाडे लिहितात, 'मूळ धन्याचे मांडलिकत्व पत्करिता पत्करिता ते प्रसंगी झुगारून स्वराज्य स्थापण्याचा प्रकारही असाच स्वामिद्रोहाच्या आरोपास पात्र होता. कर्नाटकांतील स्वराज्य स्थापनेतील हे गौणत्व शहाजी जाणून होता. करतां, मिंधेपणाचा गंध हि ज्या स्थापनेत आढळून येणार नाही, असे स्वराज्य दादाजी कोंडदेव, जिजाबाई व शिवाजी यांच्या द्वारा शहाजीने चौथ्यानदा १४ छत्रपती शिवाजी महाराज

स्थापिण्याचा उद्योग बंगळूराहून पुणे प्रांती करविला. निजामशाही टिकविण्यासाठी शहाजहानविरूद्ध त्याने जो लढा दिला त्यावरून त्याच्या स्वतंत्र आणि स्वाभिमानी वृत्तीची कल्पना येते. त्याने जे डावपेच खेळून मुघलांविरूद्ध लढा दिला ते डावपेच शिवाजीला स्वराज्यकार्यात मार्गदर्शक ठरले यात काही शंका नाही.' □□□ शहाजीची कामगिरी १५

३. शिवरायाचा उदय शिवाजीचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी - शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला. जेधे शकावलीत म्हटल्याप्रमाणे 'शके १५५१ शुक्ल संवत्सरे फालगुण वद्य तृतीया शुक्रवार नक्षत्र हस्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ ये दिवशी शिवाजी राजे शिवनेरीस उपजले.' शिवरायाचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. इ.स. १६३० मध्ये दक्षिण भारतात एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होता की, या दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरशः होरपळून निघत होती. गावेच्या गावे ओस पडली होती. अन्न काय पण पाणी मिळणेसुद्धा मुश्किल झाले होते. या विदारक दुष्काळाची वर्णने समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत. जनता हवालदिल झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथींच्या रोगांचा फैलाव सर्वदूर झाला. लोक मेटाकुटीला आले, अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती. इ.स. १६३० चे सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरू झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपले अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांचा प्रभाव तेथेही वाढू लागला होता. अशा परिस्थितीत १६३६मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशाहाशी सख्य जुळवून आदिलशहाबरोबर तह करून निजामशाही विरूद्ध लढा उभारला. शहाजीने निजामशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला तथापि १६३६च्या अखेरीस शहाजीला शरणागती पत्करणे भाग पडले. शहाजहानने निजामशाही खालसा केली आणि तो प्रदेश मुघल व आदिलशहा यांच्यामध्ये १६

