सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
तुमच्या अंतःकरणात का हो निर्माण होत नाही ? तुमच्या-माझ्यामधील द्वैताची, वेगळेपणाची भावना तुम्ही अजून कायम धरली आहे काय ? ३ मला भेट देण्याचे तुम्ही टाळता, याचे कारण देवा, आमचे पाप फार बलवत्तर आहे, का ? किंवा तूच दुबळा झालास की काय रे ? तुझ्या अंगी आता पापी लोकांचा उद्धार करण्याचे बळ पूर्वीसारखे उरलेले नाही काय ? ४ किंवा देवा, तुला इतरांचे देणे फार झाले की काय ? तुझेही दिवाळे निघाले ? की कुणाच्या ऋणात तुजकडून राहिला आहेस ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी गुंतवणूक करून का ठेवितो आहेस ? तुझ्या व माझ्या संबंधाचे स्वरूप स्पष्टपणे ठरवून ना देवा ६ विवरण - वारंवार प्रार्थना करून, स्तुती करून, आर्त भावनेने करुणा भाकूनही देव आपल्यावर का कृपा करीत नाही ? या एका प्रश्नाच्या पोटी थोर भक्तांच्या मनात जे जे विकल्प बहुतांशहतो येतात, त्यातील काही या अभंगात आहेत तुझ्यामाझ्या मार्गात काळ आडवा आला काय ? विसाराचे भेट द्यावी अथवा न द्यावी या सारख्या विचाराचे संकट निर्माण झाले काय ? का भेट न देण्याविषयीचे द्वैत पाटात निर्माण झाले ? आमचे पाप फार झाले ? की दया, तुझी पापमोचनाची शक्तीच कमी झाली ? तुझ्याही शक्तीचे दिवाळे निघाले की काय ? की कुणाच्या ऋणात जखडून गेला असल्यामुळे आमच्यासारख्याच्या वाटघास येत नाहीस ? अशासारखे अनेक संशय भक्तांच्या मनात येतात त्याचा उच्चार तुकारामबुवांनी येथे केलेला आहे मोरोपंतांची 'संशयरत्नमाला' प्रसिद्ध असून तिच्यातही लडिवाळ भक्ताच्या मनातील संशयाबद्दलचा आविष्कार फार चांगल्या प्रकारे झाला आह भक्ताने वारंवार करुणा भाकावी, दीन वाणीने प्रार्थना करावी, नाना तर्क करावेत, डाकाकुसका काढाव्यात, देवाशी प्रेमाने भांडण करावे व मग देवाने कृपा करावी, यामधील सुकुमारता व भक्तीची, जिव्हाळ्याची वृत्ती अधिक संतोषदायी आहे देवा, मला भेट, म्हटल्याबरोबर देव भेटल्यास त्या भेटीमधील आनंद व तळमळ केल्यावर, हट्ट केल्यावर भेटल्यानंतरचा आनंद, यात फरक असणारच लेकराने रागवावे, रुसावे, नाना शंका घ्याव्यात व आईने मग त्याची समजूत काढावी, यात सर्व आले ८५८ काय देहू घालू करवती कमरी । टाकू या भितरी अग्नीमाजी ॥ १ ॥ काय सेवू वन शीत उष्ण ताण । साहो कीं मोहन' धरुनी बैसो ॥ २ ॥ काय लावू अगीं भस्म उधळण । हिंडू देश कोण खुंट चारी ॥ ३ ॥ काय त्यजू अन्न करुनि उपास । काय करु नास जीविताचा ॥ ४ ॥ तुका म्हणे काय करावा उपाय । ऐसा देई भाव पाडुरंगा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कमरी-शस्त्र, मोहन-मौन, चार खुंट-चार धाम अर्थ - देवा, मी तुमच्या भेटीसाठी करावे तरी काय हो ? काय माझ्या देहावर शस्त्र घालून त्याला कापून टाकू ? की त्याला अग्नीमध्ये टाकून देऊन भाजून टाकू ? १ की एखाद्या रानावनात जाऊन शीत, उष्ण, तहान याचा त्रास सहन करू ? का मौन धारण करून तेथे स्वस्थपणे बसून राहू ? २ की अंगावर भस्माची उधळण करून वैरागी-गोसावी बनू ? चार खुंट फिरून कोणत्या देशाची वारी करू रे देवा, तुझ्यासाठी ? चार धामाची यात्रा करू तुझ्या प्राप्तीसाठी ? ३ अन्न सोडून देऊन देवा मी उपास करू का ? की माझ्या जिविताचा नाश करून टाकू ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला सांगा ना एखादा उपाय तुमच्या प्राप्तीचा याविषयी तुम्हीच मला आता एखाद्या भावभक्तीचा मार्ग दाखवा ना ५ ८५९ दमें कीर्ति पोट नरे मानी जग । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥ १ ॥ अंतरतो तुझे पाय मज दुरी । धरिता हे थोरी जाणिवेची ॥ २ ॥ पिंडाच्या पाळणे धावती विकार । मज दावेदार मजमाजी ॥ ३ ॥ १ मौन तु गाथा ५१
४०२ सार्थ तुकारामगाथा
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥ ४ ॥ तुका म्हणे मज दावी तो सोहळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पिंडाच्या-शरीराच्या, गुमान-पर्वा, फिकीर अर्थ :- ढोंग करून परमार्थ केल्यास, भक्तीचा डोल मिरविल्यास पोट भरते. लोकांत मानमान्यताही मिळते. पण त्याच्यामुळे स्वतःचे मात्र कसलेही हित होत नाही. १ मी मोठा ज्ञानी व शहाणा या ज्ञानाच्या जाणिवेने देवा, तुझे पाय मात्र अंतरतात २ आणि केवळ देहाचेच पालनपोषण केल्याने कामक्रोधादी वृत्ती वळाव- तात, व माझ्यात असलेले माझे हे शत्रू माझे दावेदार बनतात ३ लोकांची पर्वा न करता मी माझा घात कसा करून घेऊ ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे पाय मी पाहिले आहेत, असा सोहळा मला दाखवा ना. ५ ८६० धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें वर' भलें मग ॥ १ ॥ आइका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ २ ॥ देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥ ३ ॥ तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - घर-चांगले अर्थ :- ज्याचा मालक वाईट आहे, त्याच्या जिण्याला धिक्कार असो. मग त्यापेक्षा मरण कितीतरी चांगले समजावे बरे. १ देवा, नीट ऐका; अशी ही एकंदर नीती आहे; म्हणून जे योग्य व उचित असेल त्यांचा सांभाळ तुम्ही करावा. २ ज्याच्या शब्दाचा दरारा सर्व देशांतून आहे, त्याचा कुत्राही होणेही बरे, फार चांगले वाटते, ३ देवा, अशा प्रकारच्या कडक शब्दांचे उत्तर मी तुम्हास का देत आहे, याचा विचार तुम्ही माझे अंतःकरण जाणून करावा ना एकदा ४ ८६१ आतां गाऊं तुज ओविया मंगळी । करूं गदारोळी हरिकथा ॥ १ ॥ होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ २ ॥ भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होऊनि राहों ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही लाडिकी लेंकरें । न राहों अंतरें पायांविण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मंगळी-पवित्र, मगलदायक, गदारोळी-आग्रहाने, गर्जना करून अर्थ :- देवा, आता तुला मंगलदायक ओव्या गाऊन तुझी आम्ही स्तुती करू. या हरिकीर्तनाची एकच गर्जना सर्वत्र करून देऊ. १ आमच्यावर जी जी संकटे येतील त्याचे निवारण देवा, तूच करणारा होशील. भय, तळमळ, पापपुण्य यांना दूर करण्याचे कार्य तूच देवा करशील. २ आम्ही आजपर्यंत जे जे भोग घेतले, ते ते सर्व तुझ्या अंगी लावून आम्ही या जगात अलिप्त होऊन राहू. भोगणारा केवळ तूच आहेस, या जाणिवेने आमचेकडे कर्तृत्व काही नाही असे समजू ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही सर्व लेकरे तुझी फारच लाडकी आहोत रे. तुझे पाय सोडून आता आम्ही दुसरीकडे कुठेही राहणार नाही. ४ ८६२ सर्व सुखें आजी येथेंचि वोळली । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥ १ ॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणे काळें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढें जालें चित्त समाधान ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळली-प्राप्त झाली, चरणांबुजें-चरणकमले, धणी-तृप्ती. १ बरे.
