भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ५०७ शब्दार्थ व टीपा - गुज-गुह्य गोष्ट रहस्य, काज-कार्य, निर्भर-पूर्ण अर्थ - देवा, माझ्या अंत करणातील रहस्य तुम्ही जाणलेत व त्याप्रमाणे कार्य केलेत १ आम्ही जो जो वचने बोललो, ती ती तुम्ही काही खाली पडू दिली नाहीत तू आम्हां अनाथांची माउलीच आहेस २ माझ्यासारख्या याचकाची सर्व आशा पदरोनियासा, मायबापा, तुम्ही पुरविली ३ माझ्या मनातील सर्व शका येथा, तुम्ही दूर केल्यात भेदभावाची काही शंका होती, तीही तुम्ही उरू दिली नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मज तुमच्या कृपेने आता परिपूर्ण केले आहे मी आता तुझेच अपार असे गुणगान करीन ५ ११३२ उदार कृपाळ अनाथाचा नाथ । ऐकसी मात शरणागता ॥ १ ॥ सर्व भार माथा चालविसी त्याचा । अनुसरलीं वाचा काया मने ॥ २ ॥ पाचारिता उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावे ॥ ३ ॥ चालता ही पंथ सांभाळिसी वाटे । वारितील कांटे जडे हाने ॥ ४ ॥ तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा । तू त्याचा कोंवसा सर्वभावे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - मात-हकीगत कोंवसा-आश्रयाचे स्थान अर्थ - देवा, तू अतिशय उदार आहेस, कृपाळू असून अनाथांचा नाथ आहेस माझ्यासारख्या शरणागताची हकीगत तू ऐकत असतोस १ जे तुला कायावाचामनेकरून अनुसरतात, त्याचा सर्व भार तू आपल्या मस्तकावर वाहतोस २ त्यांनी तुला हाक मारिली की, तू जवळ येऊन उभा राहतोस त्यांना जे ज्या काळी हवे असेल, ते त्या काळी तू देतोस ३ ते तुझे भक्त रस्त्याने निघाले की तू त्यांचा सांभाळ करतोस, त्यांच्या पायांना वाटेतील काटे बोचू नयेत म्हणून ते तू आपल्या हातानी दूर करतोस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या दासाना कसलीही चिंता नसते कारण तू सर्वभावे त्याचा आश्रयदाताच आहेस त्याचे आश्रयस्थान तूच आहेस ५ ११३३ काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥ १ ॥ मज आता ऐसे नको करूं देवा । तुझा दास जावा वाया विण ॥ २ ॥ होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझ्या पायीं ॥ ३ ॥ अतरींचा भाव काय कळे लोका । एक मानी एका देखोवेखीं ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपत्ति गोड देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - जाणिवेचा-ज्ञानाचा देखोवेखीं-वरवरचा आतुडती-प्राप्त होतील, विपत्ती-दारिद्र्य अर्थ - देवा, मोठी कीर्ती, लौकिक लोकाकडून सन्मान, दंभ इत्यादींना घेऊन काय करू मी ? मला फक्त तुझे चरण दाखोव १ हा तुझा दास आता व्यर्थ जाईल असे देवा, आता मजविषयी काहीही करू नकोस २ मला या ज्ञानाचा फार मोठा भार उगाचच होऊन मी मात्र तुझ्या पायांना मुकेन, असे होऊ देऊ नकोस ३ अंतरगातील भाव काय लोकांना सहजासहजी समजतो की काय ? मानसन्मान हा एक दुसऱ्यास वरवरचाही दाखविता येतो ४ तुकाराम महाराज म्हणतात देवा, जर तुझे पाय प्राप्त होतील तर मग दरिद्रयासारखे सकटही मला गोड वाटेल ५ ११३४ मानाधवा जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं हे माझिया जीवा चाड ॥ १ ॥ तुझ्या पायासाठीं केली आराणूक । आना कांहीं एक नको दुजें ॥ २ ॥ करूनिया कृपा करीं अगीकार । न करीं उसीर आता देवा ॥ ३ ॥ नव्हे साच कांहीं कळो आले मना । म्हणोनि वासना आवरिली ॥ ४ ॥ तुका म्हणे आता मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥ ५ ॥

५०८ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - द्रव्यमाथा-संपत्तीचा साठा, धनाची जपणूक, आराणूक-विश्रांती, अगोकार-स्वीकार, साच-खरे अर्थ - जगामध्ये मानसन्मान हवा असेल तर जवळ काही धनाची जपणूक हवी संपत्ती जवळ असेल तरच मानसन्मान मिळेल आणि माझ्या मनात तर याची इच्छा बिलकुल नाही १ मी आजपर्यंत तुझ्याच पायाशी विश्रां- तीचे स्थान मिळविलेले आहे आता मला दुसरे काही एक नको २ देवा, माझ्यावर कृपा करून माझा स्वीकार करावा ना तुम्ही आता तुम्ही या बाबतीत उशीर लावू नये ३ देवा, तुमच्याशिवाय दुसरे काहीच खरे नाही, असे एक माझ्या मनास समजून आले आहे म्हणून मी आपली वासना आवरून धरलेली आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता माझी सर्व इच्छा कृपानिधी, परमेश्वरा तुम्ही पूर्ण करावी अशी प्रार्थना आहे ५ ११३५ आतां माझा सर्वभावे हा निर्धार । न करीं विचार आणिकासी ॥ १ ॥ सर्वभावे नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ २ ॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणी । पाहीन भरोनि डोळे मुख ॥ ३ ॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊ नेदी मनीं शंका कांहीं ॥ ४ ॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - जोडी-प्राप्ती, अंकित-स्वाधीन अर्थ - आता मी सर्व भावाने माझा एकच निश्चय केला आहे आता दुसऱ्या कोणत्याही साधनाचा विचार मी करणार नाही १ मोठ्या प्रेमाने व सर्व भावाने देवा, मी आता तुमच्याच नामाचे गान करीन व तुमचे पाय हीच माझी सर्वश्रेष्ठ प्राप्ती आहे असे समजेन २ देवा, मी तुझ्या अंगणात लोटांगण घालीन डोळे भरून मी तुझे मुख पाहीन ३ कसली लाज मनात न आणता देवा, मी तुझ्या भोवती नृत्य करीन मनात कसली शंका येऊ देणार नाही ४ देवा, मी तुमच्या स्वाधीन झालेला तुमचाच एक दास असून तुकाराम महाराज म्हणतात, हाच एक संकल्प माझ्या मनात नादत आहे ५ ११३६ जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा ॥ १ ॥ जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ २ ॥ पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणे । ही कोणाकारणे कवणे केलीं ॥ ३ ॥ आम्हा मरण नाश तू तव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥ ४ ॥ तुका म्हणे तूचि निवडीं हा गुढार । दाखवी साचार तेंचि मज ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :-जनीं-लोकांत, मात-हकीगत, गुढार-गूढ गोष्ट अर्थ -लोकात, किंवा या सबंध विश्वात एक परमेश्वर भरून राहिलेला आहे, अशी गोष्ट किंवा हकीगत ऐकतो खरी, परंतु ही काय परिस्थिती आहे हे मला समजत नाही १ तर तोच जर सर्वत्र असेल तर, जन्म घेतो कोण ? तो तर अमर आहे तर कोण मरतो ? तो तर अविनाशी आहे, तर नाना प्रकारच्या व्याधींनी व दुःखांनी कोण ग्रस्त झालेला असतो ? नाना प्रकारचे भोग भोगणारा तरी कोण असतो? २ तोच जर सर्वत्र वस्ती करून आहे तर मग पापपुण्य, शुद्धाशुद्ध आचरण ही मग कुणासाठी कुणी केली आहेत ? ३ आम्हा सर्वांना मरण व नाश आहे, व तू मात्र अविनाशी आहेस यावर विश्वास ठेवून मी ते खरे कसे मानू देवा ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या गूढ गोष्टीचा निवाडा तूच कर काय खरे असेल ते मला निवडून दाखीव ५ ११३७ यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥ १ ॥ चोरा धरिता सांगे बुठोण्याचे नाव । दोघांचे ही पाव हात जाती ॥ २ ॥ तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा ५०९ शब्दार्थ व टीपा :-पथार्थ-खरे, अधोर-घोर नर्क, कुठोन्याचे-कोठारीचे, मालकाचे. अर्थ :-नीट खरे असेल ते यथार्थपणे न सांगता उगाच लोकांना आवडतील अशा थायफळ गोष्टी सांगतील ते महा भयानक अशा नर्कास जातील. १ एखाद्या चोराला धरल्यास तो आपल्याच मालकाचे किंवा प्रमुखाचे नाव सांगतो, मग दोघांनाही बंदिवासाची शिक्षा भोगावी लागते. २ तुकाराम महाराज म्हणतात, असा निवाडा पुराणां- नीच केलेला आहे. ही काही केवळ माझीच अशी धडपड नाही. ३ ११३८ धीर तो कारण साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहो चिंता दासांसी ॥ १ ॥ सुखें करावें कीर्तन हर्षे गावे हरिचे गुण । वारी सुदर्शन आपणचि कळिकाळ ॥ २ ॥ जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥ ३ ॥ हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥४॥ शब्दार्थ व टीपा :-जडभारी-मोठे दुखणे, संकट, प्राकृत-साधारण, आहाच-उगाच. अर्थ :- या भक्तिमार्गात किंवा परमार्थविचारात जो धीर धरून वागतो, त्यासच नारायणाचे साह्य कार्य रूपाने होते. तो आपल्या दासांना कधीही शीण होऊ देत नाही, की दासांना चिंता करू देत नाही. १ त्याच्या भक्तांनी सुखात राहून कीर्तन करावे, मोठ्या आनंदाने परमेश्वराचे गुणगान गावे. मग तोच स्वतः आपल्या सुदर्शनाच्या साह्याने प्रत्यक्ष यमाचेही संकट दूर करितो. २ स्वतःच्या मुलावर काही मोठे संकट अथवा दुखणे जर कोसळले, तर त्यातून त्याला मुक्त करण्यासाठी त्याची आई जीव टाकते आणि हा दाता ईश्वर या सर्वसाधारण आई- सारखा नव्हे. तो आपल्या भक्ताची यापेक्षाही फार काळजी घेतो. ३ हे सर्व माझ्या अनुभवास आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व सत्यच आहे. माझे हे काही उगाच तुम्हांस सांगत आहे असे नाही. ४ ११३९ पुढें आतां कैचा जन्म । ऐसा धम वारेसा ॥ १ ॥ सर्वथाहि फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ २ ॥ पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥ ३ ॥ तुका म्हणे चुकती १ बापा । पुन्हा खेपा सकळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वारेसा-निवारण होईल असा. अर्थ :- जन्ममृत्यूच्या खेपाचा धम निवारण होईल, असा यापुढे आपणांस कोणता जन्म येईल. १ अशी सोय या मनुष्यजन्मात प्राप्त झालेली असल्यामुळे उगाच वणवण करीत फिरू नये. २ भवसागरातून तरून नेणारी या पांडुरंगासारखी नाव भक्तिभावामुळे आपणास आता प्राप्त झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हा या देवास मनोभावे शरण गेल्याने पुन: पुनः जन्मास येण्याचे संकट मग टळेल. ४ ११४० दूध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥ १ ॥ हेंच वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ २ ॥ लोहो फफ गारा अग्नीचिया काजें । येन्हवी तें ओझें कोण वाहे ॥ ३ ॥ तुका म्हणे सोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- घृतसार-तूप हे सार, लोहो-लोखंड, फफ-कापूस. अर्थ :- गाईम्हशींचे पालन कशासाठी करायचे असते ? त्यांच्यापासून दूध, दही, ताक वगैरे पदार्थ मिळतात म्हणूनच त्यांची जोपासना आपण करतो. कारण या सर्वांत तुपासारखा पदार्थ हे सारभूत तत्त्व आहे. १ याच तुपा- प्रमाणे हे वर्म श्रीहरीचे आमच्या हाती आलेले असल्यामुळे आम्ही आमच्या चित्तात या रामप्रभूस धारण केलेला १ चुकवी.

