सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
सार्थ तुकारामगाथा १३५ नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदीं ॥ १० ॥ नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गव्हाळा ॥ ११ ॥ आगमींचें कुडें नेणें । स्तंभन¹ मोहन उच्चाटणें ॥ १२ ॥ नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥ १३ ॥ शब्दार्थ व टीपा :- जडीबुटी-त्वरित गुण देणारी यातुर्मातुर औषधे, अयाचित-न विचारता, चाहूर-१२० बिघ्यांची जमीन, वृत्ति-निर्वाहाचे साधन, सांग खूण-गुपिते, करंटा-दुर्दैवी, भणदी-धूप जाळण्याची पात्रे, उदो-उदय असो, उदय असो असे देवीचे भक्त म्हणतात त्याप्रमाणे, गव्हाळा-बावळट लोकांना, आगमीचे-वेदान्ताचे कोडे, स्तंभन- जाग्यावर खिळून टाकण्याची विद्या, मोहनी-मोहिनी विद्या किंवा गौन, उच्चाटन-जारणमारणांपैकी एक विद्या, निरयवासी-नरकलोकांतील. अर्थ:- आपण कोण आहो, कोण नाहीत याचा स्पष्ट उलगडा करताना तुकारामबुवा सविस्तर सांगत आहेत की, लोकांना फसविण्याचे कपट काही मी जाणीत नाही. १ देवा, फक्त तुमचेच कीर्तन करून तुमचे उत्तम गुण मात्र गात असतो. २ लोकांना नादविण्यासाठी मजजवळ काही जडीबुट्टी त्यांना दाखविण्यास नाही; त्यामुळे त्वरित चमत्कारही मला करता येत नाहीत. ३ माझी शिष्यशाखाही मोठी नाही जे कोणी न विचारता किंवा न बोलविता येतात त्यांना काही थोडे सांगतो एवढेच. ४ मी तर देवा, एखाद्या मठाचा अधिपती नव्हे व मला चाहूरभर जमिनीचे निर्वाहाचे एखादे साधनही नाही. ५ देवाची पूजा करताना धूप, दीप, नैवेद्य, आरती यांचा पसारा मांडून मी दुकानही पातले नाही ६ लोकांना काही गुपिते सांगावीत, त्यांच्या मनांतील काही गोष्टी ओळखण्यात यासाठी मला एखादा बेताळही प्रसन्न नाही ७ लोकांना पुराण सांगून नादी लावणारा पुराणीकही मी नाही. सांगावे एक व करावे दुसरे असे मी करीत नाही. ८ मला घटापटादी शब्दाच्या साहाय्याने दुर्बोधी पंडितांप्रमाणे वादविवादही करता येत नाही. ९ किंवा धुपाटण्यात ऊद वगैरे धुपवून, जाळून मी आनंदीचा, अंबाबाईचा उदो उदो करीत नाही. १० चार अडाणी किंवा बावळट लोकांना भोवती जमवून मी नामजपाच्या माळा थोडण्याचे नाटकही करीत नाही. ११ मी वेदान्ताचे कोडे किंवा अथर्ववेदातील स्तंभन, मोहन, उच्चाटण इत्यादी जारणमारणादी क्रियाही आणीत नाही. १२ तुकाराम महाराज म्हणतात, मी वर सांगितलेल्या लोकांसारखा नाही, हे वेडे लोक वरील- सारखे प्रकार करून नरकाची जोड करतात. मी हरिभक्तीखेरीज दुसरे काहीच करीत नाही १३ विवरण :- तुकोबांनी व इतर साधुसंतानी सर्वांना अतिशय सुलभ असा विठ्ठलभक्तीचा मार्ग वारंवार सांगितला आहे. नामस्मरण, भजन, कीर्तन, एकादशी, सोमवार ही व्रते, पंढरीची वारी, गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचे टिळे, तुळशीची पूजा यासारखे अनेक सोपे उपचार किंवा सहज सुलभ साधने सांगितली आहेत. परंतु बुवांच्या वेळी सामाजिक भ्रष्टाचार सर्व बाजूंनी होत होता, लोकांचे प्रपंच विस्कटले होते, धार्मिक आचारविचार नष्ट झाले होते, देवदैवते याचा मुळमुळाट झाला होता. भोंदू लोक अशा प्रसंगी वरवर दिखाऊ व चमत्कार दाखवून सर्वसामान्य जनतेस फसवीत होते. त्याचा भरपूर समाचार बुवांनी अभंगातून घेतलेला आहे भोंदू व लबाड लोक सामान्य स्त्रीपुरुषांना कसे फसवितात त्याचे मोठे समर्पक व बोलके चित्र या अभंगात बुवानी काढले आहे. कुणी लोकांना फसविण्यासाठी कपट करतात, कुणी जादुटोणा करून, जडीबुट्टी देऊन, चमत्कार दाखवून लोकांना फसवितात कुणी मठाधिपती असतात. कुणी विलासी असतात, बुवांची जमिनीची व मठांची थोरवी असते, कुणी पूजेचे बाह्य अवडंबर माजवून बसलेले असतात कुणाला दुसऱ्याच्या मनातील ओळखणारी वेताळा- सारखी भूतसृष्टी प्रसन्न असते. अंगाराधुपारा देऊन हे लोक जनतेस फसवीत असतात. पुराणात एक सांगणारे व आचरणात दुसरे करणारे कुणी ढोंगी पुराणीक असतात, कुणी घटाकाश, पटाकाशासारख्या शाब्दिक बडबडीने वेदान्ताची व्यर्थ चर्चा करीत असतात कुणी देवीच्या नावे दिवटी पाजळवून आनंदीचा उदो उदो करतात. कुणी १ स्तंभ आणि उच्चाटणे.
१३६ सार्थ तुकारामगाथा ढोंगीपणाने उगाच माळ हालवून, जपाचे नाटक करुन गबाळया लोकांना फसवितात कुणी जारणमारणाच्या आसुरी विद्येच्या पाठीमागे असतात पण हे सब लोक बुवाच्या मते ढोंगी आहेत हे समाजातील भोळयाभाबड्या स्त्रीपुरुषाना लुबाडतात स्वतः तुकारामबुवा मात्र केवळ विठ्ठलाचे कीर्तन व गुणवर्णन करून हरिभक्तीचा प्रसार करतात असा भावार्थ २७३ रडोनिया मान । कोण मागता भूषण ॥ १ ॥ देवे दिले तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ २ ॥ लाविता लावणी । विके भिके केंज्या दानी ॥ ३ ॥ तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कोड-कौतुक, केंजे-धान्य अर्थ - दुसऱ्याजवळ रडून भारून मान मिळविण्यात कोणते भूषण आहे ? देवाने आपण होऊन जे दिले त्यात गोडी आणि कौतुक आहे २ स्वतः शेतात धान्य पेरून नंतर ते विकण्यात वा भिकाऱ्याला दान देण्यात काही अर्थ आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणा न मागता यायला पाहिजे धीर धरल्यासच वीर पुरुषाचे महत्त्व येईल ४ २७४ पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसता गमन मातेशीं तें ॥ १ ॥ सांगतो ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावे तरी ॥ २ ॥ संता ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीच वळसा सापडला ॥ ३ ॥ तुका म्हणे एकाएकीं वरासन । बुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संकेत-सिध्दान्त वळसा-फेरा किंवा रहस्य, अशोभ्य-विशोभित, वरासन-श्रेष्ठ आसन अर्थ - ज्या आसनावर आपणास पूज्य असणारी वस्तू अथवा व्यक्ती आहे त्याच आसनावर आपण बसल्यास आईशी गमन केल्याचे पाप लागेल १ रोज वागण्यातील धर्मनीतीचे संकेत मी नीट सांगत आहे ते तुम्हास तुमचे हित व्हावेसे वाटत असेल तर सावधपणाने ऐका २ संतांची पूजा ज्या ठिकाणी होत असते तेथेच स्वतःच्या पूजनाची इच्छा धरणे हे जन्ममृत्यूपच्या फेऱ्यात सापडण्यासारखेच आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या श्रेष्ठ आसनावर दुसरा एखादा सामान्य मनुष्य जाऊन बसेल तर सारेच दृश्य विशोभित दिसेल ४ २७५ जेणें मुखें स्तवी । तेचि निंदे पाठीं रवी ॥ १ ॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोने खाय माती ॥ २ ॥ गुदद्वारा वाटे । मिष्टान्नाचा नरक लोटे ॥ ३ ॥ विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - स्तवी-स्तुती करतो, याती-जाती अर्थ - हा मनुष्य कसा आहे पाहा ज्या मुखाने स्तुती करतो, त्याच मुखाने मागून हा निंदा करतो १ अशी ही या अधमाची जात आहे हा जवळचे सोने पुरून ठेवून माती खात असतो २ मिष्टान्नाचे जेवण करावे व गुदद्वाराच्या वाटेने त्याचीच विष्ठा व्हावी तसे याचे हे करणे असते ३ काही एक फायदा नसताना विंचू आपल्या नांगीत विषाचा साठा वाहत असतो तसे या अधम माणसाचे असते ४ २७६ अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥ १ ॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वाया विण ॥ २ ॥ सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥ ४ ॥
सार्थ तुकारामगाथा १३७ शब्दार्थ व टीपा :- यारी-संगत, प्रीती, कल्हारीं-कमळात, हृदयकमळात, क्षणी-नकारात्मक अर्थ. अर्थ :- अधम माणसाची प्रीती पतंगाच्या रंगाप्रमाणे क्षणभंगूर असते. १ एक क्षणात ती विटून जाते. तिची किंमत व्यर्थ होते २ याच्या हृदयकमळात सर्पाप्रमाणे विष नेहमी भरलेले असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असला हा अधम मला दाखवूसुद्धा नका. ४ २७७ आणिकांची स्तुति आम्हां ब्रह्महत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥ १ ॥ आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणां या देव आणिकांसि ॥ २ ॥ शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणिक संकल्पें । अवघींच पापे घडतील ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आणिकांची-इतर देवाची, शतखंड-शंभर तुकडे, रसना-जीभ. अर्थ :- त्या एका पांडुरंगाशिवाय इतर देवाची स्तुती आम्ही केली तर आमचेकडून ब्रह्महत्येचे पातक घडले असे समजा. १ आम्हा विष्णुदासाचा भाव एकच असतो व आम्ही इतर देवदेवतांना देवही मानीत नाही २ या माझ्या वचनात जर अंतर पडेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील. ३ या पांडुरंगप्रीतीशिवाय दुसरे काही भाव माझ्या मनात येतील तर माझ्या हातून जगातील सर्वच पापे घडल्यासारखे होईल असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ २७८ तान्हल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥ १ ॥ माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ २ ॥ तूं तों उदारांचा राणा । माझी अल्पचि वासना ॥ ३ ॥ कृपावृष्टीं पाहे । तुका म्हणे होई साहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धणी-तृप्ती, समाधान, उणी-कमी. अर्थ :- गंगेच्या पाण्याचे सेवन केल्यानंतर तृषाक्रांताची इच्छा तृप्त होते तो संतुष्ट होतो, पण गंगेचे पाणी काही कमी होत नाही. १ तेव्हा कृपेच्या सागरा, माझे मनोरथ एवढा पूर्ण करा ना. २ देवा, तुम्ही तर उदाराचे राजे आहात व माझी मागणीही अगदी अल्प आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, केवळ कृपावृष्टीने देवा, माझ्याकडे पाहा व मला साह्य करा ४ २७९ संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥ १ ॥ घेती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ २ ॥ अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । ताडन भेदकांची सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गाळी-घालवून देतो, शिवी, भेदक-देव व संत यांच्यात भेद करणारे. अर्थ :- घरी यज्ञाने देवपूजा चालू असताना घरात संत आले व त्यांचा सत्कार जर घडला नाही तर तो अधर्म आहे. १ अशा वेळी देवाला भक्तिभावाने मंत्रपुष्पे वाहिली तरी ती दगडाच्या वर्षावाप्रमाणे देवासही वाटतील. २ दाराशी अतिथी आला असताना त्याला घालवून देतो किंवा शिवी देतो व देवाला नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी दाखवितो हाही अधर्मच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या भेदबुद्धीने केलेली सेवा ही सेवा नसून एक प्रकारची माराची शिक्षाच नव्हे काय ? ४ २८० करणे तें देवा । हेचि एक पावे सेवा ॥ १ ॥ अवघें घडे येणें सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ २ ॥ तु गा १८
हेचि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥ ३ ॥ तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वर्म-रहस्य, त्रिवाचा-तीन वेळा उच्चार करून. अर्थ - संतांची सेवा हीच खऱ्या अर्थाने देवास पोचते. १ भक्त किंवा संत हा एक देवाचेच अंग असल्यामुळे त्याच्या पूजनाने सर्व काही गोष्टी परिपूर्ण होतात २ धर्म म्हणून जो सांगितला जातो त्याचे हेच एक रहस्य आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तीन वेळा उच्चार करून सांगत आहे हेच खरे आहे. ४ २८१ मार्गे नेणपणे घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥ १ ॥ परनारीचें जया घडलें गमन । दाखवितो वदन जननीरत ॥ २ ॥ उपदेशा वरी मन नाही हातीं । तो आम्हा पुढती पाहूं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे साक्षी असो द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सीमा-मर्यादा अर्थ :- मागे न जाणता जे काय घडले असेल ते असो त्याची तुम्हास क्षमा आहे. पण आता येथून पुढे मात्र नीट रीत किंवा मर्यादा घालून देतो ती गोष्ट ऐका १ परस्त्रीगमन ज्यास घडले आहे व जो उजळ माथ्याने वर तोंड दाखवीत आहे त्यास आईशी गमन करण्याचे पातक लागते २ मी हा उपदेश केल्यावरही ज्याचे मन स्वाधीन राहात नाही, त्याच्या मुखाचे दर्शनही मला आता यापुढे नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही घातलेली शपथ पाळण्यासाठी तुम्ही आपले मनच प्रथम साक्षी ठेवा ४ २८२ आणिकांच्या घातें । ज्याचीं निवतील चित्तें ॥ १ ॥ तेचि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ २ ॥ कान पसरूनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निरयवासी-नरकात राहणारे, भांड-भांडखोर. अर्थ - दुसऱ्याचा घातपात केल्यामुळे ज्याच्या चित्ताला समाधान वाटते, १ तो पापी समजावा तो शीघ्र- कोपी मानून त्याचा वास नरकात असतो असेच समजावे २ तो नेहमी कान टवकारून वाईट बोलणे ऐकत असतो; स्वतः बोलत असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य नुसता भांडखोर असतो त्याच्या तोंडाला धरबंध नसतो कधी. ४ हनुमंतस्तुति-अभंग ४ २८३ शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥ १ ॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ २ ॥ शूर आणि धीर । स्वामिकार्यीं तूं सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे रुद्र । अंजनीचिया कुमरा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुभटा-श्रेष्ठ वीरा, सादर-तत्पर, रुद्रा-शिवा, अंजनी-हनुमंताची आई अर्थ :-मारुतीराया, हनुमंता, तुम्ही श्रीरामचंद्राचे सेवक आहात. म्हणून मी तुम्हास पुन: पुन वन्दन करतो. १ हे श्रेष्ठ अशा वीर पुरुषा, भक्तीच्या ज्या वाटा आहेत त्या मला दाखवा ना. २ तुम्ही शूर व धैर्यवान आहात, स्वामीच्या, रामचंद्राच्या कोणत्याही कामासाठी तुम्ही तत्पर असता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अंजनीमातेच्या कुमारा, हनुमंता, तुम्ही प्रत्यक्ष शिवाचेच रूप आहात. ४
सार्थ तुकारामगाथा १३९ विवरण - तुकारामबुवांचे आराध्य दैवत पंढरपूरचे श्रीविठ्ठल हेच असले तरी याच श्रीविठ्ठलाच्या म्हणजे श्रीकृष्णच्या पूर्वावतारी रामचंद्राचा एकनिष्ठ भक्त हनुमंत याची महती भागवत सांप्रदायी साधुसंतांनी विशेष मानली आहे शक्ती, बुद्धी व स्वामीच्या कार्याविषयी तत्परता याबद्दल हनुमंताचे नाव प्रसिद्ध आहे विठ्ठलरखुमाईच्या दोन्ही अंगास गरुड व हनुमंत यांचीच जोडी हात जोडून उभी असते 'गरुड हनुमंत पुढे उभे राहती' असे वर्णन विठ्ठलाच्या प्रसिद्ध आरतीत आहे याच गरुडाचा अवतार मानतात नामदेवांनी याचे चरित्र अगदी थोडक्यात वर्णन केले आहे 'पिंड धारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥ अंजनीच्या तपासाठी । महारुद्र आले पोटीं ॥ चैत्र शुद्ध पौणिमेसी । सूर्योदयसमयासी ॥ महारुद्र प्रगटले । नामा म्हणे भ्या वदिले-' ॥ भक्ती व शक्ती यांचे प्रतीक असलेल्या या हनुमंताच्या श्रेष्ठतेचे वर्णन सर्वत्र मिळने एकनाथांनी याचे वर्णन, 'वानराचा वेष सुवर्ण पौवीन । दिसतों शोभायमान कुंडले तर्णी । जन्मताची जेणे सूर्याते धरियेलें । इंद्रादिका दिले थोर मार' अशा शब्दांत केले आहे खालील तीनचार अभंगातून तुकारामबुवांनी हनुमंताची स्तुती करून त्याच्या कार्याची ओळख करून दिली आहे हनुमंत हा सुमेरुचा राजा केसरिन व गौतमकन्या अंजनी यांचा पुत्र होय वायुपुत्र म्हणूनही याचा लौकिक आहे दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञातील पायसाचा भाग घारीच्या ताडून पडलेला अंजनीच्या ओंजळीत पडला व त्याच्या सेवनाने तिला हा पुत्र झाला या मोठ्या बलवान, ज्ञानवान सेवकाचा महिमा रामायणात विशेषत्वाने दिसून येतो रावणान सीतेचे हरण केल्यानंतर तिच्या शोधासाठी जे प्रयत्न झाले त्यात याच्या प्रयत्नाचे महत्व विशेष होत हरप्रयत्नांनी याने समुद्र उल्लंघून लंकेत प्रवेश केला अशोकवनातील सीता याने शोधून काढली रामाची मुद्रा दाखवून खूण पटविली नंतर याने अशोकवनाचा नाश केला रावणाकडून आलेल्या जंबुमालि विरूपाक्ष इत्यादी पाच सेनापतींचा याने पराभव केला नंतर इंद्रजिताने यास ब्रह्मास्त्राने बांधून रावणासमोर आणले याचा मृत्यू शेपटीत असल्याने शेपटीस आग लावण्याचे ठरले शेपटीस सर्व लंकेतील वस्त्र गुंडाळली तरी ती उघडीच राही, तेल ओतल्यावर रावणाने फुंकर मारल्याबरोबर त्याची दाढी जळून गेली अशी कथा आनंद रामायणात दिलेली आहे पुढे याने आपल्या पेटविलेल्या शेपटीने सारी लंका जाळून टाकली प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी तर याने हजारो राक्षस मारिले वानरांना संजीव करण्यासाठी निरनिराळ्या औषधी वनस्पती यानेच आणल्या याने रावणाचा पराभव केला लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर याने द्रोणागिरी माथावर उचलून आणला युद्धसमाप्तीनंतर याने रामावरची निष्ठा सोडली नाही राज्याभिषेकाच्या वेळी हनुमंतानेच समुद्राचे पाणी आणले रामचंद्राबराबर याचीही कीर्ती वाढली व एक आदर्श सेवकभक्त म्हणून याचे नाव प्रसिद्ध झाले सप्त चिरंजीवांपैकी हा एक आहेच, अर्जुनाचे रथावर याचे स्थान असे रामावर एवढी निष्ठा होती की ज्यास राम नाही त्या रत्नाचाही लोभ त्यास नसे रामभक्तीचा आदर्श म्हणजे हनुमंत होय २८४ केली सीताशुद्धी । मूळ रामायणा अर्थीं ॥ १ ॥ ऐसा प्रतापी गहन । सुरा सकळां भक्तांचे भूषण ॥ २ ॥ जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥ ३ ॥ राम लक्ष्मण । नेले आणिले चोरून ॥ ४ ॥ जोडूनिया कर । उभा सन्मुख समोर ॥ ५ ॥ तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सीताशुद्धी-सीतेचा शोध, गहन-श्रेष्ठ अर्थ :- या हनुमंतानेच सीतेचा शोध केला सर्व रामायणकथेस याच गोष्टीचे मूळ आहे १ असा हा पराक्रमी हनुमंत श्रेष्ठ असून सर्व देवाना व भक्ताना भूषणभूत झालेला आहे २ यानेच पाताळात जाऊन देवांची फजिती केली होती ३ अहिरावणमहिरावण यांनी रामलक्ष्मणास चोरून नेले होते, तेव्हा यानेच त्याचा वध करून १ सुरा सवळा मोहन