सार्थ तुकारामगाथा ४०३ अर्थ :--आज सर्व सुखांची प्राप्ती मला येथेच झाली आहे. कारण येथे संतांचे चरणकमल मी पाहिले आहेत. १ याच पावलांची इच्छा मी माझ्या मनात सदासर्वकाळ करीत होतो. आज मात्र माझी इच्छा तृप्त झाली. २ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र माझी वाणी काही बोलू शकत नसून ती कुंठित झाली आहे; व माझ्या चित्तात पूर्ण समाधान प्राप्त झाले आहे. ३ ८६३ विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥ १ ॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ २ ॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न येदे अन्यथा आन दुजें ॥ ३ ॥ सकळां इंद्रियां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोवाचें ॥ ४ ॥ तुका म्हणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा.- काया-शरीर, आन-दुसरे अर्थ :-- हा विठ्ठल आता माझा अत्यंत आवडता असा सज्जन सोयरा झाला असून माझ्या चित्तात त्याचेच स्थान दृढ झाले आहे. १ या विठ्ठलरूपानेच माझे सर्व शरीर व्यापून गेलेले असून माझी छायाही त्यामुळे विठ्ठल- रूपाचीच बनलेली आहे. २ माझ्या जिव्हेच्या अग्रावर विठ्ठलच बसला असून, तो त्याच्यावाचून दुसऱ्या कुणाचे नावही घेत नाही. ३ सर्व इंद्रियात मन हे प्रमुख इंद्रिय असून, तेही याच विठ्ठलाचे ध्यान करू लागले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता या विठ्ठलास मला क्षणभरही विसरता येणार नाही. ५ ८६४ होय¹ वारकरी । पाहें पाहे रे पंढरी ॥ १ ॥ काय करावी साधने । फळ अवघेंचि तेणें ॥ २ ॥ अभिमान नुरे । कोड अवघेंचि पुरे ॥ ३ ॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-- नुरे-उरत नाही, कोड-इच्छा. अर्थ --अरे मनुष्या, तू पंढरपूरचा वारकरी हो ना. एकदा तरी पंढरपूर येथे जाऊन त्या विठ्ठलास डोळे भरून पाहा ना १ इतर साधनांचा काय उपयोग ? सर्व फळ याच एका दर्शनाने मिळने २ याच्या भेटीमुळे मनात अभिमान उरत नाही व मनातील सर्व इच्छा मात्र तृप्त होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सावळा विठ्ठल माझ्या डोळ्यात निवास करून राहिला आहे ४ ८६५ पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥ १ ॥ अवघा होप पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ २ ॥ न लगे धन मान । देहभावे उदासीन ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ । नासी² तात्काळ तें स्थळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-- नासी-नाश होतो अर्थ. - जो पंढरपूरला मनोभावे जातो, तो देवाच्या दर्शनाने इतका भारावला जातो की आपल्या आई- बापासही विसरून जातो. १ तो सर्वार्थाने पांडुरंगच बनलेला असून बेधुंद अंग धरून राहिलेला असतो. २ त्याला धनाची वा मानाची मुळीच इच्छा नसते. स्वतःच्या देहाविषयीही तो उदासीन बनलेला असतो. ३ या पंढरीच्या वास्तव्यामुळे मनात विकारादिकाचा जो मळ असतो त्याचा संपूर्ण नाश होत असतो. ४ १ होय होय, २ नाही.
४०४ सार्थ तुकारामगाथा ८६६ बळें बाह्यात्कारें संपादिले सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥ १ ॥ ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥ जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातो विसरोनि सकळ हे ॥ ३ ॥ प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले फरी नित्य वेवसाय ॥ ४ ॥ तुका म्हणे मज भोरप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेवसाय-उद्योग, व्यवसाय, भोरप्याचि परी-बहुरूप्याप्रमाणे. अर्थ - साधुत्वाच्या बळानेच बाह्यात्काराने सोंग संपादन केले; पण अंतरगातून मात्र इंद्रियसुखाचा त्याग झाला नाही १ असे माझ्या अनुभवास नित्य येत असते व यासंबंधीचा खरा विचार काय आहे, याचीही जाणीव माझ्या मनास नेहमीच असते २ जो अनुभव जागेपणीचा असतो, तो कधी स्वप्नामध्ये दिसत नाही. यावेळी मी सर्व काही विसरून जातो ३ माझे चित्त खरोखर या प्रपंचातून बाहेर आलेलेच नाही. मागचेच सर्व उद्योग ते पुन' एकसारखे करीत असते ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझी अवस्था निरनिराळी सोंगे घेणाऱ्या बहुरूप्याप्रमाणे झालेली आहे. वरवर पुष्कळ सोंगे वेळोवेळी केली तरी आत जो जसाचा तसाच शिल्लक असतो. ५ ८६७ म्हणवितो दास ते नाहीं कारणीं । आत घरी दोन्ही भिन्न भाव ॥ १ ॥ गातो नाचतों तें दाखवितो जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ २ ॥ पाविजे तें वर्म न कळेचि कांहीं । बुडालों या दोहों वघाचिया ॥ ३ ॥ भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥ ४ ॥ तुका म्हणे वांयां गेलो ऐसा दिसे । होईल या हांसें लौकिकाचें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - करणी-कृत्य, धर्म-रहस्य अर्थ - मी स्वतःम ईश्वराचा दास म्हणवून घेतो; पण माझ्या हातून तशी कृत्ये मात्र होत नाहीत कधी. माझ्या अंतरगातील व बाहेरचा भाव वेगवेगळाच दिसतो १ मी प्रेमाने हरीचे गुण गातो त्याच्यासाठी नाचतोही; पण ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी आहे. माझ्या अंत करणात ईश्वराविषयी प्रेम हटकून आहेच असे मात्र नाही. २ ईश्वरस्वरूपाच्या रहस्याचे ज्ञान जे मला हवे आहे, ते काही अजून मिळालेले नाही या दोघांच्या डोहातच मी पूर्णपणे बुडून जात आहे ३ माझ्या आयुष्याचे जे भांडवल होते ते मात्र काळाने हातोहात संपवीत आणले आहे. ह्या माझ्या आयुष्यास माप लागले असल्याने ते उतरणीस लागले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी तर या माणसाच्या जन्मास येऊन वायाच गेलो आहे असे दिसते माझ्या सर्व लौकिक संसाराचे हंसेच होईल असे दिसते ५ विवरण-वरील दोन अभंगात भक्तश्रेष्ठ तुकोबानी आपल्या मनाची दुर्बलता स्पष्टपणे मांडलेली आहे तुकारामबुवा एवढे साधू, एवढे विठ्ठलभजनात रंगलेले, एवढे परोपकारी, पण त्याचेही मन त्यांना चित्ती खात असावे हे या अभंगातून ध्यानात येते आपण ह साधुत्वाचे बाह्यात्कारी सोंग पसरून लोकाच्या मनाची फसवणूक तर करीत नाही ना? अशी शंका त्याच्या मनात चाटून गेलेली आहे आपले मन प्रपंचातून सपूर्णपणे निघालेले नाही, जागृती व स्वप्नी एकच ईश्वरभाव अजून आपल्यात निर्माण झालेला नाही, आपण बहुरूप्याप्रमाणे वरवर सोंगधारीच आहोत की काय ? आपले गाणे व आपले नाचणे हे केवळ वरवरचे तर नव्हे ? आपल्या अंतःकरणात ईश्वराविषयी दृढ प्रेम किती आहे ? आपले आयुष्य काळाच्या मानाने हातोहात कमी तर होत नाही ना ? अशा एकसारख्या शंका ह्यांना येत असून ते अत्यंत जागृकतेने आपले चित्त सदैव श्रीहरीच्या चरणी जडून राहील अशा विवंचनेत असतात. स्वतःचे हे जे कठोर आत्मनिरीक्षण तुकोबानी केले आहे, त्यावरून वस्तुस्थितीच तशी होती असे मानण्याचे कारण नाही.
सार्थ तुकारामगाथा ४०५ आपल्या मनात नारायणाविषयी प्रेम नाही व आपण अजून संसारापासून मुक्त झालो नाही, असे जेव्हा तुकाबा म्हणतात, तेव्हा त्यांच्या म्हणण्यापाठीमागची भूमिका समजावून घ्यावयास हवी आपण जास्तीत जास्त निर्विकार व्हाव, जास्तीत जास्त पूर्णत्वाने श्रीहरीशी एकरूप व्हावे, जास्तीत जास्त आपले चित्त निर्लेप व निर्मळ असावे, हा त्यामागचा उद्देश आहे थोर थोर लोकांचेही मन कसे चळेल व मग सर्व आयुष्याचा नाश कसा होतो हे त्यांना चांगलेच माहिती होते म्हणूनच त्यांनी आपल्या मनास नित्य वैराग्याचा डिवचावा, आत्मपरीक्षणाचा कठोर अंकुश लावून घेतला दिसतो व या आत्मपरीक्षणामुळेच त्यांना सदैव जागृती येत राहिली हे स्पष्टच आहे म्हणूनच एके ठिकाणी म्हटले आहे 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥' ८६८ न कळता काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥ १ ॥ येउनिया वास करिसी हृदयीं । ऐसे घडे करूं कासयाने ॥ २ ॥ साच भावे तुझें चिंतन मानसीं । राहे हे करिती कें गा देवा ॥ ३ ॥ लटके हे माझें करुनिया दुरी । साच तू अंतरीं येउनि राहे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज राखावे पतिता । आपुलिया सत्ता पाडुरंगा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खऱ्या अर्थ - देवा, माझ्या अंतःकरणातील प्रेमभाव सतत तुझ्या पायावर स्थिर व्हावा, अशासाठी मी काय उपाय करावा ? हे काही समजत नाही १ देवा तू माझ्या हृदयात येऊन निवास करशील अशी गोष्ट कशाने बरे होईल ? २ खऱ्या भावनेने तुझेच चिंतन घडेल व तेच मनात स्थिर राहील असे कधी होईल रे ? ३ देवा, माझ्यात जे जे खोटे असेल ते दूर व्हावे व तूच खऱ्या स्वरूपात माझ्या अंतःकरणात दृढ व्हावास ४ देवा पांडुरंगा, तुकाराम महाराज म्हणतात, मला या पतिताला तू आपल्या सत्तेने सांभाळावेस ५ ८६९ चिंतितलें तें मनिंचें जाणे । पुरवी खुणे अंतरींचें ॥ १ ॥ रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत्त हे ॥ २ ॥ नवसियांचे नव' रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे समचि देणें । समचरण उभा असे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सम-एकसारखे स्वरूप अर्थ - हा देव कसा आहे ? मनामध्ये जी जी इच्छा भक्त धारण करतो ती तो मोठ्या प्रेमाने पूर्ण करतो १ त्याला रात्र झालेलीही समजत नाही, दिवस झालेलाही ध्यानात येत नाही पांडुरंग दैवत हे त्याच्या अंतरंगात व शरीरात एकसारखे खेळत असते २ या देवाची प्राप्ती व्हावी म्हणून जे जे भक्त नवस करतात, ते ते हा पूर्ण करतो जो यात स्मरण भोग भोगीत असतो त्यास तो भिन्न वाटत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भक्तांना आपल्या एकसारख्या स्वरूपाची प्राप्ती करून देणारा हा विठ्ठल समचरणाने विटेवर उभा आहे ४ ८७० उद्धाराचा२ संदेह नाहीं । याचा कांहीं सेवका ॥ १ ॥ पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ २ ॥ बुडता जळीं जळता अग्नी । ते प्रसंगीं राखावे ॥ ३ ॥ तुका म्हणणे आम्हासाठीं । कृपा पोटों वागवी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संदेह-शंका, कोंवसा-आश्रय, आधार अर्थ - हा देव आपला उद्धार करील की नाही, अशी शंका कधी त्याच्या सेवकाच्या मनात येत नाही १ हा पांडुरंग आपल्या भक्तांविषयी अभिमानी असून त्यांच्या जीवदानाचा एकमेव आधारच आहे २ पाण्यात १ पुरवी नवस २ उधारीचा
४०६ सार्थ तुकारामगाथा
बुडण्याच्या प्रसंगीं किंवा अग्नीत जळण्याच्या प्रसंगी हा ईश्वर आपल्या भक्तांचे नेहमींच रक्षण करतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आमच्यासाठीही आपल्या अंतःकरणांत निरंतर दया बाळगीत असतो. ४ ८७१ काय विरक्ति फळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥ १ ॥ नाचो सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ २ ॥ शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेवांचूनियां ॥ ३ ॥ कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥ ४ ॥ कासया एकांत सेवूनया वना । आनंद तो जनामाजी असे ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वैष्णवमेळीं-विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात, घोळ-दीणा, सरसा-बरोबर अर्थ:-वैराग्याची थोरवी आम्हांस कुठून कळणार? आम्ही त्या विठोबाचे एक नाममात्र जाणीत असतो. १ मोठ्या सुखाने व आनंदाने आम्ही विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात नाचत असतो. टाळ व घोळ यांच्या नादांत आम्ही तल्लीन होत असतो. २ शांती, क्षमा, दया यांचे महत्त्व आम्ही काय जाणावे? या पांडुरंगाच्या, गोविंदाच्या कीर्तनात हे सर्व काही येते. गुणकीर्तनावाचून दुसरे काहीही आम्ही जाणीत नाही. ३ नामामृताच्या सागरात बुडी दिल्यानंतर देहावर उदास होऊन काय उपयोग? ४ या लोकातच एवढा आनंद भरलेला असताना मी रानावनात जाऊन उगीच शीण कशास वाढवून घेऊ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस आता कसलीच भीती नाही. कारण हा श्रीविठ्ठल आमच्याबरोबर आहे, असा विश्वास आम्हांस नेहमीच वाटत आलेला आहे. ६ ८७२ जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥ १ ॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे १ यमापाशीं ॥ २ ॥ गरुडटक्यांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥ ३ ॥ सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥ ४ ॥ तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥ ५ ॥ तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- ओखदासी-औषधासमुद्धा, भेणें-भयाने अर्थ :- ज्या स्थानावर विठ्ठलभक्तांचा निवास असतो, ती भूमी व तो देश पुण्यवान आहे असेच समजावे १ या ठिकाणी औषधालासुद्धा दोष दिसणार नाही, असे यमाचे दूत यमास सांगत असतात. २ गरुडाचे निशाण ज्यांच्या खांद्यावर आहे अशा वैष्णवांच्या समुदायाने व नामकीर्तनाने सर्वत्र या विठ्ठलाचाच जयजयकार होत असतो. ३ येथील लोकांच्या वाणीस गोविंद गोविंद-विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा सहजच छंद असतो ४ या ठिकाणी तुळशीची वने असून नाना प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या असतात. येथील सर्व सोहळा वैकुंठाप्रमाणेच असतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, भीतीने काळ या बाजूस फिरकतसुद्धा नाही. ६ ८७३ माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ॥ १ ॥ पढियें देहभावें पुरवितो वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २ ॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥ ३ ॥ योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥ ५ ॥ १ सांगती.
सार्थ तुकारामगाथा ४०७ शब्दार्थ व टीपा - पडिये-आवडत, आघात-सकट, जड-राकट अर्थ - या माझ्या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे म्हणून सांगू ? तोच माझा देव व तोच माझा गुरू झालेला आहे १ भक्ताना जे जे आवडते, प्रिय आहे ते ते किंवा ती ती इच्छा हा देव पुरवितो आणि शेवटी आपणापाशी घेऊन येतो त्याना २ आपल्या प्रिय भक्ताच्या मागेपुढे उभा राहून हा त्याचा साभाळ करीत असतो येईल त्या सकटाचे निवारण करीत असतो ३ आपल्या भक्ताचे मोठे सक्ट जाणून त्याचे रक्षण करून त्याचा हा देव नीट योगक्षेमही चालवितो हाताला धरून या भक्तिमार्गाची वाट तो दाखवीत असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या या वचनावर ज्याचा विश्वास नाही, त्यानी पुराणातील अनेक दाखल्याचा विचार करावा ५ विवरण - ईश्वर आपल्या भक्ताची काळजी कशी करतो, त्याचे सकट कसे निवारण करतो, त्याचा योगक्षेम कसा चालवितो, याबद्दल तुकारामबुवानी अनेक अभंगातून फार कोवळीकतेने दिग्दर्शन केले आहे. स्वतःचे अनुभवही सागितले आहेत या एक फार गोड व तत्त्वस्पर्शी अभंगात बुवा अगदी साध्या भाषेत आपल्या विठोबाच्या प्रेमभावाचे वर्णन करीत आहेत आपल्या भक्ताची जी जी इच्छा असत, ती ती हा पूर्ण करीत असतो आपल्या लाडक्या भक्ताच्या मागेपुढे उभे राहून हा त्याच रक्षण करीत असतो हातात धरून तो भक्ताना परमार्थमार्गाची किंवा स्वरूपाची वाट दाखवीत असतो, आणि हा सब भाव पुराणातूनही व्यक्त झालेला आहे, असे बुवा आत्म- विश्वासाने सागत आहेत ८७४ सकळ धर्म मज विठोबाचे नाम । आणीक ते वर्म नेणें कांहीं ॥ १ ॥ काय जाणो सता निरविलें देवे । करिती या भावें कृपा मज ॥ २ ॥ तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळो यावा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - निरविले-सोपविले. अर्थ - या विठोबाच्या एका नामोच्चारात मला सर्व धर्म घडतात याखेरीज दुसरे कुठलेही वर्म मी जाणीत नाही १ या सतानी मजवर कृपा करावी म्हणूनच देवाने मला त्याच्यावर सोपविले की काय न जाणे २ तुकाराम महाराज म्हणतात, नाही तर असा माझा काय अधिकार आहे, की हा भक्तिज्ञानाचा विचार मला पूर्णपणे समजून यावा ? ३ ८७५ उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥ १ ॥ उडदा अक्षरा करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥ २ ॥ तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीय ते सिण रितें माप ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - उदंड-पुष्कळ, भरोवरी-श्रम, सायास, सिण-त्रास अर्थ - नाना प्रकारचे तर्क करणारे शहाणे पुष्कळच आहेत पण त्यांना या विठ्ठलाच्या स्वरूपाचा अंत काही लागणार नाही १ अक्षरे घोकून पाठांतर करणारे व अभ्यासाचा त्रास घेणारेही पुष्कळ आहेत, पण त्यांना काही विठ्ठलाची थोरवी समजून येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा लाभ भोळेपणाशिवाय होणार नाही ज्ञानाची जाणीव ही त्रास देणारीच वाटते कारण ज्ञानाच्या या मापाने या थोर विठ्ठलाला मापताच येणार नाही ज्ञानाचे माप कितीही मोठे असले तरी ते रितेच असते ३ ८७६ आधारावाचुनी । काय सागसी कहाणी ॥ १ ठावा नाहीं पंढरीराव । तोवरी अवघेंच वाय ॥ २ ॥ मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मज्ञान ॥ ३ ॥ तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -- वाय-व्यर्थ, एक सवा-एकाबाजूला
४०८ सार्थ तुकारामगाथा अर्थ - शास्त्रपुराणांतील किंवा साधुसंताच्या वचनावाचून तू ज्ञानाची कसली कहाणी सांगतोस ? १ जोपर्यंत तुला हा पंढरीचा राणा माहीत झालेला नाही, तोपर्यंत तुझे हे ज्ञानसंपादन सर्वच व्यर्थ आहे २ तुझे हे कोरडे ब्रह्मज्ञान कोण मानायला तयार होईल ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंडित लोकांनो, तुम्ही तुमच्या जाणिवेचा ठेवा एका बाजूलाच ठेवून द्या ४ ८७७ अनाथाची तुम्हा दया । पंढरीराया येतसे ॥ १ ॥ ऐसी ऐकोनिया कीर्ति । बहु विश्रांति पावलो ॥ २ अनाथाच्या धावा घरा । नामें करा कुडावा ॥ ३ ॥ तुका म्हणे सवघड हित । ठेवू चित्त पायांपैं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कुडावा-रक्षण, सवघड-उघड असलेले अर्थ - पंढरीराया, जे अनाथ असतात, त्यांची दया तुम्हांस नेहमीच येत असते १ अशी तुमची कीर्ती ऐकून माझ्या मनास फारच समाधान लाभले आहे २ देवा, तुम्ही अनाथाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या घरी धावून जाता व तुमच्या नामाच्या साह्याने त्याचे रक्षण करता ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझे हे उघड असणारे चित्त मी तुमच्या पायावर ठेवीत आहे ४ ८७८ येथे नाही उरो आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥ १ ॥ विषयाचे झगी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ २ ॥ वाहोनिया भार कुथसील ओझे । तेंचि माझें थीता त्याग ॥ ३ ॥ तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज । संतीं केशिराज साधिपेला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लोलिंगत-आसक्त अर्थ - मत्स्य, कूर्म इत्यादी अवतारही जेथे उरले नाहीत, तेथे मजसारख्या सामान्य माणसाची व गरीब पामराची काय कथा आहे ? १ इंद्रियाच्या विषयांशी जर आसक्त व्हाल तर ती इंद्रिये एकदा चेतवली गेली की मग त्याचा अंत लागेनासा होतो २ या इंद्रियसुखाचे ओझे डोक्यावर वागवीत बसला व मग विनाकारण कुंथाल तर मात्र माझ्या भावाचा त्याग करावा लागेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी या विठ्ठलाला मिळवून घेतला आहे, याची लाज तुम्हास कुणास कशी नाही ? ४ ८७९ हींच त्याचीं पचभूतें । जीवन भाते प्रेमाचे ॥ १ ॥ कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ २ ॥ हाच काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥ ३ ॥ तुका म्हणे दिवसराती । हेचि खाती अन्न ते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भातें-अन्न, निगुती-बरोबर, कैवाड-स्वीकार अर्थ - या विठ्ठलाविषयीचे प्रेम हेच या भक्ताचे मुख्य जीवनदायी अन्न व पंचभूतात्मक शरीर आहे १ या संतांनीच या श्रीहरीविषयी चित्तात कळवळा धारण करून खरोखर त्याचा स्वीकार केलेला आहे २ या हरीविषयी त्यांना वाटणारे हे प्रेम हेच त्यांचा वर्तमानकाळ असून सर्व साधनसंपत्तीही याच स्वरूपाची आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस हे हरिमक्त हेच प्रेमाचे अन्न सेवन करीत असतात ४ ८८० दीप न देखे अंधारा । आता हेचि करा जतन ॥ १ ॥ नारायण नारायण । याठी धन बळकट ॥ २ ॥ चिंतामणीपाशी चिंता । तस्वता ही नयेत ॥ ३ ॥ तुका म्हणे उभयलोकीं । हेचि निकी सामग्री ॥ ४ ॥
सार्थ तुकारामगाथा ४०९ शब्दार्थ व टीपा :- गांठी-भांभाळावे, चिंतामणी-चिंतितलेले देणारे रत्न, निकी-चांगली. अर्थ :- सर्वत्र, सर्वकाळ प्रकाशमान असणारा दिया कधी कधी अंधाराला पाहात नाही. हाच भाव मनात धारण करून तुम्ही ईश्वरास जवळ करा. १ नारायण, नारायण हे धन तुम्ही चांगले जतन करून सांभाळावे. २ चिंतामणी जवळ असल्यावर खरे पाहता मग कसलीही चिंता उरू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात, उभय लोकी याच ईश्वरप्रेमाच्या रूपाच्या धनाची सामग्री फार चांगली आहे ४ ८८१ धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥ १ ॥ संदेहाची सुटली गांठी । जालें पोटी शीतल ॥ २ ॥ भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥ ३ ॥ तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संदेहाची-संशयाची, गाठी-प्रश्न, तारा-नाव. अर्थ :- या संताच्या पायांशी मिठी पडते, तो काळ फारच धन्य होय. १ यांच्या भेटीमुळे संशयाचे सर्व प्रश्न सुटून जातात आणि त्यामुळे मन शांत व प्रसन्न होते. २ यांच्या कृपेने भवनदीच स्वतः नाव होऊन कृपा- प्रसादाने तरून नेण्यास समर्थ बनते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता या संतापेक्षा अधिक मंगलदायक असा दाता कोण आहे ? ४ ८८२ दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥ १ ॥ संकल्पिला देहू देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ २ ॥ नाहीं अवसान घडी । सफळ जोडी इंद्रिया ॥ ३ ॥ कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दिनरजनी-रात्रंदिवस, हेवा-हाव. अर्थ - रात्रंदिवस या गोविंदाची कीर्ती पोवाड्यातून गावी, हाच एक आमचा सततचा उद्योग आहे १ या सर्व देहाचा संकल्पही देवा, तुझ्यासाठी अर्पण व्हावा अशी आमची एकमेव इच्छा आहे. २ सर्व इंद्रियाची वृत्ती हीच असून याखेरीज दुसरो भावना क्षणभरसुद्धा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीची कीर्ती मी गर्जून सर्वत्र पसरवीत आहे व सर्व लोकांना सावध करीत आहे. ४ ८८३ सरें नानवट निक्षेपीचें जुने । काढिलें ठेवणें समयचिं ॥ १ ॥ मजुराच्या हातें मापाचा उफल । मी तो येथें फोल सत्ता त्याची ॥ २ ॥ कुलाळाच्या हाते घटाच्या उत्पति । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीर्णी प्रकाशाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-नानवट-नाणे, निक्षेपीचे-पुरून ठेवलेले, कुलाळाच्या-कुंभाराच्या, कीर्णी-किरणांमधून. अर्थ :- समर्थ अशा संताच्या घरी विठ्ठलकृपाचे जुनाट नाणे जमिनीत पुरून ठेविलेले होते, ते मी बाहेर सर्वांसाठी काढले आहे १ मजुराच्या हातानेच धान्याचे माप होत असले भी या ठिकाणी फुकटचा असून तरी सत्ता त्याचीच आहे. २ कुंभाराच्या हातून घटांची उत्पत्ती होते, हे खरे असले तरी, जो कोणी खरेदी करणारा असतो, तोच त्यांना स्वयंपाकाच्या ठिकाणी पाठवीत असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सूर्याचेच तेज त्याच्या किरणांतून फाकत असते, त्याप्रमाणे सर्व ध्येयातून नारायणच व्यक्त होत असतो. ४ ८८४ गंगेचिया अंताचिण काप चाड । आपुले तें कोड तुपेपाशीं ॥ १ ॥ विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ २ ॥ १ पालू. तु गाथा ५२