वाटून देण्यात आला. शहाजीने आदिलशाहीची नोकरी पत्करली आणि तो कर्नाटकात निघून गेला. पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी शहाजीने दादोजी कोंडदेव याची नेमणूक केली. या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण हे परगणे मोडत होते. शहाजी जरी कर्नाटकात गेला तरी जिजाबाई व बालशिवाजी यांचे वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरच होते. समकालीन साधनांवरून अशी माहिती मिळते की इ.स. १६४१च्या सुमारास शिवाजी आणि जिजाबाई बंगलोरला शहाजीकडे गेले. बंगलोरहून परत येताना शहाजीने शामराज निळकंठ याची शिवाजीचा पेशवा म्हणून नेमणूक केली. याशिवाय माणकोजी दहातोंडे, सरनोबत बाळकृष्णपंत दीक्षित याला मुजुमदार म्हणून नेमले. शिवाय सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनाही शिवाजीच्या दिमतीस दिले. अशाप्रकारे हा सरंजाम घेऊन शिवाजी जिजाबाई व दादोजीपंत पुण्यास परतले अशा आशयाची माहिती सभासदाने आपल्या बखरीत दिलेली आहे. शिवाजीचे शिक्षण · क्षत्रियाच्या मुलास आवश्यक ते शिक्षण शिवाजीस स्वाभाविकपणे मिळाले. अश्वारोहण, दांडपट्टा, तलवारीचे हात, नेमबाजी इ. क्षात्रशिक्षण शिवाजीस बालपणी मिळाले. परंतु शिवाजीस लिहिण्यावाचण्याचे शिक्षण मिळाले होते का? असा एक प्रश्न अनेक इतिहासकारांनी उपस्थित केलेला आढळतो. आद्य इतिहासकार, ग्रँट डफ याने शिवाजीला अक्षरज्ञान नव्हते असे म्हटले आहे. ख्यातनाम इतिहासकार, यदुनाथ सरकार शिवाजी हा अकबर, हैदरअली, रणजित सिंह यांच्याप्रमाणे निरक्षर होता असे मत व्यक्त केलेले आहे. शिवाजीच्या हस्ताक्षराचा कागद प्रत्यक्षात सापडलेला नसला तरी शिवाजीला निरक्षर ठरविणे अन्यायकारक आहे. कारण शिवाजीला लिहितावाचता येत होते हे अप्रत्यक्षपणे सिद्ध करण्यास काही समकालीन पुरावेसुद्धा सापडतात. फॅक्टरी रेकॉर्डमध्ये शिवाजीला अक्षरज्ञान चांगले होते याविषयी खात्री देणारे पुरावे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीचे वडील शहाजी आणि पुत्र संभाजी हे दोघेही संस्कृत भाषेचे जाणकार होते. स्वतः शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोश’, ‘करण कौस्तुभ’ यासारखे संस्कृत ग्रंथ विद्वानांकडून लिहून घेतले. शिवभारतकार परमानंद हा तर प्रत्यक्ष शिवाजीच्या दरबारात होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवाजीला निरक्षर ठरविणे हे निश्चितपणे अन्यायकारक आहे. शिवभारतामध्ये शिवाजी लिपीग्रहणयोग्य वयाचा झाल्यावर शहाजीने त्याला गुरूंच्या स्वाधीन केले असा उल्लेख आलेला आहे. शिवभारतातील नवव्या अध्यायातील शिवरायाचा उदय १७

उल्लेखावरून शिवाजी साक्षर होता हे स्पष्ट होते. ९१ कलमी बखरीमध्ये शहाजीच्या आज्ञेप्रमाणे दादोजी कोंडदेवाने चिरंजीवास म्हणजे शिवाजीस शहाणे केले असा उल्लेख आहे. हा एकच पुरावा शिवाजीच्या साक्षरतेची खात्री पटविण्यास पुरेसा आहे. बारा मावळांवर प्रभुत्व इ. स. १६४०-४१ मध्ये शिवाजी आणि जिजाबाई शहाजीच्या बोलावण्यावरून बंगलोरला गेले होते. तेथेच निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्याशी शिवाजीचा विवाह झाला. त्यानंतर इ.