भारतकोश
संग्रह पर लौटें

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

योजना जयसिंगापुढे मांडली. जयसिंगाने, मान्यता दिल्यावर शिवाजीने पन्हाळ्यावर हल्ला केला पण त्याला यश आले नाही. बहुधा याचवेळी नेताजी पालकर आणि शिवाजी यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. नेताजी पालकर आदिलशहाकडे निघून गेला परंतु मिर्झाराजे जयसिंगाने मोठे आमिष दाखवून नेताजीला आपल्याकडे ओढून घेतले आणि त्याला कैद करून औरंगजेबाकडे निघून गेला परंतु मिर्झाराजे जयसिंगाने मोठे आमिष दाखवून नेताजीला आपल्याकडे ओढून घेतले आणि त्याला कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले. औरंगजेबाने त्याचे सक्तीने धर्मांतर केले. महंमद कुलीखाँ असे नाव ठेऊन त्याला काबूलकडे मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या मोहिमेत जयसिंगासारखा महाप्रतापी सरदार आणि शिवाजीसारखा चतुर युद्ध सेनानी एकत्र असतानाही यश मिळाले नाही हे पाहून औरंगजेबाला या मोहिमेविषयीच संशय वाटू लागला. जयसिंगावर त्याचा विश्वास होता, पण शिवाजीविषयी मात्र त्याला खात्री वाटत नव्हती. शिवाजी हा धूर्त राजकारणी असल्यामुळे अंत:स्थपणे त्याच्या काही हालचाली चालत असतील असा संशय जयसिंगालाही येत होता. शिवाय दक्षिणेत आदिलशहा आणि कुतुबशहा मुघलांविरुद्ध एक झाले आहे, असा दाट संशय जयसिंगाला आला होता आणि औरंगजेबालाही त्याने तसे कळविले होते. दिल्लीहून औरंगजेबाचा जयसिंगावर वारंवार दबाव येत होता. त्यामुळे त्याने शेवटी शिवाजीलाच औरंगजेबाच्या भेटीसाठी पाठवून देण्याचे ठरविले. औरंगजेबाची संमती येताच मिर्झाराजे जयसिंगाने शिवाजीची रवानगी उत्तरेकडे केली. शिवाजी उत्तरेकडे पुरंदरचा तह झाल्यापासूनच शिवाजीने औरंगजेबाच्या भेटीस जावे असा जयसिंगाचा आग्रह चालू होता. विजापूरच्या मोहिमेत यश न आल्यामुळे जयसिंगाने आपला विचार पक्का केला आणि औरंगजेबाच्या भेटीस जाण्यासाठी शिवाजीचे मन वळविले. शिवाजीलाही उत्तर भारतात जाऊन तेथील मुघली राजवट पाहण्याची मनापासून इच्छा होती. औरंगजेबालाही दक्षिणेच्या राजकारणात तुफान माजविणाऱ्या शिवाजीला पाहण्याची इच्छा होती. प्रत्यक्ष भेटीत शिवाजीच्या मनातील अंत:स्थ हेतू जाणून घेता येतील असे बादशहाला वाटत होते. ५ मार्च १६६६ रोजी शिवाजी संभाजीसह उत्तरेकडे म्हणजे आग्र्याकडे निघाला. प्रयाण करण्यापूर्वी शिवाजीने स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी राजमाता जीजाबाई हिच्याकडे सुपूर्त केली. मोरोपंत पिंगळे आणि निळोपंत मुजुमदार ४६ छत्रपती शिवाजी महाराज

यांच्यावर स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली. शिवाजीने आपल्यासमवेत निवडक मराठा सरदार घेतले होते. त्यामध्ये निराजी रावजी, त्रिंबकजी सोनदेव, माणको हरी, दत्ताजी त्रिंबक, राघोजी मित्रा, दावलजी गाडगे आणि हिरोजी फर्जंद हे प्रमुख सरदार होते. एकूण लश्कर ३००० आणि मावळे १००० दिमतीसाठी बरोबर घेतले होते. औरंगाबाद शहरात ज्या दिवशी शिवाजीने प्रवेश केला त्या दिवशी त्याचे भव्य स्वागत झाले. त्याला पहाण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्याचे वर्णन भीमसेन सक्सेना याने आपल्या ‘तारिखे दिल्कशा’ या ग्रंथात करून ठेवलेले आहे. औरंगाबादचा मुघल अधिकारी सफशिकन खान हा मोठ्या आढ्यतेने शिवाजीशी वागला तेव्हा शिवाजीने त्याला चांगली समज दिली. औरंगाबादेत काही दिवस शिवाजीने मुक्काम केला आणि त्यानंतर आग्र्याकडे प्रयाण केले. आग्र्याकडे जात असतांना मध्ये एका मुक्कामात शिवाजीला औरंगजेबाचे एक पत्र मिळाले. या पत्रात औरंगजेबाने म्हटले होते की, “तुम्ही विश्वासाने आमच्याकडे यावे, भेट झाल्यावर आपला मोठा सत्कार करण्यात येईल आणि माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल.” या पत्रावरून असे स्पष्ट दिसते की भेट झाल्यावर शिवाजीला परत पाठविण्याचे आश्वासन औरंगजेबाने दिले होते परंतु औरंगजेबाच्या मनात नेमके काय आहे याबाबत स्वतः शिवाजी साशंक होता. एकतर मुघलांच्या राजधानीत जाऊन भर दरबारात मुघल बादशाहाची भेट घ्यावयाची म्हणजे शिवाजीच्या दृष्टीने एक कसोटीचा प्रसंग. कुठल्याही प्रकारचा अन्याय आणि कसल्याही प्रकारचा अवमान सहन करण्याची शिवाजीची अजिबात तयारी नव्हती. त्याचा तो स्वभावच नव्हता. म्हणून मुघल दरबारात भेटीच्या वेळी नेमके काय घडेल याविषयी तो साशंक होता. शिवाजीच्या या आग्राभेटीकडे दक्षिणेतील लहानमोठ्या राज्यकर्त्यांचे, एवढेच नव्हे तर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या पाश्चात्यांचेही लक्ष लागलेले होते कारण या भेटीनंतर दक्षिणेतील राजकारणाचे रंग बदलण्याची दाट शक्यता होती. जयसिंगाची स्वारी ४७

७. शिवाजी आणि औरंगजेब वाढदिवसाचा दरबार १२ मे १६६६ रोजी बादशहा औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आग्रा येथे खास दरबार भरविण्याचे ठरले होते. योगायोग असा की ११ मे १६६६ रोजी शिवाजी मलुकचंदसराई येथे येऊन पोहचला होता. तेथून आग्रा शहर अतिशय जवळ होते. शिवाजी आणि औरंगजेब यांची भेट वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष खास दरबारात घडवून आणावी असा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याचा विचार होता. १२ मे रोजी स्वतः रामसिंग शिवाजीकडे गेला आणि त्याचे स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी ‘दिवाण-इ-आम’ या दरबारात नेण्याचे त्याने ठरविले. परंतु शिवाजी तिथे पोहोचण्याअगोदरच ‘दिवाण-इ-आम’मधील औरंगजेबाचा वाढदिवस समारंभ संपला होता आणि खास अमीर उमराव लोकांसाठी असलेल्या ‘दिवाण-इ-खास’ या दरबारामध्ये औरंगजेब गेला. त्या काळी दिवाण-इ-खास ‘घुसलखाना’ या नावाने प्रसिद्ध होता. घुसलखाना याचा अर्थ स्नानगृह. या शब्दामुळे काही इतिहासकारांचा गैरसमज होऊन औरंगजेब व शिवाजी यांची भेट स्नानगृहात झाली असा हास्यास्पद निष्कर्ष त्यांनी काढलेला आढळतो. दिवाण-इ-खासला घुसलखाना नाव पडण्याचे कारण की सम्राट अकबर स्नान आटोपले की लगेच या दरबारामध्ये हजर होत असे म्हणून दिवाण-इ-खासला रूढ अर्थाने घुसलखाना हे नाव प्राप्त झाले होते. औरंगजेब ‘दिवाण-इ-खास’मध्ये आल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अमीर उमरावांनी बादशहाच्या जयजयकाराच्या घोषणा केल्या. शिवाजी-औरंगजेब भेट ‘दिवाण-इ-खास’मध्ये आल्यानंतर अमीर उमरावांनी कुर्निसात करून बादशहाला भेटवस्तू अर्पण करण्यास सुरुवात केली. याचवेळी रामसिंग शिवाजी ४८