४१० सार्थ तुकारामगाथा कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥ ३ ॥ बाळाचे सोईतें घांस घाली माता । अट्टाहास चिंता नाहीं तया ॥ ४ ॥ गाऊं नाचूं करूं आनंदसोहळा । भावचि आगळा' नाहीं हातां ॥ ५ ॥ तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- अंताविण-खोलो समजल्याशिवाय. अर्थ - जो तान्हेलेला आहे त्याने गंगेचे पाणी प्यावे. ह्या पाण्याच्या खोलीची चौकशी त्याने कधी करु नये. तहान भागली की नाही, हे मात्र त्याने पाहावे. १ त्याचप्रमाणे इतर कसलीही चौकशी न करिता विठ्ठलाची ही साजिरी व सुंदर अशी मूर्ती निरंतर हृदयात स्थिर करुन ठेवावी. २ सारभूत असणाऱ्या नवनीतापाशीच आपले काम असावे. इतर गबाळापाशी आपण संबंध कशास ठेवावा ? ३ बाळाची सोय व्हावी म्हणून आई त्याला एक एक घास करुन घालीत असते. त्यासंबंधी कसली चिंता किंवा कसला खटाटोप बाळाला कधी करण्याची जरूरी नसते. ४ त्याचप्रमाणे आम्ही या श्रीहरीच्या प्रेमात नाचू, गाऊ व आनंदाने सुखाचा सोहळा करु. याखेरीज दुसरा भाव आपल्या मनात कधी नसतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता सर्व एक श्रीहरिमय झाल्यामुळे आम्हास परलोकीचे भय उरलेलेच नाही. ६ ८८५ स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥ १ ॥ आतां सोडवणें धांवा नारायण । मज हे वासना अनावर ॥ २ ॥ येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुम्हीं देवा सांभाळावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पडिभर-अधिक प्रेम. अर्थ - देवा, या स्त्रीपुत्रादिक नातेवाईकांविषयी मला विशेष प्रेम वाटते व विषयसुखांवर माझे अधिक प्रेम आहे. १ नारायणा, तुम्ही धावत यावे व मला यातून सोडवावे. या वासना मला आवरेनाशा झाल्या आहेत. २ ही लोकलाज्जा आमच्या मार्गात उभी राहिलेली असल्यामुळे देवा, आमचे कार्य दूर झाले असे वाटते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस जिथे तिथे गुंतून पडण्याचेच प्रसंग दिसतात नारायणा, अशा ठिकाणी तुम्हीच मला सावरावे. ४ ८८६ पडिलों भोवनीं १ होतों बहु चिंतवनी ॥ १ होतों चुकलों मारंग । लाहो केला लाग' वेगें ॥ २ ॥ इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- भोवनीं-भोवऱ्यात, चिंतवनीं-चिंतेत, संदीं-अडचणीत. अर्थ-मी या संसारचक्राच्या भोवऱ्यात सापडलो होतो. फार मोठ्या चिंतेत होतो. १ मी मार्ग चुकून गेलो होतो. पण आता मात्र त्वरित लाभ करून घेतला आहे. २ इंद्रियवृत्तींच्या अडचणीत मी चांगलाच सापडलो होतो, चांगलाच बंदिवासात फसत होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण बरे झाले; माझ्या वाचेतून विठ्ठलाचे नाम आले ४ ८८७ बरें जालें आलौं ज्यांचीं त्यांच्या घरा । चुकला पान्हेरा³ ओढाळांचा ॥ १ ॥ बहु केलें दुखीं त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ २ ॥ १ वेगळा, २ वेग, ३ पान्हेरा
सार्थ तुकारामगाथा ४११ त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥ ३ ॥ नाहीं कोठें स्थिर राहो दिलें क्षण । आजिवरी सिण पावलो तो ॥ ४ ॥ वेगळाळ्या खोडी केली तडातडी । सांगावया घडी नाहीं सुख ॥ ५ ॥
- निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - पन्हेरा-सवध, गोवारें-समुदाय अर्थ - देवा, हे एक बरे झाले बाहेर धावणारी इंद्रिये आत मुरडून ज्याची त्याची आपापल्या घरात येऊन मुरडून राहिली या ओढाळ इंद्रियाचा सवय आता सुटला १ याचा सांभाळ करता करता मला फार दुःख झाले. पण आता त्याच्याबद्दल असणाऱ्या लाभाचे अथवा लोभाचे तोंड काळेच झाले असे समजा ना २ या इंद्रियांनी जर काही अन्याय आता केला तर, त्या अन्यायाची फळे मला शरीरावर भोगावी लागत असत ३ या इंद्रियांनी मला कुठेही एक क्षणभरसुद्धा स्थिर राहू दिले नाही याच्या नादाने आजपर्यंत फारच क्षीण मला झाला ४ या इंद्रियाच्या निरनिराळ्या खोडींपायी माझी व ईश्वराची ताटातूट अनेकदा झाली सांगण्यासारखे सुख यानी मला एक क्षण- भरही दिले नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या इंद्रियाचा समुदाय देवापाशी सोपवून, त्याच्यावर याचा भार टाकून निघालो आहे ६ ८८८ न करावी आता पोटासाठीं चिंता । आहे त्या संचिता माप लावू ॥ १ ॥ दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपांयीं सिण जाला ॥ २ ॥ येथें तब नाहीं घेइंजेसे सवे । काही नये जीवे येचो मिथ्या ॥ ३ ॥ खडणेचि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असो ॥ ४ ॥ दोवटा पावती नावेचे बैसणे । भुजाबळें कोणे कष्टी व्हावे ॥ ५ ॥ तुका म्हणे आता सकळांचे सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - भुजाबळे-हाताच्या वळान अर्थ - आता पोटासाठी चिंता करण्याची जरूरी नाही जे अन्नधान्य जवळ आहे, तेच पुरवून पुरवून खाऊ १ आपली दृष्टी परमार्थाच्या विचारात गुंतवावी, उगाच बाकीच्या क्षुल्लक उपायाचा त्रास कशाला घ्यावा ? २ काही येथून आपल्याबरोबर घ्यावे असे नाही खोट्या लाभासाठी आपल्या जीवाची शक्ती कशाला खर्च करायची ? ३ आपल्या चिंतेने जन्ममृत्यूच्या खेपात काही कधी खड पडणार नाही आम्ही संसारात नेहमीच गुरफटून दीन झालेलो आहोत ४ पण शेवटी या भवसागरावरील नौवेत बसलो आहोत ती प्रयास शेवटपर्यंत सुखरूप करणारी असताना तिच्या गतीसाठी उगाच आपल्या हाताचे बळ कशासाठी खर्च करायचे ? ५ तुकाराम महाराज म्हणतात सर्वांचे सार जे असेल तेच आता आपण करीत असावे ६ ८८९ आमच्या हे आले भागा । जिव्हार या जगाचे ॥ १ ॥ धरूनिया ठेलो जीवे । बळकट भावे एकविध ॥ २ ॥ आणूनिया केला रूपा । उभा सोपा जबळी ॥ ३ ॥ तुका म्हणे अवित्त केला । खालीं आला वचनें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जिव्हार-अन्न वरण अर्थ - सर्व जगास अंतःकरणरूपाने असणारा हा विठ्ठल आमच्या वाट्याला आला आहे १ यास मी आपल्या जीवात मोठ्या थळकट भावाने धारण करून ठेवले आहे २ या निर्गुण निराकारास आम्ही सगुण रूप देऊन नीट आकारात आणले ३ तुकाराम महाराज म्हणतात, मीच त्याला आपल्या स्वाधीन केला असून आपल्या प्रेमळ वचनामुळे तो आपल्या उच्च स्थानापासून खाली उभा आहे ४
४६२ सार्थ तुकारामगाथा ८९० खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥ १ ॥ सवंगाचें केणें सांपडलें घरीं । भरुनि वैखरी सांटविलें ॥ २ ॥ घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥ ३ ॥ फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां जालीसे निश्चिती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- उदमासी-व्यापारास, केणे-जिनस, माल, फडा-मंडळीस. अर्थ:- या विठ्ठलाच्या रूपाने खरेखुरे भांडवल आमच्या हाती आले असल्यामुळे याला काही आमच्या व्यापारात तूट येणार नाही. १ अतिशय स्वस्त असलेला असा विठ्ठलरूपी माल आमच्या घरीच सापडला असून त्याला आम्ही आमच्या वाणीतून साठवून ठेविला आहे. २ याचा लाभ सर्वांना देताना व घेताना होत असून सुदैवी असो, अथवा दुर्बल असो, सर्वांना त्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणे हा प्राप्त होतो. ३ एकदा विठ्ठलभक्तांच्या मंडळीत, मेळाव्यात तो असला म्हणजे, काही मग निराश होत नाही हा; मग जरी त्यास आपण समजून घेण्याच्या प्रयत्नात नसलो तरी चालेल. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र माझी निश्चिती झाली असून या विठ्ठलनामरूपी भांडवलाखेरीज आता चित्तात दुसरे काहीच धरणार नाही. ५ ८९१ पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥ १ ॥ रघवूनि ठेलों ठाव । जागा वाय सफळ ॥ २ ॥ पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥ ३ ॥ तुका म्हणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रघवूनि-व्यापून, क्षरभागी-क्षरणाऱ्या, कमी होणाऱ्या. अर्थ.-या श्रीहरीला मी माझे अंग पावलोपावली दिलेले असल्यामुळे माझे सर्व कार्य आता पूर्ण झाले आहे. १ जेवढी म्हणून विस्तृत जागा होती तो सर्व मी व्यापून राहिलो आहे. २ पुढे पुढे जाण्यात मनाला आनंद होत असून देहामध्ये संतोषही वाढत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक दिवशी कमी कमी होत जाणाऱ्या या जगाच्या आत, बाहेर मी सर्वत्र व्यापून राहिलो आहे. ४ ८९२ निवडूनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥ १ ॥ आतां पुढें 'भावसार' । जीवना थार पाहावया ॥ २ ॥ पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संचित-नशिबात अर्थ :- आम्ही आता श्रीहरीच्या नामाचे नवनीत सर्वांना निवडून दिले आहे. ज्याने त्याने आपल्या नशिबाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा. १ आता यापुढे जीवनाला काही आधार शोधायचा असेल तर, हरिविषय हा एकच आधार होय. २ जे कोणी परीक्षा करणारे डोळस असतील, त्यांच्या हाती हे हरिनामाचे नवनीत पडेल व जे देहादिकांच्या दृष्टीने आंधळे बनलेले असतील, ते मात्र उगाच चाचपडत राहतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी याचे मनोभावे सेवन करील, त्यासच हा लाभ निश्चित होईल. ४ ८९३ उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकिलें तें ॥ १ ॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । वळें वेताळीस कुळें जग ॥ २ ॥ १ भवसार.