स. १६४२ मध्ये जिजाबाई व शिवाजी पुण्यास परतले. वर सांगितल्याप्रमाणे त्यांचेबरोबर शामराज निळकंठ, सोनोपंत डबीर वगैरे मंडळी तैनातीसाठी होते. पुण्यास आल्यानंतर शिवाजीच्या कर्तृत्वाला प्रारंभ झाला. या सुमारास शिवाजीचे वय केवळ १२ वर्षांचे होते. दादोजी कोंडदेवच्या अनुभवाचा लाभ घेऊन या १२ वर्षांच्या मुलाने पुण्याच्या परिसरातील १२ मावळे आपल्या वर्चस्वाखाली आणले. सभासदाने असे म्हटले आहे की ‘पुण्यास येताच शिवाजीने १२ मावळे जिंकले’. वास्तविक पाहता हा १२ मावळांचा प्रदेश शहाजीच्या मूळ जहागिरीमध्ये नव्हता. शहाजी महाराजांच्या जहागिरीत इंदापूर, पुणे, सुपे व चाकण एवढे चार परागणे होते. हा मुलूख म्हणजे आजचे इंदापूर, भीमथडी, दौंड, पुरंदर, हवेली हे तालुके आणि भीमेच्या दक्षिणेकडील खेड तालुक्याचा पूर्वभाग यातला मुलूख. शहाजीच्या जहागिरीच्या मावळत्या बाजूस डोंगराळ प्रदेश होता. आजचे मुळशी, वेल्हे आणि भोर हे पुणे जिल्ह्यातील तालुके व वाई हा सातारा जिल्ह्यातील प्रदेश शहाजीच्या मूळच्या जहागिरीत नव्हते. परंतु दादोजी कोंडदेवच्या सुभेदारीमध्ये होते. हा प्रदेश मावळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. त्यातील बारा मावळे म्हणजे अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कोरबारसे मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, गुंजण मावळे, कानद खोरे, वेळवंड खोरे, हिरडस मावळ व रोहिड खोरे. दादोजी कोंडदेव सुभेदार या नात्याने मावळ प्रदेशाची व्यवस्था पहात असत. दादोजीने शेतकऱ्यांना अभयदान दिले. लावणी-संचणीची उत्कृष्ट व्यवस्था केली. चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. मावळ भागातील देशमुखाशी ममतेने वागून त्यांना आपलेसे केले. तसेच बंडखोरी करणाऱ्या देशमुखांना कडक शासने केली. अशाप्रकारे मावळ प्रदेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे आणि सर्वसामान्य जनतेला संरक्षण देण्याचे कार्य दादोजी कोंडदेवने केले. या काळात बाल शिवाजी दादोजी बरोबर मावळच्या दुर्गम १८ छत्रपती शिवाजी महाराज

डोंगराळ प्रदेशात फिरत होता. या परिसराची अचूक माहिती या काळातच शिवाजीला झालीय. स्वराज्य कार्यास प्रारंभ १७ एप्रिल १६४५ रोजी शिवाजीने दादोजी नरसप्रभू देशपांडे यास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रात “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे” असा स्पष्ट उल्लेख असून या पत्रातच हिंदवी स्वराज्य हाही शब्द आलेला आहे. परंतु राजवाड्यासारखे इतिहासकार हे पत्रच संशयास्पद किंवा बनावट मानतात. शिवाय शिवाजीच्या दुसऱ्या कोणत्याही पत्रामध्ये हिंदवी स्वराज्य हा शब्द आलेला नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित १६४५ पासून शिवाजीच्या मनात स्वतंत्र राज्याची कल्पना आकार घेऊ लागली होती. २८ जानेवारी १६४६ या तारखेचे शिवाजीचे न्यायनिवाडाविषयक एक पत्र उपलब्ध असून ह्या पत्राच्या शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते. प्रतिपच्चंद लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥ शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ॥ पत्राच्या अखेरीस 'मर्यादेयं विराजते' ही दुसरी मुद्रा दिसून येते. शिवाजीची उपरोक्त मुद्रा म्हणजे त्याच्या स्वराज्य कार्याचा प्रारंभ झाल्याची साक्ष आहे. अस्सल पुराव्यांची छाननी केल्यास १६४७ पासून शिवाजीने स्वराज्यकार्य द्रुतगतीने सुरू केलेले आढळते. ७ मार्च १६४७ रोजी दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहाजीच्या जहागिरीची संपूर्ण जबाबदारी शिवाजीवर आली. स्वतंत्र वृत्तीच्या शिवाजीने स्वराज्य स्थापण्याचा धाडशी उद्योग हाती घेऊन आदिलशहासारख्या शत्रूंना आश्चर्यचकीत केले. १६४७ मध्ये तोरणा आणि राजगड हे दोन किल्ले शिवाजीने ताब्यात घेतले. १६४७ च्या दिवाळीत पुरंदरचा किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला. याचवर्षी पुण्याचा हवालदार आणि सिंहगडचा किल्लेदार यांच्याशी स्नेह जोडून शिवाजीने कोंढाणा उर्फ सिंहगड हा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला. अशाप्रकारे केवळ एका वर्षात तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड हे चार महत्त्वाचे किल्ले शिवाजीने ताब्यात घेतले. शिवाजीचे किल्ले घेण्याचे धोरण आदिलशहास मोठे भयप्रद वाटले. शिवाजीच्या या हालचालीला शहाजीची फूस आहे असा संशयही आदिलशहाला आला. तेव्हा आदिलशहाने मुस्ताफा खान व बाजी घोरपडे यांना कर्नाटकात शिवरायांचा उदय १९

पाठवून शहाजीला कैद केले. आणि त्यानंतर अफजलखानाने शहाजीला पायात बेड्या घालून विजापूरला आणले. शहाजीला पकडल्यानंतर आदिलशहाने शिवाजीविरुद्ध फत्तेखान या सरदारास पाठविले. शिवाजी पुरंदरच्या किल्ल्यावर असल्याचे समजताच फत्तेखानाने पुरंदरला वेढा घातला. पण शिवाजीच्या मावळ्यांनी असा प्रखर प्रतिकार केला की फत्तेखानाला पळून जावे लागले. आदिलशहाने शहाजीचा थोरला पुत्र संभाजी याचेविरुद्धही फऱ्हादखान आणि तानाजी दुरे यांना पाठविले होते. पण हे दोघेही अपयश पदरात घेऊन परत आले. या पराभवामुळे आदिलशहा अधिकच संतप्त झाला. शहाजीला किती दिवस अटकेत ठेवावे हा प्रश्नही आदिलशहापुढे होता. कारण आदिलशाहीतील मराठा सरदारांमध्ये असंतोष वाढू लागला होता. तेव्हा शहाजीची सुटका करण्यासाठी शिवाजी व संभाजी यांच्यावर दडपण आणून महत्त्वाचे किल्ले परत मिळवावेत आणि आपली प्रतिष्ठा सांभाळावी असा विचार आदिलशहाने केला. त्याप्रमाणे कोंढाणा, बंगळूर व कंदर्पी हे ३ किल्ले शिवाजी आणि संभाजी यांनी आपल्या ताब्यात द्यावेत म्हणजे शहाजीची सुटका करण्यात येईल अशी अट त्याने घातली. हे ३ किल्ले ताब्यात घेतल्यावर शिवाजी आणि शहाजी या दोघांच्याही हालचालीवर नियंत्रण करता येईल अशी आदिलशहाची अटकळ होती. शहाजीची सुटका महत्त्वपूर्ण असल्यामुळे शिवाजी आणि संभाजीने हे तीनही किल्ले आदिलशहास दिले. त्यानंतर आदिलशहाने शहाजीची सुटका केली. सुटकेनंतर कर्नाटकात येऊन शहाजीने पुन्हा आपला दबदबा निर्माण केला. शिवाजी महाराजांनाही कोंढाणा गेल्याचे विशेष दुःख झाले नाही. कारण पुरंदरसारखा महत्त्वाचा किल्ला अद्याप शिवाजीच्या ताब्यात होता. तूर्त आदिलशहाच्या वाटेस न जाता जनतेवर जुलूम करणाऱ्या उन्मत्त मराठा सरदारांना वठणीवर आणण्याचे धोरण शिवाजीने स्विकारले आणि त्याप्रमाणे आपला मोहरा जावळीच्या चंद्रराव मोऱ्याकडे वळविला. २० छत्रपती शिवाजी महाराज