आणि संभाजी यांना घेऊन 'दिवाण-इ-खास'मध्ये दाखल झाला. शिवाजी आणि संभाजी दोघांनीही औरंगजेबास नजर-निसार सादर केली. याच क्षणी औरंगजेबाने शिवाजीला फजित करण्याचे ठरविले होते. वास्तविक पहाता बादशहाने शिवाजीला मोठ्या सन्मानाने भेटीसाठी बोलाविले होते आणि खास पत्र पाठवून 'तुमचा बहुत सन्मान होईल' असे आश्वासनही दिले होते. जयसिंगाचा मुलगा रामसिंग यालाही वाटत होते की बादशहाकडून शिवाजी आणि संभाजीला सन्मानाची वागणूक मिळेल. परंतु शिवाजीला फजित करण्याची आणि त्याचा स्वाभिमान डिवचण्याची ही संधी आपोआप चालून आली असे समजून औरंगजेबाने शिवाजीस पंचहजारी सरदारांच्या रांगेत उभे करण्याचे रामसिंगास फर्माविले. या रांगेत सिंहगड जिंकण्यात अपयशी ठरलेला जसवंतसिंग शिवाजीच्या पुढे होता. त्याच्याकडे लक्ष जाताच शिवाजी संतापाने थरथरू लागला. औरंगजेब अशाप्रकारे आपला अपमान करून पंचहजारी सरदारांच्या रांगेत जसवंतसिंगासारख्या क्षुद्र सरदाराच्या मागे उभा करील असे शिवाजीला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. त्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. रामसिंग त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु औरंगजेबाने मात्र शिवाजीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. उलट अमीर उमरावांना खिलत देण्याचा उपक्रम सुरू केला. हा सारा प्रकार शिवाजीला उद्वेगजनक वाटल्यास नवल नाही. रामसिंगाला त्याने बजावले की मला शोभेसा सन्मान मिळाला पाहिजे. एवढे बोलून शिवाजी सिंहासनाकडे पाठ करून घुसलखान्याच्या बाहेर पडला. हे लक्षात येताच औरंगजेबाने रामसिंगाला शिवाजी आणि संभाजी यांना घेऊन जाण्यास सांगितले. शिवाजी नजरकैदेत दरबारात अपमान झालेला पाहून शिवाजी रागाने निघून गेला हे औरंगजेबाच्या लक्षात आले. रामसिंगाला बोलवून शिवाजीची समजूत काढण्यास त्याला फर्माविले. पण अशा मलमपट्टीमुळे शिवाजीच्या स्वाभिमानी मनाला झालेली जखम भरून येणे शक्य नव्हते. त्याचा क्रोध थोडाही कमी झाला नव्हता. तेव्हा औरंगजेबाने तीन सरदारांबरोबर शिवाजीसाठी खिलत पाठविली पण शिवाजीने खिलत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. आपण केलेला अपमान शिवाजीला जिव्हारी लागला आहे हे औरंगजेबाने ओळखले. आता शिवाजीच्या संदर्भात कोणता उपाय योजावा असा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला. शेवटी त्याने ठरविले की शिवाजीला नजरकैदेत शिवाजी आणि औरंगजेब ४९

३. अफजलखान वध व प्रतापगढ़ महायुद्ध

ठेवावे आणि त्याच्या निवासस्थानाभोवती कडक पहारा ठेवावा. शिवाजी पुन्हा औरंगजेबाच्या दरबारात पाऊल टाकणे शक्य नव्हते. तथापि रामसिंगाने संभाजीला घेऊन दरबारात जाण्याचे ठरविले. १४ मे रोजी रामसिंगाबरोबर संभाजी बादशहाच्या दरबारात गेला तेव्हा रत्नजडीत कट्यार, मोत्याचा कंठा आणि पोषाख देऊन औरंगजेबाने त्याचा सन्मान केला. वरकरणी हे नाटक करीत असताना शिवाजीला ठार मारण्याचा कटही औरंगजेबाने रचला होता. शिवाजीच्या पहाऱ्यावर असलेल्या फुलादखानाला 'गुप्तपणे शिवाजीस मारून टाका' असा इशारा बादशहाने दिला होता. शाही दरबारातील आप्तस्वकीयांकडून आणि ज्येष्ठ सरदारांकडून शिवाजीला ठार मारावे असा आग्रह औरंगजेबाकडे चालू होता. शायिस्तेखानाची पत्नी म्हणजे औरंगजेबाची मामी जहान आरा बेगम, जाफरखान, मूर्तजाखान इ. सरदारही शिवाजीचा निकाल लावावा असे औरंगजेबाला आग्रहाने सांगत होते. या साऱ्या गोष्टीचा कानोसा लागल्यावर रामसिंग अत्यंत संतप्त झाला. शिवाजीच्या केसाला जरी धक्का लागला तरी आपण तो सहन करणार नाही असे रामसिंगाने जाहीर केले आणि शिवाजीच्या रक्षणासाठी आपली प्रतिष्ठा त्याने पणास लावली. औरंगजेबाला शिवाजीचे पुढे काय करावे हे समजेनासे झाले. एक तर शाही दरबारातील ज्येष्ठ सरदार आणि जहान आरा बेगम शिवाजीला कडक शिक्षा द्यावी यासाठी औरंगजेबाकडे आग्रह करीत होते. दक्षिणेत खुद्द मिर्झाराजे जयसिंग शिवाजी आग्र्याला नजरकैदेत असल्याचे समजल्यापासून अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्यातच औरंगजेबाच्या मनात असा विचार आला होता की, शिवाजीला कैदेत ठेवून आपण स्वतः दक्षिणेची स्वारी करावी आणि शिवाजीचा सर्व प्रदेश जिंकून घ्यावा. पण हा बेत ज्यावेळी जयसिंगाला समजला तेव्हा त्याने प्रखर विरोध केला. त्याने औरंगजेबास कळविले की, 'शिवाजीला कैदेत ठेवून आपण दक्षिणेत स्वारी काढली तर येथील मराठे बिथरतील आणि मग आपला हेतू तर साध्य होणार नाहीच पण नामुष्की पदरात येईल.' जयसिंगाकडून हा इशारा मिळाल्यानंतर औरंगजेबाने स्वारीचा बेत सोडून दिला. जसे दिवस जातील तसे त्याची अस्वस्थता वाढू लागली. शिवाजीला खुश करून त्याचे मन रमवावे म्हणून औरंगजेबाने मोठी मनसब देण्याचे आमिष दाखविले. परंतु स्वाभिमानी शिवाजीने मनसबीचे आमिष झुगारून दिले. त्यामुळे औरंगजेब अधिकच संतप्त झाला. शिवाजीला काबूलच्या मोहिमेवर पाठवून तिकडेच त्याचा निकाल लावावा असा एक अफलातून विचार औरंगजेबाच्या डोक्यात आला. परंतु जयसिंग त्यामुळे अतिशय बिथरून जाईल आणि ५० छत्रपती शिवाजी महाराज