५१० सार्थ तुकारामगाथा आहे २ लोखंड, कापूस, गारगोटी याचे साह्य अग्नी निर्माण करण्यासाठी होत असते, म्हणूनच त्याचे ओझे वाग वायचे असते एरव्ही कोण त्याची पर्वा करतो ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, भूमिगत धन हातात येईपर्यंतच खोरी पहार वगैरे साधने जपून ठेवायची असतात ४ ११४१ वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥ १ ॥ करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ २ ॥ क्षमा दया शांति । बाण अभंग हे हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गाढे-शूर, कळिकाळ-यम अर्थ - या विठ्ठलाचे हे सेवक मोठे शूर असून प्रत्यक्ष यमही त्यांच्या पाया पडत असतो १ ते नेहमी या विठ्ठलाचाच जयजयकार करीत असतात, दोषांचे डोंगरच्या डोंगर त्यामुळे जळून जातात २ या वीर भक्तांच्या हातात दया, क्षमा शांती हेच अभंग, न तुटणारे असे बाण असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, या जगतात हे वीर भक्तच अतिशय बलवान म्हणून प्रसिद्ध आहेत ४ ११४२ ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजीं स्मराया ॥ १ ॥ मग कैंचे रे बंधन वाचे गाता नारायण । भवसिंधु तो जाण येचि तीरीं सरेल ॥ २ ॥ दास्य करील कळिकाळ बद १ तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धिसिद्धी म्हणियारी ॥ ३ ॥ सफळशास्त्रांचे सार हे वेदांचे गुह्यर । पाहाता विचार हाचि करिती पुराणे ॥ ४ ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥ ५ ॥ तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे । आणीक ही दैवे सुख घेती भाविके ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - तीरीं-काठावर बद-बंधन ह्मणियारीं-म्हणण्याप्रमाणे वागणाऱ्या, गुह्यर-रहस्य, मुख्य अर्थ अर्थ - लोकहो, तुम्ही आता स्वहिताच्या खुणा कोणत्या त्या नीट ऐका केवळ पंढरीचा राणा मनामध्ये स्मरा म्हणजे झाले १ या नारायणाचे गुणगान गाताना मग कसले आले आहे बंधन ? मग याच्या गुणगानामुळे संसारसागर याच तीरावर संपला, असे समजायला हरकत नाही २ कळिकाळ हा तुमचे दास्य करील माया जाळाचे बंधन सुटेल आणि सर्व रिद्धीसिद्धी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे वागणाऱ्या होतील ३ सर्व शास्त्रांचे व वेदांचे सार ते हेच रहस्य होय हाच मुख्य अर्थ होय पुराणांचाही विचार हाच आहे ४ वर सांगितलेल्या साधनाचा अधिकार सर्वांना आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, शूद्र, चांडाळ या सर्वांना या विठ्ठलाच्या नामाचा अधिकार आहे लहान मुले पुरुष स्त्रिया इतकेच नव्हे तर, वेश्यांनाही याचा अधिकार आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात आम्हास अनुभवाने ही सर्व माहिती झालेली आहे या सुखाचा अनुभव इतर जी भाविक व सुदैवी माणस आहेत ही घेतात ६ विवरण - भक्तीच्या क्षेत्रात कुणा कुणास अधिकार आहे याचा पुन पुन उच्चार तुकारामासारख संत करीत असतात ईश्वराच्या प्राप्तीसाठी केवळ उच्चवर्णीयांनाच अधिकार असे खालच्या वर्गास किंवा हीन जातीच्या लोकांना परमेश्वराचे दार युगानुयुगं कमठ लोकांनी जणू बद केल होत स्वयप्राप्तीसाठी अथवा मोक्षसाधनेसाठी वेदादी ग्रंथातून पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनाच अधिकार प्राप्त झालेल दिसतात सर्वसामान्यांचा शूद्र वर्ग व स्त्रिया यांना हे अधिकार परंपरेप्रमाणे नाहीत बृहदारनिषद वगैरे ग्रंथातून मैत्रेयी गार्गी वगैरे स्त्रियांची नावे असल्यामुळे हे बंधन नंतरच्या काळातील असावे १ वध