४. स्वराज्याचा विस्तार जावळीचे चंद्रराव मोरे जावळीच्या प्रदेशावर सरदार मोरे यांचा अंमल होता. या मोरे घराण्यातील पुरुषांना चंद्रराव हा पिढीजात किताब होता. शिवाजीने स्वराज्यकार्यास प्रारंभ केला, त्या सुमारास जावळीवर दौलतराव मोरे (चंद्रराव) यांचा अंमल होता. या दौलतरावच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न निर्माण झाला. कारण दौलतराव निपुत्रीक होता. तेव्हा त्याच्या पत्नीने शिवथरकर मोऱ्यांपैकी यशवंतराव यास दत्तक घेऊन त्याला जावळीच्या जहांगिरीची सूत्रे दिली. विशेष म्हणजे या यशवंतरावास शिवाजीने पाठिंबा देऊन आपला प्रभाव जावळी प्रदेशात वाढविण्यास सुरुवात केली. मोरे घराण्यातील काही पुरुष यशवंतरावविरुद्ध बंड करून उठले. त्यामुळे जावळी प्रदेशात एक नवा संघर्ष सुरू झाला. या सुमारास अफजलखान हा वाईचा सुभेदार होता. शिवाजीच्या हालचाली ओळखून खानाने यशवंतरावाची जहागिरी हिसकावून घेण्याचा घाट घातला. परंतु स्वतः यशवंतराव धूर्त असल्यामुळे तो स्वतः आदिलशहाशी अत्यंत नम्रतेने व लीनतेने वागत होता. त्यामुळे खानाला त्याचेविरुद्ध कारवाई करणे अशक्यप्राय वाटू लागले. त्यात आदिलशहाने १६५५ मध्ये अफजलखानाला कर्नाटकाच्या कामगिरीवर पाठविले. आदिलशहाची मर्जी संपादन करण्यासाठी यशवंतराव मोरे शिवाजीच्या प्रदेशावर लहानसहान हल्ले करू लागला. शिवाजीचे सहकारी सिलिंबकर देशमुख यांच्याशी गुंजणमावळच्या देशमुखीवरून यशवंतरावाने भांडण उकरून काढले. सर्वात चीड आणण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवाजीच्या जहागिरीतील गुन्हेगारांना आश्रय देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. मोसे खोऱ्यातील रंगो त्रिमल या गावकुलकर्ण्याने अनैतिक कृत्य केले होते. त्याला पकडून शिक्षा करण्याची शिवाजीची इच्छा होती. या रंगो त्रिमलला यशवंतरावाने आश्रय दिला. तेव्हा जावळीच्या या उन्मत्त जहागिरदाराला शासन करण्याचे शिवाजीने ठरविले. २१

जावळी प्रदेशावर एकाचवेळी चारी बाजूने हल्ला करण्याची योजना शिवाजीने आखली. त्यासाठी बांदल, सिलिंबकर देशमुख आणि संभाजी कावजी हा महालकरी यांची नेमणूक शिवाजीने केली. ठरल्याप्रमाणे शिवाजीच्या मावळ्यांनी एकाचवेळी चारी बाजूंनी जावळी प्रदेशावर हल्ला केला. यशवंतराव मोरे आपली दोन मुले बाजी व कृष्णाजी यांच्यासह रायगडकडे पळून गेला. जानेवारी १६५६ मध्ये शिवाजीने जावळीचा मुलूख ताब्यात घेतला. शिवाजीचे सैन्य यशवंतरावाचा पाठलाग करीत रायगडापर्यंत गेले. मोऱ्यांनी हा किल्ला ३ महिने लढविला, पण शेवटी शिवाजीला शरण गेला आणि रायगडचा किल्ला त्याने मे इ.स.१६५६ मध्ये शिवाजीच्या ताब्यात दिला. जावळीच्या मोऱ्यांचे प्रकरण येथेच थांबावयास हवे होते. परंतु यशवंतरावाने शिवाजीविरुद्ध कारवाया चालू ठेवल्या. त्याचा राग येऊन शिवाजीने २७ ऑगस्ट इ.स.