१४० सार्थ तुकारामगाथा रामलक्ष्मणास सोडवून आणले. ४ हा हनुमंत रामचंद्रजवळ दोन्ही हात जोडून नेहमीच उभा असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, या वायुपुत्राच्या जपाने सर्व पापाचा नाश होत असतो. ६ २८५ काम घातला बांदोडी । काळ' केला देशधडी ॥ १ ॥ तया माझें दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥ २ ॥ शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥ ३ ॥ रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बांदोडी-दंडीत अर्थ :- या हनुमंताने कामास जिंकून त्याला बंदिवासातच टाकले व यमास किंवा काळास देशोधडीस लाविले. हा चिरंजीव राहिला. १ वानरवंशातील या हनुमंतास माझे नमस्कार असोत. २ या हनुमंताचे शरीर वज्रासारखे कठिण असून याचे शेपूट एवढे आहे की त्याचा वेढा सर्व ब्रह्मांडालाही बसेल. ३ अरे रामाच्या सेवका, हनुमंता, मी तुकाराम तुम्हास शरण आलो आहे. ४ २८६ हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥ १ ॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ २ ॥ करोनी उड्डाण । केले लंकेचे शोधन' ॥ ३ ॥ जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- महाबळी-मोठा पराक्रमी, शोधन-शोध, शुद्ध अर्थ :- हा हनुमंत मोठाच बलवंत आहे, कारण याने त्या दुर्लाड्य व मदोन्मत्त रावणाची दाढीच जाळून टाकली. १ त्या श्रेष्ठ व बलवान हनुमंतास माझा नमस्कार पुनः पुनः असो २ समुद्रावर उड्डाण करून याने सर्व लंकेचा शोध लावला, लंका जाळून शुद्ध केली ३ याने सारी लंका जाळून रावणाच्या मदमत्त अशा वैभवाचा नाश केला मारुतीचा हा पराक्रम फार मोठा असून तुकाराम महाराज धन्य धन्य म्हणून त्याचा गौरव करतात ४ २८७ कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकाँ गू फेडावा ॥ १ ॥ ऐसे भिन्न भिन्न सांटे । केले प्रारब्धाने वांटे ॥ २ ॥ हिरे दगड एक खाणी । कंचे विजातीसी पाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कुंभ-मडके, पाकी-स्वयंपाकात, फेडावा-काढण्यासाठी, सांटे-प्रकार, पाणी-तेज अर्थ .- सर्व मडकी ही कुंभाराच्या एकाच आव्यात तयार होतात, परंतु एक स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते व दुसरे गू काढण्यास उपयोगात येते १ याच न्यायाने प्रारब्धाने माणसांचे निरनिराळे प्रकार केले आहेत. २ हिरे व दगड एकाच खाणीतून जन्मास येतात, पण हिऱ्यास चमकदार पाणी असल्याने ते वेगळ्या जातीचे ठरतात व दगड दगडच राहातात ३ तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे एकेकाचे नशीब पाहा कसे बनते, एक हिरा राज्याच्या डोक्यावरील मुकुटात जाऊन बसतो व दुसरा दगड म्हणून कुठेतरी पायरीला बसतो ४ २८८ मांडे पुऱ्या मुखे सागो जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥ १ ॥ ऐशियाच्या गोष्टी फिक्या मिठेविण । रुचि नेदी अन्न चवी नाही ॥ २ ॥ बोलों जाणे अगी नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें ते ॥ ३ ॥ तुका म्हणे बहुतोडे जे वाचाळ । तेग तेच मूळ लटिक्याचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मात-गोष्ट, रिते-रिकामे, बहुतोंडे-फार बोलणारे, तेंग-तेच, लटिक्याचे-खोट्याचे. १ काळ घातला तोरडी, २ दहन
सार्थ तुकारामगाथा १४१ अर्थ :- भांडे, चुन्या याच्या नुसत्या गोष्टीच तोंडाने म्हटल्याने काय साधते ? तोंडास फक्त पाणी सुटते व हात मात्र रिकामेच राहून एकमेकांवर चोळले जातात १ असे नुसते बोलणाऱ्या माणसाच्या गोष्टी मिठाशिवाय असणाऱ्या अन्नाप्रमाणे फिक्क्याच असतात, त्या अन्नाला व त्या बोलण्याला कसलीच चव नसते. २ तोंडाने खूप बडबड करतो, पण अंगीं शूरपणा मुळींच नाही; त्याच्या तोंडाची बडबड काय जाळायाची ? तिचा काहीच उपयोग नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे अतिशय व वृथा बडबड करणारे पुष्कळजण मोठे वाघाळें असतात पण त्याचे सारे बोलणे सर्व खोटेपणाचेच मूळ असते. त्यात सत्याचा किंवा स्वानुभवाचा अंशही कधी असत नाही. ४ २८९ न लगे चंदना सांगावा' परिमळ । वनस्पतिमेळ हाकारूनी ॥ १ ॥ अंतरींचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ २ ॥ सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरण कर म्हून ॥ ३ ॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- परिमळ-सुवास, अंतरीचे-मनातील, म्हून-म्हणून, मयूरें-मोर. अर्थ :- रानावनातील इतर झाडाझुडपांना आपल्या अंगच्या सुवासाबद्दल चंदनास सांगावे लागत नाही तो आपोआपच प्रकट होत असतो १ जे अंतरगात म्हणजे मनात आहे ते स्वभावतःच बाहेर धावत असते, व्यक्त होत असते. त्याला आवरून धरले तरी ते आवरत नाही. २ आपले प्रकाशकिरण तेजस्वी आहेत असे म्हणून लोकांना सूर्य स्वतः होऊन काही सांगायला जात नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मेघ दिसताच मयूर आपोआप नाचू लागतात, त्यांनाही सांगावे लागत नाही. जे खरे आहे ते लपविता येत नाही. ४ २९० चंदनाचे हात पायही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥ १ ॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साखर अवघी गोड ॥ २ ॥ तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळेचि ना ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- हीन-कमी प्रतीचे, साखर-साखर. अर्थ :- चंदनाचे हातपाय, खोडमूळ सर्व अंगच चंदनमय असते. परिसाची कोणतीही बाजू कधी हीन नसते. तो अंतर्बाह्य परीसच असतो. १ दिव्याास मागेपुढे अंधार कसा दिसणार ? साखर सर्वांगाने गोडच असणार. २ तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणेच सज्जन सर्व बाजूंनी सज्जनच असायचा अवगुण पाहता कुठेही दिसणार नाही. ३ २९१ मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥ १ ॥ मने प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ २ ॥ मन गुरु आणि शिष्य । करी आपुलेंचि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥ ३ ॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सिद्धी-जे साधायाचे ते, मात-गोष्ट, आनु-दुसरे. अर्थ :- तुम्ही आपले मन आधी प्रसन्न ठेवा. कारण जे साधायाचे आहे त्या सिद्धीचे सर्व कारण मन हेच आहे. मोक्ष अथवा बंधन, सुख, समाधान, इच्छा वगैरे जे काही आहे ते सर्व मनापासूनच मिळते. १ दगडाची १ पुसावा
१४२ सार्थ तुकारामगाथा प्रतिमा अथवा मूर्ती मनाने स्थापन केली व तिची मनोमय पूजा मनानेच केली, मनानेच सर्व इच्छा पुरविल्या, आणि सर्व वासनांची, संकल्पाची माउली मनच होय २ गुरु आणि शिष्य हे मनाचेच प्रकार कल्पिले मनच स्वतःचे दास्य करू लागते. मनच स्वतःवर स्वतःच प्रसन्न असते चांगली किंवा वाईट गती या मनामुळेच प्राप्त होत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, साधकांनो, पंडितांनो, वाचकांनो, श्रोत्यांनो, वक्त्यांनो, एक गोष्ट ऐका ती ही की या मनाखेरीज दुसरे दैवत नाही ४ विवरण :- भागवत धर्मोय संतांनी चित्तशुद्धीवर फार भर दिलेला आहे. मन हे सर्व सिद्धीचे साधन, असल्याने ते शुद्ध राखणे, त्यास वळण देणे, ते ताब्यात ठेवणे, त्यावर अस्वार करणे, ने ईश्वराच्या ठिकाणी स्थिर करणे याची फार आवश्यकता संतांनी सांगितली आहे मन हे अति चंचल, अति खवळळ, हट्टी, दुराग्रही असल्याने व सर्व सुखांचेही साधन तेच असल्याने त्याची मशागत ही फार महत्त्वाची मानली जाते मन स्थिर झाल्याशिवाय, शांत झाल्याशिवाय कसलेही सुख नाही वरवर कसलाही डौल मिरविला तरी मन स्वस्थ नसेल तर सारे व्यर्थ आहे म्हणून मनोजयास, मनाच्या स्थिरतेस फारच महत्त्व आह पण ही स्थिरता यावी कशी ? मन स्वभावत च चंचल आहे, प्रमाद करणारे आह, त्याचा निग्रह करुन त्यास ताब्यात ठेवणे फार कठिण आह पण अभ्यासाने व वैराग्याने त्यावर स्वामित्व मिळविता येते असा गीतेचा आदेश आहे 'चञ्चलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्' असा मनाचा स्वभाव आहे वाऱ्याची मोट बांधणे जितके अवघड तितकेच मन वळविणे अवघड या अस्थिर मनाचे मोठे समर्पक वर्णन ज्ञानदेवानी करून म्हटले आहे, ' हे मन कैसे केवडें । ऐसे पाहों म्हणो तरी न सापडें । एन्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य याया ॥ म्हणोनि ऐसें कैसे घडेल । जें मर्कट समाधी येईल । दा राहा म्हणतलिया राहेल । महा- वायु ॥ जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी । धैर्येसीं हातरुळी । मिळऊनी जाय ॥ जें विवेकेंतें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥ परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविले अभ्यासाचिरे मोहरे । तरि केतुलेनि एके अवसरे । स्थिरावेल' या मनाची अस्थिरता बहुतेप सर्वांनी वर्णन केली आहे 'चंचळळ मन माझे नावरे आवरीता' म्हणून रामदासानी मनासच केलेला उपदेश प्रसिद्ध आहे हे चंचल मन कसे फसवे आहे व कसे झुकाड्या देत असते याचे मोठे सुंदर वर्णन एकनाथानी आपल्या भागवतात केले आहे 'निग्रहाच्या निज मन । साधक साधितो प्राणापान । त्यासीहो छेळोनिया मन । जाय निघोन तत्काळ ॥ मनोनिग्रह करिता देख । मन खवळे अधिकाधिक । मनोनेमी सज्ञान लोक । शिणले साधक साधनीं ॥ वारा बाधवेल मोठें । अग्नि प्राशवेल अवघटें । समुद्र घोटवेल घोटें । मन आत्मनिष्ठे तरी न ये ॥ आकाश फाडवेल चौघडी । महामेरु बाधवेल पुढीं । शून्याची मुरडवेल नरडी । परि या मनाच्या जोडी अनिवार ॥' अशा या दुराग्रही, हट्टी आणि चंचल मनास वश करता येते ते वैराग्य, सत्सग, प्राणायाम, हरिभक्ती, नामस्मरण, भजन इत्यादी उपायानी नाथांनी भागवतात मन स्थिर करण्याचे उपाय भिक्षुगीतात सांगितले आहेत मनाशीं वैर करावे, मनाशी मैत्री करावी, मनाविषयी उदासीन राहावे असे तीन मार्ग मनोजयाचे त्यानी सुचविले आहेत 'वैर करोनि मनचि मारावे । मित्रत्वें मनें मन साधावे । इयें दोन्ही जें न संभवें । तं उपेक्षावे मनातें ॥' मनोनिग्रहावरचे नाथाचे हे निरूपण अतिशय महत्त्वाचे व समर्पक असे आहे सर्व साधुसंतानी या मनास ताब्यात ठेवण्यासाठी उपाय सुचविले आहेत 'आधीं मन घेई हातीं । तोचि गणराज गणपती ॥ मन इंद्रियाचा राजा । त्याची सर्वभावें पूजा' असे तुकोबांनीच एका अभंगात पुढे म्हटले आहे 'मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं' या शब्दात त्यांनी मनाची चंचलता वर्णन करुन 'तुका म्हणे मन चंचळ । हातों येईल गुरूच्या बळें' असा एक उपायही सुचविला आहे मनानेच मनाला जिकावयाचे असल्याने हे फार कठिण काम वाटते नाथांनी 'जैवि हिरेनि हिरा चिरिजे । तेवी मनेंचि मन धरिजे' म्हणून सांगितले आहे. हिऱ्यानेच हिरा चिरावा लागतो, त्याप्रमाणे मनानेच मनास जिकावे
सार्थ तुकारामगाथा १४३ लागते. भावार्थ रामायणात एकनाथांनी मनोजयाचा एक उपाय सुचविला आहे. ते म्हणतात, 'मनें मनातें आवरावें । मनें मनातें निग्रहावें । मनें मनातें धरावें । मनें मारावें मनातें ॥' या मार्गाने जर मन स्वाधीन झाले, श्रीहरीकडे वळले तर मग सर्व सुख हाती आलेच म्हणून समजावे. जर असे हे मन हाती येईल तर काय काय सिद्ध होईल, याचे वर्णन करताना नाथांनी म्हटले आहे, 'या मनाची एक उत्तम गती । जरी स्वयें लागलें परमार्था । तरी दासो करी चारी मुक्ती । वे शोधीनि हातीं परब्रह्म ॥' एवढे या मनाचे सामर्थ्य आहे. यासाठीच तुकारामबुवा या मनास प्रमथ करा म्हणून सागतात. या मनास वश करुन घेतल्याने रोज नवीन नवीन जागृती येते राहील असे त्यांनी 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दीस जागृतीचा' या शब्दात सांगितले आहे. तुकोबांनी स्वतःच्या आपुल्याचा जो मधून मधून क्म दिला आहे त्यावरून त्यांनाही या मनास ताब्यात ठेवण्यासाठी केवढे सायास पडले असावेत याची कल्पना येते. 'आवरितां मन नायरे दुर्जन । घात करी मन माझें मज,' 'निरोधिते परी न मोडे विकार । बहूं हीं दुस्तर विषय द्वारें', 'एकाचेंही मज न घडे दमन । अवधीं नेमून फंसा राखौं' यासारख्या ओळीतून तुकोबाच्या मनोनिग्रहाच्या प्रयत्नाची थोडीफार कल्पना येते. 'कोण तुम्हांवीण मनाचा चालक । बुजे सांगा एक नारायणा ?' म्हणून एके ठिकाणी प्रश्न विचारून त्यांनी आपल्या अवखळ मनाम काही उपाय सुचविले आहेत. 'मना एक करों । म्हणे मी जाईन पंढरी ।', 'देवाचिये पायीं मना देईं बुडी । नको धांवो घोडी इंद्रियांचे' असा काही ओळीतून त्यांनी मनाम वश करण्याचे मार्गही सुचविले आहेत. या सर्व प्रयत्नाचा अर्थ हाच की सर्व सिद्धीचे वा वधमोक्षाचे खरे कारण मन हे एवच आहे 'मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः' हाच विचार तुकाराम महाराजांच्या समोर असावा या मनामुळेच मोक्ष वा बंधन याची प्राप्ती होते २९२ मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥ १ ॥ चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥ २ ॥ तुका म्हणे नरकों घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- संगें-पंगतीत, न पवे-पावत नाही. अर्थ :- आई सर्पीण व बाप बोका असल्यावर त्यांच्या संगतीत मुलाला सुख कसले लागणार ? तो कधीच सुखी होणार नाही कारण सर्पीण अंडो नासणार व बोका पिले खाणार. १ चंदनाचा शूळ असला आणि बेडी सोन्याची असली तरी सुख कसे घाटणार ? चंदनाचा शूळ आपले प्राणघाताचे काम करणारच. त्याच्या सुगंधाचा वा थडपणाचा काय उपयोग ? सोन्याची बेडी नाशच करणार. २ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे ज्ञानाचा गर्व झाला म्हणजे सुख न होता दुःखाचा नरकच प्राप्त होणार. ३ २९३ शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥ १ ॥ पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ॥ २ ॥ तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥ ३ ॥
१८४ सार्थ तुकारामगाथा सत्त्वरजततमाधा । नव्हे हरिमक्तासि कदा ॥ ३ ॥ खाय बोले करी । अवघा त्याच्या अगें हरी ॥ ४ ॥ देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रारब्ध-पूर्वजन्माचे कर्म, संचित-जे भोगानेच संपणारे असत ते कर्म, क्रियमाण-चालू घडीचे कर्म अर्थ - ईश्वराच्या भक्तांना पूर्वजन्मीचे कर्म, भोगावयाचे साठलेले कर्म- चालू घडीचे कर्म अशा रूपात प्रारब्ध, संचित व क्रियमाण वगैरे सर्व कर्मभोग काही नसतात १ हा भक्त सर्व बाजूंनी देवच बनून राहिलेला असतो अंतर्बाह्य त्याला देवत्व प्राप्त झालेले असते २ या हरिमक्तांना सत्त्व, रज, तम या त्रिगुणाची बाधा कधीच होत नसते ३ प्रत्यक्ष श्रीहरी या भक्तांच्याबरोबर खातो, बोलतो, कामें करतो, सर्व कर्मे देव त्यांच्याबरोबरच करतो ४ तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे देव व भक्त भिन्न नसून एकच आहेत ५ २९५ शास्त्राचे जें सार वेदाची जो मूर्ति । तो माझा सागाती प्राणसखा ॥ १ ॥ म्हणउनी नाहीं आणिकाचा पाग । सर्व जाले सांग नामें एका ॥ २ ॥ सगुण निर्गुण जयाचीं हीं अगें । तोचि आम्हा सगै क्रीडा करी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सागाती-सोबती, जिवलग मित्र, पाग-गरज, सांग-पूर्ण, विधी-सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव, जनिते-जन्म देणार, स्वयंभू-स्वत होऊन झालेले अर्थ - सर्व शास्त्राचे सार जे वेद त्याची मूर्तीच माझा जिवलग असा प्राणसखा मित्र आहे १ म्हणून मला दुसऱ्याच्या संगतीची गरजच नाही याच्या एका नामस्मरणाने सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत २ सगुण व निर्गुण ही ज्याची दोन प्रमुख अंगे आहेत तोच आमच्याबरोबर क्रीडा करीत असतो ३ तुकाराम महाराज म्हण तात, आम्ही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे बाप आहोत, आम्हीच त्याला निर्माण केले, त्याने आम्हास नाही आम्ही स्वतः होऊनच निर्माण झालो कोणी तरी आम्हास आयते बनविले असे नाही ४ विवरण - या एव लहानशा पण तत्त्वपूर्ण अभंगात बुवांनी तीन सिद्धान्त स्पष्टपणे सांगितले आहेत पहिला असा की त्यांचा परमेश्वर हा वेदांच व शास्त्रांचे सार आहे तो वेदप्रणीत आहे. 'वेदांचा तो अर्थ आम्हांसचि ठावा' म्हणणाऱ्या तुकोबांनाच हे शोभून दिसणार आहे 'वेद अनंत बोलीला अर्थ इतकाचि साधिला । विठोबासी शरण- जावे' हाच अर्थ तुकोबांनी वेदांतून काढलेला आहे तुकारामबुवांचा विठ्ठल हा वेदांचा शास्त्राचा, पुराणाचा एव पुतळाच आहे 'सावळें रूप ड्यावे डोळा । सा ची अक्षरचा मेळा' असा उल्लेख त्यांनी एका अभंगात केला आहे हा षडंगेचा राजा म्हणज 'सकळ शास्त्रांचे हैं सार । हे वेदांचे गव्हार' म्हणून दुसऱ्या एका ठिकाणी बुवानी म्हटले आहे दुसरा सिद्धान्त तुकाराम महाराजांच्या या अभंगातील असा आहे की हा आमचा देव सगुण आहे आणि निर्गुणही आहे सगुणनिर्गुणांना भेद हा वरवरचा आहे निर्गुण हा शब्दच एका गुणांचे वर्णन करणारा आहे भोगासाठी, प्रेमासाठी भक्तीसाठी निर्गुणच सगुण झाला, निराकार जो तो साकार झाला पण म्हणून तो फार निराळा झाला अस नाही 'तुज सगुण म्हणूं कीं निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदु रे' अशी प्रचीती सर्व साधुसंतांचीच आहे 'जेथुनि उद्गारू प्रसवले ॐकारू । तोचि हा श्रीवरू गोकुळीं वसे' असे याच वर्णन निवृत्तीनाथांनी केले आहे 'सगुणीं निर्गुण निर्गुणीं सगुण। दोन्हीही निरूपण नसे मूळी', 'निर्गुणा अंगीं सगुण बाणले । निर्गुण सगुण एकत्रचि आले।' अशा शब्दांत श्रीज्ञानेश्वरांनीही सगुपनिर्गुणांचे ऐक्य प्रस्थापित केले आहे तुकारामबुवांचे तर शेकडो अभंग या विषयी आहेत 'अद्वयाचि द्वय झालेचि कारण । धरिले नारायणे भक्तिकुलें।' यासारख्या ओळींतून तुकांचा हा सिद्धान्त चट्कन् मांडून जातात तिसरा एक महत्त्वाचा सिद्धान्त तुकोबांनी या अभंगात मांडला आहे तो असा की देवाच्याही आधी आपण भवन स्वयंभू आहोत देवाने, ब्रह्मदेवाने हे सर्व चराचर विश्व निर्माण केले असे आपण मानता, पण येथे बुवांची