सार्थ तुकारामगाथा ५११ परंतु नंतर ही उणीव भरून काढण्याचा पहिला प्रयत्न गीतेमध्ये झाला. जातीचा, वर्णाचा, स्त्रीपुरुषादी भेदाचा किंवा इतर कसलाही फरक न करता सद्गती देणारा भगवद्भक्तीचा मार्ग सर्वांना सहज व सुलभ करून दिला तो या गीताप्रणीत भागवतधर्मानेच होय. 'स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्' असा निर्णय भगवद्गीतेने दिलेला आहे. स्त्रिया, वैश्य व शूद्र यांच्याबरोबर अन्त्यजादी पापयोनी याचाही उल्लेख आहे. याप्रमाणे समाजातील सर्व वर्णातील लोकांना मोक्षाचे द्वार खुले झाले होते. तोच नेमका आधार घेऊन भागवतधर्मीय संतांनी हा मार्ग सहज सुलभ करून सोडला. 'ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चांडाळा आहे अधिकार । याळें नारीनर आदि- करोनि वेश्यादि' असा त्याचा खुलासा तुकारामबुवांनी या अभंगात केलेला आहे. हिंदुधर्माप्रमाणे बौद्धधर्मांतही वेश्येसही या मार्गाची प्राप्ती सुगम झालेली दिसते. बुद्धाने आम्रपाली या वेश्येस व अंगुलीमाल नावाच्या चोरासही दीक्षा दिली असल्याची हकीगत सापडते. पिंगलादी वेश्याचा संदर्भ या ठिकाणी ध्यानात राहण्यासारखा आहे. कान्होपात्रा ही तर एका नायकिणीची मुलगी होती. आपल्या दुष्कृत्याबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप व ईश्वरावर संपूर्ण विश्वास, यामुळे मोक्षाची दारे सर्वांनाच या भक्तिमार्गामुळे खुली झाली ११८४ न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥ १ ॥ अविनाश सुख देईल निर्वाणीं । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥ २ ॥ आणिकियां जीवां होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥ ३ ॥ आहिच्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥ ४ ॥ तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- निर्वाणी-अखेरीस, आहिच्य-या लोकात, परत्र-परलोकात. अर्थ :- काही एक तळमळ न करिता तू आपले मन शांत व स्वस्थ करून तू आता स्थिर हो हा माझा स्वामी मोठा कृपाळू आहे. १ हा तुला अखेरीस अविनाशी असे प्रेमामृत देईल व त्यामुळे तुझ्या चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांच्या खेपा चुकतील. २ तुझ्या स्वतःच्या अशा उद्धारामुळे आणखीही पुष्कळ लोकांचा उद्धार होईल व तुझ्या हातून कोट्यवधी उपकार पडतील. ३ या लोकी व परलोकीही तुझी मान्यता वाढेल. यासाठी पण तू मुखाने राम राम असे शब्द म्हणत राहा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू या संसाराचा लोभ मान सोडून दे. तरच तुला परमावधीचा आनंद प्राप्त होईल. ५

दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखो जाणे ॥ ३ ॥ न लगे मागणें सांगणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥ ४ ॥ तुका म्हणे लेईं अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूंचि होसी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- निश्चळ-स्थिर. अर्थ :- एके ठिकाणीं तू स्थिर बसून त्या श्रीहरीचे ध्यान कर. तो तुला भरपूर अन्नवस्त्र देईल. १ आम्हांस अधिक वस्तूंचा संग्रह करून काय करायचेय ? आम्हांस सर्वकाही पुरविणारा देव आमचा ऋणी झाला आहे. २ हा देव मोठा दयाळू व ममताळू असल्याने त्याला आमचा कळवळा मोठाच आहे. शरण आलेल्याचे रक्षण कसे करावे हे तो चांगले जाणतो. ३ त्या देवास काही मागावे लागत नाही, सांगावे लागत नाही. कारण तो ज्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे पूर्ण करीत असतो. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू आपल्या वाणीवर या विठ्ठलाचाच अलंकार घाल. त्यामुळे या जगात तू स्वतःच विठ्ठल होऊन जाशील ५ ११४६ सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥ १ ॥ काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ २ ॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥ ३ ॥ तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कळस-भांडे, पात्र, सुरारस-दारूसारखे पेय, मृत्तिकेचा-मातीचा, सांट-साठा. अर्थ - चांगले सोन्याचे भांडे आहे; पण आत मात्र दारूसारखे पेय भरलेले आहे १ तुम्ही संतलोक मला सांगा त्या सुवर्णाच्या भांड्याच्या किंमतीचा व देखणेपणाचा काही उपयोग आहे का ? २ उलट मातीचेच वेडे- वाकडे मडके आहे परंतु आत मात्र अमृताचा साठा आहे. तोच महत्त्वाचा मानावा लागेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या दोहोंपैकी हित कशात आहे, ते मला तुम्हीच सांगा ४ शेतावर-अभंग ३. ११४७ सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥ १ ॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ २ ॥ जपतप नागरणी । न लगे आटी दुनवणी ॥ ३ ॥ कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥ ४ ॥ ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥ ५ ॥ योज न लगे सचिताचे । पीक पिकले ठायचें ॥ ६ ॥ नाही यमाचें चोरटें । विठ्ठल पागोन्याच्या नेटें ॥ ७ ॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग¹ तो पिसा ॥ ८ ॥ सराई सर्व काळ । वांयां न वने घटिकापळ ॥ ९ ॥ प्रेम पिकले अपार । नाहीं सांटवावया थार ॥ १० ॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥ ११ ॥ १ उद्योग

सार्थ तुकारामगाथा ५१३ शब्दार्थ व टीपा :- फुकटचें-फुकटचे, जेवा-अन्नखर्च, जाहाती-जूलूम, सरिक-भागीदार, वाटेकरी, पानीदार आटो-खटपट, श्रम, दुनवणी-पुनः नांगरणे, पाभार-शेतांत बीं पेरण्याचे आऊत, पागोऱ्याच्या-गोफणीमुळे. अर्थ :- अहो, या विठ्ठलरायाच्या नामरूपाचे शेत फुकटचे तुम्ही करावे १ येथे काही बिगारीच्या लोकांचा अन्नखर्च येत नाही, किंवा सरकारला साराही द्यावा लागत नाही. कुणाची हुकुमी जुलूमजबरदस्तीही येथे नाही या शेताच्या उत्पन्नात दुसरा कुणी भाडेकरीही नाही. तूच एक या सर्व शेताचा धनी आहेस. २ या शेतासाठी जप- तपादी साधनांची नांगरणी नको, पुन पुनः नांगरण्याची खटपट नको. ३ नानाविध कर्मांची कुळपणीही नको. कर्म व धर्म यांच्या कुळपणीची जरूरी नाही. ४ ज्ञानरूपी पाभारीची तिकळी नको. येथे योत्तुद्या पेरावे लागत नाही. ५ येथे संचित कर्माचे बी पेरले नाही तरी चालते. येथील नामरूपामक शेत मूळचेच पिकलेले आहे. ६ येथे विठ्ठल- नामाची गोफण सिद्ध असल्यामुळे यमरूपी चोरट्यांची भीती नाही येथे. ७ येथे पीक कधीच बुडणार नाही, हा विश्वास आहे; विनाकारण जो काळजीत करीत बसतो, तो वेडाच समजायला हवा. ८ येथे नेहमीच हंगामाचे रूप असते. येथील एक घटका किंवा पळही हंगामाखेरीज जात नाही. ९ या शेतात प्रेमाचे पीक अपरंपार आले असून, त्याचा साठा करायलासुद्धा जागा नाही. १० तुकाराम महाराज म्हणतात, अशा शेताला लाभ करून घ्यायला जो चुकला त्याच्या जगण्यालाही धिक्कार असो. ११ ११४८ वोणव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥ १ ॥ तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ २ ॥ चोरावरवें वाट । चालोनि केलें तळपट ॥ ३ ॥ डोळे झांकुनि राती । कूपीं पडे दिवसा जोती ॥ ४ ॥ पोसी वांज' गाय । तेथें कैंची दुध साय² ॥ ५ ॥ फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वोणव्या-खाली वाकून, सोंकरीं-राखण करणाराच्या, निदसुरा-मूर्ख, अर्धवट जागा असलेला, सांगडी-नाव अर्थ :- शेताकडे चांगले, भान वर करून लक्ष न देता, खाली वाकून जो शेताची राखण करीत असतो, त्याचे शेत कसे राखले जाणार ? ते पाखरांकडून खाल्ले जाणारच. १ याप्रमाणे मूर्ख माणसा, जागा राहून नुकसान करून घेऊ नकोस. २ चोरांच्या बरोबर वाटचाल करून उगाच आपले नुकसान का करून घेतोस ? ३ चांगला दिवसाचा प्रकाश असताना डोळे बांधून चालल्यामुळे विहिरीत पडण्याचे मात्र संकट उभे राहील. ४ वांझ गाय पोसून दुधाची साय कशी मिळणार ? ५ फुटक्या नावेच्या साह्याने तुकाराम महाराज म्हणतात, कोण पैलतीरास जाऊ शकणार ? ६ ११४९ सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोन । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥ १ ॥ सोंकरीं सोकरीं विसावा तोंवरीं । नको खाऊं उर्ने आहे तों ॥ २ ॥ गोफणेती गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटें । पळती हाहाकारें अर्वाचीं पांखरांचीं थाटें ॥ ३ ॥ पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान वळ बुद्धि व्हावी दोन्ही ॥ ४ ॥ खळे दानें विश्व सुख करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देई त्यासी ॥ ५ ॥ तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आले हातां मूस सांडिलें निकण ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुगी-हंगामास, कोन-कोपरे, थाटें-थवे १ वांझ, सीय. तु. गाथा . ६५