१६५६ रोजी यशवंतरावास ठार मारले आणि जावळी खोऱ्यावर आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. जावळी विजयामुळे शिवाजीच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशाचा मोठा विस्तार झाला. जावळीवर विजय मिळवून कोंडेनळीचा घाट, ढवळा घाट, सापळखिंड, हातलोटचा घाट, पार घाट इ. महत्त्वाच्या घाटांवर आणि खिंडीवर शिवाजीने प्रभुत्व संपादन केले. याशिवाय रायगडसारखा बुलंद किल्ला शिवाजीच्या ताब्यात आला. केवळ प्रदेश जिंकून घेणे आणि सत्ता वाढविणे एवढेच शिवाजीचे धोरण नव्हते. आपल्या स्वामित्वाखाली आलेल्या नव्या प्रदेशातील लोकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहाणे हाही शिवाजीचा उदात्त हेतू होता. सभासदाने आपल्या बखरीत म्हटले आहे की, 'जावळी सर केली. मावळे लोकांस कौल देऊन संचणी केली. प्रतापगड म्हणून नवाच वसविला.' या प्रतापगडावर शिवाजीने तुळजा भवानीचे मंदिर बांधले. जावळीचा विजय हा शिवाजीच्या आयुष्यातील मोठा विजय म्हणावा लागेल. कारण या विजयामुळे शिवाजीच्या मूळ लहान जहागिरीचा मोठा विस्तार झाला आणि स्वतंत्र राज्य स्थापनास अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली. या विजयामुळे शिवाजीचा आत्मविश्वास वाढला. जुलमी आणि उन्मत्त जहागिरदारांवर वचक निर्माण झाला. त्याचप्रमाणे शिवाजीस आपली ताकद आजमाविता आली. आदिलशहालाही शिवाजीचे वाढते बळ पाहून मोठी चिंता वाटू लागली. विशेष म्हणजे जावळीचा प्रदेश ताब्यात आल्यामुळे घाटमाथ्याप्रमाणे कोकणपट्टीचा काही प्रदेश शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाला आणि त्याच्या राज्याची हद्द २२ छत्रपती शिवाजी महाराज

थेट समुद्रापर्यंत जाऊन भिडली. त्यामुळे पश्चिमकिनाऱ्यावर सत्ता गाजविणाऱ्या जंजिऱ्याचे सिद्दी आणि गोव्याचे पोर्तुगीज यांनाही शिवाजीच्या सामर्थ्याचा धाक वाटू लागला. इंग्रज, फ्रेंच आणि डच या पाश्चात्य व्यापाऱ्यांच्या वखारीही पश्चिम किनाऱ्यावरील मोक्याच्या बंदरातून होत्या. हे पाश्चात्य व्यापारी शिवाजीचे वाढते सामर्थ्य पाहून सावध झाले. अशाप्रकारे जावळी विजयामुळे शिवाजीचा दरारा महाराष्ट्राच्या देश आणि कोकण या दोन्ही भागात निर्माण झाला. शत्रूला आपल्या पराक्रमाने आश्चर्यचकीत करून त्यांना नामोहरम करावयाचे आणि जोपर्यंत तो बेसावध आहे तोपर्यंत त्याच्या प्रदेशात जास्तीत जास्त घुसखोरी करावयाची हे शिवाजीच्या डावपेचाचे मुख्य सूत्र होते. त्या सूत्राप्रमाणे जावळी ताब्यात आल्यावर फार वेळ न दवडता ९ सप्टेंबर १६५६ रोजी संभाजी मोहिते यांचेकडून शिवाजीने वडिलोपार्जित सुपे परगणा ताब्यात घेतला. त्यामुळे आदिलशहाप्रमाणे मुघल सत्ताधिशालाही शिवाजीची दहशत वाटू लागली. शिवाजी एकामागून एक नेत्रदिपक विजय मिळवत होता. या काळात विजापूरचा सुलतान महंमद आदिलशहा हा असाध्य रोगाने आजारी होता. विजापूरच्या दरबारात बचबचपूरी माजली होती. या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन शिवाजीने कर्नाटक प्रदेशात आक्रमण सुरु केले. नोव्हेंबर १६५६ मध्ये महंमद आदिलशहा मृत्यू पावला त्यावेळी शिवाजी कर्नाटक स्वारीवर