सार्थ तुकारामगाथा १४५ धारणा अशी की आम्ही भक्तांनीच ब्रह्मदेवासही जन्म दिला आम्ही भक्त आहोत म्हणून देवास देवपणा आहे आम्ही पतित आहोत म्हणून तो पतितपावन म्हणून नावारूपास आला आहे नाही तर त्याला कोण पुसतो ? 'जरि मी नव्हतों पतित । तरि तू पावन कंचा तेथ ?' म्हणून त्यांनी एकदा परमेश्वरास विचारलेच आहे 'लोहें महिमान परिसा। नाहीं तरी दगड जैसा' लोखंड आहे म्हणून परिसाचे महत्त्व भक्त आहे म्हणून देवाचा महिमा मूळ आहे म्हणून तर ती बाई आईपणास आली बाईने मुलास जन्म दिला खरा, पण या मुलानेही आपल्या जन्माबरोबर बाईस आईपणाचा जन्म दिला भक्ताने ईश्वराचे स्थान स्थिर केले असा मजेचा खेळ आहे हा २९६ ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय १भिलटीचीं ॥ १ ॥ थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ २ ॥ पल्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडेच ॥ ३ ॥ न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तोपुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडीची-प्रेमाची, भिलटीचीं-शबरी नावाच्या भिल्लीणीची, पल्हे-पोहे, फके-मूठ अर्थ - भक्तांचा महिमा केवढा असतो तो नीट ऐका ना. या रामाने प्रेमापोटी शबरीची उष्टी बोरे वनवासात असताना तिचे प्रेम पाहून खाल्ली. १ हा ईश्वर भक्ति-प्रेमाचा मोठाच भुकेलेला असतो, त्याच्या घरी याचाच दुष्काळ असतो त्याला खरे म्हणजे आठही सिद्धी व क्षीरसागर याचा लाभ असूनही तो त्यांना मानीत नाही २ दरिद्री सुदाम मित्राचे पोहे खाण्यासाठी हा लोभावलेला असतो घरी दुधाचा समुद्र असूनही ते पोहे कोरडेच खावयास याला आनंद वाटतो ३ प्रीतीच्या पोटी तो वस्तु उष्टी आहे की थोडी आहे हेही पाहात नाही ४ विवरण .- देवास भक्ताचे प्रेम किती थोर वाटते, तो त्याच्यासाठी किती आसुसलेला असतो याचे वर्णन संतानी अनेक अभंगातून केले आहे येथे शबरीच्या उष्ट्या बोराच्या कथेचा संक्षेपान उल्लेख केला आहे शबरी एक भिल्लीण ही रामावताराच्या वेळी दक्षिणेत मातंग ऋषीची व त्याच्या शिष्याची सेवा करून राहात असे रामचंद्र वनवासात असताना जेव्हा या अरण्यात आले तेव्हा हिने रामलक्ष्मण यांचे उत्तम स्वागत केले रामाचे आगतस्वागत करून हिने ताजी बोरे रामचंद्रास खावयास दिली ती चाखली चांगली अशी निवडून, चाखून पाहून तिने रामासाठीच वेचून ठेविली होती अशी कल्पना सुदामदेव श्रीकृष्णाचा परममित्र दरिद्री व वद्रावस्थेत राहिला, पण श्रीकृष्णभेटीस तो त्याच्या सुवर्णाच्या राजवाड्याकडे निघाला तेव्हा त्याने फडक्यात मूठभर पोहे बांधून घेतले श्रीकृष्णाने मोठ्या प्रेमाने ते कोरडेच खाल्ले अशी कथा आहे २९७ कोणे तुझा साग केला अगीकार । निश्चिंत त्यां थोर मानियेली ॥ १ ॥ कोणे ऐसा तुज उपदेश केला । नको या विठुला शरण जाऊं ॥ २ ॥ तेव्हा तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥ ३ ॥ का रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेदिस बळ क्षीण होतें ॥ ४ ॥ तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - अगीकार-स्वीकार, वदन-तोंड, नागवसी-फसतोस अर्थः-तुझा कुणी स्वीकार केला आहे म्हणून तू एवढ्या निश्चिंततेने वागू लागला आहेस ? १ या विठ्ठलाला शरण जाऊ नये असा तुला उपदेश तरी कुणी केला आहे रे ? २ जेव्हा यम पाठीशी लागेल व तुझे तोंड भूमीला लागेल, तेव्हा तुझी बाजू कोण सांभाळणार आहे ? ३ उगाच कां आयुष्य फुकट घालवितोस ? नागविला जातोस ? फसतोस ? हा काळ आयुष्य घालवोत बसला आहे ना दिवसेंदिवस बळही क्षीण होते ४ तुकाराम महाराज म्हणतात, याला कुणी तरी सांगायला हवे कारण हा मायबाप असा जो श्रीहरी त्यास विसरला आहे. ५ १ भिल्लणीची तु गाथा . १९
१४६ सार्थ तुकारामगाथा २९८ साधूनी बचनाग खातो तोळा तोळा । आणिकाते डोळा न पाहवे ॥ १ ॥ साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिके कापती देखोनिया ॥ २ ॥ असाध्य ते साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टोपा - साधूनी-साधन करून, बचनाग-भयंकर वीष, भुजंग-विषारी सर्प, सायास-प्रयत्न अर्थ - अभ्यास करून, साधने करून एवढी तयारी होते की दुसऱ्यांना डोळ्यांनी पाहावणार नाही. काही लोक भयानक असे बचनागाचे वीष तोळा तोळा खातात. १ त्याचप्रमाणे दुसऱ्यांना पाहताच थरकाप उडेल असे भयानक विषारी सर्पही हे लोक अंगावर धारण करतील. २ तुकाराम महाराज म्हणतात, प्रयत्न केला की सर्व काही साध्य होते जे असाध्य म्हणजे साधावयास कठिन वाटते ते प्रयत्न किंवा अभ्यास केला की सहज प्राप्त होते ३ २९९ आमचे गोसावी अयाचितवृत्ति । करवी शिष्याहातीं उपदेश ॥ १ ॥ दगडाची नाव आधीच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥ २ ॥ तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनीं । सोंगसंपादणी करितो परी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टोपा - अयाचितवृत्ति-न मागण्याची वृत्ती, परी-प्रकार अर्थ - आमची वृत्ती गोसाव्यासारखी, न मागण्याची आहे कुणी न मागता काही दिले तरच आम्ही ते घेतो, असे शिष्यांकडून सर्वांना सांगून काही गुरू दक्षिणा व भिक्षासामग्री मिळवितात, त्याचा काय उपयोग ? दगड आधीच जड, त्याची नाव दुसऱ्या दगडास कशी तारणार ? २ तुकाराम महाराज म्हणतात, अशा साधुसंतांनी जे अशा सोंगसंपादनीचे प्रकार केले, त्यामुळे त्यांनी साधुत्वाचे वेष विटाळून टाकले त्या पोषाखाचीच त्यांनी विटंबना केली ना ३ ३०० मृगजळा काय करावा उतार । पावावया पार¹ पैल थडी ॥ १ ॥ खापराचे होन खेळती लेकुरे । कोण त्या व्हेव्हारे² लाभ हानि ॥ २ ॥ मंगळदायक करिती कुमारी । काय त्याची खरी सोयरीक ॥ ३ ॥ स्वप्नींचे जे सुखदुःख जाले कांहीं । जागृतीं तो नाही साच भाव ॥ ४ ॥ सारीं जालीं मेली लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पार-पलीकडचा काठ, होन-नाणे, मंगळदायक-लग्नाचा सोहळा अर्थ - केवळ मृगजळाचीच नदी आहे, तेथे उतार कसला करावा ? पलीकडच्या तीरावर जाण्याची सोय करण्याची येथे काय जरूरी आहे ? १ लहान मुले खापराच्या तुकड्याची नाणी घेऊन व्यापाराचा खेळ खेळतात त्यांच्या व्यवहारात किंवा व्यापारात नफातोडा कसला असतो ? २ मुली आपापसात बाहुलाबाहुलीचे लग्न लावतात, पण ती त्यांची सोयरीक खरी की काय ? ३ स्वप्नात काही सुखदुःख झाले तरी जागेपणी त्याचा भाव काही खरा नसतो ४ त्याचप्रमाणे या सर्व जगात सारी जन्मास आली, मेली हे वचन खरे नाही आपण बद्ध, आपण मुक्त असे मानणेही व्यर्थ शीण म्हणजे त्रास मात्र आहे ५ विवरण :- या अभंगात एक तात्त्विक विचार तुवांनी मोठ्या कुशलतेने अनेक प्रकारचे दृष्टान्त देऊन मांडला आहे आपण पापी आहोत, आपण बद्ध आहोत, आपण पाशात अडकलेलो आहोत अशी आपली सारखी तक्रार असते व अनंत साधने करून आपणास या बंधनातून मुक्त व्हायचे असते. परंतु एकदा श्रीहरीच्या चरणी मन विसावले की मग हे बंधन सुटते, हा पाश मोकळा होतो, म्हणजे बद्धत्वाची अवस्थाच नाही अशी यथार्थ जाणीव होते मृगजळ जसे खोटे, स्वप्नीची सुखदुःखे जशी खोटी, बाहुलाबाहुलीची लग्ने जशी खोटी, खापराची नाणी जशी खोटी तसाच बद्धमुक्तीचा भाव खोटाच आहे जीव बद्ध व परमेश्वर मुक्त असे नाही एका थोर भूमिकेवर हा भेदच संपतो १ तीर, २ व्यापारे