५१४ | सार्थ तुकारामगाथा

अर्थ - हे हरिनामाचे शेत चांगले हंगामाला आले आहे चारही कोपऱ्यांपर्यंत याची राखण करावी चांगले पीक आले असल्याने याची राखण मात्र नीट केली पाहिजे १ यासाठी या शेताचा नीट सांभाळ करावा पीक उभे आहे, तोपर्यंत काही विसावा घेता कामा नये २ गोफणीस या श्रीहरीच्या नावाचा धोंडा घालून जोराने फेका मग या नामाच्या गर्जनेने नाना विकाराच्या पाखराचे थवेच्या थवे उठून जातात ३ आगटी पेटवून तू जागा बदलून राहावेस एखादे संकट आले तर वळ व बुटी या दोघांचेही साह्य व्हावयास हवे ४ या शेतावरील, खळ्या- वरील धान्याचे दान करून सर्व जगास तू सुखी कर ज्याचा कर त्यास देऊन साराही चुकता कर ५ तुकाराम महाराज म्हणतात, यानंतर काही कार्य मग उरणार नाही कारण निजस्वरूपाचे सत्त्व हाताशी आल्यामुळे व्यर्थ असणारे भूस सांडून गेले तरी हरकत नाही ६

विवरण - तुकाराम महाराजांनी अनेक प्रसंगी जी रूपकात्मक रचना केली आहे, त्यात हे शेतावरील तीन अभंग प्रसिद्ध आहेत हे शेत म्हणजे विठ्ठलाच्या नामरूपाचे होय अथवा मानवी देहालाही शेताचीच उपमा देऊन त्याची नीट राखण करण्याविषयी उपदेश केला असतो पारमार्थिक दृष्टीनेच या शेतावरील रूपकात्मक अभंगाचा अर्थ लावता येण्यासारखा आहे गीतेच्या तेराव्या अध्यायातही या शरीरालाच क्षेत्र म्हणजे शेत म्हटले आहे या क्षेत्राचे म्हणजे पंचमहाभूतांच्या पासून झालेल्या शरीराचे रक्षण कसे व किती करावे, याविषयी यात विचार प्रामुख्याने येतो मनुष्याचा देह हे एक क्षेत्र असून याचा मालक कोण, याची निगा कशी राखावी, या संबंधीचा विचार प्रामुख्याने अध्यात्मशास्त्र करीत असते पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, दहा सूक्ष्म इंद्रिये, मन, पाच कर्मेंद्रिये, त्याचे पाच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुख, संघात, चेतना, धैर्य इत्यादी तत्त्वाचा समुदाय म्हणजे क्षेत्र, अशी व्याख्या गीतेने केलेली आहे या क्षेत्राचे विस्ताराने निरूपण श्रीज्ञानेश्वर महाराजांनी तेराव्या अध्यायाच्या प्रारंभीच केलेले आहे

तुकारामबुवांनी छान मराठमोळ्या भाषेत मराठी शेतकऱ्याचे रूपक या देहाच्या क्षेत्राचे वर्णन करण्यासाठी रंगविले आहे या परमार्थांमधील क्षेत्रावर, शेतावर कुणाला वेठीस धरून कामास जुपावे लागत नाही त्याच्या बन- खर्चाचा प्रश्न येथे नाही येथे बुजाला मारा द्यावा लागत नाही येथे कुणाची जुलूमजबरदस्ती नाही नांगरणी, कुळवणी, पाबार घेऊन पेरणी इत्यादी रूपकात्मक भाषेत त्यांनी या शेतावरील हंगामाचे वर्णन केले आहे खाली मान घालून जो शेती राखेल, त्याचे शेत पाखरे खाऊन जातील असा एक उल्लेख क्र ११४८ च्या अभंगात आहे या संदर्भात तुकारामबुवांनी एका शेतकऱ्याचे व्यावहारिक जगातील शेत कसे राखले, याची आठवण होण्यासारखी आहे या पाखरांपासून शेताचे रक्षण करण्याऐवजी शेतामुळेच, कणसातील दाण्यांमुळेच, पाखरांचे रक्षण झाल्याचे पाहून तुकोबा संतुष्ट झाल्याची एक कथा त्यांच्या चरित्रात आहेच अशा प्रकारे शेताची राखण करूनही तुकोबांचे शेत टपोऱ्या कणसांनी भरून गेलेले आहे, असाच या कथेचा शेवट आहे तरी सुद्धा या 'शेतावरील अभंगात' मात्र त्यांनी 'बोंबण्या सोंकरीं। सेत खादले पांखरीं' असाच इशारा दिलेला आहे

वर डोळे ठेवून, पाखरांकडे लक्ष न देता शेत राखता येणार नाही, असेच त्यांना सांगावयाचे आहे कारण हे शेत नामरूपादीचे अथवा या मानवी देहाचे असल्याने, व पुन पुन न लाभणारे असल्याने महत्त्वाचे आहे काम- क्रोधादी विकारांनी अथवा चोरांनी या शेताची लुबाडणूक करू नये, असाही भावार्थ या अभंगाचा असावा या मानव जन्मात प्राप्त झालेले हे शेत ईश्वरी कृपेने चांगले पिकवावे, चांगला हंगाम काढावा, व खळ्यावरील सर्व धान्य लोकांना देऊन आपण स्वतः तृप्त व्हावे, अशीच शिकवण शेतावरील या रूपकात्मक अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराजांनी दिलेली आहे

११५० नका घालू दूध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥ १ ॥ नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥ २ ॥ तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा ५१५ शब्दार्थ व टीपा - नेदा-देऊ नका, जीवन-पाणी, फोड-हौस अर्थ - तुम्हाला दूध जर कुणाला द्यावेसे वाटत नसेल तर देऊ नका कारण त्यात सर्व सारसर्वस्व असते पण दुसऱ्यावर ताकाचे तरी उपकार करावेत १ जर कुणाला अन्न देण्याची शक्ती तुमची नसेल तर नका देऊ, पण फुकटचे पाणी पाजायला काय हरकत आहे ? २ तुकाराम महाराज म्हणतात, मला देवाच्या सगुण रूपाची हौस आहे माझ्यासारख्या दुर्बळांची इच्छा कुणी कधी पून करील का ? ४ उत्तराधिपदें-२२. ११५१ क्या गाऊ कोई सुननवाला । देखें तो सब जग ही भुला ॥ १ ॥ खेलो अपने रामहिसात । जैसी वैसी करहो मात ॥ २ ॥ काहासे लाऊ मधुरा बानी । रीझे ऐसी लोक बिरानी ॥ ३ ॥ गिरिधर लाल तो भावका भुका । राग फला नहि जानत तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भुला-चुकलेला, रामहिसात-रामाच्या बरोबर, लाऊ-आणू, बानी-वाणी, रीझे- रमेल, बिरानी-दुसरा अर्थ - जिकडे पाहावे तिकडे सर्व जग चुकल्यासारखेच आहे कोणी ऐकणाराच नाही मी काय गाऊ मग ? १ आता आत्मारामाबरोबरच खेळत राहून जसे होईल तसे त्याच्याशीच बोलत राहू २ ज्या योगे हे विषयांत रममाण होणारे दुसरे लोक रमतील, अशी गोड वाणी मी कोठून आणू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, गोवर्धन पर्वताला धारण करणारा तो गोपालकृष्ण शुद्ध भावाचा भुकेला आहे आणि मीही रागज्ञान जाणत नाही ४ ११५२ छोडे धन मंदिर वन बसाया । मागत तुका घरघर खाया ॥ १ ॥ तीनसो हम करयो सलाम । ज्यामुल बैठा राजाराम ॥ २ ॥ तुलसीमाला बभूत चढ़ावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥ ३ ॥ कहे तुका जो साई हमारा । हिरनकश्यप उन्हे मारहि डारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बसाया-वस्ती करून तुका-तुकडा, तीनसों-त्याला अर्थ - आपले घर व द्रव्य याचा त्याग करून जो वनामध्ये वस्ती करून राहिला आहे व खाण्याकरता घरोघर तुकडा मागत आहे, १ ज्याच्या मुलामध्ये निरंतर रामनामाचीच बैठक आहे, त्याला आम्ही नमस्कार करू २ तुळशीची माळ गळ्यात घालून, ज्याने अंगाला राख फासली आहे, अशाच हरीचे गुण आम्ही निर्मळ मनाने गाऊ ३ तुकाराम महाराज म्हणतात की, ज्याने हिरण्यकशिपूला मारले तोच आमचा स्वामी आहे ४ ११५३ मंत्रयंत्र नहि मानत साखी । प्रेमभाव नहि अंतर राखी ॥ १ ॥ राम कहे त्याके पगहू लागू । देखत कपट अभिमान दुर भागू ॥ २ ॥ अधिक याती कुलहीन नहि जानू । जाने नारायन सो प्रानी मानू ॥ ३ ॥ कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिहु बलिहारी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साखी-पत त्याके-त्याच्या पगहू-पाया याती-जाती, डारु-टाकू, बलिहारी- ओवाळून टाकू अर्थ - अंत करणात श्रीहरीचे प्रेम जर नसेल तर मंत्रतंत्राची पत आमच्याजवळ नसून आम्ही तो मानीतही नाही १ जो नेहमी रामभजन करील त्यालाच आम्ही भजू त्याच्याच पाया आम्ही पडू ज्याच्या ठिकाणी कपट व अभिमान आहे त्याला पाहताच आम्ही दूर पळून जाऊ २ त्याची जात, कूळ आम्ही जाणणार नाही जो