दक्षिणेतील मराठे सूड उगविल्याशिवाय राहणार नाहीत असे वाटल्यामुळे त्याने तो अफलातून विचार सोडून दिला. नेमके काय करावे हे त्याला नक्की समजेना. त्याने एकच गोष्ट केली. ती म्हणजे शिवाजीभोवतीचा पहारा जास्त कडक केला. शिवाजीही कैदेमध्ये अत्यंत बेचैन अवस्थेत होता. आपल्यामुळे रामसिंगाची परिस्थिती अवघड झाली आहे याची खंत त्याला वाटत होती. कारण औरंगजेबाने शिवाजीचा जामीन म्हणून रामसिंगाला मुक्रर केले होते. रामसिंगाची अवस्था अधिक अवघड होऊ नये म्हणून त्याची जामीनकी काढून घ्यावी असा प्रस्ताव शिवाजीने औरंगजेबापुढे मांडला पण त्याची प्रतिक्रिया भलतीच झाली. औरंगजेबाने जामीनकी तर काढून घेतली नाहीच उलट रामसिंगाचाच आणखी एक पहारा शिवाजीभोवती बसविला. आपल्याबरोबर दक्षिणेतून जी मंडळी आली आहे ती विनाकारण आपल्याबरोबर उत्तरेत अडकून पडली आहे याची खंतही शिवाजीला वाटत होती. म्हणून आपल्याबरोबर आलेल्या मंडळींना दक्षिणेकडे जाण्यासाठी परवानगी द्यावी असा आणखी एक प्रस्ताव शिवाजीने मांडला. तो मात्र औरंगजेबाने तातडीने मान्य केला आणि शिवाजीबरोबर आलेल्या लोकांना दक्षिणेत जाण्यासंबंधी परवाने देण्याबद्दल त्याने हुकूम काढला. शिवाजीचे अलौकिक साहस शिवाजीबरोबर आलेली बरीच मंडळी बादशहाकडून परवाने मिळताच दक्षिणेकडे परतू लागली. त्यामुळे शिवाजीला हायसे वाटले. संभाजी आणि काही निवडक लोक आपल्याजवळ राहतील असा त्याचा मनोदय होता. निवासस्थानाभोवतीचा पहारा तर कडक होताच, बाहेर कोठेही जाण्यास मज्जाव होता आणि पहारा कडक असल्यामुळे कोणाशीही संपर्क साधणे शिवाजीला शक्य नव्हते. अशा या बिकट परिस्थितीमध्ये एक विलक्षण साहस करण्याचा शिवाजीने बेत रचला. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अलौकिक साहस करताना शिवाजी आपल्या नियोजित कृतीबाबत बारीकसारीक तपशील निश्चित करीत असावा. या कृतीचे परिणाम काय होतील याचाही तो बारकाईने विचार करीत असावा. एखादे लोकविलक्षण साहस करायचे असेल तर त्याचे नियोजन तो स्वतः पूर्ण विचाराअंती सूत्रबद्ध करीत असे. अफझलप्रसंग, शाहिस्तेखानप्रसंग, पन्हाळ्यातून सुटका, कारतलबखानाचे युद्ध या सर्व घटना बारकाईने पाहिल्यास शिवाजीचे लोकविलक्षण साहस सूत्रबद्ध नियोजनावरच आधारलेले होते हे समजून येते. शिवाजी आणि औरंगजेब ५१

आग्याला निवासस्थानाभोवतीचा पहारा अधिक कडक होत असलेला पाहून त्यामध्ये ढिलाई कशी आणता येईल याचा विचार शिवाजीने सुरू केला. आपण आजारी असल्याचा बहाणा त्याने केला. हकिमाकडे जाऊन औषध आणण्याची जबाबदारी त्याने हिरोजी फर्जंदवर सोपविली. मदारी मेहतर या एकनिष्ठ सेवकास पाय रगडण्यासाठी ठेवले. शिवाजीची बतावणी पाहून पहारेकऱ्यांना शिवाजी खरोखरीच आजारी आहे असे वाटू लागले. आपली बतावणी यशस्वी होत आहे हे पाहून शिवाजीने आणखी एक युक्ती योजली. आपल्याला साधूसंतांचे व फकीरांचे आशिर्वाद मिळावेत म्हणून मिठाईचे पेटारे पाठविण्याचे ठरविले. सुरुवातीला काही दिवस पहारेकरी हे पेटारे तपासून पाहत असत. पण पुढे पुढे कडक तपासणी करण्याचे त्यांनी सोडून दिले. अशा प्रकारे पहाऱ्यांमध्ये क्रमाक्रमाने ढिलाई प्राप्त झाली. या संधीचा फायदा घेऊन एकेदिवशी शिवाजीने संभाजीसह पलायन केले. पेटार्याची कथा शिवाजीने औरंगजेबाच्या कैदेतून कशी सुटका करून घेतली हे स्पष्ट करणारा नेमका पुरावा अद्यापही उपलब्ध झालेला नाही. जेधे शकावलीमध्ये अशी नोंद आहे की ‘श्रावण वद्य द्वादशी शके १५८८ या दिवशी आग्यातून महाराज पेटारीयात बैसोन पळाले.’ म्हणजे १९ ऑगस्ट १६६६ रोजी मिठाईच्या पेटार्‍यात बसून शिवाजी आणि संभाजी पळाले असा अर्थ होतो. बहुतेक इतिहासकार शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटार्‍यात बसूनच सुटका करून घेतली असे मानतात. समकालीन साधनांमध्ये ही याच आशयाचे पुरावे मिळतात. समकालीन पाश्चात्य प्रवासी थेवेनॉट याने आपल्या वृत्तांतामध्ये शिवाजी टोपलीत बसून पळून गेला असा उल्लेख केला आहे. भिमसेन सक्सेना या दरबारी लेखकाने ‘मिठाईच्या पेटार्‍यातूनच शिवाजी व संभाजी निसटले’ असे लिहून ठेवले आहे. वखारवाल्यांच्या कागदपत्रांतूनही शिवाजी पेटार्‍यातून निसटला अशा आशयाचे उल्लेख आलेले आहेत. मराठी बखरीमध्ये पेटार्‍यांचीच कथा रंगतदार करून सांगितलेली आढळते. फारसी तवारिखकार खाफीखान याने शिवाजी व त्याचा मुलगा दोघेही टोपल्यात बसून निसटून गेले असे लिहून ठेवलेले आढळते. या सर्व समकालीन साधनांचा मतितार्थ हाच की कैदेतून पळून जाण्यासाठी शिवाजीने मिठाईच्या पेटार्‍याचा उपयोग केला. पण या अनुमानाला दोन मोठे अपवाद आहेत. ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथाचा कर्ता साकी मुस्तैदखान हा लिहितो की, ‘आजारी पडण्याचा बहाणा करून ५२ छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी २७ सफर (१९ ऑगस्ट) रोजी मुलासह पळून गेला.' मुस्तैदखान हा औरंगजेबाचा दरबारी लेखक असल्यामुळे त्याचे विधान विचारात घेणे आवश्यक आहे. आणखी एक समकालीन पाश्चात्य प्रवासी बर्निअर याने लिहून ठेवले आहे की 'शिवाजीच्या पलायनामागे खुद्द औरंगजेबाचाच हात होता.' शिवाजीच्या सुटका नाट्याची मिमांसा करताना या विधानाचाही विचार करणे आवश्यक आहे. शिवाजीची आग्रा भेट आणि सुटका समजावून घेण्यासाठी आणखी महत्त्वाच्या साधनाचा विचार करावा लागतो. ते साधन म्हणजे राजस्थानी भाषेतील समकालीन पत्रे. या पत्रांमधून शिवाजी उत्तरेत आल्यापासून आग्राला जाईपर्यंत त्याच्या विषयीचे अनेक उल्लेख आलेले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजीची सुटका झाल्यानंतरचेही उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे. २३ ऑगस्ट १६६६च्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की 'रात्र एक दिड घटका राहिली असता पहारेकऱ्याने शिवाजीस पाहिले होते. परंतु नंतर अचानकपणे तो कसा निसटला हे त्याला समजले नाही.' ३ सप्टेंबरच्या पत्रात असा उल्लेख आहे की '४ घटिका दिवस वर आला तेव्हा शिवाजी निसटल्याचे समजले' या दोन्ही पत्रांचा अर्थ असा की शिवाजी पहाटेच्या अंधारात पहारा शिथिल असताना निसटून गेला असावा. म्हणजेच पहारेकरी बेसावध असतानाच शिवाजी संभाजीसह निसटला असला पाहिजे. कदाचित पहारेकऱ्यांनाच त्याने वश करून घेतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पहारेकऱ्यांना वश करून आणि अगोदरच जमवून ठेवलेले परवाने उपयोगात आणून शिवाजीने सुटका करून घेतली असावी असे म्हणता येईल. शिवाजी पेटाऱ्यातून निसटला हा निष्कर्ष खुद्द बादशहानेच काढला असावा हे ३ सप्टेंबरच्या राजस्थानी पत्रावरून दिसून येते. औरंगजेबाचा संताप शिवाजी एवढ्या मोठ्या कडक पहाऱ्यातून एकाएकी नाहिसा झाल्याचे वर्तमान पहाराप्रमुख फुलादखान याचेकडून औरंगजेबाला समजले. तेव्हा औरंगजेब अत्यंत संतप्त झाला. फुलादखानाने औरंगजेबास सांगितले की 'आम्ही वरचेवर कोठडीत जाऊन पहात होतो पण एकाएकी गहजब झाला. शिवाजी गायब जाहला. पळाला, की जमिनीत घुसला, की आसमानामध्ये गेला हे काहीच कळले नाही. देखत देखत नाहिसा झाला. काय हुन्नर जाहला न कळे.' हे सर्व ऐकून औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली त्याने ताबडतोब शिवाजी आणि औरंगजेब ५३