सार्थ तुकारामगाथा १४७ 'मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥' असा एक तुकोबांचा अर्थपूर्ण चरण आह बंधनाची खोटी कल्पना माडली की मुक्तीची कल्पना आपोआपच गळते ना आणि यासाठी थोर मतानी मोक्ष अथवा मुक्ती याची काळजी कधीच केलेली नाही ३०१ माझें म्हणता याला का रे' नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥ १ ॥ कोणी सोडवी ना काळाचे हातौंचे। एकाविणें साचे नारायणा ॥ २ ॥ तुका म्हणे किती सागावे चाडाळा । नेणे जीवकळा' फोप्पा जोतो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टोपा - भाज-बायका, जीवकळा-जीवनाचे रहस्य अर्थ - हा भला गृहस्थ माझे माझे म्हणत असतो, याला लाज कशी वाटत नाही ? माझी कन्या, माझा पुत्र, माझी बायको, माझे धन, माझी सपत्ती असे हा म्हणतो याला लाज कशी वाटत नाही? १ प्रत्यक्ष यम येऊन दारात उभा राहिला की एका परमेश्वराखेरीज याला त्याच्या हातून कोणीही सोडविणार नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, या चाडाळास सांगावे तरी किती ? जीवनाचे रहस्य हा जाणीतच नाही कसा तरी जगून राहतो एवढेच ३ ३०२ आंधळयासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ॥ १ ॥ रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥ २ ॥ तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - विषतुल्य-विषासारख अर्थ - आंधळ्या माणसाास सब जगच बाघळ असे वाटते कारण त्याला स्वत ला डोळे व दृष्टी नाही १ रोगी माणसाला मिष्टान्न वाढले तरी त्याला त्याच्या तोंडात चव नसल्यामुळे ते विषासारखे वाटते २ त्याचप्रमाणे स्वत शुद्ध भावाचा नाही त्याला सर्व त्रिभुवनही खोटे वाटते ३ ३०३ छळो विष्णुदासा कोणी । त्याची अमगळ वाणी ॥ १ ॥ येऊ न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ २ ॥ नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥ ३ ॥ तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाची ते मति ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विष्णुदासात- भक्तास, याति-जात, मति-बुद्धी अर्थ - जो परमेश्वराच्या भक्तास छळतो त्याची वाणी अमगल समजावी १ तो अभागी व दुराचारी समजून त्यास समोरसुद्धा येऊ देऊ नये २ ज्याला हरिकथा आवडत नाही त्याची आई व्याभिचारिणी समजावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाची जात भ्रष्ट झालेली समजावी, त्याची बुद्धीही खोटीच मानावी ४ ३०४ बोलविती तैसे आणी अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥ १ ॥ मिठाँविण काय करावे मिष्टान्न' । शव जीवेविण शृगारिलें ॥ २ ॥ संपादणीविण विटविले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥ ३ ॥ कन्यापुत्रेंविण मगळदायके । वेचिले हैं फिके द्रव्य तरी ॥ ४ ॥ तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अतरीं प्रेमभाव ॥ ५ ॥ शब्दार्थ व टोपा - शव-प्रेत सपािणी-बतावणीचे आचरण, चांग-चागले, मगळदायक-लग्नसमारभ, वेचिले-खर्च केले, अतरीं-मनात १ नाहीं, २ जीवनकळा, ३ हो का तयाची भक्ती, ४ पक्वान्न
१४८ सार्थ तुकारामगाथा अर्थ - देवा, माझ्याकडून जसे बोलविता तसा अनुभव द्या ना नाही तर सर्वत्र विटंबना होणार आहे माझी १ मिष्टान्न अथवा पक्वान्न जरी झाले तरी मिठाशिवाय त्याची काय गोडी ? जीव नसलेले शरीर शृंगारून काय उपयोग ? २ सतायणी नीट न झाली तर सर्व सोंग व्यर्थच आहे चांगले गुण नसतील तर चांगल्या रूपाच काय करायचे ? ३ अगणित द्रव्य खर्च केले व बाहुल्याबाहुल्यांची लग्न केले, त्याचा काहीच उपयोग नाही कारण या लग्नात खरी कन्या किंवा खरा पुत्र यांपैकी कोणीच नसते ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, काही अनु भव तुम्ही दिला नाही तर माझीही अवस्था अशीच होईल यात संशय नाही ५ ३०५ अंगीं ज्वर तया नावडे साखर । जन तो इतर गोडी जाणे ॥ १ ॥ एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ २ ॥ चारितां बळें येत असे दांतीं । मागोनिया घेती भाग्यवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे नरो संचित हे बरें । तयास दुसरे काय करी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ज्वर-ताप संचित-पूर्वकर्म अर्थ - ज्याच्या अंगात ताप आहे त्यास साखर गोड लागणार नाही इतर लोकांनाच तिची गोडी समजणार १ एखाद्याच्या तोंडात अन्न पडले तर ते मातीसारख होऊन जाते, पण दुसऱ्यांना मात्र ते पोटभर खाल्याचा आनंद मिळतो २ प्रयत्न करून जरी त्याला अन्न चारले तरी ते त्याच्या दाती येते त्याला खाववत नाही, पण दुसरे भाग्यवंत असतात ते मात्र आवडीन मागवून घेऊन त्याचा स्वाद लुटतात ३ तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याचे पूर्वकर्मच बरे नसेल तर तो काय करणार ? त्याला दुसरा मनुष्य तरी काय करणार ? ४ ३०६ धिग जीणे तो वाईले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥ १ ॥ धिग जीणे ज्याचे लोभावरी मन । अतीतपूजन घडेचि ना ॥ २ ॥ धिग जीणे आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥ ३ ॥ धिग जीणे नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥ ४ ॥ तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - धिग-तुच्छ अतीतपूजन-अतिथीचे पूजन अमित-अमर्याद अघोरिया-अघोर कर्म करणाऱ्यास अर्थ - जो बाईलबेडा आहे ज्याचे वागण बायकोच्याच तंत्राप्रमाणे आहे त्याचे जगणे व्यर्थ आहे त्याला या लोकात मान नाही, परलोकात स्थान नाही १ ज्याचे चित्त केवळ लोभावर, फायद्यावरच असते व ज्याला कधी अतिथीचे पूजन घडत नाही त्याचेही जिणे व्यर्थ होय २ ज्या माणसांस फार आळस फार झोप, ज्याचे खाणे फार व जो अघोर कर्म करणारा आहे त्याचेही जिणे व्यर्थ आहे ३ ज्याला कुठल्याही गोष्टीचा विवेक नाही, ज्याला वैराग्याचा विचार शिवत नाही, व जो केवळ मानासाठी, साधुत्वाच्या ढोंगासाठी झुरतो त्याचेही जिण व्यर्थ आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे जिण कित्येक लोकांचे व्यर्थ झाले आहे हे केवळ निंदा करणारे, वाद करणारे असून ते नरकातच जाणारे आहेत ५ ३०७ अरे हे देह व्यर्थ जावे । ऐसे जरी तुज व्हावे । द्यूतकर्म मनोभावे । सारीपाट खेळावा ॥ १ ॥ मग कैंचे हरिचे नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिले ॥ २ ॥ विषयसुखाचा लपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा १४९ अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी सतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥ ४ ॥ तुक म्हणे ऐसे । मना लायी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासे । फुकट जासी ठकोनी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कोड-हौंस, राम पिस-देवाची आवड, सायासे-प्रयत्नाने, ठकोनी-फसून अर्थ - अरे गृहस्था, हा नरजन्म फुकट जावा असे तुला वाटत असेल तर तूं द्यूत खेळ ना सारीपाटाचा डाव मांडून सारखा बैस १ मग देवाचे नाव कसले आले आहे? जागा असून झोपल्याचे सोंग जो करतो त्यास कुठला राम ? कुठला देव ? असा हा मनुष्य जन्मोजन्मीचाच अधम समजावा. त्याने फार मोठ्या दुःखाचे साधन करून ठेविलेले असते २ जो विषयसुखाविषयी लंपट आहे, दासींशी सबंध ठेवण्यात जो धीट आहे त्याच्या आयुष्याची वाट अशीच अधोगतीचीच मानावयास हवी ३ आणखी कुणास नरकासच जायची हौस असेल तर नेहमी कौतुकाने संताची निंदा करावी म्हणजे ठीक होईल ४ तुकाराम महाराज म्हणतात, अरे, तुझ्या मनाला रामाचे वेड लावून घे ना नाही तर मोठ्या प्रयत्नाने मिळालेला हा नरजन्म फुकट जाईल ना ! विनाकारण फसशील ना तूं ५ ३०८ अवघें ब्रह्मरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥ १ ॥ नाहीं भाव तया सांगावे तें किती । आपुल्याला मतीं पाषाडिया ॥ २ ॥ जया भावें सत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकासि ॥ ३ ॥ तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळता खळीं दूषिला देव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रिता-रिकामा, ठाव-स्थान, प्रतिमा-मूर्ती, पाषाडिया-नास्तिकांना, अनुमोदन-अनुभव, खळीं-दुष्ट लोकांना अर्थ - सर्व जगच ब्रह्मरूप आहे रिकामी जागा कुठही नाही, असे असताना मूर्तीत देव नाही असे कसे म्हणता ? १ ज्याच्या मनांत भावच नाही, त्यांना सांगावे तरी किती ? असे नास्तिक लोक आपापल्या मतालाच धरून असतात २ सत ज्या भावनेने बोलतात त्याची प्रचीती केवळ शब्दांतून कल्पून घेणारांना येत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतानी केवळ भावालाच बलवान केले, महत्त्व दिले पण हे रहस्य न कळल्यामुळे दुष्ट लोकांनी देवालाच दूषण दिले ४ विवरण - तुकारामादा मत हे सगुण ध्यानाचे मोठे उपासक हात निर्गुण, निराकारास आपल्या आवडयासाठी देव व भक्त याच्या रूपान प्रकट झाला सगुणावर ध्यान केंद्रित करण सुलभ झाल हा देव भक्ताला आलिंगन देण्या साठी दोन मांडून चार हात धारण करून प्रकट होत राहिंग यास नाना आकारानी व रूपानी सौदर्य प्राप्त झाल देवाची खूण म्हणून एखादी मूर्ती वा एखादी प्रतिमा समोर आली म्हणून काही बिघडले असे नाही मवत्र ब्रह्मतत्त्व पसरल आहे जिथा ब्रह्मतत्त्वच गच चराचर विश्वात व्यत्त झाले आह असे असेल तर प्रतिमेत किंवा मूर्तीत ते नाही असे म्हणता येणार नाही मग मूर्तीवर भाव ठेवून तिची भजनी केल्यास बिघडले कुठे ? असा तुकारामाच्या म्हणण्याचा भावार्थ, अधिक विवरण क्र २६२ च्या अभंगावरील पाहावे ३०९ एक तटस्थ मानसीं । एक सहजचि आळसी ॥ १ ॥ दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ २ ॥ एक ध्यानीं करितो जप । एक बैसुनि घेती झोप ॥ ३ ॥ एका सर्वस्वाचा त्याग । एका पोटासाठीं जोग ॥ ४ ॥ एका भक्ति पोटासाठीं । एका देवासवें गाठी ॥ ५ ॥ वर्म पोटीं एकां । फळें दोन म्हणे तुका ॥ ६ ॥