५१६ सार्थ तुकारामगाथा नारायणाला जाणेल, त्याच प्राण्याला आम्ही मानू ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो बलवान प्रभू रामचंद्राची उपासना करतो, त्याच्यावरून जीव व शरीर आम्ही ओवाळून टाकू ४ ११५४ चुराचुराकर माखन खाया। गोलनीका नद कुमार कन्हया ॥ १ ॥ काहे बराई दिखावत मोहि। जागतहु प्रभुपना तेरा सब हि ॥ २ ॥ और बात सुन उखलसु गला। बाधलिया आपना तू गोपाला ॥ ३ ॥ फेरत बनवन गाऊ धरावत। कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - माखन-लोणी, बराई-बडाई लकरी-काठी अर्थ - नदाचा मुलगा श्रीकृष्ण हा गोळणीचे लोणी चोरून खातो १ मला कशाला बडाई मारतोस ? तुझा प्रभुषणा मी जाणत आहे, त्याचे तू रक्षण कर २ हे गोपाळा, आणखी एक गोष्ट तू ऐक तू आपला गळा उखळाला बांधून घेतला आहेस ३ तुक्याबंधू म्हणतो, हातामध्ये काठी घेऊन तू रानावनात गाई वळवीत हिंडतोस ४ ११५५ हरिसु मिल दे एकहि बेर। पाछे तू फिर नाये घर ॥ १ ॥ मात सुनो दुति आये मनायन। जाया करति भर जोबन ॥ २ ॥ हरिसुख मोहि कहिया न जाये। तब तू बुझे आगो पाये ॥ ३ ॥ देखहि नाव कछु पकरि हात। मिलाइ तुका प्रभुसात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बेर-समय, वेळ पाछे-नंतर पकरि-पकडेल, धरेल अर्थ - एक वेळ तू आपले चित्त हरेश्‍वरपात मिळव म्हणजे पुन तुला जन्ममृत्युरूपी घराकडे यावे लागणार नाही १ ह्याविषयी हकीकत अशी आहे की, ज्या वेळी यमदूत येतील, त्यावेळो तू जरी भर जवानीत असलास तरी ते तुला जायबंदी करतील २ हरीचे सुख अवर्णनीय आहे माझ्याने ते सागवले जाणार नाही ज्या वेळेस तू परमार्थोत पाऊल टाकशील, त्यावेळी तुला ते कळेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू भक्ताचा शुद्ध भाव पाहून त्याचा हात धरून आपल्याबरोबर केव्हा मिळवून घेईल हे पाहा ४ ११५६ क्या कहु नहीं बुझत लोका। लिजाये जम मारत धक्का ॥ १ ॥ क्या जीवनेकी पकडी आस। हाती लिया नहि तेरा घास ॥ २ ॥ किसे दिवाने कहता मेरा। कछु जावे तन तू सब ल्या न्यारा ॥ ३ ॥ कहे तुका तू भया दियाना। आपना विचार कर ले जाना ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बुझत-समजून, जम-यम, दिवाना-वेडा अर्थ - काय सांगू ! यम धक्के मारून नेईल हे लोकांना समजत नाही १ हातामध्ये घेतलेला घास मरणापूर्वी खात्रीने तोंडात घालीन, इतकी देखील सत्ता तुमच्या हातात नसून आम्ही पुष्कळ जगू, अशी आशा का बाळगली आहे २ हे वेड्या, तू सर्वांहून निराळा आहेस तू देह, स्त्री, पुत्र इत्यादी सब माझे असे का म्हणतोस ? ते सब नाहीसे होईल ३ तुकाराम महाराज म्हणतात, तू येडा झाला आहेस लोकहो, तुम्ही आपल्या विषयी विचार करा ४ ११५७ कब महू पाऊ चरन तुम्हारे। ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥ १ ॥ जग रडे ज्याकु सो मोहि मीठा। मीठा दर आनंदमाहि पेठा ॥ २ ॥ भला पाऊ जनम इन्हे बेर। बस मायाके असग फेर ॥ ३ ॥ कहे तुका धन मानहि दारा। बोहि लिये गुड़लीया पसारा ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा ५१७ शब्दार्थ व टीपा :- डरे-भीते, पैठा-स्थिर होणे. अर्थ - हे देवा, मी केव्हा मरेन व तुमच्या चरणांशी केव्हा एकरूप होईन, इतके तुम्ही मला जीवापेक्षा प्रिय आहात १ ज्याच्या संबंधाने जग दुःखी होते, ते मला गोड आहे त्या गोडीचा इतका आदर आहे की, त्या योगे मी आनंदात स्थिरावतो. २ या योगाने आम्ही आपल्या जन्माला जाऊ व मायेचे फेरे पूर्ण झाले म्हणून असंग- पणाने राहू ३ तुकाराम महाराज म्हणतात, धन, मान व स्त्री हा सर्व पसारा मी गुंडाळून टाकिला आहे. ४ ११५८ वासो पाछै दौरे राम । सोवे खडा आपै मुकाम ॥ १ ॥ प्रेमसरडी बांधी गले । खेंच चले उधर ॥ २ ॥ आपने जनसु भुल न देवे । कर हि घर आर्घे बाट बतावे ॥ ३ ॥ तुकाप्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दौरे-पळेल, खेंच-खेचणे, ओढणे, भूल न देवे-चुकून देत नाही, वारि-ओवाळून टाकू अर्थ - राम हा दासाच्या मागे धावतो व ते आपल्या मुक्कामावर जाऊन निजले की, तेथे उभा राहतो १ भक्त प्रेमाची दोरी गळ्यात बांधून त्याला ओढीत चालवितात त्या वेळेस तो तिकडे तोंड करून चालतो २ आपल्या दासाचा तो परमार्थाचा रस्ता चुकू देत नाही असावधपणे चुकू लागले तर, हात धरून त्यांना परमार्थाची नीट वाट दाखवितो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामी प्रभो, तू दीनदयाळ आहेस; म्हणून हे गोपाळा, तुझ्यावरून मी आपल्याला ओवाळून टाकीन ४ ११५९ ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ १ ॥ इतने गोते काहे खाता । जब तूं अपना मूल न होता ॥ २ ॥ अंतरजामी जानत साचा । मनफा एक उपर बाचा ॥ ३ ॥ तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नंहि लेस ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- छोर-सोड, अंतरजामीं-अंतर्यामी, लेस-लेशमात्र अर्थ :- ज्या योगाने तुझा राम येईल असे कर बाकीच्या धंद्याविषयी सर्व इच्छा टाकून दे १ जर तू आपल्या स्वरूपाला विसरला नसतास, तर अनेक जन्ममृत्यूचे फेरे का खावे असते ? २ मनात एक भाव व वाणीत दुसरा भाव, परंतु हे दोन्ही भाव अंतर्यामी असणारा जो परमात्मा तो जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात माझा प्रभू देशाविदेशातून भरला आहे त्याच्यावाचून एक लेशमात्र जागा रिकामी नाही. ४ ११६० मेरे रामको नाम जो लेवे बारोबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ १ ॥ हसत खेलत चालत बाट । खाना खाते सोते खाट ॥ २ ॥ जातनसुं मुजे कछु नंहि प्यार । असतेके नंहि हेतु धेड चंभार ॥ ३ ॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाम । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - त्याके-त्याला, पैजार-जोडा अर्थ - माझ्या रामाचे नाव जो वेळोवेळी घेईल, त्याच्या पायांत मी आपल्या शरीराचा जोडा करून घालीन १ हसताना, खेळताना, जेवताना, पलंगावर निजताना जो रामाचे नाव घेतो, २ मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा का असेना; त्याच्या जातीची, धर्माची मला प्रीती नाही. तो धेड असो अगर चांभार असो, कोणत्याही जातीचा असेना ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्त माझ्या रामाच्या नामाकडे लागले आहे, त्याच्या पायाच्या ठिकाणी माझे चित्त जडो ४