शिवाजीचा पाठलाग करून त्याला पकडण्यासाठी अडीच लाख स्वार पाठविले. सभासदाने दिलेली माहिती कदाचित अतिशयोक्तीची असली तरी शिवाजीचा पाठलाग करण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज पाठविली ही गोष्ट मात्र खरी. शिवाजी कैदेतून पळाला म्हणून औरंगजेबाने रामसिंगास जबाबदार धरले. त्याला बोलावून त्याचा पाणउतारा केला आणि त्याची मनसब एकदम कमी केली. शिवाजीबरोबर आलेल्या मराठ्यांपैकी जे लोक अद्याप परत गेले नव्हते आणि आग्रा किंवा जवळपास मुक्कामाला होते त्यांची त्वरेने धरपकड करण्यात आली. त्यामध्ये रघुनाथपंत कोरडे, दत्ताजी त्रिंबक, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आणि कवींद्र परमानंद ह्यांचा समावेश होता. जवळजवळ ८ महिने ही मंडळी औरंगजेबाच्या कैदेमध्ये होती. पुढे एप्रिल १६६७ मध्ये या साऱ्यांची सुटका करण्यात आली. शिवाजी राजगडाकडे परत शिवाजीला शोधण्यासाठी औरंगजेबाने फौजेची अनेक पथके वेगवेगळ्या मार्गांनी पाठविली. बहुधा शिवाजी वेषांतर करून हुलकावण्या देत असावा. कारण कोणत्याही तुकडीला त्याला शोधून काढता आले नाही. संभाजीबरोबर असल्यामुळे शिवाजीला त्याची काळजी वाटत होती. एक तर तो वयाने लहान होता. तो बरोबर असल्यामुळे शिवाजीचा माग शोधून काढणे शत्रूला सुलभ होते. तेव्हा शिवाजीने असा विचार केला की संभाजीला मथुरेत ठेवावे आणि आपण पुढे मार्गक्रमण करावे. मथुरेत असलेले शिवाजीचे निष्ठावंत सेवक कृष्णाजीपंत व काशीपंत यांच्या स्वाधीन संभाजीला करून शिवाजीने निर्धास्तपणे दक्षिणेचा मार्ग स्वीकारला. शिवाजी कोणत्या मार्गाने राजगडला परत आला याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. आग्राहून परत येताना दूरचा मार्ग शिवाजीने स्वीकारला असावा असे मत सर जदुनाथ सरकार यांनी दिलेले आहे. या मताप्रमाणे आग्रा-मथुरा- वाराणसी-प्रयाग-गोंडवण-हैद्राबाद या मार्गाने शिवाजी राजगडाकडे परतला असावा. परंतु समकालीन राजस्थानी कागदपत्रांवरून असे दिसते की शिवाजी ज्या मार्गाने आग्र्याला गेला त्याच मार्गाने राजगडाकडे परतला कारण आग्राहून निसटल्यावर तो नरवरच्या घाटापर्यंत आल्याचा उल्लेख एका राजस्थानी पत्रामध्ये आलेला आहे. आग्र्याला जाताना तो राजगड-औरंगाबाद-हंडिया- भोपाळ-सिरोज-नरवर-ग्वाल्हेर-धोलपूर-आग्र्याया मार्गाने औरंगजेबाच्या भेटीसाठी गेला होता. बहुधा त्याच मार्गाने तो राजगडाकडे परत आला असावा १२ ५४ छत्रपती शिवाजी महाराज

सप्टेंबर १६६६ रोजी निवडक लोकांसह शिवाजी राजगडला सुखरूप पोहचला. १९ ऑगस्ट रोजी त्याने स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यानंतर तब्बल २४ दिवसांनी तो राजगडला पोहचला. जर तो गोंडवण-हैद्राबाद मार्गाने आला असता तर त्याला अधिक दिवस लागले असते. शिवाजी राजगडला सुखरूप पोहचल्यानंतर राजमंडळामध्ये आणि कुटुंबियांमध्ये मोठा आनंद पसरला अष्टप्रधान मंडळ, इतर सर्व अधिकारी, राजगडवरील सर्व सेवक आणि मावळे यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. राजमाता जिजाबाई हिला औरंगजेबाच्या पोलादी पिंजऱ्यात अडकलेला आपला पुत्र तेथून निसटून सुखरूपपणे आपल्यापाशी परत आला याचा आनंद केवढा झाला असेल ते शब्दात सांगता येणार नाही. शिवाजी राजगडला सुखरूप पोहोचल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर १६६६ मध्ये कृष्णाजी पंताने संभाजीला राजगडावर आणले. तो येईपर्यंत शिवाजी राजगडला आल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली असावी. कारण जेधे शकावलीत असा उल्लेख आहे की 'मार्गशिर्ष शुद्ध पंचमी शके १५८८ (२० नोव्हेंबर १६६६) रोजी शिवाजी संभाजीसह वर्तमान राजगडास आले.' राजगडास आल्यानंतर शिवाजीने सवड न घेता आगामी मोहिमेची तयारी सुरू केली. □□□ शिवाजी आणि औरंगजेब ५५