सार्थ तुकारामगाथा ४१३ अबोलणे बोले डोळे झांकुनिया । बडबडी वाया दंभासाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणो खरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देखोवेखी-दुसऱ्याचे पाहून अर्थ :- जे केवळ इंद्रियांच्याच ओढीमुळे त्याच्या आधीन झालेले असतात, त्यांना योग्य काय, अयोग्य काय, हे काहीसुद्धा समजत नाही आपल्या गुरुजवळ ते जे शिकले त्याची वृथा बडबड मात्र करीत असतात १ अशा वागण्याने हे लोकही नरकास जातातच, पण यांच्या आधीच्या बेचाळीस पिढ्यातील पूर्वजही नरकास जातात २ हे लोक नुसते डोळे झाकतात व ब्रह्माचा अनुभव आला असल्याचे अबोल राहून बोलून दाखवितात. याची दांभिक बडबड मात्र व्यर्थ असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तर तेथील चांगले परीक्षा करणारे असून जे दुसऱ्याचे पाहून ढोंग करून नाचतात, त्यांना आम्ही नीट जाणतो हे खरे आहे ४ ८९४ एक मन तुझ्या अवघ्या भाडवला । वाटिता ते तुला येई कैसें ॥ १ ॥ म्हणउनि दृढ धरीं पातुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ २ ॥ आणिका संकल्पा नको गोऊ मन । तरीच कारण साध्य होय ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसे जाणावे उचित । तरी सहज स्थित येईल कळो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - स्थित-स्थित अर्थ - तुला असणारे एक मन तू निरनिराळ्या व्यवहाराकडे कसे वाटून देणार आहेस ? १ यासाठी तू मनात पांडुरंग दृढ धरून राहा ना, व तुझा देह प्रारब्धाच्या संगतीत लाव ना. २ याखेरीज इतर कुठल्या संकल्पा- तून तू आपल्या मनास गुंतवू नकोस असे झाले तरच तुझे जीवितध्येय जे परमार्थसाधन ते साध्य होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जे उचित आहे ते तू जाणावेस असे तू जाणलेस तर तुला सहजास्थित अशी असणारी आत्मभावाची स्थिती समजून येईल ४ ८९५ गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसे चित्त ॥ १ ॥ हेचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ २ ॥ ऐकावी म्हण कथा । राहे तैसे धरूनि चित्ता ॥ ३ ॥ तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धणी-तृप्ती अर्थ :- या श्रीहरीचे जे गीत असेल तेच गावे व त्या गाण्यातील रुपच मनात धरून असावे १ पण हे फारच अवघड काम असून, नुसते अन्न पाहून कधी भूक लागलेल्या माणसाची भूक भागेल काय ? २ म्हणून या श्रीहरीची कथा चित्तात राहील तशीच धरून ठेवावी लागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरी तृप्ती पोटभर जेवण केल्याखेरीज होत नसते. ४ ८९६ कळेल हे खूण । तरि दावी नारायण ॥ १ ॥ सत्य संतापाशीं राहे । येरा भय आड आहे ॥ २ ॥ अणुचिया ऐसें । असे भरले प्रकाशें ॥ ३ ॥ इंद्रियाचे धनी । ते हे जाती समजूनि ॥ ४ ॥ तर्क फुटकें वाटा । नागवण घटापटा ॥ ५ ॥ तुका म्हणे ल्यावें । डोळा अंजन वरवे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :-येरा-मत्नाशिवाय इतरांना, घटापटा-घटाकाश, पटाकाश अशी वेदान्तातील शुष्क चर्चा.
४१४ सार्थ तुकारामगाथा अर्थ - हा नारायण कृपा करील, धर्म दाखवील तरच पुढील खूण कळेल १ सत्य संतापाशी असते व त्याच्याशिवाय इतरांना मात्र मयाचीच परिस्थिती असते २ या परमेश्वराचे स्वरूप अणुरेणुएवढे असून त्याच्यात सर्वत्र प्रकाशच भरून राहिलेला आहे ३ इंद्रियावर स्वामित्व ठेवणारे जे कोणी आहेत त्यांनाच हे वर्म नीटपणे समजते ४ अनेक तर्क व कुतर्क करून नाना वाटा निर्माण करणारे व घटापटादिकांची शुष्क चर्चा करणाराची व्यर्थ नागवणूक मात्र होते ५ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी चांगले असे ज्ञानाजन डोळ्यात घालावे ६ ८९७ जातो न येति या वाटा । काय निरवितो करटा ॥ १ ॥ कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ २ ॥ पाहे वैरियाकडे । डोळे वासुनिया रडे ॥ ३ ॥ बांधुनिया यमा हातीं । दिला नाहीं त्याची खती ॥ ४ ॥ नाही यापें काम । ऐसे जाणे तो अधम ॥ ५ ॥ अजून तरि मुका । का रे जालासि म्हणे तुका ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - बेश्रम-निलाजरा अर्थ - जेथे गेल्याने परत येता येणार नाही, अशी वस्तुस्थिती असली तरी आपल्या धनदौलतीची व संपत्तीची व्यवस्था हा करटा पुरुष अशाही वेळेस करीत बसला आहे १ कसा हा निलाजरा झाला आहे पाहा याला कसलीच लाज नाही रामाचे नाम घ्यायला काही हा तयार नाही २ हा अजूनही आपल्या शत्रूकडे डोळे मोठे करून पाहतो व रडतो ३ सर्वांनी मिळून याला बांधून यमाच्या हातात दिलेले असले तरी त्याची काही चिंता दृष्टी हा करीत नाही ४ या यमदूतांशी आपले काहीच काम नाही, असे अजूनही हा अधम समजत असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, तू या प्रभूचे नाम घेण्याविषयी अजून तरी का मूक राहिला आहेस ? ६ ८९८ वाटा घेईं लवकरि । मागें अतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥ १ ॥ ऐसीं भांबावलीं किती । काय जाणो नेणो किती१ । समय नेणती । माथा भार वाहोनि ॥२॥ नाहीं सारिले तोवरी । धाव घेईं वेग करीं । घेतले पदरीं । फावले ते आपुलें ॥ ३ ॥ फट लडी म्हणे तुका । एक न राहावे धका । तरिच या सुखा । मग कैसा पावसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भरोवरी-खटपट, फटलडी-हलकट मनुष्य अर्थ - अरे माणसा, नीट ध्यानात घे परमार्थाचा वाटा लौकर घे ना पदरात नाही तर मग विनाकारण प्रभूला तू अतरला जाशील सारी खटपट त केलीस व त्या श्रमाचे श्रेय इतरच घेऊन जात आहेत असे होऊ नये १ अशाच भ्रमात कितीजण सापडली आहेत ते काही नीट समजत नाही ही माणसे प्रसंग न ओळखता वृथा संसाराचा भार डोक्यावर वागवून कष्टी होत असतात २ जोपर्यंत आयुष्य सरले नाही, तोपर्यंतच वेगाने, त्वरेने धाव घेऊन जे पदरात आहे ते आपलेच आहे असे समजून घेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, अरे हलकट मनुष्या, तुला सत्यज्ञानाचा किंवा परमार्थविचाराचा एक धकासुद्धा सहन होत नाही असे असेल तर मग तुला या परमार्थ सुखाचा ठेवा कसा प्राप्त होईल ? ४ ८९९ चालावा पथ तो पाहिजे त्या ठाया । ऐकिल्या वाया वारता त्या ॥ १ ॥ ऐका जी वोझे पडतसे पाया । भावाची तें जायावाट नव्हे ॥ २ ॥ व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव । सांगता तो भाव येत नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें पाहिजे आरालेँ । बियों निव्वळलें तरि भासे ॥ ४ ॥ १ भिती
सार्थ तुकारामगाथा ४१५ शब्दार्थ व टीपा :- धोजें-सरळपणाने, व्याली-बाळंत झालेल्या स्त्रीस, आराले-शांत. अर्थ -असा पंथ चालावा की, जेथे आपणास पोचावयाचे आहे, तेथे तो घेऊन जाणारा असावा. या ठिकाणी एकदा पोचल्यावर मग पूर्वीच्या ऐकलेल्या वाटा व्यर्थ होऊन जातात. १ मी पाया पडून सांगत आहे, ते गोष्ट सरळ मनाने ऐका ना तेथे निश्चितपणे जाण्यासाठी भक्तिमार्गाचीच वाट निश्चित नाही का? २ जी बाळंतीण आहे, तिला आपला अनुभव कुमारिकेस काही कधी सांगता येणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, येथे मन शांत पाहिजे, कारण बिंबाचे रूप स्वच्छ भासावयास हवे. ४ ९०० काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥ १ ॥ जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ २ ॥ काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥ ३ ॥ तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा १ डेंग हा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धस-अविचारी, मद बुद्धीचा, कुचर-न शिजणारा, डेंग-मूर्ख. अर्थ - वारा आल्यावर झाडे काय लवत नाहीत ? वेडा मनुष्य आपल्या देहाचे हावभाव काय विसरत नाही ? १ ज्याला चांगला उपदेश रुचत नाही, त्याला मद बुद्धीचा, अविचारी म्हणतात. २ दगड हा न बोलणारा जड असत नाही काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अन्नात न शिजणारा एखादा टणक दाणा असतो, त्याप्रमाणे हा मूर्ख मनुष्य या भक्तिमार्गाच्या विचारात समरस न होणाराच असतो ४ ९०१ देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥ १ ॥ मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सफळ मूर्ति ॥ २ ॥ काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । बोंधाळुनि थोरी परती सांडीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- देखीचा-दुसऱ्याचे पाहून, थोरी--थोरवी. अर्थ - दुसऱ्याचे पाहून काही दिमाख किंवा डौल दाखविला तरी तो काही खरा नव्हे. गारगोटचा कितीही झाल्या तरी हिऱ्यासारख्या कशा होतील ? १ अरे, अभाग्या, तू नीट मर्यादा जाणून ऐस ना. सर्व भूतमात्र हे त्या देवाच्या मूर्तीच आहेत, हे नीट समजून घे. २ उगाच खोट्या भरोस पडू नकोस व स्वतःच्या ठिकाणची थोरवी थोडी दूर सारून ठेव. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मला पुढे तुझा घात दिसत आहे. म्हणून मी तुला फजीत करून पाहात आहे. ४ ९०२ संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥ १ ॥ भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासा मुकावें ॥ २ ॥ भिक्षा आणि बेवसाय । कसा करितो गाढव ॥ ३ ॥ करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी फास्या निस्पृही ॥ ४ ॥ प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं २ ॥ ५ ॥ तुका म्हणे होईं शूर । किंवा निसुर मजूर ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- निसुर-निवळ. अर्थ :- संसाराचे ओझे माथ्यावर असले की, मग पलीकडे काही उरतच नाही १ या भक्तीची जातच अशी आहे की, तिच्यासाठी सर्वस्वात्या मुकावे लागते. २ वैराग्यासाठी भिक्षा मागायची असेल तर, तिची व १ जाणा, २ जेवी.