५१८ सार्थ तुकारामगाथा ११६१ आप तरे त्याकी कोन वराई । औरनकुं भलो नाम धराई ॥ १ ॥ काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥ २ ॥ बरसते मेघ फलतेहैं विरखा । कोन काम आपनी उन्होति रखा ॥ ३ ॥ काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥ ४ ॥ काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत धातु ॥ ५ ॥ कहे तुका उपकारहि काज । सब कररहिया रघुराज ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- तरे-तरतो, खिन-क्षण अर्थ - जो आपण स्वतः परमार्थ करून तरतो, त्याचा काय मोठेपणा आहे ? म्हणून अन्य जीवांना श्रीहरीचे नाव चांगले घ्यावयास लावावे १ पृथ्वी अनेक भूतांचा भार वाहते. त्यात तिचे काम काय आहे ? गाय ही मालकाला दूध देते, त्यातले किंचित्‌सुद्धा चाखीत नाही. २ मेघ वृष्टी करितात, तिचे फळ मेघांना मिळते काय ? म्हणून काय मेघांनी आपले वृष्टी करण्याचे काम बंद ठेविले आहे ? ३ हे चंद्रसूर्य पूर्वेस उगवून पश्चिमेकडे मावळतात. एक क्षणभर विसांवा न घेता फिरतात ४ परीस हा लोखंडाचे सोने का करतो ? त्याने लोखंडाचे सोने केले तरी, त्याची किंमत कमी होत नाही व तो स्वतः धातूही होत नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्यांवर उपकार करण्याचे कार्य राम करीत असतो. ६ ११६२ जग चले उस घाट कोन जाय । नहिं समझत फिरफिर गोते खाय ॥ १ ॥ नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥ २ ॥ उपर स्वार बैठे तृष्णांपीठ । नहिं बाचे कोई जावे लूठ ॥ ३ ॥ देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बुझे-समजेल, तृष्णापीठ-तृष्णेच्या आसनावर अर्थ :- ज्या मार्गाने जग जात आहे, त्या मार्गाने कोण जात नाही ? परंतु त्याचा परिणाम काय होईल, तो कुणी समजत नसल्यामुळे ते वारंवार जन्ममृत्यूचे गोते खातात १ असे एकदोन नाहीत, सर्व प्राणीमात्र असेच गोते खातात जो हे जाणतो तो आघाडीचा स्वार होतो. २ जे तृष्णेच्या आसनावर बसले आहेत, त्यातले सर्व वाचणार नाहीत. सर्व लुटले जाणार आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व प्रकार पाहून मला भीती वाटली व मी सगळ्यांकडे पाठ फिरवून एकट्या रामाचाच मार्ग धरला ४ ११६३ भले रे भाई जिन्हे किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ १ ॥ फीरतफीरत पाया सारा । मीलत लोले धन किनारा ॥ २ ॥ तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटत भवरोग ॥ ३ ॥ कहे तुका में ताको दास । नहिं सिरभार चलावे पास ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा.- चीज-सार्थक अर्थ - लोकांनो, ज्यांनी आपल्या जन्माचे सार्थक केले, ते चांगले. कारण चांगले अनेक योनींतून फिरत फिरत सारभूत असा नरदेह प्राप्त झाला आहे या ठिकाणी - १ होते. २ सर्वस्वाचा त्याग करून ज्याने तीर्थव्रते केली, पण देहादी संसाररूपी रोगाची तळमळ तुकाराम महाराज म्हणतात, जो देह व देहासंबंधी माझे अशी भावना बाळगीत नाही त्याचा ११६४ लाल कमलि ओढे पेनाये । मोसु हरियें कंसे समाये ॥ १ ॥ कहे सखि तुम्हे करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥ २ ॥

नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥ ३ ॥ और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कमली-राबळे, घोंगडी, पेनावे-पांघरून, हिरदा-हृदय, सरम-शर्म, कछु-काही अर्थ :- हरीने लाल घोंगडी मला पांघरून कसे सुशोभित केले आहे. १ मैत्रीण म्हणते, तू हरीविषयी आकांत करतेस, पण हरीचे हृदय तुजविषयी कठोर आहे २ हरीच्या ठिकाणी शरम, लज्जा काही नाही आणखीही तुला सांगते की, त्याला पुष्कळ बायका आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ती मैत्रीण आणखी सांगते की, इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या हरीस नामरूप नाही. असा माझा प्रभू लोणी खात असतो. ४ ११६५ राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंव न पाई ॥ १ ॥ कवनका मंदर कवनकी झोपरी । एकरामबिन सब हि फुकरी ॥ २ ॥ कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥ ३ ॥ कहे तुका सब हि चलनार । एकरामविन नहिं वासारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कवनकी-कोणाची अर्थ :- रामाचे भजन करणे, हीच जगण्याची सफलता आहे. म्हणून हरिभजनास आळस करु नकोस १ कुणाचे घर आणि कुणाची झोपडी; एका रामावाचून सर्व फुकट आहे २ कुणाचा देह व कुणाची ममता ? एका रामा वाचून सर्व नष्ट होणार आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व काही नष्ट होणार आहे. एका रामावाचून काही सार नाही ४ ११६६ काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ १ ॥ राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥ २ ॥ माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥ ३ ॥ राना रक डोगरको राई । कहे तुका करे इलाहि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- काल-यम, मिथ्या-खोटा. अर्थ :- भयंकर घातक अशा धनसपत्तीच्या ठिकाणी तू का गुंतून पडलास ? अरे, बाबा, रामनाम गा, व ऐक १ राजे आदीकरून लोक हे सर्व तू मजले आहेत असे म्हणतोस, पण जोपर्यंत काळ तुझे प्राण आकर्षण करीत नाही, तोपर्यंत हे माझे आहे, असे तुझे म्हणणे शोभते. पण प्रसंगी कोणी उपयोगी पडत नाही. २ देहादी प्रपंचही खोटा असून मनकल्पनेचा आहे, म्हणून त्याचा अभिमान टाक व देवाला भज ३ तुकाराम महाराज म्हणतात, राजाचा रंक व डोंगराची मोहरी होईल. याकरता काही तरी उपाय कर ४ ११६७ काहे रोवे आगले मरना । ग्वार तू भुला आपना ॥ १ ॥ केते मालुम नंहि पडे । नन्हे बडे गये सो ॥ २ ॥ बाप भाई लेका नंहि । पाछें तूं हि चलनार ॥ ३ ॥ काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रोवे-रडतोस, अगले-पुढचे, बाल-केस, सिपत-पांढरे अर्थ - अरे मूर्खा, पुढचा मेल्याबद्दल तू का रडतोस ? तू आपल्यावर येणाऱ्या मृत्यूस विसरलास काय ? १ किती तरी लहान मोठे मृत्यूच्या मुखी गेले, हे तुला माहीत नाही काय ? २ बाप, भाऊ आदीकरून अनेक मेले;