१५० सार्थ तुकारामगाथा ८ शब्दार्थ व टीपा - मानसीं-मनात, वर्म-खूण, रहस्य, जोग-भिक्षा अर्थ - कुणी एक मनुष्य तटस्थ राहून ध्यानात मग्न आहे व दुसरा स्वभावत च आळशी आहे १ ही दोनही माणसे एकसारखी वरवर दिसतात पण दोहोंच्यांतील फरक जाणणारे असतात तेच खरे पारख करणारे होत २ कुणी खरोखरीची ध्यानधारणा करतात, जपजाप्य करतात व दुसरे नुसतीच झोप काढतात, पण दोहोंत फारच फरक आहे ३ एकाचा त्याग सर्वस्वाचा असून चित्त प्रभूशी रममाण झालेले असते, तर दुसऱ्या ढोंगी माणसाचे काम केवळ पोटासाठी भिक्षा मागण्याचे होते ४ एकाची भक्ती पोटासाठी असते, तर दुसऱ्याची देवाची भेट घेण्यासाठी असते ५ या शब्दांतील रहस्य तुकाराम महाराज म्हणतात असे आहे की, वरवर एकसारख्या दिसणाऱ्या कर्माचे फळ मात्र भिन्न भिन्न असते ६ ३१० काय फळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥ १ ॥ आहे नाहीं हे न फळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ २ ॥ देखिले तें दृष्टी । मागे घालूनिया मिठी ॥ ३ ॥ तुका म्हणे भावे । माझ्या मज समजावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सदैव-भाग्यवंत अर्थ - आपला बाप भाग्यवंत आहे की दुबळा दरिद्री आहे, हे काय लहान मुलाला समजत नसते ? १ आपण मागीत आहोत ती वस्तू बापाजवळ आहे की नाही हे काय त्यावेळी मुलाला समजत असते का ? २ त्याला एवढेच माहीत असते की, जे पाहिले ते मागायचे, बापाला मिठी घालून त्याचा हट्ट धरायचा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, याच भावाने मी तुम्हास मागत आहे माझी समजूत काढावी ४ ३११ भजन घाली भोगावरी । अकर्तव्य¹ मनीं धरी ॥ १ ॥ धिग त्याचे साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ २ ॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जीवे आस² ॥ ३ ॥ हे ना ते से जाले । तुका म्हणे वाया गेले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अकर्तव्य-जे करू नये ते कर्म जीर्वे-मनापासून, जीवे-जिवंत राहता अर्थ - या माणसाचे भजन भोगासाठीच असते जे कर्म करू नये त्यासाठी, भोगासाठीच ज्याचा तर्कही करता येणार नाही अशाच्या प्राप्तीसाठीच हे भजन त्याचे असते १ अशा माणसाच्या साधुपणाचा धिक्कार असो त्याचे मन विटाळूनच जगात वावरत असते २ त्याच्या मनात वैराग्याचा लेशही नसतो त्याला पैशाची हास मना पासून असते त्यासाठीच तो जगत असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाला काही प्राप्त होत नाही त्याला इहलोकी समाधान मिळत नाही त्यास परलोकातही स्थान नसते त्याचे जीवितच वाया गेलेले असते ४ ३१२ एकादशीस अन्न पान । जे नर करीती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥ १ ॥ ऐका व्रताचे महिमान । नेमें आचरती जन । गाती ऐकती हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ २ ॥ अशुद्ध विटाळसीचे फळ । विष्ठा भक्षिता तांबूल । सापडे सबळ । काळहातीं न सुटे ॥ ३ ॥ सेज चाज विलास भोग । करी कामिनींशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी मळिवंत ॥ ४ ॥ १ अकर्तव्य त २ जीवे आस
सत्य तुकारामगाथा १५१ आपण न वजे हरिकीर्तना । अणिका वारी जातां कोणा । त्याच्या पापें आणा । ठेंगणा महा मेरु ॥ ५ ॥ तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अधम-दुष्ट खळ-दुष्ट, न वजे-जात नाही, वारी-अडथळा आणतो अर्थ - जे लोक एकादशीच्या दिवशी अन्न खातात, सुग्रास अन्नाचे भोजन करतात, त्यांचे खाणे कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे समजावे ती माणसेही अधमच म्हणावीत १ या थोर एकादशी व्रताचे माहात्म्य ऐका याचे आचरण लोक नित्यनेमाने करतात या दिवशी लोक परमेश्वराचे कीर्तन करतात, स्वतः त्याचे स्तवन गातात, ऐकतात असे लोक प्रत्यक्ष विष्णूसारखेच होत २ या दिवशी विडा खाल्ला तर ते खाणे विडाळणीच्या विष्ठाळाप्रमाणे अशुद्ध मानावे असा पापी मनुष्य कलिष्ट अशा यमाच्या हातांतच सापडत असतो तो काही त्याच्या हातून सुटणार नाही ३ या दिवशी जो खाली शय्या करून स्त्रीशी विलास भोग करतो त्याला क्षयरोग जडतो त्याला जन्माच्या भयंकर अशा व्याधी जडतात ४ असा हा दुष्ट मनुष्य आपण स्वतः हरिकीर्तनास तर जात नाहीच, पण दुसरे कोणी जात असतील तर तो अडथळा आणतो याची पापे फार मोठी असतात, त्याच्यापुढे मेरुंपर्यंत ठेंगणाच वाटावा ५ त्याला यमदूत नेहमीच शिक्षा देतात, ते त्याचेच अंकित होतात तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी व्रत न केल्यान असा हा परिणाम होतो ६ विवरण - भागवत संप्रदायात एकादशी महाव्रताचे माहात्म्य फार मोठे सांगितले आहे या दिवशी उपवास करून दिवस व रात्र हरिभजनात, नामसंकीर्तनात, प्रभूचिंतनात घालविण्याचा प्रघात आहे विठ्ठलाच्या भक्तांना या एकादशीचे महत्त्व विशेष वाटते मन व वाणी पवित्र असावी, ध्यानधारणा सुलभ व्हावी आत्मचिंतनास सुकरता यावी म्हणून एकादशीचा उपवास सागितला आहे तुकोबांनी या एकादशी माहात्म्यास वारंवार उचलून धरले आहे न यासाठीच 'जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत याव लोकीं', 'एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्याची गति होईल नेणा' 'पंधरा दिवसा एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार।' इत्यादी ओळींतून त्यांना एकादशीचे महत्त्व सांगितले आहे एकनाथानी एकादशीमाहात्म्य नावाच स्वतंत्र प्रकरणच लिहिले आहे 'अनंत व्रतांचिया राशी । पाया लागतो एकादशी।' अस म्हणून एकादशी व्रत कस आचराव हेही त्यांनी विम्तारान सांगी तले आहे तुकारामबोवाप्रमाणेच त्यांनीही म्हटले आहे, ज्यासी न माने एकादशी । तनू जाणावी ती राक्षसी । त्यासी संपती घडे ज्यासी । नरकयासी तो होय ॥ ज एकादशीस भक्षिती अन्न । ते श्वानविष्ठेसमान । तांबुल तें रुधिरपान । रजस्वले स्त्रियेचें । एकादशीस स्त्रीभोग । क्यासी लागे क्षयरोग । यमयातना दुःखें अनेक । व्यथा जगीं तो पावे ॥ जो विंदो एकादशी । नरका जाणे न लागे त्यासी । तो स्वयेंचि नरपदासी । म्हणो आल्हाळा ॥ उलट जे एकादशी व्रत नियमाने करतात त्याचे भाग्य कसे असते ? एकनाथांनीच वणन कल आह 'जो एकादशी व्रत धरी । तो अतिशय पवित्र हरी । या लागी देव त्याचे घरीं । निरंतरी तिष्ठत ॥ जथें राहिले हरि वरिष्ठ । तोचि आश्रम होय श्रेष्ठ । ब्रह्मानंदें पिकली पेठ । ग्राहक तेथें हरिभक्त ॥ ऐसे एकादशीचे व्रत । निर्विकल्प पा आचरत । त्याचे घरों हरि तिष्ठित । कातेसहवर्तमान ॥ माघरी एकादशी । भक्त उद्धरती दोन्ह पक्षीं । मोक्षांचिया राशी । तिथियात्रा जोडिती ॥ घरों जरी व्रतासी दृढभाव । तरी सबाह्य प्रकट देव । वदनी संसार चाय । निजात्मठाय निजपदों ॥ जो एकादशीचा व्रती, त्यासी तीर्थे पें सेधिती । तेथे पुण्यं भगव प्राप्ती । क्षणमात्र न लागता ॥' या एकादशी व्रताची कथा व माहात्म्य याच वर्णन पुराणांतून आले आहे भागवताच्या नवम स्कंधातील अध्याय चार ते सहामध्ये अंबरीष राजाचे आख्यान आले आहे द्वादशीच्या दिवशी त्याच्या येथे दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आले त्यांना भोजनाम येण्यास उशीर झाला, पण व्रतभंग होऊ नये म्हणून या भगवद्भक्त राजाने तोय पाऊन