८. चढाईचे राजकारण आग्याहून परत आल्यावर शिवाजी आग्याहून परत राजगडला आल्याचे वर्तमान नोव्हेंबर १६६६च्या अखेरीस सर्वत्र पसरले. शिवाजीच्या शत्रूंची मोठी तारांबळ उडाली. विजापूर दरबारात मोठी खळबळ माजली. वखारवाले इंग्रजांचे धाबे दणाणले. शिवाजीच्या सुटकेचा सर्वात मोठा धक्का दक्षिणेत असलेल्या मिर्झाराजे जयसिंगाला बसला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की तो आजारी पडला आणि त्यातच २८ ऑगस्ट १६६७ रोजी बन्हाणपूर येथे त्याचा मृत्यू झाला. बन्हाणपूर येथे तापी नदीचे काठी मिर्झाराजे जयसिंग यांची भव्य समाधी बांधलेली आजही दिसते. शिवाजी आग्याला अडकून पडला असताना त्याचे लहानसहान शत्रूही मोकाट सुटले होते. परंतु शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटला हे समजल्यावर त्याच्या बहुतेक शत्रूंनी आपले धोरण बदलले. सप्टेंबर १६६६ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तुमजमा याने रांगणा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. आदिलशहाला ही गोष्ट आवडली नाही. त्याने बहलोलखान या सरदाराला मराठ्यांविरुद्ध पाठविण्याचे ठरविले. शिवाजीचा सावत्रभाऊ व्यंकोजी राजे बहलोलखानच्या मदतीला धावून आला आणि त्या दोघांनी मिळून रांगणा किल्ला मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या जबरदस्त प्रतिकारामुळे त्यांना यश आले नाही. मराठे आपल्याला दाद देत नाहीत, आणि आता तर प्रत्यक्ष शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आला आहे, हे लक्षात घेऊन आदिलशहाने आपणहून शिवाजीशी सलोखा करण्याचे ठरविले. दरसाल दोन लाख होन खंडणी देण्याचे मान्य करून आदिलशहाने शिवाजीशी तह केला. कुतुबशहा हा तर प्रथमपासून सावध होता. शिवाजीशी शत्रुत्व नको म्हणून त्याने आपणहून शिवाजीशी मैत्रीचा तह केला आणि दरसाल पाच लाख होन खंडणी देण्याचे कबुल केले. यावरून आग्याहून परत आल्यानंतर शिवाजीचा दरारा केवढा निर्माण झाला होता याची कल्पना येते. आदिलशहा आणि ५६

कुतुबशहा यांच्याशी मैत्रीचे तह झाल्यावर मुघलांशिवाय कोणी मोठा शत्रू शिवाजीला उरला नाही. पोर्तुगीज आणि इतर पाश्चात्त्य वखारवाले अधून मधून शिवाजीच्या वाटेला जात होते. त्याशिवाय जंजिऱ्याचे सिद्दी हे समुद्रावर सत्ता गाजवत असल्याने त्यांचे आव्हानही शिवाजीसमोर होते. सिद्दी काय, पोर्तुगीज काय किंवा पाश्चात्त्य वखारवाले काय, यांना कह्यात आणायचे असेल तर आपले स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार उभारणे आवश्यक आहे, हे शिवाजीने ओळखले होते. आरमाराची उभारणी जावळीचे खोरे जिंकल्यानंतर रायगडसारखा दुर्गम किल्ला शिवाजीच्या ताब्यात आला आणि त्याच्या राज्याची सरहद्द समुद्रापर्यंत जाऊन भिडली. इ.स. १६५७ मध्ये कल्याण, भिवंडी जिंकल्यानंतर किनारपट्टीतील आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी आपण स्वतंत्र आरमार उभारले पाहिजे याची जाणिव शिवाजीला झाली होती आणि म्हणून इ.स. १६५७ मध्येच आरमार बांधणीस त्याने सुरुवात केली. पोर्तुगीज पत्रव्यवहारावरून असे दिसते की आरमार उभारण्यामध्ये प्रारंभीच्या काळात पोर्तुगीज तंत्रज्ञांनी शिवाजीला मदत केली होती. १६५७ ते १६५९ या दरम्यान शिवाजीने २० जहाजे तयार केली. १६५९ मध्ये अफझलखानाचा वध झाल्यानंतर किनारपट्टीचा आणखी प्रदेश शिवाजीला मिळाला. इ.स. १६६४ मध्ये चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रावरून शिवाजीचे आरमारी सामर्थ्य बरेच वाढले होते असे दिसते. शिवाजीची राजनीती अशी होती की, किनारपट्टीचा जेवढा-जेवढा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली येईल, तेवढ्या प्रमाणात आरमारी सामर्थ्यामध्ये वाढ झाली पाहिजे असा त्याचा हिशेब होता. आपल्या आरमारी सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी शिवाजीने इ.स. १६६५ मध्ये बसनूरची स्वारी काढली आणि त्यात तो यशस्वी झाला. थोडक्यात जयसिंगाची स्वारी होण्यापूर्वी आणि शिवाजीची आग्राभेट होण्यापूर्वी मराठ्यांचे आरमार चांगलेच आकाराला आले होते. आग्र्याहून परत आल्यानंतर आरमारी सामर्थ्य अधिक बळकट करण्याचा निर्णय शिवाजीने घेतला. १६६७ मध्ये शिवाजीने आपले आरमारी सामर्थ्य एवढे वाढविले की गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरांना एका पत्रात 'शिवाजीचे आरमार आता भीतीदायक वाटते. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे शिवाजीने आरमार तर वाढविलेच पण किनाऱ्यावर किल्लेही बांधले.' असे म्हटलेले आढळते. वरकरणी मात्र पोर्तुगिजांनी शिवाजीबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले चढाईचे राजकारण ५७

होते. आग्र्याहून शिवाजी सुखरूप परत आल्यानंतर त्याचे अभिनंदन करण्यासाठी गोवेकरांनी एक खास वकीलही पाठविला होता. परंतु अंतःस्थपणे पोर्तुगिजांच्या शिवाजीविरुद्ध कारवाया चालू होत्या. पोर्तुगीजांच्या कारवाया शिवाजीने आरमारी सामर्थ्य वाढविल्यामुळे पोर्तुगिजांना शिवाजीच्या हेतूविषयी संशय वाटू लागला होता. विशेषतः शिवाजीने सुरत लुटल्यानंतर पोर्तुगिजांना अधिक काळजी वाटू लागली होती. सुरतेची लूट स्वराज्यात आणताना शिवाजीला पोर्तुगिजांनी मदत केली होती, असा निष्कर्ष पोर्तुगीज दप्तरातील पत्रव्यवहारावरून निघतो. शिवाजीच्या सामर्थ्याला पोर्तुगीज वचकून होते. पण त्याचबरोबर शिवाजीची नजर आपल्या राज्याकडे केव्हा वळेल याची भीतीही त्यांना वाटत होती. म्हणूनच वरकरणी पोर्तुगिजांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. तथापि, शिवाजीच्या विरोधकांना मदत करण्याचे धोरणही त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे हे दुटप्पी वर्तन शिवाजी ओळखून होता. कुडाळचे देसाई शिवाजीला विरोध करण्यामध्ये आघाडीवर होते. वास्तविक पाहाता कुडाळचा लखम सावंत याचा पराभव करून शिवाजीने त्याला चांगलाच धडा शिकविला होता. त्याने शिवाजीबरोबर तह करून अभयदान मिळविले होते. परंतु शिवाजी आग्र्याकडे गेल्यानंतर लखम सावंताने आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या. विशेषतः पोर्तुगिजांची फूस असल्यामुळे लखम सावंत शिवाजीच्या प्रदेशावर हल्ले करण्यास उद्युक्त झाला. आग्र्याहून परतल्यानंतर लखम सावंतचे उद्योग आणि पोर्तुगिजांच्या कारवाया शिवाजीच्या लक्षात आल्या. तेव्हा लखम सावंतला धडा शिकविण्यापेक्षा पोर्तुगिजांनाच धडा शिकवावा असे शिवाजीने ठरविले. त्याप्रमाणे नोव्हेंबर १६६७च्या पहिल्या आठवड्यात पोर्तुगिजांच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून शिवाजीने पोर्तुगिजांना नामोहरम केले. शिवाजीचा प्रतिकार करणे आपल्याला जमणार नाही आणि प्रतिकार जर केला तर शिवाजी थेट गोव्यापर्यंत येऊ शकेल अशी भीती पोर्तुगिजांना वाटू लागली. आणि म्हणून त्यांनी शिवाजीबरोबर तह केला. या तहाप्रमाणे लखम सावंताला पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरले. अशा प्रकारे आदिलशहा आणि कुतुबशहानंतर पोर्तुगिजांनीही शिवाजीचे श्रेष्ठत्व मान्य केले. मुअज्जमची भूमिका दक्षिणेचा मुघल सुभेदार म्हणून शाहजादा मुअज्जम मे १६६७ मध्ये ५८ छत्रपती शिवाजी महाराज