होता. विजापूरच्या नव्या सुलतानाने अली आदिलशहाने शिवाजीच्या हालचालींना कर्नाटकात पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. तरीपण १६५९ पर्यंत शिवाजीने कर्नाटकावर लहानमोठ्या स्वाऱ्या केल्या या सुमारास दिल्लीचा बादशहा शहाजहान यांचा मुलगा औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. शिवाजीचा आणि त्याचा प्रत्यक्ष संघर्ष झाला नाही. पण ज्यावेळी औरंगजेबाने बिदर आणि कल्याणी या आदिलशाही प्रदेशावर हल्ले केले त्यावेळी जुन्नर या मुघलांच्या महत्त्वाच्या केंद्रावर हल्ला करुन शिवाजीने औरंगजेबाला चकीत केले. शिवाजी वाढते वर्चस्व महागात पडेल हे लक्षात घेऊन औरंगजेबाने शिवाजी विरुद्ध सरदार पाठविले. त्याचबरोबर विजापूरच्या आदिलशहाला शिवाजीच्या हालचालींना पायबंद घालण्याचा इशारा त्याने दिला. अशा परिस्थितीत औरंगजेबालाच शिवाजीबरोबर वरकरणी सलोखा प्रस्थापित करावा लागला. कारण शहाजहान बादशहा आजारी असल्याची वार्ता कळल्यावर औरंगजेबाने आपले दक्षिणेतील राजकारण तात्पुरते स्थगीत केले आणि दिल्लीकडे प्रयाण केले. दिल्लीला येताच कुटील डावपेच खेळून शहाजहान बादशहाला त्याने नजरकैदेत ठेवले आणि ५ जून १६५९ रोजी स्वतःला मुघल बादशहा म्हणून जाहीर करून घेतले. स्वराज्याचा विस्तार २३

शिवाजीने सोनोपंत वकीलास औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीस पाठविले. औरंगजेबाने जुलै १६५९ मध्ये शिवाजीला मानाची वस्त्रे पाठविली. अशाप्रकारे शिवाजी आणि औरंगजेब यांच्यामध्ये वरकरणी सलोखा निर्माण झाला. परंतु शिवाजीने आपले आक्रमणाचे धोरण कायम ठेवून कोकणातील कल्याण-भिवंडीपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणला. तसेच माहुली व इतर काही किल्ले ताब्यात घेतले. शिवाजीचा दरारा वाढला कोकणामध्ये शिवाजीची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत याची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठविले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केल्याने लखम सावंताची परिस्थिती अधिकच बिकट झाली. या संकटाला तोंड देण्यासाठी त्याने ५ मार्च १६५९ रोजी शिवाजीशी तह केला आणि त्याचे मांडलिकत्व पत्करले. लखम सावंताला मदत करून शिवाजीने रुस्तुमजमापासून त्याचे रक्षण केले. कोकणातील शिवाजीचे वाढते वर्चस्व पाहून आदिलशहाच्या दरबारात खळबळ निर्माण झाली. शेवटी शिवाजीचा बंदोबस्तासाठी अफजलखान यास पाठविण्याचे विजापूर दरबारने निश्चित केले. अफझल प्रसंग विजापूर दरबारने अफझलखानाची शिवाजीवर हेतुपुरस्सर नेमणूक केली. त्याकाळात आदिलशहाच्या दरबारात जे काही मोजके नामवंत सरदार होते त्यामध्ये अफझलखानाचा क्रमांक वरचा होता. शिवाय अफझलखान हा प्रथमपासून शिवाजीचा द्वेष करीत होता. जावळीवर शिवाजीने वर्चस्व निर्माण केले ही गोष्ट खानाला अजिबात आवडली नाही. खान शिवाजीचाच नव्हे तर शहाजीचाही द्वेष करीत असे. शहाजीला कर्नाटकातून पायात बेड्या घालून विजापूरच्या दरबारात आणण्यामध्ये खानानेच पुढाकार घेतला