४१६ सार्थ तुकारामगाथा व्यवसायाची गल्लत करून भागणार नाही. असा फाला करणारा गाढवच म्हणायला हवा ३ बाजारात लोभाने गेला आहे आणि स्वतःस मी निःस्पृह म्हणून घेत आहे, हे कसे पटणार ? ४ दुसऱ्याच्या कवितेतील काही प्रासादिक शब्द उचलून कवित्व करणाऱ्या भोंदू कवीचे काव्य हे खऱ्या तुपात पाणी मिसळल्याप्रमाणेच नव्हे काय ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, एक चांगले शूर तरी व्हावे, किंवा निव्वळ मजूर तरी बनावे. ६ ९०३ तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥ १ ॥ काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ २ ॥ नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥ ३ ॥ तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तेज्या-तेजीत असणाऱ्या घोड्यास. अर्थ - तेजीत असणाऱ्या घोड्याला नुसती इशारत करताच त्याला समजते व तो त्याप्रमाणे वागू लागतो; परंतु निर्बुद्ध तट्टाला कितीही फोक मारिले तरी ते काही ऐकत नाही. १ तुम्हाला काय सांगावे ? तुम्ही त्याच्या- हूनही नीच झालेले दिसता. तेव्हा मी काय सांगतो ते नीट मनात धरा व त्याप्रमाणे वागा. २ मी काही तसा भांडखोर नाही; पण तुमचा पदर ओढून धरीन व काही सांगू शकेन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांनी तोंड खाली करून काळे करावे. ४ ९०४ मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥ १ ॥ आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ २ ॥ वर्णधर्म कोणी न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥ ३ ॥ वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥ ४ ॥ तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहु होती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कळीं-कलियुगात अर्थ - मागच्या संतांनी पुढे होणार होणार म्हणून जे जे सांगितले आहे, ते ते सर्व अनुभवास येऊ लागले आहे. १ या कलियुगात लोक आचारभ्रष्ट होतील व त्यामुळे पुण्य क्षीण होऊन पाप मात्र बलवान ठरेल. २ वर्णधर्माचा कोणीही विटाळ न मानता एकाच ठिकाणी सर्व वर्णांचा व जातींचा गोंधळ निर्माण होईल. ३ वेदांचे पठण करणारेच दारूचे सेवन करतील व हे भांडखोर विषयाचा भेद पाहणार नाहीत ४ तुकाराम महाराज म्हणतात, याची फजिती तरी किती करावी ? त्याचे तेच तेच छंद नित्याचे म्हणून होत राहतात ५ ९०५ अक्षरांचा श्रम केला । फळा१ आला तेणे तो ॥ १ ॥ अवघियाचा तळ घरी । जीबा उरी नुरउनी ॥ २ ॥ फळलें२ तें लवे भारें । पिक खरें३ आलें तईं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । पुढें भाव साराया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अक्षराचा-पाठांतराचा. अर्थ :- काही अक्षरांचे व ग्रंथांचे पाठांतर करण्याचे श्रम केले म्हणून पुढील फळ प्राप्त झाले. १ त्याच्या आयुष्यात जीवदशा उरलेली नसून सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी तो विनम्र झालेला आहे. २ जो वृक्ष फळांच्या भारांनी खाली लवला आहे, त्यासच खरे व समृद्ध पीक आले आहे, हे खरेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा हा भाव या देवापुढे ठेवावा सर्वांनी ४ १ फळो, २ भरले, ३ सरे
सार्थ तुकारामगाथा ४१७ ९०६ उचित जाणावे मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायां स्थीर ॥ १ ॥ न घलावी १ धाव मनाचिये ओडी । वचन आवडी संतांचिये ॥ २ ॥ अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - स्थीर-स्थिर अर्थ - आपले चित्त शुद्ध करून, बुद्धी परमेश्वराच्या पायाशीं स्थिर करून, उचित असेल त्या धर्माचे धर्म आधी नीट जाणावे १ केवळ ओढाळ मनाच्याच ओघाने किंवा ओडीने धावत सुटू नये संतांच्या वचनाचा आव- डीने ध्यासच ठेवावा २ या संतवचनाचा विश्वास एकदा मनात स्थिर झाला म्हणजे मग तुकाराम महाराज म्हणतात, उपदेशही करावा लागणार नाही ३ ९०७ जीवन हे मुक्त नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥ १ ॥ बहुत अन्न विष मोहरीच्या माने । अवघेंचि तेणें विष होय ॥ २ ॥ तुका म्हणे जेणे आपुलें स्वहित । तैंसी करीं नीत विचारूनि ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - मानें-प्रमाणानसुद्धा अर्थ - एखादा मनुष्य अत्यंत पवित्र आचरणाचा असून तो जीवन्मुक्तही आहे तरीसुद्धा त्याने दुर्जनांची संगत सोडायला हवी १ अन्न पुष्कळ असले तरी मोहरीएवढ्या विषानेसुद्धा त्याज्यात सर्वत्र विष पसरून राहाते २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यात आपले स्वहित आहे त्याविषयी बरी नीती पाहून विचार करावा ३ ९०८ द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥ १ ॥ करोनिया हेंचि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥ २ ॥ तुका म्हणे हेंचि करूनि जतन । आलिया हो दान याचकासी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - लाग-पाठलाग अर्थ - द्रव्याचा आम्ही नेहमी विटाळच मानलेला आहे कारण या द्रव्याच्या मागे काळ एकसारखा पाठ- लाग करीत असतो १ म्हणून नारायणाचे नाम हेच मी माझे जीवन ठरवून राहिलो आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, याच भावाची मी जपणूक करणार असून जे कुणी याचक दान मागायला येतील त्यांनाही हेच देणार आहे ३ ९०९ द्रव्याचिया मागें कळिकाळाचा लाग । म्हणोनिया संग खोटा त्याचा ॥ १ ॥ निरयाचे मूळ घालुनिया मागें । माडिली प्रसंगें कथा पुढें ॥ २ ॥ आजिच्या प्रसगें हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥ ३ ॥ प्रारब्ध काहीं न पालटे सोसें । तृष्णेचे हे पिसें वायांचिन ॥ ४ ॥ तुका म्हणे घेईं राहे ऐसें धन । सादर श्रवण करुनियां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - लाग-पाठलाग निरयाचे-नरकाच, प्रारब्ध-दैव अर्थ - द्रव्याची संगत, सोबत खोटी आहे असेच समजा कारण त्याच्या पाठीमागें एकसारखा काळ लागलेला असतो कळिकाळ त्याचा पाठलाग करीत असतो १ नरकाचे मूळ असणारे हे द्रव्य सोडून, त्याचा त्याग करूनच मी यापुढची कथा प्रसंगाने सांगत आहे २ आजच्याही प्रसंगी हाच लाभ तुम्ही करून घ्यावा व देवावर भार घालावा ३ आपल्या दैवात जे असेल ते कितीही प्रयत्न केला तरी पालटणार नाही त्यामुळे एकसारख्या तृष्णेचे येड व्यर्थ आहे असेच समजावे ४ तुकाराम महाराज म्हणतात नीट आदराने श्रवण करून परमार्थमार्गाचे जे धन कायम टिकेल तेच स्वीकारावे ५ १ घालावी तु गा ५३
४१८ सार्थ तुकारामगाथा ९१० रडे अळंकार ऐन्याचियें¹ कांती । उत्तमा विपत्तिसंग घडे ॥ १ ॥ एकाविण एक अशोभ्य दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ २ ॥ रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रांधू नेणे-स्वयंपाक करणे जाणीत नाही. अर्थ :- अंगावर भरपूर अलंकार घातले आहेत; पण ज्याच्या अंगावर अलंकार आहेत, तोच सारखा रडत असेल किंवा तोच कांतिविहीन व दैन्यवाणा असेल तर मग काय उपयोग ? कारण दागिने अथवा अलंकार उत्तम असले तरी, ते विपत्तीच्या संगतीत असल्याने त्याची काती असून नसल्यासारखीच वाटते १ एकास दुसरे शोभून दिसणारे जर दातारा, नसेल तर त्याचा उपयोग काय ? पांडुरंगा, कृपेच्या सागरा, मग ते सुरूपही विशोभित दिसेल. २ चांगली स्वयंपाकाची आयती तयारी केली व ती ज्याला स्वयंपाक बिलकुल येत नाही, त्याच्यापुढे नेऊन ठेविली तर तिचा काय उपयोग होणार ? ती सर्व वायाच जाणार ना ! ३ तुकाराम महाराज म्हणतात, शेळीच्या गळ्यात कुणी सर्व चिंता दूर करणारा चिंतामणी बांधला तरी त्याचा काय उपयोग होणार तिला ? तो त्या स्थानी विशोभितच दिसणार. ४ ९११ दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसी ॥ १ ॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ २ ॥ भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें झांकितीळ डोळे । भोग देतेवेळे येईल कळों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तव-तर. अर्थ - या मानवी जन्मात दुःखाचे डोंगरच्या डोंगर सहन करावे लागतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. १ असे असूनही हे लोक आपल्या हिताचा विचार कधी करीत नाहीत, की कधी प्रभूच्या नामाचा घोष करीत नाहीत. २ या जन्मी आपण जे भोग भोगीत आहोत, ते पाहून या मागील जन्मात आपण उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे जे जे कर्म केले असेल ते ते ध्यानी येते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक याकडे या जन्मी डोळेझाक करतील व मग नाना खडतर भोग भोगताना मात्र त्यांना समजून येईल. ४ ९१२ सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥ १ ॥ मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ती देखाया ॥ २ ॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होतीं पांगुळें ॥ ३ ॥ घरास आणि लायुनि जागा । न पळे तो² गा वांचे ना ॥ ४ ॥ तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सदैव-सुदैवाने, ठकलीं-फसली. अर्थ:-तुम्ही फार सुदैवाने जगणारे आहात, कारण ईश्वराने तुम्हाता सर्व अवयव नीटनेटके दिलेले आहेत. चालण्यासाठी पाय आहेत, पुण्यकर्म करण्यासाठी हात आहेत १ देवाचे नाव घेण्यासाठी वाणी मुखात आहे. त्याची कीर्ती ऐकण्यासाठी कान आहेत, त्याची मूर्ती पाहण्यासाठी डोळे आहेत. २ कित्येक आंधळे, बहिरे, मुके, पांगळे परमेश्वराची सेवा करिता येत नाही म्हणून फसले गेले आहेत ३ घराला आग लागली आहे व आत राहणारा जागा असून पळत नाही, तो कसा जिवंत राहणार ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, लोकांनो, तुम्ही आपल्या हिताविषयी नीट जागृत असा. ५ १ विघ्नवेने सगतीं, २ ते.