औरंगाबादला रुजू झाला. आग्र्याहून सुटका करून शिवाजी दक्षिणेत परत आल्यावर मुघलांच्या राजकारणात फरक घडून येऊ लागला. शिवाजी आता निसटलाच आहे, तेव्हा ह्याच्याशी वैर करण्यापेक्षा शक्यतो समझोता करावा असे खुद्द औरंगजेबाला वाटू लागले होते. विशेषतः मिर्झाराजे जयसिंग मृत्यू पावल्यामुळे औरंगजेबाला दक्षिणेचे राजकारण आक्रमक स्वरूपाचे करून चालणार नाही असे वाटू लागले. शाहजादा मुअज्जम हा स्वतः ऐषआरामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजीशी लढा देण्यापेक्षा सामोपचाराचे धोरण स्वीकारावे असे त्याचे मत होते. शिवाय संभाजीला मनसबीच्या जाळ्यात पकडून काही कूरघोडी करता येईल का या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. संभाजीला पुन्हा मनसब द्यावी म्हणून त्याने औरंगजेबाचीही परवानगी मिळवली आणि त्याप्रमाणे नोव्हेंबर १६६७ मध्ये संभाजीला औरंगाबादेला बोलाविले मुअज्जमने समारंभपूर्वक संभाजीला मनसबदारी बहाल केली. संभाजी वयाने लहान असल्यामुळे त्याच्यातर्फे मन्सबीची जबाबदारी निराजी रावजी आणि प्रतापराव गुजर यांनी सांभाळावी असेही ठरले. अशा प्रकारे मराठ्यांशी सख्य जोडण्याचा उपक्रम मुअज्जमने सुरू केला होता. परंतु दिल्लीत औरंगजेबाला मुअज्जमच्याच हेतूविषयी शंका वाटू लागली. मराठ्यांच्या मायाजालात मुअज्जम जर फसला तर दक्षिणेतील राजकारणाचा धागा तुटून जाईल अशी भीती औरंगजेबाला वाटू लागली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी निघून गेल्यामुळे तो अत्यंत बेचैन झाला होता. सूड म्हणून हिंदू जमातीवर जिझिया कर बसविण्याचे त्याने ठरविले. वास्तविक पाहाता हा जाचक कर अकबराने विचारपूर्वक बंद केला होता. परंतु औरंगजेबाने मात्र हेतुपुरस्सर हिंदूंवर जिझिया कर बसविला. शिवाजी त्यामुळे उद्विग्न होईल अशी औरंगजेबाची अपेक्षा होती. गरीब सामान्य हिंदू रयतेवरती हा जुलमी कर बादशहाने बसविला ही गोष्ट शिवाजीच्या मनाला क्लेशदायक वाटली. त्याने औरंगजेबाला लिहिलेले फारसी भाषेतील एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रावरून शिवाजीच्या उदार धार्मिक धोरणाविषयी आणि त्याच्या थोरपणाविषयी कल्पना येते. त्याने या पत्रात उल्लेख केला आहे की, ‘हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही परमेश्वराची लेकरे आहेत. मंदिरामध्ये हिंदू घंटानाद करतात, तर मशिदीमध्ये मुसलमान ईश्वराला बांग देतात. सृष्टी हे परमेश्वराने निर्माण केलेले एक सुंदर चित्र आहे.’ अशा आशयाचा मजकूर लिहून शिवाजीने औरंगजेबाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने मात्र आपली भूमिका अधिक ताठर करून सुरतेच्या हिंदू व्यापाऱ्यांवर अधिक जकात बसविली. हिंदूंना डिवचण्यासाठी १६६९च्या सुमारास काशी येथील चढाईचे राजकारण ५९

देवालय औरंगजेबाने पाडले. आणि त्या ठिकाणी मशीद उभारली. अशा प्रकारच्या औरंगजेबांच्या ताठर धोरणामुळे उत्तर भारतात सर्वसामान्य हिंदूंमध्ये अस्वस्थता पसरली. सुरतेमधील जवळ जवळ ८००० हिंदू बादशहाकडे दाद मागण्यासाठी दिल्लीकडे गेले, असा उल्लेख एका समकालीन पत्रामध्ये आढळतो. दक्षिणेत दहशत निर्माण करण्यासाठी औरंगजेबाने मुअज्जमला असे कळविले की, प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी या दोघांनाही कैद करावे. मुअज्जमला मात्र बादशहाच्या या घातकी धोरणाबद्दल चीड आली होती. त्याने कोणालाही कैद वगैरे केले नाही. उलट मराठ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या प्रदेशात जाऊ दिले. वास्तविक पाहता शिवाजीची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर सलोख्याचे राजकारण जर औरंगजेबाने केले असते तर शिवाजीनेही मुघलांबाबत सामोपचाराचे धोरण स्वीकारले असते. संभाजीला मन्सब घेण्यासाठी पाठवून शिवाजीने आपले सामोपचाराचे धोरण स्पष्ट केले होते. औरंगजेबाने हिंदूवर जिझियाकर लादलेला ऐकून एक सविस्तर पत्र पाठवून सामान्य रयतेची छळवणूक करू नये अशी तळमळीची विनंती शिवाजीने बादशहाला केली होती. परंतु संपूर्ण दक्षिण आपल्या स्वामित्वाखाली आणण्याचा मनसुबा औरंगजेबाने रचलेला होता आणि म्हणून शिवाजीच्या सामोपचाराच्या धोरणाला त्याने दाद दिली नाही. शिवाजीची आक्रमक भूमिका औरंगजेबाने सामोपचाराचे धोरण सोडून देऊन आपल्याविरुद्ध छुपे राजकारण सुरू केले, आपले निष्ठावंत सरदार निराजी रावजी व प्रतापराव गुजर यांना विश्वासघाताने कैद करण्याचा डाव रचला हे पाहून शिवाजीनेही मुघलांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले आणि केवळ घाटावर व कोकणातच नव्हे तर बागलाण, खानदेश, वऱ्हाड, मराठवाडा इत्यादी मुघलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर आक्रमक हल्ले करण्याचे धोरण आखले. पुरंदरच्या तहामुळे जो प्रदेश गमावला आणि जे किल्ले गमावले आहेत ते पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवाजीने योजना आखली. पुण्याजवळ असलेला सिंहगड हा किल्ला स्वराज्याचे प्रवेशद्वारच होते. तेव्हा तो किल्ला प्रथम जिंकून घेण्याचे शिवाजीने ठरविले आणि त्याप्रमाणे ४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवाजीने तानाजी मालुसरे याला पाठवून सिंहगड जिंकून घेतला. हा अभेद्य किल्ला जिंकून घेण्यासाठी तानाजीला वीरमरण पत्करावे लागले. पुण्याजवळ घाटमाथ्याच्या तोंडाशी असलेला दुसरा ६० छत्रपती शिवाजी महाराज