होता. कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत शिवाजीचा भाऊ संभाजी हा मारला गेला, या घटनेलाही खानाची कारवाई कारणीभूत होती. अशाप्रकारे खान हा भोसले घराण्याचाच वैरी होता. म्हणूनच शिवाजीला पकडण्याचा विडा त्याने विजापूरच्या दरबारात उचलला. सभासदाने आपल्या बखरीत खानाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे, “शिवाजी काय, चढे घोडियानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो.” ‘तारिखे २४ छत्रपती शिवाजी महाराज

अली'चा कर्ता रुहूल्ला हा लिहितो की, “बादशहाने अफझलखानाला जातेवेळी सांगितले होते की, शिवाजीने वाटेल ते सांगितले तरी त्याचे बिलकुल न ऐकता त्याचा नाश करावा.” डच पत्रव्यवहारामध्येही शिवाजीचा नाश करण्यासाठीच विजापूर दरबाराने अफझलखानाची नेमणूक केली होती असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तारिखे अली, डच पत्रव्यवहार, आदिलशाही फर्मानि इ. साधनांच्या आधारे असे स्पष्ट दिसून येते की, खानाने शिवाजीचा नाश करावा म्हणून त्याची नेमणूक विजापूर दरबाराने केली होती. शिवाजीची सावधगिरी विजापूरहून निघताना अफझलखानाने शिवाजीच्या प्रदेशात दहशत निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले. त्याचप्रमाणे धर्मस्थळांना इजा करून शिवाजीला डिवचण्याचे क्षुद्र राजकारण त्याने केले. तुळजापूर, माणकेश्वर, करकंब, भोसे, पंढरपूर इ. धर्मक्षेत्रांना खानाने उपद्रव दिल्याचा उल्लेख अज्ञानदासाच्या पोवाड्यात आढळतो. तुळजापूर आणि पंढरपूर या दोन धर्मक्षेत्रांना खानाने उपद्रव दिल्याचा उल्लेख सभासदाने केला आहे. वाईकडे येताना फलटणजवळ मलवडी या ठिकाणी बजाजी निंबाळकर यास खानाने पकडले आणि हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. परंतु खानाच्या बरोबर असलेले मराठे सरदार नाईकजी राजेपांढरे यांच्या मध्यस्थीमुळे बजाजीची सुटका झाली. खानाच्या साऱ्या हालचाली शिवाजी अत्यंत सावधपणे पहात होता. आपल्या जनतेमध्ये दहशत निर्माण करून आणि धर्मस्थळांना उपद्रव देऊन खान आपल्याला अस्वस्थ आणि संतप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे हे शिवाजीने ओळखले. खानाची पावले ओळखून त्याचा प्रतिकार करण्यासाठी सावधगिरीचा मार्ग शिवाजीने स्वीकारला. १६५९ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी शिवाजीने जावळी खोऱ्यात आपला मुक्काम हलविला. लष्करी डावपेचाच्या दृष्टीकोनातून जावळीचा प्रदेश शिवाजीच्या दृष्टीने मोठा सोईचा होता. खानानेसुद्धा जावळीचा प्रदेशच शिवाजीची कोंडी करण्यास सोईचा आहे असाच विचार केलेला होता. कारण खानाने वाईची सुभेदारी केलेली होती. त्यामुळे जावळी भागातील दऱ्याखोऱ्यांची त्याला माहिती होती. सुभेदारी करीत असताना जावळी आणि वाई भागातील देशमुखांना खानाने आपल्या कब्जात आणले होते. शिवाय आदिलशहाच्या फर्मानाप्रमाणे या भागातील देशमुख खानाला मदत करतील अशी अपेक्षा होती. खानाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. स्वराज्याचा विस्तार २५