सार्थ तुकारामगाथा ४१९ ९१३ ऐसे पुढती मिळता आता । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥ १ ॥ म्हणउनि फावले तें घ्यावे । नाम गावे आवडी ॥ २ ॥ संचित प्रारब्ध गाढें । धावे पुढे क्रियमाण ॥ ३ ॥ तुका म्हणे घुबडा ऐसे । जन्म सरिसे शुकराचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ऐसे-असा मानवी देह शूकर-डुक्कर अर्थ - मानवी देहासारखे उत्तम साधन पुढे प्राप्त होईल असे नाही याबाबतीत आपण स्वतंत्र नसून आपल्या हाती सत्ताही काही नाही १ म्हणून जो आज मिळाला आहे, त्याचा फायदा घेऊन ईश्वराचे नाव मोठ्या प्रेमाने घेत जावे २ कारण आपल्या संचित कर्माची मोठ्या प्रारब्धाची व क्रियमाणाची गती एकसारखी पुढे धाडत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात यापुढे कदाचित घुबडाचे, डुकराचे जन्म न येतील हे कशावरून ? तेव्हा तुम्ही या नरजन्मातच काय साधायचे असेल ते साधा ४ ९१४ सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आता कोण भाव निवडे एक ॥ १ ॥ संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणता माझें कोणी ॥ २ ॥ देहसुख काहीं बोलिले उपचार । विष ते आदर बद' वाटे ॥ ३ ॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवाचे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - न साहे-सहन होत नाही, बद-वधन उपाधी-अडचण अर्थ - या सर्व लौकिक व सांसारिक गोष्टींविषयी माझा जीव त्रासून गेला आहे आता नाही असा कोणता एक भाव मी निवडून सांगू ? १ संसारासंबंधी तर मला कसलीच रुची नाही, त्याची वार्ताही सहन होत नाही आणि दुसऱ्याने कुणी हा संसार माझा माझा असे म्हटल्याचेही सहन होत नाही २ देहाला सुख देणाऱ्या काही उपचारांविषयी कुणी सुचविले तर तेही मला आवडत नाही इंद्रियसुखाचे हे भोग मला विषाप्रमाणे वाटतात त्याचे मोठे बंधनच माझ्या मनावर असते ३ कुणी माझा गौरव केला, कुणी माझी प्रतिष्ठा सांगितली तर त्या स्तुतीने माझा जीव फार कासावीस होतो ४ तुकाराम महाराज म्हणतात मला आता दुसरे काहीही सहन होत नाही मला या वैष्णवांचेच पाय महमी आवडतात मी त्यांचाच आश्रय घेतो ५ ९१५ आणीक काहीं या उत्तराचे काज । नाहीं आता मज बोलावया ॥ १ ॥ भिन्न भेद हे भावनाव्स्वभाव । नव्हे काहीं देव एकविध ॥ २ ॥ गुण दोष कोणे निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म ते ॥ ३ ॥ तरिच भले आता न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥ ४ ॥ तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हेचि धणी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - काज-कारण धणी-तृप्ती अर्थ - आता दुसरे काही बोलावे हे कारणच मजजवळ नाही १ मानवी स्वभावानुसार ज्या ज्या भावना असतील त्या त्या प्रमाणे भिन्न भिन्न प्रकार असले तरी देव हा एकविध म्हणजे विविधतेतही एकपणानेच नटलेला आहे २ गुणांची व दोषांची निवड कोणत्या धर्मावरून करावी ? कर्म व अकर्म याची निवड कशी करावी ? याना कसे जाणावे ? ३ आता कुणाचीही संगत धरू नये यातच खरे म्हणजे चांगले आहे यामुळे दुःखाचे प्रसंगही आपोआप तुटले जातील ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी या देवाचेच गुण गात राहील यातच तिची तृप्ती आहे ५ १ बध
४२० सार्थ तुकारामगाथा ९१६ आपुल्या विचार करीन जीवांशीं । काय या जनांशीं चाड मज ॥ १ ॥ आपुलें स्वहित जाणती सकळें । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ २ ॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥ ३ ॥ माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥ ४ ॥ तुका म्हणे भाकूं आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाड-किंमत, वोज-चांगला. अर्थ :- परमार्थासंबंधीचा विचार मी माझ्या जीवाला विचारूनच करीन. इतर लोकांची किंमत मला काय असणार ? त्यांचा संबंध काय ? १ जो तो आपले हित नीटपणे जाणीत असतोच; त्यांना त्यांच्या कर्मापासून निरोधित केले तर दुःखच होणार. २ माझी ही कथा कोणी ऐको वा न ऐको, किंवा कोणी आपल्या घरी सुखाने झोपी जावोत. ३ माझा तरी या मार्गात असा कोणता चांगला शेवट झाला आहे की, ज्याच्यामुळे मी इतरांना मार्गाला लावावे ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी स्वतःपुरती त्या ईश्वराची करुणा भाकेन. ज्याची जशी वासना तसा तो त्यास प्रसन्न होईल. तशी त्याची वासना फळद्रूप होईल. ५ ९१७ धाईं अंतरिच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥ १ ॥ विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ २ ॥ वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥ ३ ॥ अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥ ४ ॥ साधनाची सिद्धि । मौन करा स्थिर बुद्धि ॥ ५ ॥ तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - धाईं-संतुष्ट, ब्रह्मवृंदें-ब्राह्मणांचे मेळावे. अर्थ :- अंतःकरणातील परमेश्वररूपाच्या दर्शनाने जे सुख होईल ते ध्यानात धरून संतुष्ट व्हावे. मुखाने उगाच बडबड कशास करावी ? १ परमेश्वराच्या विषयांची अनुभवाची गोडी जोपर्यंत लाभलेली नाही, तोपर्यंत विधिनिषेधांची शुष्क चर्चा नुसती उर फोडणारी व्यर्थच होते. २ जोपर्यंत ईश्वरविषयक अनुभव आलेला नाही, तोपर्यंत हृदयातील तळमळ मात्र वाढत असते. ३ कित्येक जण आपल्याच विशिष्ट मताने येडावलेले असून त्यांचा त्यायोगे काहीही फायदा झालेला नाही. ते जिथे आहेत, तिथेच दिसतात. त्यांच्यांत कसलीही प्रगती झालेली नाही. ४ तुम्ही मौन धारण करून बुद्धी स्थिर करा. हीच खरी म्हणजे सर्व साधनांची सिद्धी आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु व्यर्थ वादविवाद करकरून हे ब्राह्मणांचे समुदाय किंवा मेळावे उगाच वाया मात्र गेलेले दिसतात. ६ ९१८ कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥ १ ॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ २ ॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥ ३ ॥ तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कुशळ-कुशल, सांकडीं-संकटात, उपणुनि-पाखडून, मथिलें-पुसलेले असता. अर्थ :- जे शास्त्रांमध्ये कुशल आहेत, त्यांचे सारे आयुष्य विधिनिषेधांच्या जंजाळातच जाते व ज्यांची बुद्धी प्रगल्भ आहे, ते नेहमीच वाद करण्यास प्रवृत्त झालेले असतात. १ ढोंग किंवा दंभ व विषयांची संकटे यांत हे दीन बापडे लोक कसे फसून गेले आहेत पाहा. २ भुसा पाखडून काय हाती लागणार ? दाणेही जातील व भुसही हातचा जाईल. ३ आधीच लोणी काढून घेतले असताना मग ताक घुसळले असता काय हातात येणार ? ४