किल्ला म्हणजे पुरंदर होय. हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याला पुणे शहराची, विशेषतः स्वराज्याची नाकेबंदी करता येणे सहज शक्य होते. त्यामुळे सिंहगड पाठोपाठ पुरंदरचा किल्ला ताब्यात घेण्याचे शिवाजीने ठरविले. शिवाजीने निळोपंतांना पुरंदरचा किल्ला जिंकण्यास पाठविले. ८ मार्च १६७० रोजी निळोपंतांनी हा किल्ला जिंकून घेतला. अशा प्रकारे शिवाजीने अवघ्या दोन महिन्यात दोन महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची झोप उडाली. हे किल्ले जिंकण्यापूर्वीच वऱ्हाड प्रदेशात जानेवारी १६७० मध्ये मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर जुन्नर-नगर पासून थेट औरंगाबादपर्यंत आणि तेथून मराठवाड्यात परिंडा-औसा पर्यंत आक्रमण करून मराठ्यांनी मुघलांची दाणादाण केली. पुरंदरच्या तहाप्रमाणे जे २३ किल्ले मुघलांना देण्यात आले होते ते एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा मराठ्यांनी सपाटा सुरू केला. ३ मे १६७० रोजी लोहगड जिंकून घेतला, तर १६ जून रोजी माहुली जिंकून घेतला. त्यानंतर एकाच आठवड्यात २२ जून रोजी कर्नाळा आणि २४ जून रोजी रोहिडा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले. अशा प्रकारे १६७०च्या पावसाळ्यापर्यंत पराक्रमाची शर्थ करून मराठ्यांनी पुरंदरच्या तहाचा कलंक धुवून काढला. केवळ किल्ले जिंकून मराठे थांबले नाहीत, तर मुघलांच्या ताब्यात गेलेली महत्त्वाची ठाणीही त्याने एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा उद्योग सुरू केला. कल्याण हे कोकणातील महत्त्वाचे ठाणे मराठ्यांनी जिंकून घेतले. अशाप्रकारे शिवाजीचे हे आक्रमक धोरण पाहून औरंगजेबाला शिवाजीविरुद्ध काहीतरी जालीम राजकारण केले पाहिजे असे वाटू लागल्यास नवल नाही. आदिलशहाला आणि किनारपट्टीवर असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना आपल्या बाजूस वळवून शिवाजीविरुद्ध डावपेच लढविण्यास त्याने सुरुवात केली. त्यानुसार त्याने पाश्चात्य वखारवाल्यांना आणि आदिलशहा यांना फर्माने पाठविली परंतु हे सर्व होईपर्यंत पावसाळा सुरू झाला. मराठ्यांनी आपले चढाईचे राजकारण स्थगित केले आणि पावसाळ्याच्या दिवसात शिवाजीविरुद्ध हालचाली करणे धोकादायक आहे हे मुघलांना माहित असल्यामुळे तेही स्वस्थ बसले. सुरतेची दुसरी लूट १६७०चा पावसाळा थांबला आणि शिवाजीने लगेच पुन्हा चढाईचे राजकारण सुरू केले. मुघलांना नामोहरम करण्यासाठी अचानकपणे सुरतेवर छापा घालण्याचे त्याने ठरविले. या सुरतेच्या स्वारीपाठीमागे शिवाजीचे प्रमुख दोन उद्देश होते. एक म्हणजे सुरतेवर स्वारी केल्यामुळे औरंगजेबाला जबरदस्त चढाईचे राजकारण ६१

धक्का देता येईल आणि मुघलांची नाचक्की होईल. दुसरा उद्देश म्हणजे आपल्याविरुद्ध मुघलांना मदत करण्यास उद्युक्त असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना धक्का बसेल. याशिवाय तिसरा उद्देश म्हणजे सुरतेची पुन्हा लूट करून संपत्ती आणता येईल. या दुसऱ्या स्वारीच्या वेळी शिवाजीने किनारपट्टीचा मार्ग निवडला होता. ३ व ४ ऑक्टोबर १६७० रोजी त्याने सुरतेवर अचानक हल्ला केला आणि सुमारे ६६ लाख रुपयांची लूट केली. या लुटीच्या वेळी शिवाजीने डच आणि इंग्रज यांना बहुधा अंतःस्थपणे कौल (संरक्षण) दिला असावा. कारण इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये आणि डचांच्याही पत्रव्यवहारामध्ये ‘शिवाजीने आम्हाला कसलाही त्रास दिला नाही' अशा आशयाचे उल्लेख आलेले आहेत. ही लूट परत घेऊन जाताना किनारपट्टीच्या ऐवजी खानदेश-बागलाणच्या मार्गाने जाण्याचे शिवाजीने ठरविले होते. वणी-दिंडोरीची लढाई सुरतेची स्वारी आटोपून आणि बरोबर लुटीची संपत्ती घेऊन शिवाजी खानदेश-बागलाण मार्गाने स्वराज्याकडे मार्गाक्रमण करू लागला. यावेळी खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान पन्नी हा होता. शिवाजीशी सामना देण्यासाठी त्याने जय्यत तयारी केली. बागलाणातून मार्गाक्रमण करीत असताना शिवाजीला वणी-दिंडोरीच्या परिसरात दाऊदखानाने अडविले. १७ ऑक्टोबर १६७० रोजी कंचन-मंचनच्या घाटाजवळ मुघल आणि मराठे यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धामध्ये मराठ्यांनी मुघलांचा दणदणीत पराभव केला. सभासदाने आपल्या बखरीमध्ये वणी-दिंडोरीच्या लढाईचे तपशिलाने वर्णन दिलेले आहे. मराठ्यांनी या लढाईत शानदार विजय संपादन केला मात्र औरंगजेबाचा दरबारी लेखक भीमसेन सक्सेना याने ‘या लढाईत मराठ्यांची हार झाली व ते पळून गेले' असे लिहून ठेवले आहे. दरबारी लेखक औरंगजेबाच्या समजुतीसाठी मुद्दाम खोटे लिहून ठेवत असावेत. बऱ्हाणपूरपर्यंत मराठे वणी-दिंडोरीची लढाई झाल्यानंतर शिवाजीने मुघलांबरोबरचे आक्रमक धोरण अधिक तीव्र केले. दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या बऱ्हाणपूर पर्यंत मजल मारून औरंगजेबाला आणखी एक धक्का देण्याचे शिवाजीने ठरविले. या योजनेप्रमाणे डिसेंबर १६७० पर्यंत मराठ्यांनी थेट बऱ्हाणपूरपर्यंत मजल मारली. तेथून साधारणपणे दोन मैल अंतरावर असलेली बहादरपूरा ही पेठ मराठ्यांनी ६२ छत्रपती शिवाजी महाराज