१५२ सार्थ तुकारामगाथा एकादशी सोडली त्यामुळे दुर्वास रागावले आपल्या जटेतून त्यांनी एक कृत्या निर्माण करून अंबरीषावर सोडली राजा विष्णुभक्त असल्यामुळे सुदर्शनचक्र दुर्वासाच्या पाठीमाग लागले दुर्वास घाबरून अखेर राजाकडे आले एक वर्षाच्या उपवासानंतर त्याने मग दुर्वासासह भोजन करून पारणे फेडले हा अंबरीष राजा असा विष्णुभक्त होता हा बार्शी येथील राहणारा असून वारकरी पंथीयांना बार्शीच्या भगवानाचे दर्शन यासाठीच प्रिय आहे ३१३ करवितां व्रत अर्धं पुण्य लाभे । मोडवितां दोघें नरका जाती ॥ १ ॥ शुद्धबुद्धि होय' दोघा एक मान । चोरासवे कोण जिवे राखे ॥ २ ॥ आपुले देऊनी आपुलाचि घात । न करावा थीत जाणोनिया ॥ ३ ॥ देउनिया वेच धाडी वाराणसी । नेदावे चोरासि चंद्रवळ ॥ ४ ॥ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडू नये ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - थीत-व्यर्थ, वेच-खर्च, चंद्रबळ-चंद्राचे बळ मारग-मार्ग अर्थ - कुणाकडून का होईना पण एखादे व्रत करविले तर त्यास अर्धे पुण्य लागते त्या व्रताचा भंग केला तर मात्र दोघेही नरकास जातात १ दोघांचीही बुद्धी शुद्ध असली तरच दोघांची मनेही एकच होतात चोराच्या संगतीत कुणाला स्वतःच्या जिवाची शाश्वती वाटणार ? २ आपले देऊन आपलाच घात होणार असेल तर तसे व्यर्थ न करणे हेच योग्य नाही का ? ३ एकादा काशीयात्रेस जात असेल तर त्याला खर्चासाठी पैसे देऊन पाठवावे पण चोरास मात्र चंद्राचे बळ अनुकूल असल्याचेही सांगू नये ४ तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थव्रत याग हा भक्तीचा माग आहे, तो सोडू नये कधी ५ ३१४ इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥ १ ॥ अवघेची येती वाण । अवघें शकुन लाभाचे ॥ २ ॥ अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाण-जिनस उरी-बाकी अर्थ - या पंढरपुरात भक्तजनांचे घनदाट माग सुरू झाले आहेत ही एक त्याची इनामाची पेठच आहे १ या पेठेत सर्व वस्तू येतात येथे सर्व शकुन लाभदायक होतात २ या ठिकाणी सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, देण्याघेण्यातील बाकी येथे काही उरत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या पेठेत ज्याने आपला स्वतःचाच लाभ करून घेतला तो धन्य होय ४ ३१५ वेदाचे गह्वर न कळे पाठका । अधिकार लोकां नाहीं येरा ॥ १ ॥ विठोबाचे नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ २ ॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र फाळ । येर तो सकळ मूढ लोक ॥ ३ ॥ तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गह्वर-अतरंग मम सोपारें-सोपे एकसरें-एकदम अर्थ - नुसते शब्द पाठ करणाऱ्या शास्त्रीपंडितांना वेदाचा अर्थ समजत नाही व दुसऱ्याही लोकांना त्याचा अधिकार नाही १ एका विठ्ठलाचेच नांव सहज, सुलभ व सोपे आहे ते एकदम संसारसागर तरून नेण्यास समर्थ आहे २ जे केवळ मंत्र, तंत्र काळवेळ मानाच म्हणतात त्यांना मात्र हे असाध्य आहे, व इतर लोक तर मूर्खच आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात विधिनिषेध सपल्यामुळे या मार्गाचा नाग झाला आहे ४ १ दोघा होय
३. नाम-स्मरण व संकीर्तन महिमा
सार्थ तुकारामगाथा १५३ ३१६ विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥ १ ॥ मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ २ ॥ बहु अतिशय खोटा । तकें होती बहु वाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- विधीनें-योग्य मार्गानें, आदि-प्रारंभ, अवसान-शेवट. अर्थ :- योग्य मार्गाने किंवा शास्त्र सांगेल त्या मार्गाने विषयसेवन केले तर ते विषयत्यागाएवढेच श्रेष्ठ होय. १ या धर्माचे मुख्य रहस्य असे की देह धारण केल्यापासून तो तो नष्ट होईपर्यंत देवास मनात वागवावे हे उत्तम. २ कोणत्याही गोष्टीची अतिशय विचित्रता खोटी आहे; कारण केवळ बुद्धीच्या वाटेने, केवळ तर्काच्या मार्गाने पुष्कळ पर्यायांच्या वाटा निर्माण होऊन कार्यनाश मात्र होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराविषयी एक- चित्ताने भाव ठेविल्यासच त्याची कृपा प्राप्त होते. ४ ३१७ येथींचिया अलंकारें । काय खरें पूजन ॥ १ ॥ वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व सांठा ते ठायीं ॥ २ ॥ येथींचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥ ३ ॥ तुका म्हणे वैष्णव जन । माहे गण समुदाय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-येथींचिया-या जगातील, साठा-साठा, गण-समुदाय अर्थ - या लोकातील अलंकाराने भूषविणे हे काय खरे पूजन आहे ? हे तर सर्व नाश पावणारे अलंकार होत १ म्हणून वैकुंठाच्या वाटा निर्माण करू. कारण सर्व सुखांचा साठा तिथे आहे. २ या जगातील सर्वच प्रकार नाशवंत आहेत. मग त्यांच्या नादाने उगाचच लोकांना कशासाठी फसवू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवजन किंवा विष्णुभक्त हाच माझा आवडता समुदाय आहे. तोच मला प्रिय आहे. ४ ३१८ उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवड ॥ १ ॥ बोलविले बोल बोले । धनी विठ्ठला सन्निध ॥ २ ॥ तरी मनीं नाहीं शंका । वळें एका स्वामींच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-उजळावया-स्वच्छ करण्यासाठी अर्थ :- भक्तिमार्गाच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी, त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठीच मी येथे आलो आहे. मला खऱ्याखोट्याचा निवाडा करावयाचा आहे. १ ईश्वर, विठ्ठल हा माझा धनी आहे. तो ज्याप्रमाणे बोलवील त्याप्रमाणे मी बोलतो. २ त्या माझ्या स्वामीच्या पाठबळामुळे मी बोलत असल्याने मला कसलीच शंका नसते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यापुढे गबाळघासारखे काम कधीच चालणार नाही. ४ विवरण- या एका लहानशा अभंगात तुकारामबुवा आपल्या आयुष्याचा हेतू स्पष्टपणे सांगत आहेत. आपण जे बोलत आहोत तो देवाचाच निरोप आहे अशी भावना त्याची नेहमीच होती. भांडार फोडून तो धन्याचा माल आपण भारवाहीप्रमाणे वाहतो अशी त्याची श्रद्धा होती जो कृपावंत सखा पांडुरंग तोच बोलविता असून आपली वाणी त्याचीच आहे असे ते वारंवार सांगतात. ' नव्हती माझे बोल बोले पांडुरंग ।' अशी त्याची निष्ठा होती आपण भक्तिमार्गाचा प्रसार करण्यास आलो आहोत, सत्याचा मार्ग स्वच्छ करावयास आलो आहोत, जग सर्व आडरानात सापडले असून त्याच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी आपण आहोत असेही ते अनेकदा बोलतात तु गाथा २०
१५२ | सार्थ तुकारामगाथा एकादशी सोडली त्यामुळे दुर्वास रागावले आपल्या जटेतून त्यांनी एक कृत्या निर्माण करून अबरीषावर सोडली राजा विष्णुभक्त असल्यामुळे सुदर्शनचक्र दुर्वासाच्या पाठीमागे लागले दुर्वास घाबरून अखेर राजाकडे आले एक वर्षाच्या उपवासानंतर त्याने मग दुर्वासासह भोजन करून पारणे फेडले हा अबरीष राजा असा विष्णुभक्त होता हा बार्शी येथील राहणारा असून वारकरी पंथीयांना बार्शीच्या भगवंताचे दर्शन यासाठीच प्रिय आहे ३१३ करविता व्रत अर्ध पुण्य लाभे । मोडविता दोघं नरका जाती ॥ १ ॥ शुद्धबुद्धि होय¹ दोघां एक मान । चोरासये कोण जियें राखे ॥ २ ॥ आपुले देऊनी आपुलाचि घात । न करावा धोत जाणोनिया ॥ ३ ॥ देऊनिया बेच धाडी वाराणसी । नेदावे चोरासि चंद्रबळ ॥ ४ ॥ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडू नये ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा. - धोत-व्यर्थ, वेच-खर्च, चंद्रबळ-चंद्राचे बळ, मारग-मार्ग अर्थ - कुणाकडून का होईना पण एखादे व्रत करविले तर त्यात अर्धे पुण्य लाभते त्या व्रताचा भंग केला तर मात्र दोघेही नरकास जातात. १ दोघांचीही बुद्धी शुद्ध असली तरच दोघांची मनेही एकच होतात चोराच्या संगतीत कुणाला स्वतःच्या जिवाचो शाश्वती वाटणार ? २ आपले देऊन आपलाच घात होणार असेल तर तसे व्यर्थ न करणे हेच योग्य नाही का? ३ एखादा काशीयात्रेस जात असेल तर त्याला खर्चासाठी पैसे देऊन पाठवावे पण चोरास मात्र चंद्राचे बळ अनुकूल असल्याचेही सांगू नये ४ तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थव्रत, याग हा भक्तीचा मार्ग आहे, तो सोडू नये कधी ५ ३१४ इनामाची भरली पेठ । याहाती दाट मारग ॥ १ ॥ अवघेची येती याण । अवघं शकुन लाभाचे ॥ २ ॥ अडचणी त्या केल्या दुरी । वेच्या उरी घेण्याच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - याण-जितम, उरी-बाकी अर्थ :-या पंढरपुरात भक्तजनांचे घनदाट मार्ग सुरू झाले आहेत ही एक त्याची इनामाची पेठच आहे ! या पेठेत सर्व वस्तू येतात येथे सर्व शकुन लाभदायक होतात २ या ठिकाणी सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, देण्याघेण्यातील बाकी येथे काही उरत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या पेठेत ज्याने आपला स्वतःचाच लाभ करून घेतला तो धन्य होय ४ ३१५ वेदाचे गह्वर न कळे पाठका । अधिकार लोका नाहीं येरा ॥ १ ॥ विठोबाचे नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ २ ॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥ ३ ॥ तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गह्वर-अंतरंग, मर्म सोपारे-सोपे, एकसरें-एकदम अर्थ - नुसते शब्द पाठ करणाऱ्या शास्त्रीपंडितांना वेदाचा अर्थ समजत नाही व दुसऱ्यांतरे लोकाना त्याचा अधिकार नाही १ एका विठ्ठलाचेच नांव सहज, सुलभ व सोपे आहे ते एकदम संसारसागर तरून नेण्यास समर्थ आहे २ जे केवळ मंत्र, तंत्र शाळवेळ यांनाच जाणतात त्यांना मात्र हे असाध्य आहे, व इतर लोक तर मूर्खच आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, विधिनिषेध संपल्यामुळे या मार्गांचा नाश झाला आहे ४ १ दोघा होय