त्यांची मोजदाद करीत एक दिवस तूही मरणार. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे तुझे काळे केस पांढरे झाले, हे तुला माहीत असू दे. ४ ११९८ दया मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुम्हारा ॥ १ ॥ तनजोवनकी कोन बराई । व्याधपीडादि स काटहि खाई ॥ २ ॥ कीर्त बघारूँ तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥ ३ ॥ कहे तुका नहिं समझत मात । तुम्हारे शरन हे जोडहि हात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- जोवन-यौवन, बराई-मोठेपणा अर्थ :- माझ्या रामावांचून सारभूत सुख कोणते आहे ? ते मला सांगा, मग मी तुमचा दास होईन १ शरीराच्या ठिकाणी तारुण्याचा, यौवनाचा काय मोठेपणा आहे ? कारण व्याधींचे दुःख त्याला क्षीण करून मारील. २ कीर्ती वाढवावयास जावे तर आपले नाव कुठे आहे ? या खोट्याच्या फेऱ्यात पडून पश्चात्ताप का करून घ्यावा ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रकार लोकांना समजत नाही. याकरिता मी तुम्हाला हात जोडून शरण आलो आहे, याचा तुम्ही विचार करा. ४ ११९९ देखत आलौं झुटा कोरा । तो काहे छोरा घरवार ॥ १ ॥ मनसुं किया चाहिये पाज । उपर खाक पसारा ॥ २ ॥ कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥ ३ ॥ कहे तुका वो संन्यास । छोडे आस तनकी हि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कोरा-निव्वळ, छोरा-सोडलास, पाज-शुद्ध अर्थ - डोळ्यांना स्पष्ट दिसत आहे की, तू निव्वळ ढोंगी आहेस, तर घरव्यवहार कशाला टाकलास ? १ प्रथम मन शुद्ध केले पाहिजे. तसे न करता वरवर राख फासणे हा सर्व पसारा आहे २ कामक्रोधादी वृत्तींना हृदयात आश्रय देणे, हाच संसार आहे. तू मस्तकावर त्याचे ओझे घेतले आहेस. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपल्या देहाचा समूळ लोभ टाकला आहे, तोच खरा संन्यासी आहे. ४ १२०० रामभजन सब सार मिठाई । हरि संताप जनमदुख राई ॥ १ ॥ दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहिं अंततारे ॥ २ ॥ खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पछतावे ॥ ३ ॥ कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- खटमिठा-आंबटगोड, संताप-त्रिविध ताप अर्थ :- रामाचे भजन करणे हे सगळ्या गोडाचे सार आहे. हे जन्मदुःख व त्रिविध ताप विशेष नाहीसे करते. १ दूधभात, तूप, साखर सेवन केल्याने भूकही नाहीशी होत नाही व ते पुरतही नाही. २ खाण्यातच सर्व युग निघून जाते. नंतर आंबटगोडाच्या रुचीच्या मोहाने पश्चात्ताप होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रामरसाचे ज्याने सेवन केले, तो मोठ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात केव्हाही सापडणार नाही ४ १२०१ बारबार काहे मरत अभागी । बहुरि गरन संख्या तोरेभागी ॥ १ ॥ ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे बैकुंठ जाम ॥ २ ॥ रामनाम मोल नहिं बेचे कदरि । यो हि सब माया छुरावत झगरी ॥ ३ ॥ कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चालो ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा ५२१ शब्दार्थ व टीपा :- अभागी-करंटा, क्वडि-कवडी. अर्थ:- हे करंट्या, तू वेळोवेळीं का मरत आहेस ? तुझ्या वाट्याला पुष्कळ मरणांची संख्या आली आहे. १ या मनुष्य देहाने केले तर काय होणार नाही ? श्रीहरीच्या भक्तिभजनाने तो वैकुंठास जाऊ शकतो. २ रामनामाचे चिंतन करण्याला एक कवडीसुद्धा किंमत द्यावी लागणार नाही; त्यापासून या सर्व व्यथेतून सुटका होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रामाच्या ठिकाणी मन अडवून ठेव; व त्या रसासच जिह्वेने नित्य चाख. ४ ११७२ हम उदास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिई लंका ॥ १ ॥ गोवरधन नखपर गोकुल राखा । वर्सन लागा जय मेंहूं फत्तरका ॥ २ ॥ वैकुंठनायक काल कंसासुरका । दैत धुवाय सब मंगाय गोपिका ॥ ३ ॥ स्तंभ फोड पेट चीरीया कश्यपका । प्रल्हाद के लिये कहे भाई तुकयाका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तीन्हके-त्या, काल-काळ, यम, वर्सन-पाऊस पडू लागला. अर्थ:- रावणाला मारून विभीषणाला ज्याने लंका दिली, त्या रामाचा मी दास आहे, असे सर्व लोकांना सांगतो. १ ज्या वेळेस इंद्राने शिळाधारांनी पर्जन्यवृष्टी केली, त्या वेळेस गोवर्धन पर्वत याने उचलून नखावर धरला व गोकुळाचे रक्षण केले. २ वैकुंठाचा स्वामी हा कंसासुराचा काळ असून त्याचे सर्व दैत्य सैन्य ज्याने मारून टाकले, त्याला सर्व गोपिकांनी मागितले. ३ तुकारामप्रभू म्हणतात, प्रल्हादाकरता नरसिंहरूप धारण करून तो खांब फोडून प्रकट झाला; व त्याने हिरण्यकशिपूचे पोट फाडले. ४ साख्या ३० ११७३ तुफा वस्तर विचारा क्या करे । अंतर भगवान होप । भीतर मैला केंच मिटे रे । मरे उपर धोय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- वस्तर-वस्त्र, भीतर-आत अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, जर अंतःकरण शुद्ध नसेल, तर बाह्य भगवे वस्त्र बिचारे काय करील? वरच्या बाजूने मरेतोपर्यंत धुतले तरी अंतःकरणातील मळ नाहीसा कसा होईल ? १ ११७४ रामराम कहे रे मन । औरसुं नहि काज । बहुत उतारे पार । आधे राख तुकाकी लाज ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- औरसुं-दुसऱ्याशी. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, अरे मना, तू राम राम असे भजन कर. दुसऱ्याशी काही काम नाही. या रामनामाने या संसारातून पुष्कळ लोक पार पडले. याकरिता यापुढे तू माझी लज्जा रक्षण कर. १ ११७५ लोभीकें चित धन बैठै । कामीन चित काम । माताके चित पुत बैठै । तुकाके मन राम ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामीन-विषयी, पुत-पुत्र. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, लोभ्याचे चित्त धनावर बसलेले असते किंवा विषयी मनुष्याच्या चित्तामध्ये जसा काम असतो, मातेचे चित्त बालकाच्या ठिकाणी असते, तसे माझे मन रामाच्या ठिकाणी राहेल असे काही तू कर. १ तु. गाथा....६६

५२२ सार्थ तुकारामगाथा ११७६ तुका पखिबहिरन मानु । बोई जनाबर बाग । असतनकु सत न मानू । जे धर्मकु दाग ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पखिबहिरन-पक्षी बहिरी ससाणा, बाग-वाघ अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, बहिरी ससाण्यास आम्ही इतर पक्ष्यांप्रमाणे मानणार नाही व वाघ, हाही इतर जनावरांप्रमाणे नाही त्याप्रमाणे असताना सत मानणार नाही त्याच्या वाईट वर्मास आम्ही डाग लावू १ ११७७ तुका राम बहुत मिठा रे । भर राखू शरीर । तनकी करू नावरि । उतारू पैल तीर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - नावरि-नौका अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात राम हा फार गोड आहे म्हणून सर्व शरीरात त्याला भरून ठेवू व देहाची नौका करून या भवनादीच्या पार उतरून जाऊ १ ११७८ सतन पन्हया ले लडा । राहू ठाकुरद्वार । चलत पाछेंहु फिरो । रज उडत लेऊ सीर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पन्हया-पादुका रज-धुली अर्थ - संतांच्या पादुका मस्तकावर घेऊन देवाच्या द्वारात उभा राहीन आणि संत निघाले की त्यांच्या मागे मी फिरेन व त्यांच्या पायांची जी धूळ उडेल ती मी मस्तकावर घेईन १ ११७९ तुकाप्रभु बडो न मनू न मानू बडो । जिसपास बहु दाम । वलिहारि उस मुझकी । जिसती निकसे राम ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रभु-राजा अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, मी राजाला मोठा मानणार नाही व ज्याच्यापाशी पुष्कळ पैसा आहे, त्यालाही मी मोठा मानणार नाही ज्याच्या मुखातून रामनाम निघत आहे, त्याचे मुख धन्य आहे व तोच श्रेष्ठ आहे १ ११८० राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खाड । हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस राड ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - खाड-खडासाखर अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात जे मुख रामनामाचे चिंतन करीत आहे, ते उत्तम आहे व ते चिंतन नव्हे तर दूधसाखरेचे सेवन आहे ज्या मुखात हरीचे चिंतन नाही त्या मुखात माती पडली त्या आईने रांडेने, त्याला जन्म कशाला दिला ? १ ११८१ राम कहे सो मुख भला रे । बिन रामसे बीप । आप न जानू रमते बेरो । जन काल लगावे सीष ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - वीप-वाप अर्थ - जे मुख रामचिंतन करीत आहे, ते उत्तम आहे रामचिंतन नसेल तर ते मुख विष्ठाप्रमाणे होय आपल्या मताने आपल्यास मोठे समजू नये कारण ज्या वेळी काळ शिक्षा करील त्या वेळेस आपणांस कळून येईल १

सार्थ तुकारामगाथा ५२३ ११८२ कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार । मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - सवदा-सौदा अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, मी सौदा विकत आहे. जे कोणी घेतील त्यांची देहबुद्धीच हरेल. साधुसंत गोड आहेत व मूर्खांच्या डोक्यावर मात्र मार बसेल १ ११८३ तुका दास तिनका रे । रामभजन निरास । क्या विचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - तिनका-त्याचा. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, मी निष्काम मनाने रामाचे भजन करतो, त्याचा मी सेवक आहे. मोठे पंडित जरी असले तरी, त्या गरीबाचे काय करावयाचे आहे ? का ? तर ते आशेने ज्याच्या त्याच्या पुढे हात पसरतात. १ ११८४ तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी रास । पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- पतंग-टोळ. अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे टोळ हा प्रेमाने दिव्यावर उडी घालून स्वतःस जाळून घेतो, तसे उत्तम प्रेम रामाच्या ठिकाणी तू ठेव. १ ११८५ कहे तुका जग भुला रे । कह्या न मानत कोय । हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- डोय-डोके. अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जग विषयांच्या संगतीने भूलून गेले आहे किती सांगितले तरी कोणी मानीत नाहीत ज्या वेळेस त्याच्यावर काळाचा हात पडेल त्या वेळेस तो इतका मार घेईल की, त्या योगाने डोके फुटेल. १ ११८६ तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ॥ चोट साहे धनकि रे । हिरा नीबरे तोये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुरा-शूर, धनकि-घणाचे, चोट-घाव, आघात अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, जे बोलण्याने आपल्याला शूर मानतात, त्यांनी जोपर्यंत शूरत्व गाजवले नाही, तोपर्यंत मी त्यांना मानीत नाही घणाचे घाव सोसून न फुटता जो टिकतो, त्याची खऱ्या हिऱ्याप्रमाणे निवड होते. १ ११८७ तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये । एक पावे उंच पदवी । एक खोसां जोये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- विरला-एखादाच अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, तोंडाने आपणाला शूर म्हणविणारे पुष्कळ आहेत, पण खऱ्या प्रसंगी धैर्य धरून शूरत्वाने युद्ध करणारे असे थोडे; म्हणून असे जे कोणी आहेत ते मोठे अधिकारी होतात. पण कित्येक जोडा खाणारे असे नीच पदवीचे राहतात १