लुटली. खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान याला ती बातमी कळल्यानंतर तो मोठ्या तयारीनिशी बऱ्हाणपूराकडे निघाला. परंतु मराठ्यांचा वेग एवढा मोठा होता की बहादूरपूरा लुटून अतिशय शिघ्र गतीने ते बागलाणपर्यंत पोहचले याचा अर्थ दाऊदखान बऱ्हाणपूरपर्यंत पोहचण्याअगोदरच त्याला झुकांडी देऊन मराठे खानदेश सुभ्यामध्ये घुसले आणि बागलाणमधील मुल्हेर किल्ल्याजवळची पेठ त्यांनी लुटली. ही बातमी कळल्यावर दाऊदखान अधिकच चवताळला आणि मोठ्या शिघ्र गतीने तो बागलाणकडे परतला. परंतु दरम्यान ५ जानेवारी १६७१ रोजी मराठ्यांनी मुल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. या सगळ्या बातम्या समजल्यामुळे औरंगजेब अतिशय बेचैन झालेला होता. शिवाजीचा पुढचा बंदोबस्त करण्यासाठी महाबतखान नावाच्या पराक्रमी सरदारास त्याने दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविले. महाबतखानाची मोहीम जानेवारी १६७१ मध्ये बऱ्हाणपूर ओलांडून महाबतखान दक्षिणेत आला. औरंगाबादकडे जाताना खानदेशचा सुभेदार दाऊदखान याच्या बरोबर मोहिमेच्या आखणीबाबत त्याने चर्चा केली. नंतर औरंगाबादेत जाऊन शाहजादा मुअज्जम याला तो भेटला. आपल्या मोहिमेमध्ये बागलाण प्रदेशावर प्रथम वर्चस्व निर्माण करण्याचे धोरण त्याने आखले. त्याच्याबरोबर नव्या दमाचे सैन्य होते. त्याचप्रमाणे दिलेरखानही त्याच्या मदतीसाठी मोठे सैन्य घेऊन आला. शिवाय दाऊदखान पन्नी याचेही सैन्य त्याच्या दिमतीस होते. दाऊदखानच्या सैन्यास बागलाणमधील किल्ले लढविण्याचा अनुभव होता. अशाप्रकारे मोठी तयारी झाल्यावर महाबतखानाने वेगवेगळ्या तुकड्या बागलाणातील किल्ले जिंकून घेण्यासाठी पाठविल्या. अहिवंत, हातगड आणि मार्कंडा हे किल्ले अल्पावधीत जिंकून घेऊन मुघलांनी बागलाणमध्ये पुन्हा प्रभाव निर्माण केला. बागलाणमधील कण्हेरागड या किल्ल्याच्या पायथ्याशी मराठे व मुघल यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धात रामजी पांगेरा या मराठी सरदाराने पराक्रमाची शर्थ केली. सभासद लिहितो, 'एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले'. त्याचा पराक्रम पाहून दिलेरखानही चकीत झाला असा उल्लेख सभासदाने आपल्या बखरीत केलेला आहे. बागलाणमधील महत्त्वाचे किल्ले ताब्यात आल्यानंतर महाबतखानाने आपल्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. या योजनेप्रमाणे मराठ्यांना बागलाणच्या प्रदेशात गुंतवून ठेवायचे आणि दिलेरखानाने शिवाजीचे प्रमुख केंद्र असलेल्या पुणे शहरावर हल्ला करायचा चढाईचे राजकारण ६३

असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे जानेवारी १६७२ च्या सुमारास दिलेरखानाच्या फौजा पुण्याकडे मार्गक्रमण करू लागल्या. परंतु यावेळी मराठ्यांनी आत्मसंरक्षणाची कडेकोट तयारी केलेली होती आणि बागलाणमधून मुघलांना माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी चौफेर हल्ले करण्याची योजना मराठ्यांनी आखली होती. प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य बागलाणमध्ये उतरले. अटीतटीचा प्रसंग आला तर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी बागलाणात जाऊन किल्ले जिंकण्यास मदत करावी असे ठरविण्यात आले. दरम्यान मुघलांतर्फे इखलासखान याने साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. यावेळी रोमहर्षक युद्ध झाले. मराठ्यांतर्फे सूर्यराव काकडे याने एवढा पराक्रम गाजविला की मुघलांना माघार घेण्याशिवाय इलाज उरला नाही. तथापि अचानकपणे तोफेचा एक गोळा सुर्यराव काकड्यास लागला आणि तो धारातिर्थी पतन पावला. परंतु मराठ्यांनी धीर सोडला नाही. ठरल्याप्रमाणे मोरोपंत पिंगळे कोकणातून प्रतापराव गुजराच्या मदतीसाठी बागलाणात आले. आणि या सर्वांनी मिळून मुघलांचा वेढा मोडून काढला. साल्हेरचा वेढा सोडून मुघलांनी माघार घेतली. फेब्रुवारी १६७२ मध्ये मुल्हेरचा किल्ला जिंकून घेऊन संपूर्ण बागलाणवर मराठ्यांनी पुन्हा पकड निर्माण केली. मराठ्यांच्या चौफेर पराक्रमाच्या वार्ता ऐकून दिलेरखानालाही पेचात सापडल्यासारखे वाटले. पुण्यापेक्षा बागलाणवरच प्रभाव निर्माण केला पाहिजे कारण तो प्रदेश आपल्या हातचा गेला तर दक्षिणेतील मुघल सत्ता धोक्यात येईल असा विचार करून दिलेरखानाने पुण्याची मोहिम सोडली आणि बागलाणकडे तो परतला. मुघलांची ही पिछेहाट झालेली पाहून औरंगजेब अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्याने मुअज्जम व महाबतखान यांना उत्तरेत परत बोलाविले. दिलेरखानाबाबतही तो नाराज झाला होता. मुघल फौजेतील अनेक मराठे सरदार शिवाजीच्या आश्रयाला येऊ लागले होते. सिद्दी हिलाल, जाधवराव इत्यादी सरदार आपापल्या फौजा घेऊन शिवाजीच्या आश्रयास आले. अशाप्रकारे १६७२ च्या प्रारंभी शिवाजीने मुघलांच्याच प्रदेशात विशेषतः बागलाण भागात आपले प्रभुत्व निर्माण केले आणि बागलाणातील किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची खानदेश बागलाणमार्गे पुण्याकडे होणारी आक्रमणे थोपविणे मराठ्यांना सहजशक्य झाले. छत्रसाल आणि शिवाजी शिवाजी आग्र्याहून परत आल्यानंतर त्याच्या पराक्रमाविषयी उत्तर भारतातील लोकांना मोठे कुतूहल वाटू लागले. विशेषतः रजपूतांना शिवाजीच्या धाडसी ६४ छत्रपती शिवाजी महाराज

आणि आक्रमक प्रवृत्तीचे विशेष कौतुक वाटले. चंपतराय बुंदेले याचा मुलगा छत्रसाल हा औरंगजेबाच्या प्रशासनामध्ये काम करीत होता. शिवाजीचे बाणेदार वर्तन पाहून तो बेहद खूष झाला. शिवाजीने दक्षिणेत ज्याप्रमाणे एक स्वतंत्र राज्य स्थापन केले, त्याप्रमाणे आपल्याला उत्तर भारतात करता येईल का असा एक महत्त्वाकांक्षी विचार त्याच्या मनामध्ये आला. या विचाराने तो एवढा भारला की त्याने मुघलांची मनसबदारी सोडून दिली आणि दक्षिणेत शिवाजीच्या भेटीसाठी तो आला. भीमसेन सक्सेना याने ‘तारिखे दिलकशा’ या ग्रंथामध्ये छत्रसाल आणि शिवाजी यांच्या भेटीचा तपशील दिलेला आहे. छत्रसालाने शिवाजीकडून प्रेरणा घेतली आणि उत्तर भारतात जाऊन संधी येताच स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा निर्धार केला. १६७२ पर्यंत शिवाजीने दक्षिणेतील आपल्या सर्व शत्रूंना नामोहरम करून सोडले. मुघलांशी शिवाजीचा सामना चालू असतांना आदिलशहा, कुतूबशहा, पोर्तुगीज आणि अन्य वखारवाले शिवाजीच्या विरोधात गेले नाहीत. आपले स्वराज्य चारी बाजूंनी सुरक्षित करण्यासाठी शिवाजी कसोशीने प्रयत्न करीत होता. कारण आपली सत्ता निर्वेध झाल्यानंतर स्वतःला राज्याभिषेक करवून घेण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागला होता. 🞎🞎🞎 चढाईचे राजकारण ६५