५२४ सार्थ तुकारामगाथा ११८८ तुका मान्या पेटका । और न जाने कोये । जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - मान्या-मारला गेला, पेटका-पोटाने अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, मी पोटाने मारला गेलो आहे दुसरे काही मी जाणत नाही. त्यातल्या त्यात हरिभक्ताच्या संप्रदायाने मी थोडा रामनामाचा जप करतो १ ११८९ काफर सोही आपण बुझे । आला दुनिया भर । कहे तुका तुम्हे सुनो रे भाई । हिरिदा जिन्होका कठोर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - काफर-नास्तिक हिरिदा-हृदय अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या योगाने प्रेम वाढते, त्यास मी सत समजतो व ज्याच्यामुळे देवावर असलेले प्रेम कमी होते अशा नास्तिकांना मी दुर्जन म्हणतो १ ११९० भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये । निचा जयै कमतरिण । सो ही सो फल खाये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पढीया-शिकलेले अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, जे कुणी शिकलेले आहेत, त्यांनी आपल्या विद्यारूपी मालावर भरवंसा ठेवून लोकरंजन केले तर त्यांना परमार्थफळ प्राप्त होणार नाही व जे कोणी सर्व अभिमान टाकून आपल्याकडे कमीपणा घेऊन नम्र झाले आहेत तेच त्या परमार्थफळाचे सेवन करितात १ ११९१ फल पाया तो खुस भया । किन्होसु न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित मिलाया नाद ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - भया-झाले, मिरगा-हरीण अर्थ - जो परमार्थफळाचे सेवन करतो, तो सुखी होतो व कुणाशी वादविवाद करीत नाही जसे व्याधाच्या गायनाकडे हरिणीचे चित्त वेधून जाते की व्याधाने मारावयास काढलेल्या बाणाकडे तो पाहातही नाही १ ११९२ तुका दास रामका । मनमे एक हि भाव ॥ तो न पालटू आव । यँ हि तन जाय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पालटू-बदलूं अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात मी रामाचा दास आहे व माझ्या मनात त्याच्याविषयीचाच एक भाव आहे, तो हे शरीर पडले तरी कधी बदलणार नाही १ ११९३ तुका रामसु चित बाघ राखू । तैसा आपनो हात । धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - बछरा-वासरू सात अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात वासराला टाकून गाय ही जरी वनात गेली तरी तिचे वासरावरील जे प्रेम आहे ते उठून तिच्या बरोबर जात नाही, तसे तुम्ही आपले चित्त आपल्या हाताने रामाच्या ठिकाणी बांधून ठेवा १ ११९४ चितसु चित जब मिले । तब तनु थडा होये । तुका मिलना जिन्होसु । ऐसा विरला कोये ॥ १ ॥

सार्थ तुकारामगाथा ५२५ शब्दार्थ व टीपा :- विरला-एकदाच, थोडेकेच. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, उभयतांच्या चित्तातले विचार जेव्हा एक होतील, त्या वेळेस देह शांत होतो. पण ज्याच्या चित्ताशी आपले चित्त मिळवावे असे सज्जन थोडेकेच असतात. १ ११९५ चित मिले तो सब मिले । नहि तो फुकट संग । पानी पथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठोर-जागा. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात चित्ताला चित्त मिळाले की, सर्व काही मिळालेच. नाही तर कोणाचीही संगत करणे फुकट. जसे पाणी आणि दगड या दोघांचा योग जरी झाला तरी त्या दगडाच्या आतील एक भागसुद्धा भिजला जात नाही. असंगतीने दगडाचे काठिण्यात नरमाई येत नाही. १ ११९६ तुका संगत तीन्हसें कहिये । जिनमें सुख दुनाये ॥ दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- दुनाये-दुप्पट होईल, मू-मुख. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या संगतीने प्रेमसुख दुप्पट होते, त्याची संगती करावी व ज्याच्या संगतीने असलेले प्रेम नाहीसे होते, त्या दुर्जनांचे तोंड काळे आहे असे समजून जावे. १ ११९७ तुका मिलना तो भला । मनसूं मन मिल जाय । उपर उपर माटि घसनी । उनकि कोन धराई ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - घसनी-घासून अर्थ :- जर मिळायचे असेल तर मनाने मनाशी मिळावे हे चांगले. वरवर कितीही मातीने घासले तरी त्याचा मोठेपणा काय आहे ? १ ११९८ तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर मुंदाय । जबये इच्छा नहिं मुई । तब तूं किया काय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- मंदाय-बोडून. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, बायका, पोरे इत्यादी सर्व कुटुंबाचा त्याग करून डोके बोडून संन्यास घेतला; पण अंतःकरणातील इच्छा नाहीशी झाली नाही तर तू काय केलेस ? १ ११९९ तुका इच्छा मीटइ तो । फाहा करे जट खाक । मथोया गोला डारदिया तो । नहि मिले फेरन ताक ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- मीटइ-नाहीशी, जट-जटा, मथोया-मथन करून. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणातील इच्छा नाहीशी झाल्यावर जटा राखणे व राख लावणे हे काय करावयाचे आहे ? तो संसारात जरी असला तरी त्याहून अलिप्त आहे. जसे मंथन करून काढलेला लोण्याचा गोळा पुन ताकात घातला तरी तो अलिप्त राहतो. १ १२०० दीद मेरे सांइयाके । तुका चलावे पास । सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - सांईयाके-स्वामीचे, लरे-लढे.

५२६ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामीचे ब्रीद जो चालवतो, त्याच्या जवळ मी असतो. जो कोणी धीर, शूर असून देहाचा लोभ टाकतो तोच आमच्याशी लढेल. १ १२०१ कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास । क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- भया-झाला. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, मी संताचा दास झालो, हे फार चांगले. माझ्या मनातील आशा जर नाहीशी झाली नसती तर किती वेळ मरावे लागले असते हे कळू शकेल. १ १२०२ तुका और मिठाई क्या करूं रे । पाले बिकारपिंड । राम कहावे सो भली रूखी । माखन खांडखीर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- पाले-पाळळा, रूखो-कोरडी. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, बाकीच्या मिष्ट रसास काय करावयाचे आहे ? त्या योगेकरून विकारी देहाचेच रक्षण होईल. राम भजन करून कोरडी भाकरी खाणे, हे लोणी, दूध, साखर खाल्ल्याप्रमाणे उत्तम होय. १ १२०३ म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥ १ ॥ लाहो घेईं हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ २ ॥ गळा पडेल यमफांसी । मग केंचा हरि म्हणसी ॥ ३ ॥ पुरलासाटीं देहाडा । ऐसें न म्हणे न म्हणे मूढा ॥ ४ ॥ नरदेह दुबळा । ऐसें न म्हणे रे चांडाळा ॥ ५ ॥ तुका म्हणे सांगों किती । सेकीं तोंडीं पडेल माती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - संचित- प्रारब्धामध्ये, मात-गोष्ट, लाहो-लाभ, पुरलासाठीं-भोगासाठी, देहडा-देह, सेकीं-शेवटी. अर्थ :- श्रीहरीचे भजन आपल्या प्रारब्धामध्ये नाही अशा प्रकारची गोष्टच मुखातून काढू नकोस. १ या श्रीहरीच्या नामाचा लाभ त्वरित करून घे तू आपल्या या मानवी देहाचा जन्म व्यर्थ जाऊ देऊ नकोस २ कधी तरी लौकरच तुझ्या गळयात यमाचा पाश पडेल; मग या श्रीहरीचे नाव तुला कसे घेता येईल ? ३ मूर्ख माणसा, हा आपला देह केवळ विषयाच्या भोगासाठीच आहे, असे तू कधीही समजू नकोस. ४ हा नरदेह दुबळा आहे, असेही चांडाळा, तू कधी म्हणू नकोस ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता तुला सांगू तरी किती ? शेवटी तुझ्या तोंडात मातीच पडेल हे मात्र ध्यानात ठेव. ६ १२०४ संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥ १ ॥ बहु घट जरी झाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥ २ ॥ तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - दुर्गम-समजण्यास कठीण, शाब्दिकाचे-पंडिताचे. अर्थ :- या संताचे माहात्म्य समजून घेण्यास फार कठीण आहे. केवळ पडिक पंडिताचे ते काही काम नव्हे. १ एखादी गाय अथवा म्हैस कितीही घडघास्ट झाली तरी, ती काय इच्छिलेली वस्तू देणाऱ्या कामधेनूच्या बरोबरीची पद्योतरी होईल काय ? २ तुकाराम महाराज म्हणतात, स्वतः आपण अंगानेच संत झालो, तरच संतांचे महत्त्व समजून येईल. एरव्ही नाही. ३